Author: अनंत पांगारकर

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क शिवसेनेत उद्भवलेला पेच अद्यापही कायम आहे. आपल्या गटाला समर्थन असल्याचे सिद्ध करण्यासाठी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रापैकी तब्बल अडीच लाख प्रतिज्ञापत्र केंद्रीय निवडणूक आयोगाने अवैध ठरविले आहे. तर उर्वरित प्रतिज्ञापत्र वैध असल्याचा निर्वळा आयोगाने दिला आहे.चार महिन्यांपूर्वी झालेल्या शिवसेना फुटीनंतर तात्पुरत्या स्वरूपात शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह गोठविल्यामुळे पक्षाच्या अडचणी वाढल्या असतानाच आता केंद्रीय निवडणूक आयोगाचा नवीन निर्णय समोर आला आहे. दरम्यान शिवसेना नावावर आणि धनुष्यबाण चिन्हावर ठाकरे आणि शिंदे दावा केल्यानंतर हा वाद केंद्रीय निवडणूक आयोगापर्यंत पोहोचला होता.त्यामुळे आपल्याच गटाला पदाधिकारी कार्यकर्त्यांचे समर्थन असल्याचे दावा करणारे प्रतिज्ञापत्रे ठाकरे-शिंदे गटातर्फे निवडणूक आयोगाकडे दाखल करण्यात आली होती. ठाकरे…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क बालकांच्या हृदयरोगाबाबत झालेली जनजागृती आणि सर्वसामान्य रुग्णांच्या मागणीमुळे या महिन्यात पुन्हा एकदा एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये बालकांच्या हृदय उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या महिन्यात तब्बल आठवडाभर बालकांवर मोफत हृदयउपचार करण्यात येणार आहेत.गेल्या दोन महिन्यांत आयोजित करण्यात आलेल्या बालकांवरील मोफत हृदयउपचार आरोग्य शिबिरास भरघोस प्रतिसाद मिळाला. तब्बल ८२ बालकांवर यशस्वी हृदय उपचार करण्यात आले. ठाणे, पालघर जिल्ह्यासह संपूर्ण उत्तर महाराष्ट्रातील रुग्णांचा या आरोग्य शिबिराला मोठा प्रतिसाद लाभला. आज २६ ऑक्टोंबरपासून या शिबिरास सुरुवात होणार असून जास्तीत जास्त रुग्णांनी संपर्क साधावा असे आवाहन एसएमबीटी हॉस्पिटलच्या प्रशासनाकडून करण्यात आले आहे. एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये गंभीर आजारांवरील उपचार होत आहेत. गंभीर आजारांवरील…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क विकृतपणाचा कळस गाठणारी आणि प्रत्येकाच्या मनात संताप निर्माण होईल अशी संतापजनक घटना पुण्यातून समोर आली आहे. पुण्याच्या वारजे माळवाडी भागात तेरा महिन्याच्या चिमुकलीवर अत्याचार करण्यात आला असून आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. ओळखीतल्या व्यक्तीनेच हे संताप आणणारे कृत्य केले आहे. पोलिसांकडील माहितीनुसार वारजे माळवाडी परिसरात मजुरी करणारे दांपत्य राहते. या दांपत्याला एक तेरा महिन्यांची चिमुकली आहे. चिमुकलीचे आई-वडील काही कामानिमित्त बाहेर जाण्यासाठी निघाले होते. त्यावेळी आरोपीने, तुम्ही येईपर्यंत मी चिमुकलीचा सांभाळ करतो. तुम्ही बिनधास्त जा, असे सांगत चिमुकलेला आपल्या कडेवर उचलून घेतले. संबंधित व्यक्ती ही विश्वासातील आणि ओळखीचे असल्याने तो आपल्या चिमुकलीचा सांभाळ करेल, असा विश्वास…

