Author: Annant Ppangarkar
विशेष प्रतिनिधी / मुंबई महाराष्ट्रात प्रवास सुखकर होण्यासाठी परिवहन विभागाने गेल्या काही काळात काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. आता परिवहन विभागाने आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे, त्यामुळे मुंबईकरांचा प्रवास स्वस्तात होणार आहे. ओला, उबेरसारखेच मुंबईत बाईक टॅक्सीला परवानगी देण्यात येणार आहे. तसेच, पुढील दोन महिन्यात रॅपिडोसारख्या बाईक सर्विस सुरू होणार आहेत. त्यामुळे ट्रॅफिकमध्ये अडकून पडणाऱ्या प्रवाशांसाठी आता आणखी एक पर्याय निर्माण होणार आहे. त्यामुळे आता मुंबईकरांचा प्रवास अधिक जलद आणि स्वस्तात होणार असल्याचे सांगितले जात आहे देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत प्रवास करण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. मुंबई लोकल, बेस्ट बस, मुंबई मेट्रो, टॅक्सी, रिक्षा असे पर्याय असतानाही मुंबईकरांना…
संगमनेर दि. ३० – अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत सध्या नोकर भरतीची प्रक्रिया सुरू आहे. आरक्षणाशिवाय सुरू असलेली ही भारतीय प्रक्रिया थांबविण्याची मागणी संगमनेर मधील सामाजिक कार्यकर्त्यांनी संगमनेरचे नवनियुक्त आमदार अमोल खताळ यांच्याकडे केली आहे. दरम्यान जिल्हा बँकेवर जिल्ह्यातील बड्या नेत्यांचे वर्चस्व असल्याने आमदार खताळ या प्रकरणी काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागले आहे. हिरालाल पगडाल, के. जी. भालेराव, राजाभाऊ अवसक, ॲड. किरण रोहम, सिताराम राऊत, अरुण ताजने, सूर्यकांत शिंदे, अरविंद सांगळे, प्राध्यापक बाबा खरात, विकास वाव्हळ, विश्वनाथ आल्हाट, हनुमंत उबाळे, सुखदेव मोहिते, ज्ञानेश्वर राक्षे, मनोज उपरे, संजय दारोळे, प्रशांत गायकवाड, अंतोन घोडके, दिलीप पराड, डॉ. दानिश खान, अमोल जगताप,…
अहिल्यानगर दि. ३०- दिव्यांगांना स्वावलंबी करण्याच्या दृष्टीने हरित उर्जेवर चालणाऱ्या फिरत्या वाहनावरील दुकान (मोबाईल शॉप ऑन ई-व्हीईकल) मोफत उपलब्ध करुन देण्याच्या योजनेस शासनाने मान्यता दिली आहे. या योजनेच्या लाभासाठी जिल्ह्यातील अधिकाधिक दिव्यांगांनी ६ फेब्रुवारी २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत https://register.mshfdc.co.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त आणि विकास महामंडळाच्या जिल्हा व्यवस्थापकांनी केले आहे. दिव्यांग व्यक्तींना पुरेशा सोयी-सुविधा उपलब्ध करुन रोजगार निर्मितीस चालना देणे, दिव्यांग व्यक्तींचे आर्थिक, सामाजिक पुनर्वसन व्हावे तसेच सर्वसामान्य व्यक्तीप्रमाणे दिव्यांगांना त्यांच्या कुटुंबासमवेत जगण्यास सक्षम करण्याच्या दृष्टीने ही योजना राबविण्यात येत आहे.
