Author: अनंत पांगारकर
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन | संगमनेर संगमनेर शहरातील प्रभागांकरीता पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सहकार्याने जिल्हा नियोजन व विकास समितीमधून सुमारे दोन कोटी रुपयांच्या निधीतून ४७ सौर ऊर्जेवरील हायमॅक्स दिवे मंजूर करण्यात आले आहेत. यापैकी १४ हायमॅक्स दिव्यांचे काम पूर्ण झाले असून, या दिव्यांचे लोकार्पण आमदार अमोल खताळ आणि महायुतीच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात आले. या मोहिमेअंतर्गत जनतानगरमधील जिजामाता गार्डन आणि लालतारा हाउसिंग सोसायटी येथील हायमॅक्स दिव्यांचे प्रातिनिधिक स्वरूपात लोकार्पण करण्यात आले. लोकार्पण सोहळ्यास मुख्याधिकारी दयानंद गोरे, नगरसेविका साक्षी सूर्यवंशी, शिवसेना शहराध्यक्ष विनोद सूर्यवंशी, भाजप शहराध्यक्ष पायल ताजणे, आरपीआय शहराध्यक्ष कैलास कासार यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. संगमनेर विधानसभा…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन | संगमनेर येथील मालपाणी उद्योग समूहाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही अक्षय्यतृतीयेच्या शुभमुहूर्तावर १९ एप्रिल रोजी सायंकाळी साडेचार वाजता मालपाणी लॉन्स येथे भव्य सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. सामाजिक उत्तरदायित्वाची भावना जपणाऱ्या या सोहळ्यात ४१ जोडपी विवाहबद्ध होऊन आपल्या सहजीवनाचा श्रीगणेशा करणार आहेत. या सोहळ्याच्या माध्यमातून लग्नावरील होणारी उधळपट्टी टाळून समाजासमोर एक आदर्श निर्माण केला जात असून, या उपक्रमाची २९ वर्षांची गौरवशाली परंपरा यंदाही तितक्याच उत्साहात साजरी होत आहे. विवाह सोहळ्याचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे यात केवळ गरजवंत किंवा मध्यमवर्गीयच नव्हे, तर अनेक उच्चशिक्षित वधू-वरांनीही ‘मालपाणी पॅटर्न’ला पसंती दिली आहे. १९९७ मध्ये स्वर्गीय ओंकारनाथजी आणि स्वर्गीय माधवलालजी…
विशेष प्रतिनिधी | मुंबई अशोक खरातचा सीडीआर हा एसआयटी काढत नाही तर कुणीतरी बाहेरचा व्यक्ती काढते, ही बाब अत्यंत गंभीर आहे. त्यामुळे सीडीआर बाहेर काढलेल्या दमानिया यांच्यावर कारवाई करावीच, पण त्यामध्ये नाव असलेल्या एकनाथ शिंदे यांची एसआयटी चौकशी कधी करणार, असा प्रश्न ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी विचारला. दीपक केसरकर हे या प्रकरणातील सर्व कड्या जोडणारे व्यक्ती आहेत, त्यांना एसआयटीकडून कधी चौकशीला बोलावलं जाणार याची माहिती द्यावी अशी मागणीही अंधारे यांनी केली. सुषमा अंधारे म्हणाल्या की, ज्यांनी सीडीआर काढले त्यांच्यावर कारवाई करावीच, पण ज्यांचे सीडीआरमध्ये नाव निघाले त्यांच्यावर काय कारवाई करणार? या सीडीआर प्रकरणात एकनाथ शिंदे यांचं नाव आहे.…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, मुंबई/नाशिक नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील अशोक खरात या भोंदूबाबाचे प्रकरण समोर आल्यानंतर, अंधश्रद्धेला खतपाणी घालणाऱ्या मंत्री, आमदार आणि अधिकाऱ्यांच्या हकालपट्टीची मागणी करत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या (माकप) वतीने आज राज्यभर तीव्र आंदोलन करण्यात आले. राज्यात तंत्र-मंत्र आणि अंगारे-धुपारे करून महिला व सामान्य नागरिकांचे शोषण करण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. सिन्नर येथील अशोक खरात याच्या कृत्यामुळे अनेक नागरिक शोषणाचे बळी ठरले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, या भोंदूबाबाच्या कारस्थानात महिला आयोगाच्या अध्यक्षांसह राज्यातील ३९ आमदार, विविध मंत्री, अधिकारी आणि अनेक राजकीय कार्यकर्ते एकतर सहभागी आहेत किंवा त्या अंधश्रद्धेचे बळी ठरले आहेत. संविधानिक पदांवर बसलेल्या लोकप्रतिनिधींनी वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवणे…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन | संगमनेर राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी रविवारी संगमनेर येथील आमदार सत्यजीत तांबे यांच्या ‘प्रभा’ निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. या भेटीदरम्यान महिला सुरक्षा आणि सक्षमीकरणाच्या मुद्द्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली असून, संगमनेर नगरपालिकेद्वारे राबविण्यात येत असलेला ‘रक्षक दल’ हा उपक्रम राज्यभर राबवण्याचे संकेत मंत्री तटकरे यांनी दिले आहेत. या भेटीच्या वेळी पारनेर-नगर मतदारसंघाचे आमदार काशिनाथ दाते, माजी नगराध्यक्ष दुर्गा तांबे आणि नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे उपस्थित