Author: अनंत पांगारकर
सातारा, प्रतिनिधी – यशवंतराव चव्हाण यांचे समृद्ध वारसदार आणि महाराष्ट्राच्या राजकारणातील सुसंस्कृत नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे माजी महसूल मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी शुक्रवारी सातारा येथे ज्येष्ठ विचारवंत व लेखक डॉ. आ. ह. साळुंखे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान दोन्ही दिग्गजांमध्ये राज्यातील राजकारण, साहित्य, समाजकारण आणि संस्कृती अशा विविध महत्त्वपूर्ण विषयांवर सखोल चर्चा झाली. बाळासाहेब थोरात यांनी डॉ. साळुंखे यांच्या प्रकृतीची विचारपूस करून त्यांच्या प्रदीर्घ साहित्य सेवेचा गौरव केला. विचारांप्रती निष्ठा जपणारे आणि समाजापर्यंत सत्य पोहोचवण्यासाठी आयुष्यभर लेखणी झिजवणारे डॉ. साळुंखे हे थोर साहित्यिक असल्याचे थोरात यावेळी म्हणाले. डॉ. साळुंखे आजही आपल्या लेखनातून समाजभान जागृत करण्याचे…
संगमनेर: संगमनेर शहराच्या भविष्यातील गरजा आणि वाढती लोकसंख्या लक्षात घेता, शहराला नियमित, स्वच्छ आणि पुरेसा पाणीपुरवठा व्हावा या उद्देशाने नगराध्यक्षा मैथिली तांबे यांनी शुक्रवारी महत्त्वपूर्ण पाहणी दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी निळवंडे धरणापासून शहराकडे येणाऱ्या मुख्य पाईपलाईनची तसेच धरणाजवळील बॉल व्हॉल्व्हची प्रत्यक्ष पाहणी करून सद्यस्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांशी तांत्रिक बाबींवर सविस्तर चर्चा करून कामात सुधारणा करण्याच्या आवश्यक सूचना दिल्या. शहराच्या पाणीपुरवठा सुविधेला अधिक बळकट करण्यासाठी प्रस्तावित असलेल्या नवीन जलशुद्धीकरण प्रकल्पाच्या जागेचीही यावेळी पाहणी करण्यात आली. या जागेची निश्चिती केल्यानंतर नगराध्यक्षांनी संगमनेर नगरपरिषदेच्या पंपिंग स्टेशनला भेट देऊन तेथील कामकाजाची माहिती घेतली. या संपूर्ण पाहणी दौऱ्यात माजी नगराध्यक्ष दुर्गाताई…
संगमनेर: मुंबई येथे संपन्न झालेल्या छात्र भारतीच्या ४२ व्या राज्य अधिवेशनात संगमनेरचे सुपुत्र अनिकेत घुले यांची संघटनेच्या राज्य अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडीबद्दल संगमनेरमधील राष्ट्रसेवा दल, छात्र भारती, जयहिंद लोक चळवळ तसेच विविध सामाजिक, राजकीय व पुरोगामी संघटनांच्या वतीने के. बी. दादा देशमुख सभागृहात अनिकेत घुले यांचा भव्य नागरी सत्कार आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पदवीधर मतदारसंघाचे माजी आमदार डॉ. सुधीर तांबे होते. यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. तांबे यांनी राष्ट्र सेवा दल आणि छात्र भारती या संघटना पुरोगामी विचार आणि भक्कम वैचारिक अधिष्ठान असणारी नवी पिढी घडवत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. राष्ट्र सेवा दलाचे नेते आणि माजी…