मुंबई दि. २९ : मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून वैद्यकीय सहाय्यता मिळणेकरीता आजारांचे पुनर्विलोकन करणे, आजारांकरीता देण्यात येणाऱ्या अर्थसहाय्याची रक्कम नव्याने निश्चित करणे व रुग्णालय संलग्नीकरणासाठी निकष ठरविण्याकरिता शिफारशी करणेबाबत समिती गठीत आली आहे. याबाबत शासननिर्णय काढण्यात आला असल्याची माहिती मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांनी दिली. या समितीमध्ये संचालक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय (मुंबई) हे अध्यक्ष असतील. तसेच, आरोग्य संचालनालय (मुंबई) चे संचालक, आयुष संचालनालय (मुंबई) चे संचालक, सर ज. जी रुग्णालय समूहाचे अधिष्ठाता, लोकमान्य टिळक स्मारक रुग्णालयाचे (सायन) अधिष्ठाता, मुख्यमंत्री यांचे सल्लागार डॉ. आनंद बंग, वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे (मुंबई) माजी संचालक डॉ. प्रवीण शिनगारे, वैद्यकीय…
मुंबई दि. २९- नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार सत्यजित तांबे यांनी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांची भेट घेतली आहे. माजी मंत्री व तत्कालीन आमदार बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर तालुक्यातील विविध रस्त्यांसाठी निधी मिळविला आहे. मात्र राजकीय हेतू डोळ्यासमोर ठेवून सत्ताधाऱ्यांनी गेल्या तीन वर्षांपासून तालुक्यातील ही सर्व कामे रखडवून ठेवली आहेत. रस्ते दुरुस्तीसह रखडून ठेवण्यात आलेल्या सर्व कामांना तात्काळ गती देण्यात यावी या मागणीसाठी तांबे यांनी भोसले यांची भेट घेतली. आमदार तांबे यांनी म्हटले आहे की, माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांनी प्रत्येक गावच्या विकासासाठी निधी दिला. अनेक रस्त्यांच्या कामासाठी निधी मंजूर करून घेतला. परंतु मागील तीन वर्षापासून सत्ताधाऱ्यांनी निधी मंजूर…
संगमनेर दि. २९- रात्रीच्या वेळी गस्त घालत असतांना संगमनेर तालुका पोलिसांनी निळवंडे शिवारात संशयास्पदरित्या फिरणाऱ्या इंडिका कारचा पाठलाग करून दरोड्याच्या तयारीत असलेल्या तिघांना पकडले तर या कारवाईदरम्यान दोघे पळून जाण्यात यशस्वी झाले. पोलिसांनी पकडलेल्या संशयित आरोपींकडून गावठी कट्टा, कोयता, चार मोबाईल, इंडिका कार जप्त करण्यात आली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक देविदास ढुमणे यांनी दिली. मंगळवारी (दि. २८) पहाटे साडे पाच वाजेच्या तालुका पोलीस स्टेशनचे गस्तीचे अंमलदार पोलीस हेडकॉन्स्टेबल संपत जायभाये, चालक कोकणे हे मोबाईल पेट्रोलींग करून निळवंडे मार्गे करुन वडगावपानकडे येत असतांना त्यांना समोरून एक पांढऱ्या रंगाची इंडिका कार (क्र. एम. एच. २३ ई ६८४७) हि निळवंडे-कवठे कमळेश्वर रस्त्यांने वेगांने…
संगमनेर – नवसाला पावणारा अशी ख्याती असलेल्या संगमनेर शहरातील नवश्या गणपती मंदिर स्थापनेला २५ वर्ष पूर्ण होत आहे. या पार्श्वभूमीवर गणेश जयंती पासून विविध धार्मिक कार्यक्रम आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती प्रमुख कार्यकर्ते अमोल डुकरे यांनी दिली आहे. गणेश जयंतीला (शनिवार दि. १ फेब्रुवारी) सकाळी सव्वा सहा वाजता नवश्या गणपतीला महा अभिषेक करून महाआरती केली जाणार आहे. त्यानंतर सायंकाळी सात वाजेपर्यंत मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी पावणे सात वाजता महाआरती व त्यानंतर सात वाजता महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध अंधकलाकारांचा भावगीते व भक्ती गीतांचा कार्यक्रम मंदिर परिसरात आयोजित करण्यात आला आहे. गेल्या आठ वर्षांपासून अमोल डुकरे व परिसरातील…
