Author: अनंत पांगारकर

संगमनेर, प्रतिनिधी संगमनेर शहरातील म्हाळुंगी नदीवरील नवीन पुलाचे उर्वरित अपूर्ण काम १० जूनपर्यंत पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश आमदार अमोल खताळ यांनी संगमनेर नगरपरिषद प्रशासन आणि संबंधित ठेकेदारास दिले आहेत. हा पूल स्वामी समर्थ मंदिर ते साई मंदिर दरम्यान असून, आमदार खताळ यांनी गुरुवारी सकाळी मुख्याधिकारी रामदास कोकरे यांच्यासह या कामाची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत महायुतीचे नेते श्रीराम गणपुले, ज्ञानेश्वर कर्पे, कैलास वाकचौरे, शिरीष मुळे, कैलास लोणारी, अविनाश थोरात, दगाबाई धात्रक, अल्पना तांबे, शिवसेना शहर प्रमुख विनोद सूर्यवंशी, आरपीआय (आठवले) पक्षाचे शहराध्यक्ष कैलास कासार, सागर भोईर, प्रशांत वाडेकर, निलेश कोंतम, लखन घोरपडे, विकास डमाळे, दिलीप अनाप, राहुल भोईर, शशांक नामन, सौरभ…

Read More

संगमनेर – प्रतिनिधी  जनसुरक्षा विधायक कायद्याच्या विरोधात संगमनेरमधील नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी आज (गुरुवारी २९ मे २०२५) प्रांताधिकार्‍यांना निवेदन दिले. हा कायदा जनतेच्या सुरक्षेऐवजी अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणारा असून, तो रद्द करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे. निवेदनात म्हटले आहे की, जनसुरक्षा विधायक कायद्याचे नाव जरी जनतेच्या सुरक्षेचे असले तरी, प्रत्यक्षात या कायद्यात जनतेच्या सुरक्षेसाठी काय आहे हे त्यात स्पष्ट केलेले नाही. विशेषतः, ‘शहरी नक्षलवाद’ या संकल्पनेची व्याख्याच या विधेयकात स्पष्ट करण्यात आलेली नाही. माओवाद आणि नक्षलवाद यावर हा कायदा लागू करणे ठीक असले तरी, ‘शहरी नक्षलवाद’ या अस्पष्ट संकल्पनेखाली संपूर्ण राज्यात हा कायदा लागू करण्याचा प्रयत्न लोकशाहीविरोधी असल्याचे म्हटले…

Read More

संगमनेर, २९ मे २०२५ संगमनेर शहरातील लालतारा परिसरातील नागरिकांना सध्या वाढत्या अस्वच्छतेमुळे गंभीर आरोग्य समस्यांना सामोरे जावे लागत आहे. कचऱ्याचे ढिगारे, मृत जनावरांची कातडी आणि सर्वत्र पसरलेली घाण यामुळे परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली असून, डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने साथीचे आजार पसरण्याची भीती निर्माण झाली आहे. या गंभीर प्रश्नावर नगरपालिका प्रशासनाने कोणतीही ठोस कारवाई केली नसल्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. लालतारा परिसरातील रहिवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील अनेक भागांतील कचरा आणि विशेषतः मृत जनावरांची कातडी सर्रास लालतारा परिसरात आणून टाकली जाते. यामुळे या भागाला अक्षरशः कचराकुंडीचे स्वरूप आले असून सर्वत्र मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे. आम्ही प्रशासनाकडे वेळोवेळी या समस्येबद्दल…

Read More

अहिल्यानगर –  अहिल्यानगर जिल्ह्यातील चास तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. घराजवळ साचलेल्या पावसाच्या पाण्याच्या डबक्यात बुडून दोन सख्या भावांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना २७ मे रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली. अमितेश बलराज बिडे (वय १०) आणि अनिकेत बलराज बिडे (वय ०६, रा. चास, ता. अहिल्यानगर) अशी मयत भावंडांची नावे आहेत. या घटनेने चास परिसरात शोककळा पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी सायंकाळी अमितेश आणि अनिकेत हे दोघे भाऊ त्यांच्या घराजवळ खेळत असताना पावसाच्या पाण्यामुळे साचलेल्या एका डबक्यात पडले. ही बाब लक्षात येताच, त्यांच्या नातेवाईकांनी तात्काळ त्यांना पाण्यातून बाहेर काढले. मात्र, तोपर्यंत दोघेही बेशुद्ध झाले होते. त्यांचे चुलते…

Read More

मुंबई, २८ मे:  उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील नियोजन विभागाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मगावी, अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील मौजे चौंडी येथील स्मृतीस्थळाच्या जतन आणि संवर्धनासाठी ६८१ कोटी ३२ लाख रुपयांच्या विकास आराखड्यास प्रशासकीय मान्यता दिली आहे. यासंदर्भातील शासन निर्णय आज नियोजन विभागाने जारी केला. या आराखड्याच्या संनियंत्रण आणि अंमलबजावणीची जबाबदारी अहिल्यानगरच्या जिल्हाधिकाऱ्यांवर सोपवण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयात सातत्याने बैठका घेऊन केलेल्या पाठपुराव्यामुळे हा शासन निर्णय वेळेत जारी होऊ शकला आहे. जगातील महान स्त्री राज्यकर्त्यांपैकी एक असलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या चौंडी येथील स्मृतीस्थळाचा विकास व्हावा यासाठी उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार विशेष प्रयत्नशील होते. अर्थसंकल्पीय…

