Author: अनंत पांगारकर
संगमनेर | महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर तालुक्यातील जवळेकडलग परिसरात गेल्या काही दिवसांपासून निर्माण झालेली बिबट्याची दहशत कमी करण्यासाठी वनविभागाला मोठे यश आले आहे. वनविभागाच्या रेस्क्यू टीमने अत्यंत धाडसी मोहीम राबवत आतापर्यंत तीन बिबट्यांना जेरबंद केले. सुरुवातीला घटनेच्या दुसऱ्या दिवशी पकडण्यात आलेल्या बिबट्यानंतर पुन्हा एका बिबट्याला गुंगीचे औषध (डॉट) देऊन पकडण्यात आले, तर एक बिबट्या वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात अडकला. त्यामुळे पकडलेल्या बिबट्यांची संख्या जवळेकडल मध्ये तीन वर गेली आहे. काही दिवसांपूर्वी जवळेकडलग येथील अवघ्या चार वर्षांच्या सिद्धेश कडलग या चिमुकल्याचा बिबट्याच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाला होता. या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला असून ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण होते. शासनाने या घटनेची गंभीर दखल…
संगमनेर | महाराष्ट्र संवाद न्यूज सहकार, शेती, शिक्षण आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेत ‘संगमनेर मॉडेल’ राज्यासमोर ठेवणारे माजी महसूलमंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी आता ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक महत्त्वाकांक्षी पाऊल उचलले आहे. तालुक्यातील युवकांना स्पर्धा परीक्षा व उच्च शिक्षणासाठी हक्काची जागा मिळावी, या उद्देशाने ९ अद्यावत अभ्यासिका उभारण्याची संकल्पना त्यांनी मांडली आहे. या उपक्रमाचा शुभारंभ म्हणून राजापूर येथे ग्रामविकास २५१५ अंतर्गत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने ३० लाख रुपये निधीतून साकारल्या जाणाऱ्या अभ्यासिकेचे भूमिपूजन युवक काँग्रेसच्या अध्यक्ष डॉ. जयश्रीताई थोरात यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले. डॉ. जयश्रीताई थोरात म्हणाल्या की, यशवंतराव चव्हाण यांचे समृद्ध वारसदार ही ओळख जपत लोकनेते बाळासाहेब थोरात…
अहिल्यानगर | महाराष्ट्र संवाद न्यूज: अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधात पोलिसांनी कंबर कसली असून, स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) चंदनाची तस्करी करणाऱ्या एका मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. नाशिकहून श्रीरामपूरच्या दिशेने चंदनाची लाकडे घेऊन जाणाऱ्या एका पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट कारची पोलिसांनी सिनेस्टाईल सापळा रचून झडती घेतली. या धडाकेबाज कारवाईत ५ लाख ७० हजार रुपयांच्या मुद्देमालासह एका आरोपीला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात अवैध चंदनाची वाहतूक व विक्री करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिले होते. या आदेशान्वये स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांनी विशेष पथक तयार करून तपास सुरू केला होता. गुरुवारी (१८ डिसेंबर) एलसीबीचे…
अहिल्यानगर: जिल्ह्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ज्या शाळांमध्ये मतदान केंद्रे आहेत, अशा शाळांना शुक्रवार १९ डिसेंबर आणि शनिवार २० डिसेंबर २०२५ रोजी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी सुट्टी जाहीर केली आहे. निवडणूक आयोगाच्या सुधारित कार्यक्रमानुसार जिल्ह्यातील राहाता वगळून उर्वरित संगमनेर, शिर्डी, राहुरी, श्रीरामपूर, शेवगाव, जामखेड, श्रीगोंदा, कोपरगाव, देवळाली प्रवरा, पाथर्डी या नगरपरिषदा आणि नेवासा नगरपंचायत या ठिकाणी २० डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या मतदान प्रक्रियेसाठी नियुक्त केलेले अधिकारी आणि कर्मचारी मतदानाच्या एक दिवस अगोदर, म्हणजेच १९ डिसेंबर रोजीच केंद्रांवर दाखल होणार आहेत. निवडणूक कामात कोणताही अडथळा येऊ…
मेष: कामाच्या ठिकाणी तुमच्या कतृत्वाचे कौतुक होईल. रखडलेली कामे मार्गी लागतील. आरोग्याची काळजी घ्या. वृषभ: आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. जोडीदाराशी संवाद वाढवा. मिथुन: नवीन कामाची संधी मिळेल. मानसिक शांतता लाभेल, पण खर्चावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. कर्क: आजचा दिवस धावपळीचा ठरेल. कायदेशीर बाबींमध्ये यश मिळेल. वादाचे प्रसंग टाळण्याचा प्रयत्न करा. सिंह: आत्मविश्वासात वाढ होईल. व्यापार-उद्योगात फायदा होईल. रखडलेले धन परत मिळण्याची शक्यता आहे. कन्या: नोकरीत बढतीचे योग आहेत. वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. घरासाठी काही खरेदी कराल. तूळ: प्रवासाचे योग आहेत. नशिबाची साथ मिळेल. धार्मिक कार्यात रुची वाढेल. वृश्चिक: आरोग्य आणि खाण्यापिण्याकडे लक्ष द्या. गुपित गोष्टी कोणाशीही…