नागपूर, दि. २९ : लोकशाही व्यवस्थेमध्ये कायद्याचे राज्य या संकल्पनेला सर्वोच्च स्थान आहे. न्यायव्यवस्था हा सर्वात महत्त्वाचा लोकशाहीचा स्तंभ म्हणून आपण पाहतो. आजही नागरिकांचा सर्वाधिक विश्वास हा न्यायव्यवस्थेवर आहे. हा विश्वास कायम ठेवण्यासाठी उत्तम वकील आवश्यक आहेत. उत्तम वकील तयार करण्यासाठी चांगली विधी महाविद्यालये व अनुभवी गुरुजन वर्गाची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयाच्या शताब्दी समारोहाच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्यमंत्री आशिष जैस्वाल, राज्यमंत्री इंद्रनील नाईक, कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे, न्यायमूर्ती व्ही. एस. सिरपूरकर, प्राचार्य डॉ. रविशंकर मोर, रजिस्ट्रार डॉ. राजू हिवसे यांची प्रमुख उपस्थिती होती. मुख्यमंत्री…
मुंबई, दि. २८ : राज्यात वाघांचे होणारे मृत्यू शासनाने गांभीर्याने घेतले असून वन अधिकाऱ्यांना अपघाती मृत्यू रोखण्याचे निर्देश देण्यात आले आहे. त्याचबरोबर मागील सोळा वर्षात राज्यामध्ये वाघांची संख्या सरासरी ३५० ने वाढली असून केंद्र सरकारच्या निर्देशाप्रमाणे राज्यातील वनक्षेत्र एकूण भौगोलिक क्षेत्राच्या ३० टक्के पर्यंत वाढविण्याचा प्रयत्न असणार आहे, असे वनमंत्री गणेश नाईक यांनी सांगितले. ३० डिसेंबर २०२४ ते २२ जानेवारी २०२५ या कालावधीमध्ये राज्यात विविध घटनांमध्ये बारा वाघांचा मृत्यू झाला. पाच वाघांचा मृत्यू आपापसातील संघर्षातून जखमी झाल्याने, आजारपणामुळे इत्यादी नैसर्गिक कारणांनी झालेला आहे. चार वाघांचा मृत्यू अन्य जनावरांसाठी लावण्यात आलेल्या विजेच्या तारांचा शॉक लागल्याने झाला आहे. किंवा वाहनांच्या धडकेने झाला…
संगमनेर दि. २८- संगमनेरचा विकास रोखू पाहणाऱ्यांनी आता विकासाबरोबरच येथील एकजूट मोजण्यासाठी राजकीय उद्देश समोर ठेवून प्रशासकीय सोयीच्या नावाखाली तालुक्याची मोडतोड करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. प्रस्तावित आश्वी बुद्रुक येथील अप्पर तहसील कार्यालयाच्या नावाखाली तालुक्याची मोडतोड सुरू केली असून कोणत्याही स्थितीत सत्ताधाऱ्यांचा हा प्रकार सहन केला जाणार नसल्याचा इशारा राज्याचे माजी मंत्री काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी दिला आहे. अहिल्यानगर जिल्हाधिकारी महसूल शाखा यांनी पत्र क्र. प्रा. फे.ब.2022 /प्रक्र. 94/म -10, दिनांक 17 जानेवारी 2023 या राजकीय दबावातून काढलेल्या अध्यादेशातून संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक येथे स्वतंत्र अप्पर तहसील कार्यालय निर्माण करण्याबाबत घाट घातला आहे. खरे तर संगमनेर तालुका हा…
काही रकमेचा दिला परतावा… नंतर मात्र केली फसवणूक नाशिक – मोठी गुंतवणूक केल्यास जास्तीचा परतवा देण्याचे आमिष दाखवत काही भामट्यांनी नाशिक शहरातील वृद्धाला तब्बल ३६ लाखाला गंडविल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे या भामट्यांनी वृद्ध व्यक्तीला काही रकमेचा परतवा देत विश्वास संपादन केला होता. या विश्वासातून भामट्यांनी वृद्ध व्यक्तीला मोठी गुंतवणूक करण्यास भाग पाडले होते. इंदिरानगर पोलीस ठाण्यात यासंदर्भात अरुण हरी शिंपी (वय ७२, रा. गजानन दर्शन सोसायटी, पाथर्डी फाटा) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अलका गोरे (रा. बर्डे नगर, आडगाव नाका) व हिरामण भामरे (रा. समर्थ नगर, इंदिरानगर) या ठकबाजी करणाऱ्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी शिंपी यांचा…