संगमनेर, प्रतिनिधी – श्रीरामपूर आरटीओ कार्यालयातील अधिकारी ‘मार्च एंडिंग’चे टार्गेट पूर्ण करण्यासाठी किरकोळ कारणांवरून ४ ते ८ हजार रुपयांपर्यंत अवाढव्य दंड आकारून गरिबांच्या तोंडचा घास हिरावत असल्याचा आरोप करत, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रणित ‘वाहतूक सेना’ आणि ‘रिक्षा सेने’च्या वतीने तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. या अन्यायकारक दंडवसुलीविरोधात १ मार्चपासून संगमनेर शहर व तालुक्यात ‘रिक्षा बंद’ करण्याचा निर्धार रिक्षाचालकांनी व्यक्त केला आहे. वाढती स्पर्धा आणि इंधन दरवाढीमुळे आधीच मेटाकुटीला आलेल्या रिक्षाचालकांना आता प्रादेशिक परिवहन विभागाच्या जाचक दंडवसुलीचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर वाहतूक सेनेचे जिल्हाप्रमुख इम्तियाज शेख आणि तालुकाप्रमुख अशोक बढे यांनी प्रशासनावर खळबळजनक आरोप केले आहेत. आरटीओ…
दैनिक राशिभविष्य मेष: आजचा दिवस तुमच्यासाठी उत्साहाने भरलेला असेल. कार्यक्षेत्रात तुमच्या मेहनतीचे चीज होईल आणि वरिष्ठ तुमच्या कामाचे कौतुक करतील. वैयक्तिक आयुष्यात जोडीदाराशी असलेले नाते अधिक दृढ होईल. आरोग्याकडे थोडे लक्ष देणे गरजेचे आहे, विशेषतः खाण्यापिण्याच्या सवयींबाबत जागरुक राहा. आर्थिक लाभ होण्याची दाट शक्यता आहे. वृषभ: आज तुम्हाला नशिबाची उत्तम साथ मिळणार आहे. रखडलेली कामे मार्गी लागल्याने मानसिक समाधान मिळेल. व्यावसायिकांसाठी आजचा दिवस गुंतवणुकीसाठी चांगला आहे. कुटुंबातील सदस्यांसोबत आनंदाचे क्षण घालवण्याची संधी मिळेल. जोडीदारासोबतच्या संवादात गोडवा ठेवा, जेणेकरून तुमचे नाते अधिक बहरेल. मिथुन: तुमच्यासाठी आजचा दिवस संमिश्र फलदायी राहील. कामाचा ताण थोडा वाढू शकतो, त्यामुळे डोके शांत ठेवून निर्णय घ्या.…
संगमनेर | प्रतिनिधी आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर संगमनेर तालुक्याच्या सर्वांगीण विकासाला मोठी गती मिळाली आहे. महाराष्ट्र सरकार आणि कुंभमेळा प्राधिकरणाच्या वतीने तालुक्यातील महत्त्वाच्या रस्त्यांच्या कामांसाठी ९७ कोटी २५ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असून उपलब्ध सुविधा टप्प्याटप्प्याने विकसित केल्या जाणार असल्याची माहिती आमदार अमोल खताळ यांनी दिली. या विकासकामामुळे केवळ रस्तेच सुधारणार नाहीत, तर तालुक्याच्या दळणवळण क्षेत्राला खऱ्या अर्थाने ‘प्रगतीचे स्वातंत्र्य’ मिळणार आहे. कोणत्याही प्रगत समाजासाठी दळणवळणाचे स्वातंत्र्य हे प्रगतीचे पहिले पाऊल असते. या निधीतून होणारी कामे नागरिकांना खराब रस्त्यांच्या जाचातून मुक्त करणार असून, त्यांना सुरक्षित आणि वेगवान प्रवासाचे स्वातंत्र्य मिळेल. संगमनेर पंचायत समिती ते तळेगाव फाटा, तळेगाव फाटा ते…
