Author: अनंत पांगारकर
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क जोर्वे येथे एकविरा फौंडेशनच्या अध्यक्षा डॉ. जयश्रीताई थोरात यांनी अंगणवाडीतील मुलांसोबत अनोख्या पद्धतीने दिवाळी साजरी केली. ‘दिवाळी सण मोठा, नाही आनंदाला तोटा’ असे असले तरी अनेक लोकांना दिवाळीचा आनंद घेता येत नाही. याच हेतूने लहान बालकांची दिवाळी गोड व्हावी यासाठी या चिमुकल्यांना शैक्षणिक साहित्य आणि दिवाळीचा फराळ वाटप करीत एकविरा फाउंडेशनच्या अध्यक्ष डॉ. जयश्री थोरात यांनी या चिमुकल्यांचा दिवाळीचा आनंद द्विगुणीत केला. वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळत तरुणांनी ग्रामस्थांच्या मदतीने लोकसहभागातून गावातील अंगणवाडी डिजिटल बनविली. अनोखा आदर्श घालून देत डिजिटल बनविलेल्या या अंगणवाडीला जयश्री थोरात यांनी भेट दिली आणि डिजिटल अंगणवाडीचे कौतुक केले.
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क कमी पटसंख्येच्या कारणावरून राज्यभरातील हजारो शाळा बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. सरकारच्या या धोरणाचा निषेध म्हणून छात्रभारती संघटनेने राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना काळा आकाश कंदील भेट पाठविला आहे. कमी पटसंख्येच्या शाळा बंद केल्याने ग्रामीण भागातील वाड्या-वस्त्यांवरील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची मोठी गैरसोय होणार आहे. दूरवर असलेल्या शाळांमध्ये विद्यार्थी-विद्यार्थिनी जाणार नाहीत. त्यामुळे अनेक विद्यार्थी-विद्यार्थिनी सरकारच्या या धोरणामुळे मुकण्याची शक्यता आहे. राज्य सरकारने कमी पटसंख्येच्या शाळा बंद केल्यास या विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होणार असल्याने छात्रभारती संघटनेने सरकारच्या या निर्णयाला विरोध दर्शविला आहे. विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहा बाहेर जाणार असल्याने छात्रभारती संघटनेने अनेक शाळांवर जाऊन यासंबंधीच्या सर्वे…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क जाणता राजा म्हणून ओळख असलेले शरद पवार केंद्रात कृषी मंत्री होते. या पवारांनीच राज्यातील सहकारी साखर कारखानदारी संपविली. अशी गंभीर टीका राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी नाशिकमध्ये केली. नाशिक साखर कारखान्याच्या पळसे येथील गळीत हंगामाचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आणि पालकमंत्री दादा भुसे, खासदार हेमंत गोडसे, आमदार देवयानी फरांदे यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी मंत्री विखे बोलत होते. विखे पाटील म्हणाले, पवार कृषिमंत्री असताना पंधरा वर्षांपूर्वीच साखर कारखानदारी संदर्भात निर्णय व्हायला हवे होते. इथेनॉल बद्दल धोरण राबवायला हवे होते. त्यांनी त्यावेळी योग्य धोरण राबविले असते तर आज राज्यातील साखर कारखाने कवडीमोल भावाने विकले…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क सहकारी साखर कारखानदारीत अवघ्या देशासाठी अनुकरणीय ठरलेल्या संगमनेरच्या सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष बाबा ओहोळ यांची महाराष्ट्र राज्य सहकारी साखर संघाच्या संचालकपदी निवड करण्यात आली आहे.माजी मंत्री काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते आणि विद्यमान आमदार बाळासाहेब थोरात यांच्या अधिपत्याखाली असलेल्या सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात साखर कारखान्याने साखर कारखानदारीत वेगवेगळे उच्चांक प्रस्थापित केले आहेत. ऊस उत्पादकांना सर्वाधिक भाव देणारा साखर कारखाना म्हणून या कारखान्याने राज्यभरात ख्याती मिळविली आहे. या कारखान्याला राष्ट्रीय पातळीवरील उत्कृष्ट ऊस विकासाचा पुरस्कार देखील मिळालेला आहे. याशिवाय या कारखान्याचे कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनादेखील गोवा येथे एका कार्यक्रमात उत्कृष्ट कार्यकारी संचालक म्हणून गौरविण्यात…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क सांत्वनपर भेटीच्या चढाओढीनंतर अखेरीस संगमनेर तालुक्यातील त्या विजेच्या दुर्घटनेत मृत पावलेल्या चार भावंडांच्या वारसांना पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते प्रत्येकी चार लाख रुपये मदतीचे धनादेश शुक्रवारी देण्यात आले. राज्याचे महसूल मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री असलेल्या राधाकृष्ण विखे पाटील यांनी शुक्रवारी पुन्हा एकदा बर्डे कुटुंबीयांची भेट घेतली. संगमनेर तालुक्यातील खंदरमाळच्या वांदरकडा येथे वीजवाहक तार पाण्यात पडल्याने झालेल्या दुर्घटनेत अनिकेत अरूण बर्डे, ओंकार अरुण बर्डे, दर्शन अजित बर्डे व विराज अजित बर्डे या चार कुमारवयीन भावंडांचा मृत्यू झाला होता. या मृत मुलांच्या वारसांना मंत्री विखे