Author: अनंत पांगारकर

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क उच्च दाबाची वीजवाहक तार तुटून पडल्यामुळे या तारेचा धक्का लागून चार बालकांचा दुर्दैवी अंत झाला. सख्खी भावंडे यात मृत्युमुखी पडल्याने तालुक्याच्या पठार भागात शोककळा पसरली.संगमनेर तालुक्यातील पठार भागात असलेल्या नांदूर खंदरमाळवाडी गावात ही घटना शनिवारी दुपारच्या वेळी घडली. ओमकार अरुण बर्डे (वय १० वर्ष’ अनिकेत अरुण बर्डे (वय १२ वर्षे) आणि विराज अजित बर्डे (वय ६ वर्ष), दर्शन अजित बर्डे (वय ८ वर्ष) अशी या दुर्दैवी भावंडांची नावे आहेत. चौघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी संगमनेरच्या कुटीर रुग्णालयात आणण्यात आल्याची माहिती मिळाली.महसूल प्रशासनाने या घटनेची दखल घेत तातडीने संबंधितांना सूचना केल्या घडलेला प्रकार महावितरण कंपनीच्या कार्यकारी अभियंत्यांना कळविण्यात आला…

Read More

मृतांचा आकडा १२ वर तर जखमींची संख्या ३८ बसमध्ये क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी असल्याचे निष्पन्न चोवीस तासाच्या आत बस पेटण्याची दुसरी घटना महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क शनिवार नाशिककरांसाठी अपघातवार ठरला. बस पेटण्याच्या दोन घटना नाशिक शहर व जिल्ह्यात घडल्या. एका घटनेत मोठ्या प्रमाणात जिवीतहानी झाली तर दुसऱ्या घटना मात्र सुदैवाने सर्व प्रवाशांचे प्राण वाचले आहे. नाशिकमध्ये नांदूरफाटा येथील घटनेत मृतांच्या संख्येत वाढ होवून ही संख्या १२ वर गेली तर ३८ प्रवासी जखमी असल्याचे समोर आले आहे. मृतकांच्या वारसांना पंतप्रधान निधीतून प्रत्येकी दोन लाख तर राज्य सरकारकडून पाच लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. जखमींवरील उपचाराचा खर्च राज्य सरकार उचलणार असून…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क : कमी पटसंख्येच्या मराठी शाळा बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे राज्यभरातील 17000 शाळा बंद होण्याची चिन्हे आहेत. यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होणार असून या विरोधात छात्र भारतीने राज्यस्तरीय आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनाचा एक भाग म्हणून शनिवारी संगमनेरमध्ये शंभर एसटी बसेसला सरकारच्या निषेधाचे पोस्टर चिटकविण्यात आले आहे.दिल्लीमध्ये केजरीवाल सरकारने सरकारी शाळांना प्राधान्य देत या शाळांचा लौकिक जगभरात पोहोचविला आहे. तर दुसरीकडे राज्य सरकारने सरकारी शाळांना टाळे लावण्याचे धोरण अवलंबिले आहे. एकाच देशातील शिक्षणाचे हे चित्र विदारक आहे. कमी पट संख्येच्या राज्यभरातील जवळपास 17000 मराठी शाळांवर सरकारच्या या निर्णयामुळे गंडांतर येणार आहे.…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क : नासिकच्या औरंगाबाद रस्त्यावरील नांदूर नाका परिसरात मिरची चौकामध्ये शनिवारी पहाटे सव्वाचार वाजण्याच्या सुमारास खासगी लक्झरी बसला अपघातानंतर भीषण आग लागली. या आगीमध्ये दहा जणांचा होरपळून मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. घटनास्थळी प्रशासनाकडून मदत कार्य सुरू आहे. अपघातग्रस्त बस यवतमाळहुन मुंबईकडे चालली होती. मात्र शनिवारी पहाटे सव्वाचारच्या सुमारास ही बस नांदूर नाक्याजवळ मिरची चौकात आल्यानंतर चौफुलीवर एका टँकरला धडकली आणि अपघातानंतर लगेचच चिंतामणी ट्रॅव्हल्स या बसने पेट घेतला. अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशामक दलाचे तीन-चार वाहने तसेच चार-पाच रुग्णवाहिका झाल्या होत्या. पेटलेली अपघातग्रस्त बस विजविण्याचा अर्धा तासाहून अधिक वेळ प्रयत्न सुरू होता. आग एवढी…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क संगमनेर तालुक्यातील दोघा व अकोले तालुक्यातील एका सराईत गुन्हेगारांस प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे यांनी एक वर्षाकरिता हद्दपार केले असल्याची माहिती संगमनेरचे उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने यांनी दिली आहे. रमेश संतू पावसे (रा. हिवरगाव पावसा, ता. संगमनेर), सागर उर्फ शक्तिमान तुकाराम कोकण (रा. धांदरफळ खुर्द, संगमनेर) आणि ऋतिक किसन बांडे (रा. खडकी ता. अकोले) अशी या हद्दपार केलेल्या तिघा गुन्हेगारांची नावे आहेत. अकोले आणि संगमनेर तालुका पोलिसांकडून पोलीस उपविभागीय अधिकाऱ्यांकडे तसेच पोलीस उपविभागीय अधिकाऱ्यांनी प्रांत अधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे यांच्याकडे या आरोपी