संगमनेर दि. २८- संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील श्री बाळेश्वर मंदिर परिसरात पोलिसांची बिनतारी यंत्रणा आहे. येथे संरक्षण ड्युटीला असलेल्या पोलिस कर्मचाऱ्याला चौघांनी दमबाजी, शिवीगाळ केली. हा प्रकार सोमवारी (दि.२७) सकाळी ६ वाजेच्या सुमारास घडला. त्यानंतर घारगाव (ता. संगमनेर) पोलिस ठाण्यात फिर्याद देण्यासाठी गेलेल्या पोलिसालाच तक्रार देण्यासाठी तब्बल सहा तास थांबावे लागले. एवढे होऊनही घारगाव पोलिसांनी केवळ अदखलपात्र गुन्हा दाखल करून घेतला आहे. पोलिस ठाण्यातच पोलिसाला आलेल्या अनुभवाची चर्चा सगळीकडे सुरू आहे. यांच्या विरोधात तक्रार – सचिन वैष्णव (गाव माहीत नाही), फॉरेस्ट अधिकारी (गाव, पत्ता माहीत नाही) व इतर दोघे अशा एकूण चार जणांविरोधात पोलिस हेड कॉन्स्टेबल रघुनाथ खेडकर (नेमणूक, पोलिस…
संगमनेर दि. २८- नासिक-पुणे महामार्गावरून प्रवास करणाऱ्या कारला संगमनेर तालुक्यात बोटा गावाजवळ असलेल्या माळवाडी शिवारात भीषण अपघात झाला. या अपघातात पुण्यातील रहिवासी असलेल्या पती-पत्नीचा मृत्यू झाला असून अन्य एक महिला गंभीर जखमी झाली आहे. प्रजासत्ताक दिनी (२६ जानेवारी) सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. सचिन वसंतराव दरेकर (वय ५७), रमा सचिन दरेकर (वय ५३) अशी अपघातात मृत झालेल्या पती-पत्नीच नाव आहे. तर सीमा देशमुख नावाची महिला गंभीर जखमी असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. तर अपघातातून आणखी एक जण बचावला आहे. याबाबत घारगाव पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की पुणे शहरातील गुरुवार पेठेतील दरेकर वाडा येथील सचिन वसंतराव दरेकर, रमा सचिन…
डेहराडून – २०२२ मध्ये उत्तराखंडमधील विधानसभा निवडणुकीत राज्यात समान नागरी कायदा लागू करण्याचे दिलेले आश्वासन भाजपने सोमवारी पूर्ण केले. समान नागरी कायदा लागू करणारे उत्तराखंड हे पहिलेच राज्य ठरले आहे. या कायद्यांतर्गत सर्व धर्म व जातींसाठी एकच कायदा असेल. ज्या मुला-मुलींना ‘लिव्ह इन’मध्ये राहायचे असेल त्यांना त्याची नोंदणी ‘रजिस्ट्रार’कडे करावी लागेल. त्यानंतर त्यांना पालकांची परवानगी आवश्यक ठरणार आहे. तसेच ‘लिव्ह इन’मध्ये राहणाऱ्या जोडप्याला जर मूल झाले तर ते कायदेशीर मानले जाईल, आदी तरतुदी या समान नागरी कायद्यात करण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी याबाबतची अधिसूचना जारी केली आहे. या नियमांच्या अंमलबजावणीसाठी खास पोर्टल तयार केले आहे. यात लग्नाची नोंदणी,…
मुंबई, दि. २८ : एस. टी. महामंडळाला स्वमालकीच्या दरवर्षी पाच हजार या प्रमाणे येत्या ५ वर्षात २५ हजार नव्या बसेस घेण्याच्या प्रस्तावाला उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी तत्वतः मान्यता दिली असून तसा प्रस्ताव लवकरात लवकर सादर करण्याच्या सूचना त्यांनी परिवहन विभागाला दिल्या आहेत, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. सन २०२५-२६ अर्थसंकल्पासाठी परिवहन विभागाची आढावा बैठक सोमवारी (२७ जानेवारी) उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झाली. बैठकीला वित्त व नियोजन राज्यमंत्री आशिष जयस्वाल, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, वित्त विभागाचे प्रधान सचिव ओ.पी गुप्ता, परिवहन विभागाचे अपर मुख्य सचिव संजय सेठी, परिवहन आयुक्त विवेक…
विशेष प्रतिनिधी | मुंबई वाल्मिक कराड याची गु्न्हेगारी, दहशत आणि अवैध धंदे रोखण्यासाठी बीडमधील पोलीस दलात मोठे बदल करत पोलीस अधीक्षक पदी नवनीत कॉवत यांची नियुक्ती करण्यात आली. वाल्मिक कराड न्यायालयीन कोठडीत आहे, मात्र तुरुंगातही त्याची बडदास्त ठेवली जात असल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाचे आष्टीचे आमदार सुरेश धस यांनी केला आहे. तर बीडमध्ये २६ पोलीस अधिकारी वाल्मिक कराडच्या मर्जीतील असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी केला आहे. त्यावर आमदार सुरेश धस म्हणाले की, तृप्ती देसाई यांनी सांगितलेला आकडा फार कमी आहे. वाल्मिक कराडच्या दिमतीला असलेल्या सर्व पोलीस कर्मचारी अधिकारी यांची बेरीज केली तर २०० पेक्षा जास्त हा आकडा जाईल.…
