Author: अनंत पांगारकर

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन पुणे: राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त करत महाराष्ट्रातील महिलांच्या हक्कांसाठी आणि त्यांच्या सुरक्षेसाठी कार्यरत असलेल्या राज्य महिला आयोगाच्या कार्यक्षमतेवरच आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले असल्याचे रूपवते यांनी म्हटले आहे. ज्या तत्परतेने पुणे रेव्ह पार्टी आणि प्रांजल खेवलकर यांच्या प्रकरणात महिला आयोगाच्या अध्यक्षांनी ठोस भूमिका घेतली, त्याच तत्परतेने कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये विनयभंगाचा आरोप करणाऱ्या पीडित दलित मुलीला न्याय मिळवण्यासाठी दोन मिनिटांचा वेळ दिला नाही. आयोगाच्या अध्यक्षा पुण्यामध्येच वास्तव्यास असताना, पीडित मुली तीन दिवस सातत्याने पोलीस स्टेशनबाहेर आंदोलनात बसल्या होत्या, तरीही त्यांना भेटायला अध्यक्ष गेल्या नाहीत, असे आयोगाच्या माजी सदस्या आणि वंचित बहुजन…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन नाशिक: काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यानंतर आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनीही निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर गंभीर आरोप केले आहेत. लोकसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर मतचोरी आणि घोटाळे झाल्याचा दावा करत, जर निवडणूक आयोगाने निवडणुकीसंदर्भात डिजिटल माहिती सार्वजनिक केली, तर सर्व घोटाळे समोर येतील, असे थोरात म्हणाले. जागतिक आदिवासी दिनानिमित्त नाशिकमध्ये आयोजित एका कार्यक्रमात पत्रकारांशी बोलताना थोरात यांनी हे मत व्यक्त केले. त्यांनी राहुल गांधी यांनी दिल्लीतील पत्रकार परिषदेत सादर केलेल्या पुराव्यांचा संदर्भ देत, भाजप लोकशाही संपवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला. निवडणुका चुकीच्या पद्धतीने आणि घोटाळे करून जिंकल्या जात आहेत, असे ते म्हणाले. थोरात यांनी जनतेला…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन:  अवैध वाळू उत्खनन आणि वाहतूक करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यासाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे ॲक्शन मोडमध्ये आले आहेत. त्यांनी शनिवारी बुलढाण्यात घेतलेल्या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना थेट ‘महाराष्ट्र धोकादायक व्यक्ती प्रतिबंधक कायद्यांतर्गत’ (MPDA) गुन्हे दाखल करण्याचे स्पष्ट निर्देश दिले. या बैठकीत त्यांनी अवैध गौण खनिज उत्खननात सामील असलेल्या महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांवरही लक्ष ठेवून कारवाई करण्याचे आदेश दिले. तसेच, यापुढे कोणत्याही मंत्री, खासदार किंवा आमदारांच्या शिफारशींना न जुमानता कारवाई करण्याचे निर्देश देत, यापुढे जिल्ह्यात अवैध वाळू उपसा झाल्यास जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांवर जबाबदारी निश्चित केली जाईल, असा सज्जड इशाराही त्यांनी दिला. यावेळी मंत्री बावनकुळे यांनी…

Read More

