Author: अनंत पांगारकर

भाग – २ संगमनेर | अनंत पांगारकर अधिकृत गर्भपात केंद्र नसताना देखील रुग्णालयातील डॉक्टरने गर्भपातासंदर्भातील कायदा आणि नियम बाजूला ठेवत महिलेचा गर्भपात करण्याचे धाडस कसे दाखविले. महिलेची प्रकृती हाताबाहेर गेल्यानंतर तिला थेट दुसऱ्या तालुक्यातील रुग्णालयात हलविण्यात आल्यानंतर तेथे या महिलेच्या मृत्यू झाला. याची माहिती शहरात कानोकानी बहुतांश ठिकाणी पसरली. त्यामुळे आता या दुर्दैवी घटनेनंतर संगमनेर शहरातील महिला सामाजिक कार्यकर्त्या बानोबी शेख यांनी ‘ह्युमन इनोवेशन ऑर्गनायझेशन’ या संस्थेच्या माध्यमातून घडलेल्या प्रकरणावर आवाज उठवला आहे. त्यांनी सलग चार ते पाच दिवस या घटनेची सखोल माहिती मिळवली आणि २ मे २०२५ रोजी अहमदनगर जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडे एक विस्तृत तक्रार अर्ज दाखल केला. या…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज –  राहाता: शेतात खत टाकण्याचे काम आटोपून जवळच्या ओढ्यावर हातपाय धुण्यासाठी गेलेल्या दोन सख्ख्या चुलत भावांचा पाय घसरून पाण्यात पडल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. एकमेकांना वाचवण्याच्या प्रयत्नात दोघांनाही प्राण गमवावे लागले. ही हृदयद्रावक घटना राहाता तालुक्यातील गोगलगाव येथे घडली. मृत पावलेल्या मुलांची नावे साहिल दत्तात्रय चौधरी (वय १८) आणि किरण नारायण चौधरी (वय १५) असून दोघेही गोगलगावचे रहिवासी होते. किरणने नुकतीच ९ वीची परीक्षा उत्तीर्ण केली होती, तर साहिल औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत (आयटीआय) शिक्षण घेत होता. मिळालेल्या माहितीनुसार, किसन तुकाराम तनपुरे (वय ६०) हे बुधवारी सायंकाळी त्यांच्या शेतात पिकांना पाणी देत होते. त्याचवेळी त्यांच्या शेजारी राहणारे साहिल आणि…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज – संगमनेर तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे विट व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तयार करण्यासाठी ठेवलेल्या कच्च्या विटांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने विट उत्पादक आर्थिक अडचणीत सापडले आहेत. या नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी, यासाठी विट उत्पादकांनी शासनाकडे अनेक वर्षांपासून मागणी केली आहे, परंतु शासनाने अद्याप कोणतीही दखल घेतलेली नाही. शेतमालाला अवकाळी पावसामुळे नुकसान झाल्यास जशी विमा योजना लागू आहे, त्याच धर्तीवर विट व्यवसायासाठी देखील विमा योजना लागू करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. विट उत्पादकांनी विमा कंपन्यांकडे विमा पॉलिसीनुसार कच्च्या विटांचा विमा उतरवण्याची विचारणा केली असता, विमा कंपन्यांनी मात्र विट व्यवसायासाठी त्यांच्याकडे कोणतेही विशिष्ट धोरण…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्यात राजशिष्टाचार आणि सुरक्षा नियमांचे उल्लंघन झाल्यामुळे प्रशासनाने कठोर पाऊले उचलली आहेत. या प्रकरणी दोन तलाठ्यांना निलंबित करण्यात आले आहे, तर अप्पर जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि उपविभागीय अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. सहाय्यक महसूल अधिकारी एस. पी. हांगे आणि ग्राम महसूल अधिकारी व्ही. व्ही. कंठाळे या दोन तलाठ्यांनी मुख्यालयात थांबण्याचे आदेश असूनही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या पूजन कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांचा सत्कार केला, ज्यामुळे राजशिष्टाचाराचे उल्लंघन झाले. ठाकरे गटाचे माजी आमदार वैभव नाईक यांनी या घटनेवर नाराजी व्यक्त करत लाचलुचपत प्रतिबंधक विभागात कारवाई झालेल्या अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांचा सत्कार केल्याचा आरोप…

Read More

संगमनेर – प्रतिनिधी महाराष्ट्र विधानमंडळाच्या अत्यंत महत्त्वाच्या आणि जबाबदारीच्या लोकलेखा समितीवर (Public Accounts Committee) आमदार सत्यजीत तांबे यांची निवड झाली आहे. त्यांच्या अभ्यासू वृत्ती, प्रभावी मांडणी आणि युवा नेतृत्वामुळे ही निवड विशेष लक्षवेधी ठरली आहे. विधानमंडळ सचिवालयाने जारी केलेल्या पत्रकानुसार, आमदार तांबे यांची लोकलेखा समितीवर अधिकृत नियुक्ती करण्यात आली आहे. ही समिती राज्य सरकारच्या खर्चावर, आर्थिक निर्णयांवर आणि नियंत्रक व महालेखापरीक्षक (CAG) यांच्या अहवालावर आधारित चौकशी करून शिफारसी करते. विरोधी पक्षनेते आमदार विजय वडेट्टीवार हे या समितीचे अध्यक्ष आहेत. युवा नेतृत्वाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या तांबे यांच्यावर राज्याच्या आर्थिक पारदर्शकतेची मोठी जबाबदारी आली आहे. त्यांनी यापूर्वी विधान परिषदेत कायदा, आरोग्य, शिक्षण, शेती,…