होत्या. दुर्गा तांबे यांनी मंत्री आदिती तटकरे यांचे पारंपरिक पद्धतीने औक्षण करून स्वागत केले. चर्चेदरम्यान आदिती तटकरे यांनी संगमनेरमध्ये महिलांच्या सुरक्षिततेसाठी स्थानिक पातळीवर राबविण्यात येत असलेल्या ‘रक्षक…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन | आळेफाटा शिखर शिंगणापूरहून पायी दिंडी घेऊन धांदरफळ (ता. संगमनेर) येथे परतत असताना वाटेत नियोजनावरून वाद झाल्याने एका तरुणाला लाथाबुक्क्यांनी, वायरने आणि लाकडी काठीने अमानुष मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी आळेफाटा पोलीस ठाण्यात ११ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनोज सुरेश खुरपे (वय ३४) असे फिर्यादीचे नाव असून ते धांदरफळ येथील रहिवासी आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, मनोज खुरपे व त्यांच्या गावातील अंदाजे ७० लोक दिंडीनिमित्त शिखर शिंगणापूरला गेले होते. ३० मार्च रोजी ते सर्वजण पायी गावाकडे निघाले होते. ४ एप्रिल रोजी दुपारी एकच्या सुमारास हे लोक आळे रोडने जात असताना चार मोटारसायकलवरून…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन | संगमनेर संगमनेर तालुक्यातील उंबरी बाळापूर शिवारात रविवारी (दि. ५) सायंकाळच्या सुमारास बिबट्याने अत्यंत हिंसक पवित्रा घेत तिघांवर प्राणघातक हल्ले केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या एकापाठोपाठ झालेल्या दोन हल्ल्यांमध्ये दुचाकीस्वार तरुण आणि एका डॉक्टरांना गंभीर दुखापत झाली असून, या घटनेने संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी सायंकाळी ७:४५ च्या सुमारास अभिषेक केशव खेमनर (वय ३४) आणि सार्थक सुनील खेमनर (वय १७) हे दोघे दुचाकीवरून लेंडी नाल्याजवळून जात असताना तेथे दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर अचानक जीवघेणा हल्ला चढवला. या अनपेक्षित आक्रमणामुळे दोघांनीही मदतीसाठी मोठा आरडाओरडा सुरू केला. त्यांचा आवाज ऐकताच बापूसाहेब निर्मळ,…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर संगमनेर तालुक्यातील पठार भागातील सावरगाव घुले येथील खंडोबा देवस्थान हे परिसरातील भाविकांचे प्रमुख श्रद्धास्थान आहे. या देवस्थानाचा ‘क’ वर्गात समावेश होणे अत्यंत आवश्यक असून, आगामी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत या विषयाचा तीव्रतेने पाठपुरावा केला जाईल, असा विश्वास आमदार अमोल खताळ यांनी सावरगाव घुले येथील ग्रामस्थांना दिला. सावरगाव घुले येथे आयोजित खंडोबा देवस्थानच्या यात्रोत्सवानिमित्त आमदार अमोल खताळ यांनी उपस्थित राहून महाआरती केली. या कार्यक्रमात आमदार खताळ यांच्या हस्ते बैलगाडा शर्यतीत यश मिळविल्याबद्दल मधुकर घुले यांचा सन्मानचिन्ह व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी ग्रामस्थांशी संवाद साधताना ते म्हणाले की, या देवस्थानाचा ‘क’ वर्गात समावेश यापूर्वीच व्हायला…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, शिर्डी संगमनेर तालुक्यातील वडगावपान येथील ॲसिड हल्ला प्रकरणातील पीडित मुलीची महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी रविवारी लोणी येथील प्रवरा रुग्णालयात जाऊन भेट घेतली. या निंदनीय घटनेतील पीडितेच्या पाठीशी शासन पूर्ण ताकदीने उभे असून, तिच्या पुढील उपचारांचा संपूर्ण खर्च शासन करणार असल्याची स्पष्ट ग्वाही त्यांनी दिली. रुग्णालयात उपचार घेत असलेल्या या मुलीची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. मात्र, तिचे वय लहान असल्याने आणि त्वचा संवेदनशील असल्याने तिला आणखी काही दिवस विशेष उपचारांची तसेच एका शस्त्रक्रियेची आवश्यकता आहे. प्रशासनाकडून तिची उत्तम काळजी घेतली जात असून, विशेष समुपदेशकाद्वारे तिचे समुपदेशन करण्यात आले आहे. हे समुपदेशन…
आपल्या राजकीय फायद्यासाठी राज्याच्या, राज्यातील जनतेच्या हिताचा जराही विचार न करता मनाला वाटेल तशा योजना जाहीर करणार्या सत्ताधार्यांमुळे राज्याचा आर्थिक गाडा पुरता दोलायमान बनला आहे. करदात्यांच्या कष्टाच्या रक्कमेची ही लूट ज्यांनी केली ती त्यांच्याकडूनच वसूल झाली पाहिजे. या योजना जाहीर करताना राज्याचं काय होईल, इतकाही विचार त्यांनी केला नाही. केवळ सत्ता मिळावी, इतक्या कुटील हेतूने जाहीर झालेल्या योजनांनी महाराष्ट्राला बेजार केलंच पण राज्य जगावं म्हणून जे आपल्या खिशाला ताण देतात त्यांनाही जगणं मुष्कील करून टाकलं आहे. लाडक्या बहिणींच्या नावाने सुरू केलेल्या या योजनेने जनतेच्या सुमारे 21 हजार कोटी इतक्या रक्कमेला चुना लावल्याचं नुकतंच उघड झालंय. सुधारलेल्या महाराष्ट्राने देशाला लूट करण्याचा…