Read More

संगमनेर – प्रतिनिधी दहावीच्या निकालानंतर विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक वर्षात प्रवेशासाठी लागणाऱ्या विविध दाखल्यांच्या अडचणी लक्षात घेता, संगमनेर येथील यशोधन जनसंपर्क कार्यालयाने यंदाही विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी एक महत्त्वाची सुविधा सुरू केली असल्याची माहिती यशोधनचे मुख्याधिकारी डॉ. नितीन भांड यांनी दिली आहे. या दाखल्यांचा समावेश… राज्याचे माजी शिक्षणमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली आणि कॅन्सर तज्ञ डॉ. जयश्री थोरात यांच्या नेतृत्वाखाली ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून, विद्यार्थ्यांना आता एकाच ठिकाणी उत्पन्नाचा दाखला, नॉन-क्रिमिलेअर, डोमिसाईल, नॅशनॅलिटी, डोंगरी आणि जात प्रमाणपत्र यांसारखे आवश्यक दाखले तात्काळ मिळवता येणार आहेत. ऐतिहासिक निर्णयाची आठवण आणि सद्यस्थिती… माजी शिक्षणमंत्री बाळासाहेब थोरात यांनी आपल्या कार्यकाळात राज्यभरात ‘शाळेतच दाखले’…

Read More

छत्रपती संभाजीनगर-  वर्ग-२ मधील जमीन वर्ग-१ मध्ये रूपांतरित करण्यासाठी ४१ लाखांची लाच घेताना छत्रपती संभाजीनगरचे निवासी उपजिल्हाधिकारी विनोद गोंडुराव खिरोळकर आणि त्यांचा महसूल सहाय्यक दिलीप त्रिभुवन यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहाथ पकडले. या कारवाईनंतर खिरोळकर यांच्या घरावर टाकलेल्या धाडीत तब्बल ६७ लाख ४५ हजार रुपयांचे घबाड सापडले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संभाजीनगर तालुक्यातील तिसगाव येथील ६ हजार १८ गुंठे वर्ग-२ जमीन एका व्यक्तीने नियमानुसार खरेदी केली होती. ही जमीन वर्ग-१ मध्ये करण्यासाठी खिरोळकर आणि त्रिभुवन यांनी आधीच २३ लाख रुपये घेतले होते. उर्वरित प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आणि चलन देण्यासाठी त्यांनी आणखी १८ लाख रुपयांची मागणी केली. यातील ५ लाख रुपये…

Read More

अहिल्यानगर दि.२७-  जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी प्रभारी अपर जिल्हादंडाधिकारी अरुण उंडे यांनी मुंबई पोलिस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) (३) अन्वये २८ मे ते १० जुन २०२५ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत शस्त्र व जमावबंदी आदेश जारी केला आहे. सदरचे आदेश धार्मिक कार्यक्रम, लग्नकार्य, लग्न मिरवणुका, किंवा प्रेतयात्रेच्या जमावास लागू राहणार नाहीत. तसेच हा आदेश पोलीस अधिकारी, कामावर असलेल्या इतर शासकीय अधिकारी, कर्मचारी यांना, सभा अगर मिरवणूका काढण्यास रितसर परवानगी घेतली असलेल्या व्यक्तींना लागू नाही. आदेशाचा भंग करणाऱ्या विरोधात कारवाई करण्यात येईल, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

Read More

मुंबई राज्य सरकारने शेतसारा न भरल्यामुळे सरकारच्या ताब्यात गेलेल्या आकारीपड जमिनी मूळ शेतकऱ्यांना परत करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. तीन महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर या निर्णयावर शिक्कामोर्तब करणारा अध्यादेश अखेर जाहीर झाला आहे. या निर्णयामुळे राज्यातील सुमारे दीड हजार शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून, अंदाजे ५ हजार एकर जमिनींचा मार्ग मोकळा झाला आहे. निर्णयाची पार्श्वभूमी… सध्या राज्यात सुमारे ५ हजार एकर आकारीपड जमिनी आहेत, त्यापैकी एकट्या पुणे विभागात ५९७ एकर जमीन आहे. मार्च महिन्यात झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या जमिनी मूळ शेतकरी, मालक किंवा त्यांच्या वारसांना परत देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, अध्यादेश प्रसिद्ध न झाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना या निर्णयाचा लाभ मिळत…

Read More

संगमनेर, अनंत पांगारकर दहावी, बारावीच्या निकालानंतर पुढील प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे मिळवण्यासाठी सध्या विद्यार्थी आणि पालकांची मोठी धावपळ सुरू आहे. उत्पन्न, जात, अधिवास, नॉन क्रिमीलेअर यांसारख्या दाखल्यांसाठी त्यांना तहसील कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागत आहेत. या पार्श्वभूमीवर, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि तत्कालीन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी २०१३ मध्ये सुरू केलेल्या “शाळेतूनच दाखले वाटप” योजनेची आठवण पालकांना होत आहे. थोरातांच्या दूरदृष्टीने घेतलेला हा निर्णय विद्यार्थ्यांना मोठा दिलासा देणारा ठरला होता आणि आता तो पुन्हा सुरू करण्याची मागणी जोर धरत आहे. थोरातांचा ऐतिहासिक निर्णय आणि त्याचे फायदे… २०१३ मध्ये महसूल मंत्री असताना, बाळासाहेब थोरात यांनी महसूल विभागाला अधिक लोकाभिमुख आणि पारदर्शक बनवण्यासाठी ‘सुवर्ण…

Read More