Author: अनंत पांगारकर
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क नाशिक : घराची परिस्थिती हलाखीची. त्यातच दुष्काळात तेरावा म्हणतात तसे अचानक दोन्ही पायाचे खुबे अकाली निकामी झालेले. अनेक दवाखान्यांत घिरट्या घातल्या मात्र कुठे खर्च परवडेनासा तर कुठे निदान होत नव्हते. अखेर कंटाळून पुन्हा ते घरी परतले. यानंतर एसएमबीटी रुग्णालयात दाखल झालेल्या या रुग्णाचे दोन्हीही पायाच्या खुब्यांवर यशस्वी सांधेरोपण करण्यात आले. विशेष म्हणजे रुग्ण आता हालचालदेखील करू शकत असून नेहमीप्रमाणे चालू शकतो आहे. या रुग्णावर यशस्वी शस्रक्रिया झाल्यानंतर डॉक्टरांचे रेखाटलेले हुबेहूब छायाचित्र भेट देऊन या रुग्णाने अनोखे आभारप्रदर्शन केले. घटना आहे जळगाव जिल्ह्यातील भुसावळ येथील मूळ रहिवाशी असलेले संदीप मुरलीधर बोधडे यांची. बोधडे सध्या कुटुंबीयांसोबत नाशिक जिल्ह्यातील…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क नागपूर : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात सोमवारी सकाळी मॉर्निंग वॉक करत असताना पाय घसरून पडल्याने त्यांच्या डाव्या खांद्याला गंभीर दुखापत झाली आहे. उपचारासाठी विशेष विमानाने नागपूरहून त्यांना मुंबईला आणण्यात येत असल्याची माहिती मिळते. https://twitter.com/bb_thorat/status/1607287654697295876?t=0RxvLgFB82zgejUx8xVgfQ&s=19 सध्या हिवाळी अधिवेशन सुरू असून थोरात अधिवेशनासाठी नागपूरमध्ये आहे. सोमवारी सकाळी ते मॉर्निंग वॉक करत असताना पाय घसरून खाली पडले. यावेळी त्यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे. त्यांचा हात फ्रॅक्चर झाल्याची माहिती मिळत असून त्यांची तातडीने अधिवेशनासाठी तैनात असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केली. त्यानंतर त्यांना नागपूरच्या मेयो रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तेथे थोरात यांची वैद्यकीय…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क अहमदनगर : कुंभार समाजाला वीटभट्टी व्यवसाय सुलभरीत्या करता येईल, यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असल्याचे आश्वासन अहमदनगरचे पालकमंत्री व राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी वीटभट्टी व्यावसायिकांच्या शिष्टमंडळाला दिले. शिष्टमंडळाच्या वतीने यावेळी पालकमंत्री विखे पाटील यांचा सत्कार करण्यात आला. शासनाने लाभलेल्या विविध जाचक अटी आणि वीट भट्टी चालकांच्या प्रश्नासंदर्भात पालकमंत्री विखे यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक पार पडली. यावेळी जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, अप्पर जिल्हाधिकारी सुहास मापारी यांच्यासह वीटभट्टी चालक उपस्थित होते. वीट भट्टी व्यवसाय संदर्भात येणाऱ्या अनेक अडचणी, माती वाहतूक, बिगर शेती अट, कामगारांचे प्रश्न यावेळी मंत्री महोदयांसमोर शिष्टमंडळाने उपस्थित केले. यातून मार्ग काढून हा व्यवसाय…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क ‘बेशरम रंग’ या गाण्यामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या पठाण चित्रपटाबद्दल मोठी माहिती समोर येत आहे. चित्रपटावर सर्वत्र टीका जरी होत असली तरी या चित्रपटाचे ओटीटी हक्क खूपच मोठ्या म्हणजेच तब्बल दोनशे कोटी किमतीला विकले गेले आहेत. वादाच्या भोवऱ्यात अडकूनही एवढ्या मोठ्या किमतीला ‘पठाण’चे ओटीटी अधिकार विकले गेल्याने अनेक जण थक्क झाले आहेत. शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण यांचा पठाण हा चित्रपट यामुळे पुन्हा एकदा चांगलाच चर्चेत आला आहे. हा चित्रपट नव्या वर्षात २५ जानेवारी रोजी चित्रपट गृहात प्रदर्शित होणार आहे. चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच त्यातील गाण्यामुळे वादात अडकला. त्यामुळे बायकॉट पठाणचे नारे सुरू असताना त्याचे ओटीपी हक्क मात्र…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क संगमनेर : भारतीय क्रिकेट नियामक मंडळांतर्गत मुलींच्या पंधरा वर्षाखालील महाराष्ट्र क्रिकेट संघात मूळची देवकौठेची असलेली सुहानी भारत कहांडळ हिची उपकर्णधारपदी निवड झाली असून रांची व जयपूर येथे खेळल्या जाणाऱ्या नॅशनल लिगमध्ये ती महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करणार आहे. भारत नवनाथ कहांडळ हे पुणे येथे आयटी कंपनीमध्ये नोकरी करत आहेत. त्यांची सुहानी कन्या आहे. लहानपणापासून सुहानीला क्रिकेटची आवड होती. तिच्यातील कलागुण हेरून भारत कहांडळ व चुलते माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांचे जनसंपर्क अधिकारी नामदेव कहांडळ यांनी तिला क्रिकेटसाठी प्रोत्साहित केले. इयत्ता नववीमध्ये शिकणारी सुहानी ही सलामीची आक्रमक फलंदाज असून उजव्या हाताने ऑफ स्पिन गोलंदाजी करते. सुहानी सध्या…
