Author: अनंत पांगारकर
संगमनेर, प्रतिनिधी – मुंबई येथील अर्थसंकल्पीय अधिवेशनात संगमनेर मतदारसंघातील पाणी प्रश्नावर आमदार अमोल खताळ यांनी सरकारचे लक्ष वेधले आहे. निळवंडे धरण आणि भोजापूर पूरचारी योजनेचा लाभ न मिळालेल्या गावांच्या व्यथा त्यांनी सभागृहात मांडल्या. विशेषतः सायखिंडी, चिकणी आणि परिसरातील गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर असून सिंचना अभावी शेतीचेही मोठे नुकसान होत असल्याची बाब त्यांनी अधोरेखित केली. आमदार खताळ यांनी या भागासाठी उपसा सिंचन योजना मंजूर करण्याची आग्रही मागणी केली आहे. ग्रामीण भागातील ही तीव्र पाणीटंचाई कायमस्वरूपी दूर करण्यासाठी शासनाने तातडीने ठोस पावले उचलणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले. या योजनेमुळे केवळ शेतीलाच नव्हे, तर पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करणाऱ्या नागरिकांनाही मोठा दिलासा…
आजचे सविस्तर राशिभविष्य: गुरुवार, १२ मार्च २०२६ मेष: आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत उत्साहाचा राहील. कार्यक्षेत्रात तुमच्या कष्टाचे चीज होईल आणि वरिष्ठांकडून तुमच्या कामाची प्रशंसा केली जाईल. आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे, विनाकारण खर्च वाढण्याची शक्यता आहे. कौटुंबिक जीवनात सुख-शांती नांदेल आणि जोडीदारासोबतचे संबंध अधिक दृढ होतील. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका, विशेषतः खाण्यापिण्याच्या सवयींवर नियंत्रण ठेवा. वृषभ: आज तुम्हाला नशिबाची उत्तम साथ लाभणार आहे. प्रदीर्घ काळापासून रखडलेली कामे पूर्ण झाल्यामुळे मनावरचा ताण हलका होईल. व्यवसायात नवीन संधी उपलब्ध होतील, ज्याचा भविष्यात मोठा फायदा होऊ शकतो. घरात मंगल कार्य ठरण्याची शक्यता आहे. सामाजिक कार्यात सहभागी झाल्यामुळे तुमचा मान-सन्मान वाढेल. प्रिय व्यक्तीशी…
संगमनेर, प्रतिनिधी – मुंबई येथे सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात संगमनेर मतदारसंघाचे आमदार अमोल खताळ यांनी संगमनेर शहरात ‘मराठी भाषा भवन’ स्थापन करण्याची मागणी विधानसभेत केली. मराठी भाषेच्या जतन, संवर्धन आणि प्रसारासाठी संगमनेर येथे स्वतंत्र मराठी भाषा भवन उभारण्यात यावे आणि त्यासाठी राज्य शासनाने आवश्यक निधी उपलब्ध करून देत सहकार्य करावे, अशी विनंती त्यांनी सभागृहातून केली. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी राज्य शासनाच्या वतीने विविध स्तरांवर प्रयत्न सुरू आहेत. या संदर्भात शासनाने स्थापन केलेल्या समितीचे अध्यक्ष प्रा. रंगनाथ पठारे हे संगमनेर मतदारसंघातील असल्याचा अभिमान असल्याचेही आमदार खताळ यांनी यावेळी नमूद केले. मराठी भाषा आणि साहित्याच्या समृद्ध परंपरेचा वारसा लाभलेल्या संगमनेर…
संगमनेर, प्रतिनिधी- संगमनेर तालुक्यातील दळणवळण व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी आणि ग्रामीण विकासाला गती देण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून एकूण ३१ कोटी रुपयांचा निधी अर्थसंकल्पात मंजूर करण्यात आला आहे. यामध्ये विविध रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटी रुपये आणि वेल्हाळे ते राजापूर दरम्यान म्हाळुंगी नदीवर उभारल्या जाणाऱ्या पुलासाठी ६ कोटी रुपयांच्या निधीचा समावेश असल्याची माहिती आमदार अमोल खताळ यांच्या कार्यालयाकडून देण्यात आली आहे. मुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात संगमनेर तालुक्यातील ग्रामीण भागातील अत्यंत महत्त्वाच्या रस्त्यांच्या कामांसाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे. या निधीमुळे गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेले रस्त्यांचे प्रश्न सुटणार असून, नागरिकांना मोठा दिलासा…
आश्वी | वार्ताहर संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द–हनुमानवाडी–दाढ खुर्द या सुमारे ३ किलोमीटर लांबीच्या रस्त्यावरील अडथळे दूर करण्यात आश्वी खुर्द ग्रामपंचायतीला यश आले असून, गेल्या अनेक दिवसांपासून गुदमरलेला हा रस्ता आता मोकळा झाला आहे. ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी विशेष प्रयत्न करून रस्त्यावरील झाडांची छाटणी केली, खड्डे बुजवले आणि बंद असलेले पथदिवे पुन्हा सुरू केल्यामुळे विद्यार्थी आणि ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या दोन वर्षांपासून या रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी झाडे मोठ्या प्रमाणावर वाढल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी अत्यंत धोकादायक बनला होता. झाडांच्या फांद्यांमध्ये पथदिव्यांच्या तारा अडकल्याने संपूर्ण रस्ता अंधारात असायचा. त्यातच परिसरात बिबट्याचा वावर वाढल्याने शेतकरी आणि शालेय विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत…