विरोधातील हद्दपारीचे प्रस्ताव पाठविले होते. मंगरूळ यांनी तीनही गुन्हेगारांना एक वर्षासाठी अहमदनगर जिल्ह्यातून हद्दपार…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क निळवंडे धरण आणि कालव्यासाठी अविश्रांत श्रम केल्यानेच ही कामे आज मार्गी लागली आहेत. ती आता कोणीही थांबवू शकत नाही. यासाठी ज्यांनी मदत केली त्यांचा आम्ही सातत्याने उल्लेख करतो, मात्र या कामात तुमचे योगदान काय, समन्यायी पाणी वाटपावर होतात आम्ही संघर्ष करत असताना तुम्ही गप्प का होतात, असा थेट सवाल राज्याचे माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी विद्यमान महसूलमंत्र्यांना नाव न घेता केला आहे. तालुक्यातील तळेगाव दिघे येथे विविध विकास कामांची उद्घाटने माजी मंत्री, आमदार बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आमदार डॉ. सुधीर तांबे होते. संगमनेरच्या…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क राज्यात महाविकास आघाडीचा प्रयोग घडवून आणणाऱ्या आणि महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा ज्येष्ठ नेते शरद पवार टीकेचे धनी ठरले. शिवसेनेतून 40 आमदारांना घेऊन बाहेर पडलेले आणि नव्याने शिंदे-फडणवीस सरकार बनविलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काँग्रेस राष्ट्रवादी सोबतचे युती आपल्याला कधीच मान्य नव्हती, शिवसेनेने त्यांचे हिंदुत्व सोडले अशी टीका केली आहे. बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी ही युती कधीच मान्य केली नसती. असे देखील शिवसेनेतून बाहेर पडलेले अनेक नेते म्हणत आहेत. मात्र प्रत्यक्षात वस्तुस्थिती वेगळीच आहे. ज्या शरद पवारांवर आज टीका केली जाते त्या पवारांचे आणि बाळासाहेब ठाकरे यांचे पक्षविरहीत राजकीय संबंध कसे होते हे…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क अन्न औषध प्रशासनाने नाशिकरोड भागात केलेल्या तब्बल १८ लाख रुपयांचा मिक्स गुटखा, सुगंधित तंबाखू, पानमसाला व सिगारेटचा साठा जप्त करण्यात आला आहे. प्रशासनाने ज्या गोडावूनवर छापा टाकला तेथून अनेक पानटपऱ्यासह दुकानांमध्ये गुटखा पोहचविला जात असल्याचा अंदाज आहे. नाशिकरोड पोलीस ठाण्यात यासंदर्भात दोन गुन्हे दाखल करण्यात आले. अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचा दोन पथकांनी वेगवेगळ्या ठिकाणी ही कारवाई केली. अन्न सुरक्षा अधिकारी प्रमोद पाटील यांनी नाशिक रोडवरील सचदेव आर्केड या ठिकाणी असलेल्या गोडावूनवर छापा टाकला असता त्यांना तेथे ३ लाख ६१ हजार ५७० रुपयांचा वैधानिक इशारा नसलेला सिगारेटचा साठा आढळून आला. हा माल ताब्यात घेत गोडावून सील…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क खरी शिवसेना कोणाची यावरुन न्यायालयात वाद विवाद सुरु असतांना दसरा मेळाव्यासाठीही शिंदे आणि ठाकरेंच्या शिवसेनेला न्यायालयात जावे लागले. न्यायालयाच्या निर्णयानंतर शिवाजी पार्कवर ठाकरेंच्याच शिवसेनेचा दसरा मेळावा होत असतांना बीकेसीत शिंदेच्या शिवसेनेचा मेळावा होत आहे. मात्र मुख्यमंत्री शिंदे यांनी दसरा मेळाव्याला गर्दी जमविण्यासाठी चालविलेल्या कोट्यावधी रुपयांच्या उधळपट्टीची ईडी आणि आयकर विभागाने चौकशी करण्याची मागणी महाराष्ट्र प्रदेश कॉग्रेस कमिटीचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली आहे. लोंढे म्हणाले, शिंदे गट राज्याच्या विविध भागातून एसटी व खासगी बसेसमधून कार्यकर्ते आणत आहे. यासाठी एसटी महामंडळाकडे दहा कोटी रुपये भरले असून ते मोजण्यासाठी महामंडळाला दोन दिवस लागले, असे वृत्त माध्यमातुन समजले.…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क राज्यातील २० पेक्षा कमी विद्यार्थी संख्येच्या शाळा बंद करण्याचा फतवा राज्य शासनाने काढला आहे. शासनाच्या या निर्णयाविरोधात छात्रभारती संघटना आक्रमक झाली आहे. मराठी शाळा ह्या गोरगरीब जनतेच्या आहेत, त्या कोणाच्या बापाच्या नाहीत असे ठणकावत छात्रभारतीने या निर्णयाचे पत्रक फाडून टाकत आणि संगमनेरच्या प्रांताधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करत निषेध नोंदविला आहे. कमी पटसंस्थेच्या राज्यातील सतरा हजारापेक्षा अधिक शाळा बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याची शासनाची ही कृती अत्यंत निषेधार्ह आहे, शासनाच्या या निर्णयाचा आणि गरिबांचे शिक्षण बंद करणाऱ्या मानसिकतेचा छात्रभारती तीव्र निषेध व्यक्त करत असल्याचे आंदोलकांनी म्हटले आहे. शासनाच्या या निर्णयामुळे ग्रामीण…

Read More