पाटील यांच्या हस्ते प्रत्येकी चार लाख रुपयांचे धनादेश आणि जनसेवा फाउंडेशनच्या वतीने…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क बापानेच आपल्या स्वत:च्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना संगमनेरमध्ये समोर आली आहे. या प्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात नातीवर झालेल्या या अत्याचाराची मुलाविरोधात आजीनेच तक्रार दिल्याने हा प्रकार समोर आला. या विकृताची पत्नी दहा वर्षापूर्वीच त्याला सोडून गेली आहे. त्यावेळेपासून दोन नातवंड व त्यांच्या वडील मुलाचा सांभाळ फिर्यादी करत आहे. मोलमजुरी करुन ही वृध्दा मुलगा आणि नातवंडाचा सांभाळ करते. आरोपी कामधंदा न करता घरीच असतो. गेल्या आठवड्यात नातीने आपल्या पोटात दुखत असल्याची तक्रार आजीकडे केली. त्यामुळे आजीने तिला घुलेवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात तपासण्यासाठी नेले. तेथून औषधे घेवून घरी आल्यानंतर आजीने नातीस पोट दुखण्याचे कारण विचारले असता…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क गोमातेपासून आपणास दूध मिळते. अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह या दुग्ध व्यवसायावर चालतो. वसुबारसेला गोमातेचे पूजन करणे ही आपली परंपरा व संस्कृती आहे. जसा बैलपोळा साजरा होतो तशीच संगमनेर तालुक्यात मोठ्या उत्साहात वसुबारस साजरी होत असते. मात्र यावर्षी लंम्पी आजाराच्या पार्श्वभूमीवर सर्वांनी आपल्या पशुधनाची काळजी घ्यावी कारण पशुधनाचे शेतकऱ्यांच्या जीवनात मोठे महत्त्व असल्याचे प्रतिपादन राजहंस दूध संघाचे अध्यक्ष रणजितसिंह देशमुख यांनी केले आहे. संगमनेर तालुका सहकारी दूध उत्पादक व प्रक्रिया संघामध्ये अध्यक्ष रणजितसिंह देशमुख यांच्या हस्ते गाय पूजन करून वसूबारस साजरी करण्यात आली. यावेळी उपाध्यक्ष राजेंद्र चकोर, संचालक विलास कवडे, संतोष मांडेकर, कार्यकारी संचालक डॉ. सुजित खिलारी, फायनान्स…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क म्युच्युअल फंडाला गुंतवणूकदारांची पसंती मिळत असल्याने त्यात गुंतवणुकीचा ओघ वाढत आहे. येत्या चार ते पाच वर्षांत हा उद्योग १०० लाख कोटींचा होईल आणि भारत शक्तीशाली अर्थव्यवस्था म्हणून उदयास येत असताना गुंतवणूकदार संपत्ति निर्माण करतील असा आशावाद आर्थिक गुंतवणूक तज्ज्ञ सुनील कडलग यांनी व्यक्त केला. घारगाव येथे साईनाथ उद्योग समूहाच्या दिपावली निमित्त आयोजित स्नेहबंध मेळाव्यात कडलग प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी साईनाथ उद्योग समूहाचे संस्थापक बजरंगशेठ वाकळे उपस्थित होते. प्रास्तविक भाषणात साईनाथ उद्योग समूहाचे संचालक सुदिप वाकळे यांनी कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला. समाजातील प्रत्येक घटक अर्थसाक्षर झाल्यास जीवनातील समस्या दूर होतील व संपत्ती निर्माण होईल…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क दीपावलीच्या पहील्या दिवशी वसुबारसेला म्हणजेच गोपाष्टमीला शुक्रवारी सकाळी संगमनेरमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्यावतीने गो ग्राम परिक्रमा आयोजित करण्यात आली होती. मोठ्या उत्साहात ही गो ग्राम परिक्रमा आणि गो पूजन सकाळी सात वाजता पार पडले. वसुबारसेला अतिशय श्रद्धेने गोमातेचे पूजन केले जाते, अशा पवित्र गोमातेचे रक्षण करणे हे आपले हिंदू धर्मीय म्हणून प्रथम कर्तव्य आहे. सद्यस्थितीत देशभरात हजारोंच्या संख्येने गोमातेची कत्तल होत असल्याने तिचे अस्तित्व धोक्यात आले आहे. गोमातेला सांभाळणं शेतकऱ्याला आर्थिक दृष्टीने परवडत नसल्याने तो कसायांना गाई विकतो. शहरात आपल्याला गाई पाळणे शक्य नाही परंतु शेतकऱ्यांच्या गाई वाचवणं आपल्या हातात आहे. गोमाता कामधेनु आहे.…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क दीपावली सणाच्या पार्श्वभूमीवर संगमनेर नगर परिषदेने आपल्याकडे सेवेत असलेल्या आणि सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना विविध देय रकमेपोटी सुमारे एक कोटी रुपयांचे वाटप केले आहे. अशी माहिती पालिकेचे प्रशासक तथा प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरूळे आणि मुख्याधिकारी राहुल वाघ यांनी दिली. दीपावली सण उत्साहात व आनंदात साजरा करण्यासाठी नगर परिषदेचे प्रशासक डॉ. शशिकांत मंगरुळे व मुख्याधिकारी राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन करतांना कायम सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांना शासन निर्णयाप्रमाणे दीपावली सण अग्रीम तसेच कायम कर्मचाऱ्यांसह सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगाच्या फरकापोटी ही रक्कम अदा करण्यात आली आहे. तसेच शासन निर्णयाप्रमाणे दीपावली सणानिमित्त माहे ऑक्टोबर महिन्याचे वेतन 22 तारखेपर्यंत करणार असल्याची…