देशाच्या बहुतांश शासकीय यंत्रणांमध्ये सरकारी दलालांचा उच्छाद पराकोटीने वाढला आहे. सरकारच्या हातचं बाहुलं बनलेल्या या यंत्रणांवर प्रचंड टीका होऊनही त्यांना आपल्या कर्तव्याची जाणीव होत नाही. अगदी न्यायालयांनीही कान उपटले तरी तिथे बसलेल्यांनी आपल्यातला मुर्दाडपणा सोडला नाही. या यंत्रणांमध्ये अर्थातच देशातल्या निवडणूक आयोगाचा उल्लेख करावा लागतो आहे. देशातील निवडणुका या अपारदर्शक होऊ लागल्यापासून आयोगावर प्रचंड टीकेचे बाण सुटत आहेत. हा आयोग सत्ताधारी पक्षाचा बटिक झालाय, अशी टीका विरोधक कायमच करत आले आहेत. आपल्यावरचं बालंट दूर करण्यासाठी आयोगाचे अधिकारी पुराव्यांचं निमित्त करत पुन्हा सत्तेचे पाठिराखे बनतात. आयोगातील अधिकार्‍यांच्या या वर्तणुकीने आयोगाची अक्षरश: पिसं निघालीयत.  तिरुनेलाई नारायण अर्थात टी. एन. शेषन यांच्या काळातील…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन  संगमनेर, प्रतिनिधी: ड्राय डे च्या दिवशी दारू विकण्याच्या उद्देशाने एक व्यक्ती दारूची वाहतूक करत असल्याची माहिती संगमनेर शहर पोलिसांना मिळाल्याने पोलिसांनी केलेल्या कारवाईमध्ये 3 लाख 35 हजार 360 रुपयांच्या मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी शाहूनगर (अकोले) येथील राजेश बबन शिंदे याला दारूची वाहतूक करताना पकडण्यात आले. संगमनेर पोलिसांची अवैध दारू वाहतूक करणाऱ्यांवर ही मोठी कारवाई मानली जात आहे. शनिवारी (9 ऑगस्ट) अकोले तालुक्यात जागतिक आदिवासी दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या अनुषंगाने प्रशासनाने अकोलेमध्ये ‘ड्राय डे’चे आदेश दिले होते. या पार्श्वभूमीवर राजेश बबन शिंदे (वय 40 वर्ष, रा. शाहूनगर, अकोले, ता. अकोले, जि. अहिल्यानगर)…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन  संगमनेर, प्रतिनिधी: राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली 9 ऑगस्ट क्रांती दिनी ‘चले जाओ’चे मोठे आंदोलन झाले. देश स्वातंत्र्यासाठी अनेक वीरांनी हौतात्मे पत्करले. त्यांच्या त्यागातून देशाला स्वातंत्र्य मिळाले. राज्यघटना आली. मात्र ज्या विचारांनी स्वातंत्र्य लढ्यामध्ये कोणतेही योगदान दिले नाही. इंग्रजांविरुद्ध कोणतीही लढाई केली नाही. ते लोक आज जातीभेदाच्या नावावर दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहे. गरज आहे देश, लोकशाही आणि राज्यघटना वाचवण्याची याकरता या लोकशाही विरुद्धच्या विघातक शक्तींविरोधात क्रांतीचा नारा देण्याची मोठी गरज निर्माण झाली असल्याचे प्रतिपादन काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य माजी प्रांताध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केले आहे. नेहरू चौक येथील अशोक स्तंभास क्रांती दिनानिमित्त अभिवादन केल्यानंतर…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन पुणे: कुणीही उठतो आणि उपदेश करतो, सगळा मक्ता मीच घेतला आहे. कुठून पुण्याचा पालकमंत्री झालो असे वाटायला लागले आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली. पिंपरी-चिंचवडमध्ये मुळा नदीच्या सुशोभीकरण प्रकल्पासाठी झाडे तोडण्यात येत असल्याच्या मुद्द्यावरून ते चिडले. पर्यावरणप्रेमींनी पालकमंत्री म्हणून अजित पवार यांनी ही वृक्षतोड थांबवावी अशी मागणी केली होती, त्यावर त्यांनी हे विधान केले. चिंचवडमध्ये अभिनेते सयाजी शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात अजित पवार बोलत होते. यावेळी त्यांनी भाषणाच्या शेवटी सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी वृक्षतोडीचा मुद्दा उपस्थित केला. भापकर यांनी पवना, इंद्रायणी, मुळा नद्यांच्या सुशोभीकरण प्रकल्पांत हजारो झाडे तोडण्यात येत असल्याकडे…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर, प्रतिनिधी: राजापूर ग्रामपंचायतीमध्ये अनेक वर्षांपासून काँग्रेसची सत्ता असूनही गावातील मूलभूत प्रश्न प्रलंबित असल्याचा आरोप करत गावाच्या विकासासाठी पुढाकार घेतल्यानंतर विरोधक निराधार आरोप करत आहेत. या बिनबुडाच्या आरोपांना मी भीक घालणार नाही, असा स्पष्ट इशारा संदेश देशमुख यांनी दिला आहे. देशमुख म्हणाले, गेल्या अनेक वर्षांपासून गावात काँग्रेसच्या नेतृत्वाखाली बेकायदेशीर कामे सुरू असल्याचा आरोप देशमुख यांनी केला आहे. या चुकीच्या कामांविरोधात आवाज उठवल्यामुळेच आपल्याला बदनाम करण्याचे प्रयत्न सुरू आहे. पण आपण कोणत्याही दबावाला बळी न पडता यापुढेही आमदार अमोल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली चुकीच्या कामांना विरोध करतच राहणार असल्याच सांगितलं. आमदार अमोल खताळ यांच्या प्रयत्नांमुळे गावातील शेतकऱ्यांना कोणतीही…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर, प्रतिनिधी: रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला आमदार अमोल खताळ यांनी ‘लव्ह जिहाद’ विरोधी कायदा लागू करण्यासाठी हिवाळी अधिवेशनात आवाज उठवणार असल्याचं आश्वासन आपल्या भगिनींना दिलं. डिसेंबरमध्ये नागपूर येथे होणाऱ्या अधिवेशनात हा प्रश्न उपस्थित करून, कायदा लागू होईपर्यंत त्याचा पाठपुरावा करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. आमदार खताळ यांच्या जनसंपर्क कार्यालयात रक्षाबंधनानिमित्त संगमनेर शहर आणि तालुक्यातील अनेक भगिनींनी त्यांना राखी बांधली. यावेळी, प्रेमाच्या नावाखाली हिंदू युवतींना फसवून त्यांचं जबरदस्तीने धर्मांतर करणं, शारीरिक आणि मानसिक छळ, लैंगिक अत्याचार आणि आत्महत्यांसारख्या घटना वाढत असल्याबद्दल भगिनींनी चिंता व्यक्त केली. अशा घटनांना आळा घालण्यासाठी कठोर ‘लव्ह जिहाद’ विरोधी कायदा तातडीने लागू करावा, अशी मागणी…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन राजापूर: सोमवारी झालेल्या संगमनेर तालुक्यातील राजापूर गावच्या ग्रामसभेत महायुतीच्या एका पदाधिकाऱ्याकडून होत असलेल्या दडपशाहीची तक्रार समोर आली आहे. सरपंच कुसुमताई पानसरे यांनी, संदेश बाळासाहेब देशमुख हे गावातील विकासकामांमध्ये अडथळे निर्माण करत असल्याचा आरोप केला. या गंभीर आरोपांची दखल घेत, ग्रामपंचायत चुकीचे काम करत असेल तर वरिष्ठांकडे तक्रार करून चौकशीची मागणी करावी. विकास कामात अडथळे आणू नये, असा निर्णय घेण्यात आला. सरपंच पानसरे यांनी ग्रामसभेत सांगितले की, संदेश देशमुख हे नेहमीच गावाच्या प्रगतीपथावरील कामांमध्ये अडथळे आणण्याचा प्रयत्न करतात. केवळ प्रसिद्धीसाठी ते विकासकामांना विरोध करतात. तालुक्याच्या नेतृत्वाने विकासाचा अजेंडा राबवण्याचे निर्देश दिले असतानाही, देशमुख त्यांच्या भूमिकेच्या विरोधात काम…

Read More