संगमनेर, प्रतिनिधी – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यासाठी ‘शिवजयंती उत्सव समिती’ची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. या समितीच्या अध्यक्षपदी अमोल डुकरे यांची निवड करण्यात आली असून, त्यांच्या नेतृत्वाखाली उत्सवाचे भव्य नियोजन केले जाणार आहे. या कार्यकारिणीमध्ये उपाध्यक्षपदाची जबाबदारी दीपक वन्नम आणि प्रकाश गायकवाड यांच्यावर सोपवण्यात आली आहे. तसेच उत्सवाच्या प्रभावी नियोजनासाठी कार्याध्यक्ष म्हणून दत्तू नाईक, संजय सोनवणे आणि दीपक साळुंके यांची नियुक्ती करण्यात आली आहे. समितीच्या आर्थिक नियोजनासाठी खजिनदारपदी राजू सातपुते, अमित चव्हाण, भाऊसाहेब हासे आणि फैसल सय्यद यांची निवड करण्यात आली आहे. शिवछत्रपतींच्या विचारांचा वारसा जपत आणि सर्व शिवप्रेमींना सोबत…
शेवगाव | महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव पोलिसांनी आखेगाव रोडवर सापळा रचून एका इसमास बेकायदेशीर देशी बनावटीचे पिस्तुल आणि जिवंत काडतुसांसह अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी विना नंबरची स्कॉर्पिओ गाडी आणि मोबाईल असा एकूण २० लाख २५ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, १२ फेब्रुवारी रोजी रात्री अकरा वाजेच्या सुमारास पोलीस कॉन्स्टेबल श्याम गुंजाळ यांना गोपनीय माहिती मिळाली होती की, आखेगाव रोडने एका काळ्या रंगाच्या विना नंबरच्या स्कॉर्पिओमधून एक व्यक्ती देशी बनावटीचे पिस्तुल घेऊन शेवगावकडे येत आहे. या माहितीची दखल घेत पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने हॉटेल रिलॅक्स इन परिसरात नाकाबंदी केली.…
नाशिक: नाशिकमध्ये बालविवाहाची एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना उघडकीस आली असून, या प्रकरणी आडगाव पोलिसांनी पीडित मुलीच्या सासरच्या आणि माहेरच्या अशा एकूण आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे केवळ १४ ते १५ वर्षे वय असलेल्या या मुलीचा विवाह नातेवाईकांनी बळजबरीने लावून दिला होता. मिळालेल्या माहितीनुसार, मार्च २०२५ मध्ये पीडित मुलीचे वडील, मामा, मामी आणि मावशी यांनी संगनमत करून तिचा विवाह छत्रपती संभाजीनगर येथील एका तरुणाशी लावून दिला. हा विवाह मुलीच्या इच्छेविरुद्ध आणि कायद्याचे उल्लंघन करून करण्यात आला होता. लग्नानंतर सासरी गेल्यानंतर पीडित मुलीवर सतत अत्याचार करण्यात आले. हा छळ आणि अत्याचार असह्य झाल्यामुळे अखेर पीडित मुलीने धाडस…
संगमनेर, प्रतिनिधी – भारतीय राजकारणात ‘स्वराज’ हा शब्द सर्वप्रथम प्रचलित करण्याचे कार्य दादाभाई नवरोजी यांनी केले. दादाभाईंनी केलेली ब्रिटिशांच्या आर्थिक शोषणाची मीमांसा हाच भारतीय राष्ट्रवादाचा खरा पाया आहे, असे प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ वकील आणि प्रसिद्ध राजकीय भाष्यकार ॲड. अनिल नौरीया यांनी केले. ॲड. नौरीया पुढे यांनी दादाभाई नवरोजी आणि महात्मा गांधी यांच्यातील वैचारिक व भावनिक नाते उलगडताना त्यांनी या गौरवशाली इतिहासाचा विसर पडत असल्याबद्दल तीव्र खंत व्यक्त केली. दादाभाई नवरोजींच्या इंग्रजी पुस्तकाचा अनुवाद गुजराती, मराठी, उर्दू आणि बंगाली अशा विविध भाषांमध्ये झाला होता, ज्यातून त्यांच्या विचारांचा प्रसार देशभर झाला. त्यांच्या लोकप्रियतेचा प्रत्यय तेव्हा येत असे, जेव्हा ते दिल्लीला जात…