संगमनेर | महाराष्ट्र संवाद न्यूज: राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार अमोल खताळ यांची सोशल मीडियाच्या माध्यमातून जाणीवपूर्वक बदनामी केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी संगमनेर शहर पोलिसांनी ‘संगमनेरचा राजू’ या इन्स्टाग्राम अकाऊंट चालकाविरोधात भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल केला असून पुढील कारवाई सुरू केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ‘संगमनेरचा राजू’ या इन्स्टाग्राम आयडीवरून मंत्री विखे पाटील आणि आ. अमोल खताळ यांच्या नावाचा वापर करून आक्षेपार्ह सब-टायटलसह काही व्हिडिओ आणि मजकूर प्रसिद्ध करण्यात आला होता. या पोस्टमध्ये दोघांची प्रतिमा मलीन करण्याचा आणि बदनामी करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करण्यात आल्याने कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या गेल्या. भाजपचे ज्येष्ठ नेते…
अकोले (प्रतिनिधी): अनेक प्रयत्न आणि प्रशासकीय पाठपुरावा करूनही अकोले तालुक्यातील अवैध दारूविक्री थांबत नसल्याने दारूबंदी समितीचे सदस्य तथा प्रसिद्ध समाजसेवक हेरंब कुलकर्णी यांनी प्रशासकीय यंत्रणेविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या बैठकीत आदेश देऊनही पोलीस आणि उत्पादन शुल्क विभाग कोणतीही ठोस कारवाई करत नसल्याचा निषेध नोंदवत कुलकर्णी यांनी आजच्या बैठकीवर बहिष्कार टाकला. तसेच, पुढील बैठकीपर्यंत परिस्थिती न सुधारल्यास समिती सदस्यत्वाचा राजीनामा देण्याचा इशाराही त्यांनी तहसीलदार यांना दिलेल्या पत्रात दिला आहे. हेरंब कुलकर्णी यांनी प्रशासनावर गंभीर आरोप करताना म्हटले आहे की, संगमनेर, ठाणगाव आणि घारगाव येथील दुकानांतून दररोज अकोल्यात अवैध दारूचा पुरवठा होतो. उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी सहस्त्रबुद्धे यांना वारंवार…
संगमनेर | महाराष्ट्र संवाद न्यूज: ग्राम विकास विभागाच्या मुख्यमंत्री ग्राम सडक योजना आणि आशियाई विकास बँक यांच्या संयुक्त विद्यमाने संगमनेर तालुक्यातील दोन मोठ्या पुलांच्या बांधकामासाठी १० कोटी ५० लाख १४ हजार रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती आमदार अमोल खताळ यांनी दिली आहे. महायुती सरकारच्या माध्यमातून संगमनेर तालुक्यात विकासकामांचा धडाका सुरू असून यामुळे ग्रामीण भागातील दळणवळणाचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे, तालुक्यात रस्त्यांचे आणि पुलांचे जाळे निर्माण करून सर्वांगीण विकास साधण्याचा मानस आमदार खताळ यांनी यावेळी व्यक्त केला. या निधीतून चंदनापुरी ते शिरापूर दरम्यानच्या पुलाच्या बांधकामासाठी ३ कोटी २४ लाख ७० हजार रुपयांच्या खर्चाला मंजुरी देण्यात आली आहे. तर पिंपरणे…
संगमनेर | महाराष्ट्र संवाद न्यूज: संगमनेर तालुक्यात नवीन औद्योगिक वसाहत (MIDC) स्थापन करण्यासाठी आमदार सत्यजीत तांबे यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला सकारात्मक दिशा मिळताना दिसत आहे. पठार भागातील साकुर व बोटा परिसरात औद्योगिक वसाहत उभारण्याच्या दृष्टीने या भागातील दहा ते पंधरा किलोमीटरच्या परिघात शासकीय अथवा खाजगी स्वरूपातील औद्योगिक वापरासाठी उपलब्ध होऊ शकणाऱ्या जागांचा सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश मंडल अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. आमदार सत्यजीत तांबे यांनी 2025 च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात संगमनेर तालुक्याच्या पठार भागात औद्योगिक वसाहत स्थापन करण्याचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यानंतर 7 एप्रिल 2025 रोजी त्यांनी उद्योगमंत्री नामदार उदय सामंत यांना यासंदर्भात पत्र पाठवले. त्या पत्राची दखल घेत…
अहिल्यानगर | महाराष्ट्र संवाद न्यूज: राज्याच्या प्रशासकीय वर्तुळातून एक अतिशय खळबळजनक बातमी समोर आली आहे. अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयाला आज सकाळी एका निनावी ईमेलद्वारे बॉम्बस्फोटाची धमकी देण्यात आल्याने संपूर्ण शहरात एकच खळबळ उडाली. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता, पोलीस प्रशासनाने तात्काळ पावले उचलली आणि सखोल तपासणी केली. मात्र, सुदैवाने काहीही आक्षेपार्ह आढळले नसल्याने हा केवळ एक खोडसाळपणा आणि अफवा असल्याचे स्पष्ट झाले असून आता कार्यालयाचे कामकाज पूर्णपणे सुरळीत झाले आहे. आज सकाळी नेहमीप्रमाणे कामकाज सुरू असतानाच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अधिकृत ईमेलवर हा धमकीचा संदेश धडकला. यामुळे प्रशासकीय यंत्रणेचे धाबे दणाणले आणि तातडीने पोलीस विभागाला याची माहिती देण्यात आली. सुरक्षिततेचा उपाय म्हणून पोलिसांनी…