Read More

अनंत पांगारकर | महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क राज्याचे महसूल मंत्री आणि अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री असलेल्या राधाकृष्ण विखे पाटील यांनी महसूल खात्याचा पदभार हाती घेतल्यानंतर वाळू संदर्भात निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. मात्र त्यांचे हे निर्णय राज्यासाठी नसून केवळ संगमनेर आणि पारनेर या दोन तालुक्यासाठीच असल्याची टीका मंत्री विखे यांच्यावर होत आहे. या पार्श्वभूमीवर संगमनेर शिवसेनेची समाज माध्यमांवर व्हायरल होत असलेली पोस्ट चर्चेचा विषय ठरली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नुकताच औरंगाबाद दौरा करत अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांशी संवाद साधला होता. ठाकरे यांच्या या भेटीवर महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी टीका केली होती. या टीकेमुळे नाराज झालेल्या…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क गेल्या वर्षी राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचे नेतृत्व करून चर्चेत आलेले आणि सत्तांतर झाल्यानंतर फारसे चर्चेत नसलेल्या ॲड. गुणरत्न सदावर्ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. सदावर्ते यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे संपादक असलेल्या दैनिक ‘सामना’वर बंदीची मागणी केली आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष असलेल्या शरद पवार यांच्या घरावरील हल्ला प्रकरणी सदावर्ते यांना अटक करण्यात आली होती. अनेक दिवस अटकेत असलेल्या सदावर्ते यांनी नंतरच्या काळात मवाळ भूमिका घेतली.महाविकास आघाडी सरकार पडल्यानंतर राज्यात शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आले त्यानंतर देखील जवळपास तीन महिने सदावर्ते शांत होते.अलीकडेच शिंदे-फडणवीस सरकारने क्लीनचीट दिलेल्या व आयपीएस अधिकारी असलेल्या रश्मी शुक्ला यांच्याबद्दल दैनिक सामनातून येत असलेल्या बातम्यांचे कारण…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क शहराची सांस्कृतिक ओळख अधोरेखित करणारा आणि पहाट गाणी ही संकल्पना संगमनेरमध्ये रुजविणारा दिवाळी पहाट गाणी हा कार्यक्रम येत्या बुधवारी (दि.२६) पहाटे साडेपाच वाजता भंडारी मंगल कार्यालयात होणार आहे. संगमनेर इतिहास संशोधन मंडळ आणि स्वसंगम संगीत प्रसारक संस्था यांच्या वतीने सादर होणाऱ्या कार्यक्रमाला संगमनेरकर रसिकांनी नेहमीप्रमाणे मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन कार्यक्रमाचे संयोजक डॉ. संतोष खेडलेकर यांनी केले आहे. दरवर्षी वेगवेगळ्या संकल्पना घेऊन दिवाळी पहाट गाणी हा कार्यक्रम सादर केला जातो. या वर्षी स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर, ज्येष्ठ गायक भूपेन हजारिका, संगमनेरच्या भूषण गुलाबबाई संगमनेरकर हे महान कलाकार आपल्यातून गेल्याने, शाहीर साबळे यांचे हे जन्मशताब्दी वर्ष असल्याने…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेती पिकांबाबत शेतकऱ्यांच्या दृष्टीने शासन स्तरावर निर्णय घेणार असून बाधित शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळवून दिली जाईल, असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. पालकमंत्री विखे पाटील यांनी सोमवारी जामखेड तालुक्यात अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पाहणी केली. खर्ड्याच्या सिताराम गड मध्ये आयोजित आढावा बैठकीत विखे पाटील बोलत होते. यावेळी त्यांच्या समवेत कर्जत-जामखेडचे आमदार माजी मंत्री राम शिंदे आणि अहमदनगरचे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले उपस्थित होते. विखे पाटील यांनी खर्डा परिसराश मोहरी तेलंगशी जायभाय वाडी येथील बाधित शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीचे पाहणी केली. बाधित क्षेत्राचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश त्यांनी यावेळी…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क अहमदनगरच्या पालकमंत्र्यांनी वाळू तस्करीसाठी वापरल्या जाणाऱ्या दोन लोखंडी बोटी स्वतः पकडण्याच्या घटनेला काही तास उलटत नाही तोच, नाशिकच्या पालकमंत्र्यांचे नवे धाडस समोर आले आहे. पालकमंत्री दादा भुसे यांनी दरोड्याच्या उद्देशाने हातात पिस्तूल घेऊन बंगल्यात घुसलेल्या चोरट्याला पकडण्याचे धाडस दाखवले आहे. यामुळे बंगल्यातील तीन महिलांचे प्राण वाचले. मालेगावच्या कलेक्टर पट्टा भागात घडलेल्या या घटनेची चर्चा राज्यभरात होत आहे. पालकमंत्री भुसे यांनी पकडलेल्या या संशयित चोराला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असल्याची माहिती मिळाली. आज लक्ष्मीपूजन असल्याने बंगल्यात मोठ्या प्रमाणात रोकड, दाग दागिने असेल ते लुटून नेता येतील या उद्देशाने दुपारी साधारणता तीन वाजण्याच्या सुमारास एक चोरटा बंगल्यात घुसला.…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क दोन वर्षानंतर प्रथमत:च मोठ्या उत्साहात दिवाळी साजरी होत असली तरी जास्तीच्या झालेल्या पावसामुळे शेतकरी अडचणीत आहे. शेतकरी अडचणीत असताना सरकारने त्याच्या पाठीशी उभा राहण्याची गरज आहे. मात्र सध्याच्या सरकारकडून केवळ घोषणांचा पाऊस सुरू असून प्रत्यक्षात मदत मिळत नसल्याची टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर केली आहे. दीपावलीच्या पार्श्वभूमीवर आयोजित कार्यक्रमात माजी मंत्री थोरात बोलत होते. राज्य साखर संघाचे संचालक आणि सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात कारखान्याचे अध्यक्ष बाबा ओहोळ, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष माधवराव कानवडे, संगमनेरच्या नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, जिल्हा परिषद सदस्य रामहरी कातोरे, डॉ. हसमुख जैन, डॉ. जयश्री थोरात आदी यावेळी उपस्थित होते.…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क गुवाहाटीला जाऊन करोडो रुपये लाटले, असा आरोप रवी राणा यांनी बच्चू कडू यांच्यावर केला होता. या आरोपांवरुनच बच्चू कडू यांनी पोलिसांत तक्रार दाखल करत रवी राणा यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. यामुळे शिंदे-फडणवीस सरकारमधील आमदारांमध्ये सुरू असलेली धुसफूस चव्हाट्यावर आली आहे. या दोन आमदारांमधील वादात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मध्यस्थी करणार असल्याची माहिती समोर येत आहे. आधी मंत्रिमंडळाचा रखडलेला शपथविधी, आता बहुचर्चित रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार यामुळे शिंदे-फडणवीस सरकारमध्ये नाराजी असल्याचे सांगितले जाते. अशा पार्श्वभूमीवर गेल्या तीन महिन्यात सरकारने घेतलेल्या महत्वाच्या निर्णयामुळे पक्षांतर्गत असलेली नाराजी समोर आलेली नव्हती. मात्र आता गुवाहाटी वरून झालेल्या आरोपामुळे आमदार बच्चू…

Read More