Author: अनंत पांगारकर
आजचे राशीभविष्य: मेष – मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस उत्साहाचा राहील. प्रजासत्ताक दिनानिमित्त सामाजिक कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल. सरकारी कामात प्रलंबित असलेले निर्णय तुमच्या बाजूने लागण्याची शक्यता आहे. कुटुंबातील सदस्यांसोबत आनंदाचे वातावरण राहील. प्रकृतीची काळजी घ्या, विशेषतः खाण्यापिण्याच्या सवयींवर नियंत्रण ठेवा. वृषभ – वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आर्थिक लाभ देणारा ठरेल. जुन्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळण्याची शक्यता आहे. नोकरीत असलेल्या व्यक्तींना वरिष्ठांकडून कौतुक मिळेल. जोडीदारासोबतचे संबंध अधिक दृढ होतील. घरातील थोरामोठ्यांच्या आशीर्वादाने कठीण कामे सुलभ होतील. मिथुन – मिथुन राशीच्या व्यक्तींनी आज घाईघाईत कोणतेही निर्णय घेऊ नयेत. संवादातून अनेक समस्या सुटू शकतात, त्यामुळे बोलण्यावर संयम ठेवा. कामाच्या ठिकाणी…
अहिल्यानगर, २६ जानेवारी संगमनेर तालुक्यातील धार्मिक आणि सामाजिक चळवळीचे केंद्र असलेल्या श्री क्षेत्र खंडोबा देवस्थान (खळी) आणि श्री क्षेत्र विठोबा देव मंदिर (धांदरफळ बु.) या दोन देवस्थानांना शासनाकडून अधिकृतपणे ‘क’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा मंजूर करण्यात आला आहे. अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयात रविवारी पार पडलेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत या प्रस्तावावर शिक्कामोर्तब करण्यात आले असून, आमदार सत्यजीत तांबे यांनी यासाठी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हे मोठे यश मिळाले आहे. या निर्णयामुळे भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण असून परिसरातून समाधान व्यक्त होत आहे. ‘क’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा प्राप्त झाल्यामुळे आता या दोन्ही देवस्थानांच्या सर्वांगीण विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे. या विशेष दर्जामुळे जिल्हा नियोजन समिती आणि…
मुंबई, २६ जानेवारी छात्र भारती विद्यार्थी संघटनेच्या राज्य अध्यक्षपदी संगमनेरचे झुंजार युवा नेतृत्व साथी अनिकेत घुले यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. मुंबईतील काळाचौकी येथे २४ आणि २५ जानेवारी २०२६ रोजी पार पडलेल्या संघटनेच्या ४२ व्या राज्य अधिवेशनात ही निवड जाहीर करण्यात आली. या अधिवेशनासाठी छात्र भारतीचे मावळते अध्यक्ष रोहित ढाले आणि राष्ट्र सेवा दलाचे राज्य अध्यक्ष राजा कांदळकर यांची प्रमुख उपस्थिती होती. अनिकेत घुले यांची गेल्या दहा वर्षांपासून महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचा बुलंद आवाज म्हणून ओळख आहे. शिक्षणाच्या विविध प्रश्नांवर त्यांनी सातत्याने रस्त्यावर उतरून आंदोलने केली आहेत. विशेषतः शिक्षण संस्थाचालकांच्या मनमानी विरोधात आक्रमक भूमिका घेत त्यांनी संगमनेर भागात २०२४-२५ या वर्षात…