मुंबई, दि. २७: पुणे येथील महात्मा फुले वाडा आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्मारकाच्या विस्तारीकरणासाठी भूसंपादन आणि रहिवाशांचे अन्यत्र पुनर्वसन करण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासकीय मान्यता दिली आहे. या कामांसाठी २०० कोटी रुपयांचा निधी मंजूर असून प्रशासकीय मान्यता मिळाल्याने आता या स्मारकाच्या विस्तारीकरणाला अधिक गती मिळणार आहे. पुणे शहरातील महात्मा फुले वाडा व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले या स्मारकांचे विस्तारीकरण करण्यासाठी भूसंपादन आणि रहिवाशांचे पुनर्वसन या कामांसाठी २०० कोटी रुपयांचा निधी अर्थसंकल्पात मंजूर करण्यात आलेला आहे. स्मारकांच्या विस्तारीकरणासाठी भूसंपादन रहिवाशांचे पुनर्वसन करण्यात येणार असून त्यानंतर फुले वाडा आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्मारक या दोन्ही स्मारकांना जोडण्यासाठी रस्ता करण्यात येणार आहे. त्याचबरोबर…
अहिल्यानगर दि. २७- संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ राज्य निवृत्ती वेतन योजना या योजनांचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांनी आपले बँक खाते आधार कार्ड सोबत संलग्न करून घ्यावे लागणार आहे अन्यथा या योजनेचा लाभ फेब्रुवारी महिन्यापासून बंद होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ राज्य निवृत्ती वेतन योजनेच्या लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण फेब्रुवारी २०२५ पासून डीबीटीद्वारे वितरित करण्यात येणार आहे. यासाठी लाभार्थ्यांनी त्यांचे बँक खाते आधारकार्डशी संलग्न करुन घेण्याचे आवाहन उपजिल्हाधिकारी (महसूल) अतुल चोरमारे यांनी केले आहे. लाभार्थ्यांनी योजनेच्या लाभासाठी उघडलेले बँक खाते आधार क्रमांक व मोबाईल क्रमांकासोबत जोडण्यासाठी बँक खाते, आधार व मोबाईल क्रमांक आदी माहिती संबंधित…
अहिल्यानगर दि. २७- कृषी विभागामार्फत सन २०२१-२२ पासून कृषी यांत्रिकीकरण योजना महाडीबीटी प्रणालीद्वारे सोडत पद्धतीने राबविण्यात येत आहे. या योजनेच्या सध्याच्या सोडत पद्धतीविषयी बदल करण्यासाठी शेतकऱ्यांनी त्यांचे अभिप्राय ३० जानेवारी, २०२५ पर्यंत कृषी सहायक, तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे लेखी स्वरुपात सादर करण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांनी केले आहे. कृषी यांत्रिकीकरण योजनेची सध्याची सोडत पद्धत योग्य आहे का, प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या पद्धतीची सोडत पद्धत असावी असे वाटते काय, प्रचलित सोडत पद्धत व प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य यापैकी कोणती सोडत पद्धत प्राधान्याने राबवावी याबाबत शेतकऱ्यांनी त्यांचे अभिप्राय सादर करावेत, असेही बोराळे यांनी म्हटले आहे.
संगमनेर दि. २७- संगमनेर शहरामध्ये शासकीय विश्रामगृहासमोरील चांदणी खानावळी समोर ‘गावचा सरपंच होऊ दिले नाही’, या कारणावरून झालेल्या हाणामारी प्रकरणी शनिवारी रात्री १९ दिवसानंतर संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झालेल्या आरोपींमध्ये सोमनाथ रावबा गीते, अमोल सोमनाथ गीते (दोघे रा. सोनोशी, ता. संगमनेर) व आकाश संतोष चकोर (रा. पिंपळे ता. संगमनेर) यांचा समावेश आहे. ७ जानेवारीला घडलेल्या या प्रकाराची शहरात चर्चा सुरू होती. मात्र या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यासाठी तब्बल १९ दिवसांचा कालावधी लागला आहे. शहर पोलीस ठाण्यात सोनोशी येथील उपसरपंच राजेंद्र तुकाराम सानप यांनी दिलेल्या फिर्यादीवरून या तिघांविरोधात गुन्हा रजिस्टर नंबर ६४, भारतीय न्याय…