रविवार विशेष | प्रवीण पुरो मराठी शब्दकोषात निर्लज्जपणा या शब्दाचा अर्थ निलाजरेपणा असा निघतो. लायक नसलेला म्हणजे नालायक. पण त्याला नालायक म्हणू नये. निलाजरेपणा चालेल पण निर्लज्ज म्हणू नये. निलाजरेपणा हा त्यातल्या त्यात सौम्यता दर्शवतो. दोन्हींचा अर्थ सारखाच. पण तो उच्चारण्याची पध्दत त्याची तीव्रता दर्शवत असते. वेळ आणि काळानुसार त्या शब्दांची तीव्रता नोंदली जाते. गरजेप्रमाणे असे शब्द वापरले जावेत. मुळात असंसदीय असलेले असे शब्द संसदीय की असंसदीय हे त्या त्या परिस्थितीनुसार ठरतात. राज्य विधानमंडळात असंसदीय असूनही अशा शब्दांचा वापर सर्रास केला जातो. जयंत पाटलांचं निलंबन करण्याची मागणी करणार्या प्रत्येकाच्या तोंडी याहून कठोर असंसदीय शब्द उच्चारले गेलेत. मुंबईला सोन्याची अंडी देणारी…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क संगमनेर : युवा सेना प्रमुख आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी शिवसेनेतील मुस्लिम मावळा म्हणून गौरविलेल्या संगमनेरमधील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या शाखाप्रमुखाला अज्ञात व्यक्तीने दिलेल्या एका पत्राद्वारे जीवे मारण्याची धमकी दिली आहे. शहर पोलीस ठाण्यात या संदर्भात भारतीय दंड संहितेच्या कलम 507 नुसार नुसार अज्ञात व्यक्ती विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवसेना शाखाप्रमुख अजित याकूब मोमीन यांनी संगमनेर शहर पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, एका अज्ञात इसमाने मोमीनपुरा येथील घरी एक पत्र आणून दिले असल्याची माहिती मोमीन यांच्या मोठ्या भावाने त्यांना मोबाईलवर दिली. फिर्यादी मोमीन यांनी सदरचे पत्र बघितले असता त्याचे पाकीट…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क अहमदनगर : २०२२-२३ या वर्षासाठी जिल्ह्यात विविध कामांकरिता ७५३.५२ कोटी रुपयांचा नियतव्यय मंजूर करण्यात आला आहे. यातून जिल्ह्यात विविध विकासाची कामे दर्जेदार आणि गुणवत्ता पूर्ण करा तसेच संपूर्ण निधी खर्च होईल, यादृष्टीने नियोजन करण्याच्या सूचना देत पदवीधर मतदार संघाची आचारसंहिता लागू होण्याची शक्यता लक्षात घेता प्रत्येक विभागाने प्रशासकीय मान्यतेचे प्रस्ताव येत्या तीन दिवसात सादर करण्याचे निर्देश महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी यंत्रणांना दिले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत मंत्री विखे पाटील यांच्या उपस्थितीत आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. खासदार सदाशिव लोखंडे, खासदार सुजय विखे पाटील, आमदार प्रा. राम…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क संगमनेर : सुसंस्कृत राजकारण आणि सातत्याने होत असलेला येथील विकास काही लोकांना बघवत नाही, त्यामुळे त्यांचे त्रास देण्याचे काम सुरू आहे. सत्ता येते आणि जातेही, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर पुन्हा एकदा एका दिवसात चित्र बदलेल असा विश्वास माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या अतिथी गृहावर संगमनेर तालुक्यातील नवनिर्वाचित २९ सरपंच व ३७ ग्रामपंचायत निवडून आलेल्या सदस्यांचा थोरात यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आमदार डॉ. सुधीर तांबे होते. इंद्रजीत थोरात, रणजीतसिंह देशमुख, शंकर खेमनर, डॉ. जयश्री थोरात, रामहरी कातोरे, सुरेश थोरात, सोमेश्वर दिवटे आदी…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क पंढरपूर : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे हिंदुत्ववादी नाहीत, असं धक्कादायक विधान करत शिंदे-फडणवीस सरकार हे अनैतिक असल्याचे भाजपचे माजी खासदार डॉ. सुब्रह्मण्यम स्वामी यांनी म्हटलं आहे. राजकीय वर्तुळात डॉ. स्वामी यांच्या या विधानाची चर्चा रंगली आहे. स्वामी यांनी असं विधान करत देशातील व राज्यातील आपल्याच सरकारला घरचाच आहेर दिला असल्याचे म्हटले जात आहे. पंढरपूरमधील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर सरकार मुक्त करण्याबाबत चर्चा करण्यासाठी सुब्रह्मण्यम स्वामी शनिवारी (२४ डिसेंबर) पंढरपूरला आले होते. यावेळी त्यांनी ही धक्कादायक विधानं करत भाजपला घरचा आहेर दिला आहे. सुब्रह्मण्यम स्वामी म्हणाले, पंतप्रधान मोदींनी कोणते चर्च सरकारीकरण केले का? १९४७ नंतर चर्च…