Read More

नवी दिल्ली: पाकिस्तानने बेकायदेशीरपणे बळकावलेला भारतीय भूभाग त्वरित रिकामा करावा, अशी कठोर भूमिका भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने घेतली आहे. मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी पत्रकार परिषदेत बोलताना पाकिस्तानला यासंदर्भात स्पष्ट शब्दांत ताकीद दिली. याव्यतिरिक्त, सिंधू पाणी वाटप करार देखील आता स्थगित ठेवण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. रणधीर जयस्वाल म्हणाले की, जम्मू-काश्मीर या केंद्रशासित प्रदेशाशी संबंधित कोणतेही प्रश्न भारत आणि पाकिस्तानने द्विपक्षीय स्तरावरच सोडवले पाहिजेत, ही भारताची नेहमीची आणि राष्ट्रीय भूमिका आहे आणि त्यात कोणताही बदल झालेला नाही. 10 मे 2025 रोजी दुपारी 3:35 वाजता दोन्ही देशांच्या डीजीएमओंमध्ये दूरध्वनीवरून झालेल्या चर्चेबाबत माहिती देताना जयस्वाल म्हणाले, “पाकिस्तानी उच्चायुक्तालयाकडून दुपारी 12:37 वाजता या…

Read More

मुंबई –  आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने (भाजप) राज्यभरात संघटनात्मक फेरबदल केले आहेत. पक्षाने राज्यातील ३६ जिल्ह्यांसाठी ५८ नवीन जिल्हाध्यक्षांची नियुक्ती केली आहे. या निवडी आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महत्त्वपूर्ण मानल्या जात आहेत. विधानसभा निवडणुकांनंतर भाजपचे ज्येष्ठ नेते रवींद्र चव्हाण यांना मंत्रिमंडळात स्थान देण्याऐवजी पक्षाने त्यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली. कार्यकारी अध्यक्ष म्हणून रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली भाजपने ‘संघटन पर्व’ अभियान यशस्वीरित्या राबवून दीड कोटी नवीन सदस्यांची नोंदणी पूर्ण केली. ही सदस्य नोंदणी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी महत्त्वाची रणनीती मानली जात आहे. https://x.com/BJP4Maharashtra/status/1922220666297713066?t=2k_iZ7sCUaO21JLggAJQpA&s=19 या पार्श्वभूमीवर, भाजपने राज्यातील सर्व जिल्ह्यांसाठी ५८ जिल्हाध्यक्षांची नवी यादी जाहीर…

Read More

अहिल्यानगर – एमआयडीसी परिसरात सुरू असलेल्या दोन अवैध जुगार अड्ड्यांवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी रविवारी मोठी कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी 17 जुगार खेळणाऱ्यांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून 2 लाख 27 हजार 930 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, पकडलेल्यांमध्ये एका पतसंस्थेच्या व्हाईस चेअरमन आणि वडगाव गुप्ता ग्रामपंचायतीच्या आजी व माजी पदाधिकाऱ्यांचा समावेश असल्याने या कारवाईची परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे. पोलिस अधीक्षक राकेश ओला यांच्या आदेशानुसार, पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या दोन पथकांनी ही कारवाई केली. पथकांनी एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सह्याद्री चौक ते चाकण ऑईल मिल रस्त्यालगतच्या हॉटेल जनता दरबारच्या मागील पटांगणात…

Read More

संगमनेर – प्रतिनिधी राज्यातील महत्त्वपूर्ण सहकारी संस्थांपैकी एक असलेल्या आणि सहकाराच्या माध्यमातून संपूर्ण राज्यासाठी नव्हे तर देशासाठी दिशादर्शक टिपलेल्या सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी राज्याचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची एकमताने निवड झाली आहे. यासोबतच, व्हाईस चेअरमनपदी पांडुरंग घुले यांची देखील सर्वानुमते निवड झाली आहे. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध पार पडल्यानंतर आज (मंगळवारी) प्रादेशिक सहसंचालक संतोष बिडवाई यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यावेळी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्यासह कारखान्याचे नवनिर्वाचित संचालक, काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते. बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली यापूर्वीही कारखान्याने अनेक महत्त्वपूर्ण…

Read More

अकोले – प्रतिनिधी नवलेवाडी (ता. अकोले) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षिका श्रीमती सुमन गणपत खतोडे यांच्या शिकवण्याच्या अनोख्या पद्धतीमुळे आणि विद्यार्थ्यांप्रति असलेल्या समर्पण भावनेमुळे पालक अक्षरशः भारावून गेले आहेत. त्यांच्या या कार्याचा गौरव म्हणून नवलेवाडीतील विद्यार्थी आणि पालकांनी एकत्र येत त्यांना चक्क एक नवीन स्कुटीची खास भेट दिली आहे. अकोले येथे आयोजित एका विशेष कार्यक्रमात हा कौतुक सोहळा पार पडला. या कार्यक्रमाला आमदार डॉ. किरण लहामटे यांच्यासह राजूर महाविद्यालयाचे माजी प्राचार्य विलास नवले यांनी अध्यक्षस्थान भूषविले. माजी नगराध्यक्ष के. डी. धुमाळ, गटशिक्षणाधिकारी अरविंद कुमावत, शिक्षण विस्तार अधिकारी (अकोले) माधवराव हासे, शिक्षण विस्तार अधिकारी (मवेशी बीट) बाळासाहेब दोरगे आणि केंद्रप्रमुख…

Read More