अहिल्यानगर, २६ जानेवारी अखिल भारतीय तमाशा परिषदेचे ज्येष्ठ मार्गदर्शक, संगमनेरचे भूषण आणि ज्येष्ठ तमाशा कलावंत रघुवीर खेडकर यांना भारत सरकारतर्फे जाहीर करण्यात आलेल्या ‘पद्मश्री’ पुरस्कारामुळे तमाशा या लोककलेला राष्ट्रीय पातळीवर मानाचा मुकुट लाभला आहे. या ऐतिहासिक सन्मानाबद्दल आमदार सत्यजीत तांबे यांनी रविवारी झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत रघुवीर खेडकर यांचा अभिनंदनाचा ठराव मांडला जो सर्व सदस्यांनी एकमताने मंजूर केला. स्वर्गीय कांताबाई सातारकर यांचा समृद्ध कलावारसा समर्थपणे पुढे नेत रघुवीर खेडकर यांनी तमाशा या लोककलेला नवी ओळख, नवे परिमाण आणि नवी उंची मिळवून दिली. सोंगाड्याच्या हजरजबाबी भूमिकेपासून वगनाट्यातील दमदार अभिनय तसेच पारंपरिक लावणी नृत्य आणि अष्टपैलू सादरीकरणातून त्यांनी रसिक प्रेक्षकांच्या मनावर…
डॉ. संतोष खेडलेकर, संगमनेर संतोषभाऊ… आज आई पाहिजे होती… एक हुंदका बाहेर पडला आणि क्षणभर आम्ही दोघेही नि:शब्द झालो… रघुभाऊ फोनवर बोलत होते. एकीकडे आनंद आणि दुसरीकडे मागील पंचावन्न वर्षांचा तमाशा रंगभूमीवरचा प्रवास आठवत भाऊ बोलत होते. सन २०१५ पासून तमाशा लोककलेला पद्म पुरस्कार मिळावा म्हणून पाठपुरावा सुरु होता. सुरुवातीची अनेक वर्षे कांताबाई सातारकर यांना पद्म पुरस्कार मिळावा म्हणून पाठपुरावा सुरु होता. त्यानंतर दरवर्षी सप्टेंबर महिना आला की पद्मसाठीचा अतिशय क्लिष्ट असा फॉर्म भरायला सुरुवात व्हायची. यासाठी सुरुवातीला माझे मित्र ज्ञानेश्वर केदार यांच्या मदतीने अविनाश वर्पे यांच्याकडे हे काम चालायचे. पुढे या सगळ्याचा सराव झाला. दरम्यान कोविडमध्ये कांताबाई गेल्या. नंतर…
संगमनेर, २५ जानेवारी | अनंत पांगारकर संगमनेर शहरात अवैध कत्तलखान्यांनी कायद्याची भीती गुंडाळून ठेवल्याचे चित्र असतानाच, पोलिसांनी सलग दुसऱ्या दिवशी केलेल्या धडाकेबाज कारवाईने गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत. एलसीबी आणि पोलीस उपअधीक्षकांच्या पथकाने शुक्रवारी केलेल्या ३३ लाखांच्या कारवाईची शाई वाळते ना वाळते, तोच शनिवारी पुन्हा संगमनेर शहर पोलिसांनी जमजम कॉलनी परिसरात दोन वेगवेगळ्या कारवाया करत सुमारे ५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत १००० किलो गोमांस जप्त करण्यात आले असून १० जिवंत गोवंशांची सुटका करण्यात आली आहे. शहरातील अनियंत्रित कत्तलखाने बंद करण्याचे धाडस स्थानिक लोकप्रतिनिधी, पोलीस आणि पालिका प्रशासनाने दाखवावे, अशी मागणी जोर धरत असतानाच उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.…
संगमनेर | प्रतिनिधी आयुष्यभर तमाशा या लोककलेचे जतन, संवर्धन करत कलाप्रेमींचे मनोरंजन व समाजप्रबोधन करणारे संगमनेर येथील ज्येष्ठ तमाशा कलावंत, स्व. कांताबाई सातारकर यांचे सुपुत्र तसेच अखिल भारतीय तमाशा फड मालक संघटनेचे अध्यक्ष तमाशा कलावंत रघुवीर खेडकर यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारकडून लोककला क्षेत्रातील सर्वोच्च असा पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. या घोषणेमुळे संपूर्ण तमाशा कला क्षेत्रात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. संगमनेर ही लोककलावंतांची पवित्र भूमी म्हणून ओळखली जाते. शाहीर कवी अनंत फंदी, प्रथम महिला तमाशा कलावंत पवळा भालेराव हिवरगावकर, लोकशाहीर विठ्ठल उमप, लावणी कलावंत गुलाबबाई संगमनेरकर तसेच ज्येष्ठ तमाशा कलावंत स्व. कांताबाई सातारकर हे…