शिर्डी: उत्तर अहिल्यानगर जिल्ह्याची जीवनवाहिनी असलेल्या भंडारदरा धरणाचे शताब्दी वर्ष सांस्कृतिक आणि निसर्ग पर्यटनाच्या माध्यमातून अविस्मरणीय करण्यासाठी एक सर्वंकष कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश जलसंपदामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले आहेत. विधान भवनात या आराखड्याचा सविस्तर आढावा घेण्यासाठी आयोजित विशेष बैठकीत ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता प्रकाश मिसाळ, कार्यकारी अभियंता बाळासाहेब शेटे, स्वप्नील काळे यांसह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. भंडारदरा धरणाचे शताब्दी वर्ष हा एक ऐतिहासिक टप्पा असून, या निमित्ताने राज्य शासनाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विशेष समितीची स्थापना केली आहे. या महोत्सवांतर्गत जलाशय परिसराचे सुशोभीकरण करणे,…
आजचे सविस्तर राशिभविष्य: बुधवार, ११ मार्च २०२६ मेष आजचा दिवस आपल्यासाठी उत्साहाचा असेल. कार्यक्षेत्रात नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता आहे. जुन्या मित्रांच्या भेटीमुळे मन प्रसन्न राहील. आर्थिक गुंतवणुकीसाठी काळ अनुकूल असून धनलाभाचे योग आहेत. जोडीदारासोबतचे संबंध अधिक दृढ होतील. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका, विशेषतः खाण्यापिण्याच्या सवयींवर नियंत्रण ठेवा. वृषभ आज आपल्याला कामाच्या ठिकाणी संयम ठेवावा लागेल. सहकाऱ्यांशी विनाकारण वाद घालणे टाळा. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील आणि घरातील ज्येष्ठ व्यक्तींचा आशीर्वाद मिळेल. नवीन वस्तू खरेदी करण्याचे बेत आखले जातील. व्यापारात मध्यम फळ मिळेल. मान-सन्मानात वृद्धी होईल, मात्र खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. मिथुन आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर आज आपण कठीण कामे सहज पूर्ण…
संगमनेर, प्रतिनिधी- संगमनेर तालुक्यातील चिखली गावच्या शिवारात महार वतन इनाम जमिनीवर कोणत्याही सक्षम अधिकाऱ्याची परवानगी न घेता अनधिकृतपणे सिमेंट रस्ता आणि भूमिगत गटाराचे बांधकाम केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी सिन्नर तालुक्यातील महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून संगमनेर शहर पोलीस ठाण्यात दोन ठेकेदारांविरुद्ध ॲट्रॉसिटीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीच्या आईच्या पश्चात चिखली येथील महार वतन जमीन वारसा हक्काने त्यांच्या आणि त्यांच्या नातेवाईकांच्या नावे असून, ती त्यांच्या सामायिक ताब्यात आहे. दरम्यानच्या काळात, चिखली ग्रामपंचायतीने अनुसूचित जाती वस्ती विकास योजनेअंतर्गत सन २०२२-२३ आणि २०२३-२४ या आर्थिक वर्षांसाठी रस्ता काँक्रिटीकरण व भूमिगत गटार बांधकामाचा निधी मंजूर करून घेतला होता. या…
संगमनेर | अनंत पांगारकर शहराला शिस्त लावण्याच्या नावाखाली संगमनेर नगरपरिषदेने राबवलेली अतिक्रमण हटाव मोहीम आता संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. नवीन नगर रस्त्यावरील ज्या जागांवरून गरिबांच्या हातगाड्या आणि छोटी दुकाने हटवण्यात आली, तिथे आता चक्क आलिशान चारचाकी गाड्यांनी तळ ठोकला आहे. यामुळे ही मोहीम नेमकी शहर सुशोभीकरणासाठी होती की श्रीमंतांच्या बेकायदेशीर पार्किंगला रान मोकळे करून देण्यासाठी, त्यांचे पार्किंगचे चोचले पुरविण्यासाठी असा संतप्त सवाल सामान्य नागरिक विचारत आहेत. काही दिवसांपूर्वी मुख्याधिकारी दयानंद गोरे आणि प्रशासन अधिकारी प्रल्हाद देवरे यांच्या नेतृत्वाखाली मोठा गाजावाजा करत, फौजफाटा घेऊन शहरात अतिक्रमण विरोधी मोहीम राबवण्यात आली. वाहतुकीला अडथळा होतो, शहराचे विद्रूपीकरण होते असे कारण देत अनेक हातावर…
श्रीरामपूर, विशेष प्रतिनिधी – अल्पवधीत अवाढव्य परताव्याचे आमिष दाखवून सामान्य जनतेची फसवणूक करणाऱ्या ‘ग्रो-इन्व्हेस्टर’ कंपनीवर श्रीरामपूर पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, भोकर परिसरात बेकायदेशीरपणे गुंतवणूक स्वीकारून लोकांची लूट केली जात होती. या माहितीची गांभीर्याने दखल घेत पोलिसांनी कोणतीही अधिकृत तक्रार येण्याची वाट न पाहता स्वतःहून पुढाकार घेऊन हा घोटाळा उघडकीस आणला आहे. या कारवाईसाठी पोलीस पथकाने २६ डिसेंबर २०२५ रोजी भोकर शिवारातील संदिपराज मोहिणीबाई कपाटे (वय ३६) याच्या घरावर छापा टाकला. यावेळी पोलिसांनी संशयिताकडून कोणतीही अधिकृत परवानगी नसल्याचे निष्पन्न केले. झडतीदरम्यान ९ पासबुक, १० चेकबुक, हिशोबाची वही, लॅपटॉप, संगणक, रोख रक्कम…