संगमनेर, प्रतिनिधी: संगमनेरचे सुपुत्र आणि ज्येष्ठ लोककलावंत रघुवीर खेडकर यांना केंद्र सरकारचा प्रतिष्ठित ‘पद्म’ पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे. खेडकर यांची ही निवड म्हणजे तमाशा या महाराष्ट्राच्या अस्सल लोककलेला मिळालेले ‘गतवैभव’ असल्याची भावना थोरात यांनी व्यक्त केली असून, या गौरवामुळे संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यात आनंदाचे वातावरण पसरले आहे. स्वर्गीय कांताबाई सातारकर यांनी जपलेला लोककलेचा अमूल्य वारसा रघुवीर खेडकर यांनी आपल्या आयुष्यात अत्यंत प्रामाणिकपणे पुढे नेला आहे. एकेकाळी तमाशा ही कला लोप पावते की काय, अशी भीती निर्माण झाली असताना खेडकर यांनी आपल्या सहज सादरीकरणाने आणि आत्मीयतेने या कलेला राष्ट्रीय पातळीवर एक वेगळी…
महाराष्ट्र संवाद न्यूज – केंद्र सरकारने प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला २०२६ सालासाठीच्या मानाच्या पद्म पुरस्कारांची घोषणा केली असून, यामध्ये महाराष्ट्रातील चार मान्यवरांसह देशातील विविध क्षेत्रांतील दिग्गजांचा गौरव करण्यात आला आहे. कला, समाजसेवा, विज्ञान आणि वैद्यकीय अशा विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना हे सर्वोच्च नागरी सन्मान जाहीर झाले आहेत. महाराष्ट्रासाठी यंदाचा पद्म पुरस्कार सोहळा विशेष ठरला आहे, कारण राज्यातील चार व्यक्तींना या यादीत स्थान मिळाले आहे. लोकनाट्य क्षेत्रातील त्यांच्या प्रदीर्घ योगदानाबद्दल ज्येष्ठ कलाकार रघुवीर खेडकर यांना पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. दिल्लीतील राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत कांताबाई खेडकर आणि रघुवीर खेडकर यांना तमाशा सादर करण्याचा बहुमान मिळाला होता. कृषी क्षेत्रात कापूस…
नाशिक | २५ जानेवारी २०२६ पालघरमध्ये २१ जानेवारी रोजी ५०,००० लोकांच्या उपस्थितीत झालेल्या यशस्वी आंदोलनानंतर, आता नाशिकमध्ये शेतकरी संघर्षाचा दुसरा अंक सुरू झाला आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि अखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्वाखाली आज, २५ जानेवारी रोजी नाशिकमधून सुमारे ५५,००० शेतकऱ्यांचा भव्य ‘लाँग मार्च’ मुंबईच्या दिशेने रवाना झाला. या महामोर्चाचे नेतृत्व माकपचे पॉलिट ब्युरो सदस्य व किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे, माजी आमदार जे. पी. गावीत, माकपचे राज्य सचिव डॉ. अजित नवले, डॉ. डी. एल. कराड, इंद्रजित गावीत आणि उमेश देशमुख यांसारखे दिग्गज नेते करत आहेत. हा लाँग मार्च मुख्यत्वे दोन मोठ्या मुद्द्यांवर सरकारला धारेवर धरण्यासाठी काढण्यात आला…
