Author: अनंत पांगारकर

महाराष्ट्र संवाद न्यूज – संगमनेर संगमनेर तालुक्याच्या विकासासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून मोठा निधी आणण्यात यश आले आहे. या निधीतून सुरू असलेल्या विविध विकासकामांमध्ये घुलेवाडी येथील सव्वादोन कोटी रुपयांच्या कामांचा समावेश आहे. ही सर्व कामे उच्च दर्जाची झाली पाहिजेत, याची अधिकाऱ्यांनी दक्षता घ्यावी, असे स्पष्ट निर्देश आमदार अमोल खताळ यांनी दिले. कामाचा दर्जा चांगला राखल्यास ठेकेदार या तालुक्यात मोठ्या प्रमाणात काम करू शकतील, अन्यथा त्यांनी इतरत्र कामे शोधावी लागतील, असा सज्जड दमही त्यांनी दिला. संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी येथे अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्ती विकासांतर्गत मंजूर झालेल्या सव्वादोन कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते…

Read More

आपल्या लोकशाही संविधानातील राष्ट्रपतींची देश प्रमुखपदाची गरीमा पूरती तळाला गेली आहे. मोदी सरकारच्या काळात या पदाची अवस्था रबर स्टॅम्पसारखी झाली आहे. अगदी इंदिरा गांधींच्या सरकारपासून चालत आलेली ही परंपरा नरेंद्र मोदींच्या सत्तेने त्याहून खाली आणली आणि देशाच्या प्रमुखाला कणाहीन बनवलं. इतकं की एका मंदिरातला पुजारीही राष्ट्रपतींना ते आदिवासी आणि मागास असल्याच्या कारणास्तव मंदिर प्रवेश नाकारतात. अशा परिस्थितीत सरकारच्या निर्णयांना रोखण्याची हिंमत कोण दाखवेल? राजेंद्र प्रसादांपासून ग्यानी झैलसिंग, के. आर. नारायणन, एपीजे अब्दुल कलाम, प्रणव मुखर्जी अशा काही मोजक्याच राष्ट्रपतींनी केंद्र सरकारला आरसा दाखवला. के. आर. नारायणन यांनी तर गुतरातच्या दंगलीवेळी अटलबिहारींच्या सरकारला खडेबोल सुनावले होते. यानंतर अटलबिहारींनी मोदींना राजधर्म पाळण्याचा…

Read More

संगमनेर – प्रतिनिधी संपूर्ण देश सध्या लष्कराच्या ‘ऑपरेशन सिंदूर’ या यशस्वी मोहिमेमुळे एकत्रितपणे राष्ट्रभक्तीच्या भावनेने भारावलेला आहे. याच पार्श्वभूमीवर संगमनेर शहरात नागरिकांच्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी विजयी तिरंगा बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. ही रॅली उद्या, (रविवार दि. १८ मे) सकाळी ९ वाजता आयोजित करण्यात आली आहे. या रॅलीद्वारे नागरिकांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा व लष्कराच्या योगदानाबाबत जनजागृती घडवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. या भव्य तिरंगा रॅलीमध्ये शहरातील युवक, सामाजिक संस्था आणि विविध क्षेत्रातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. रॅलीचा मार्ग पुढीलप्रमाणे असेल – शास्त्री चौक, मेनरोड, विठ्ठल मंदिर, बस स्टँड (अकोले रोड), पेटीट कॉलेज, श्रमिक कार्यालय, चैतन्य नगर, गणेश नगर, नाशिक-पुणे…

Read More

छत्रपती संभाजीनगर: जमिनीच्या नोंदीतील दुरुस्तीच्या कामासाठी तब्बल तीन लाख रुपयांची लाच मागणाऱ्या अपर तहसीलदारासह दोन खासगी व्यक्तींना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) बेड्या ठोकल्या आहेत. अपर तहसीलदार नितीन गर्जे (वय ४५) आणि त्यांचे कथित मध्यस्थ नितीन धुमा चव्हाण (वय ३८) व सोहेल जुबेर बहाशवान (वय २९) अशी आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी एका ५० वर्षीय तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार केली होती. एसीबीचे सापळा अधिकारी वाल्मिक कोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराच्या मुलाच्या आणि नातेवाईकांच्या मालकीच्या मिटमिटा येथील भूखंडाच्या क्षेत्र दुरुस्तीसंबंधी पाच प्रकरणे डिसेंबर २०२४ पासून अपर तहसीलदार कार्यालयात प्रलंबित होती. तक्रारदार एप्रिल २०२५ मध्ये सुनावणीसाठी हजर झाले असता, निकाल त्यांच्या बाजूने देण्यासाठी अपर तहसीलदार…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज – पुणे  वाघोली येथील दहा एकर जमिनीच्या मालकी हक्कासाठी झालेल्या घोटाळ्यात चंदननगर पोलीस ठाण्याचे तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र लांडगे यांच्यासह चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आर्थिक फायद्यासाठी पदाचा गैरवापर करून कट रचल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. या घटनेमुळे पुणे पोलीस दलात खळबळ माजली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वाघोलीतील सुमारे दहा एकर जमीन हडपण्याच्या उद्देशाने आरोपींनी संगनमत केले. त्यांनी एका बनावट महिलेला मूळ मालक म्हणून उभे केले आणि या महिलेच्या माध्यमातून जमिनीच्या व्यवहारातून स्वतःचा आर्थिक फायदा करून घेतला, असा आरोप आहे. या प्रकरणी आनंद लालासाहेब भगत, शैलेश सदाशिव ठोंबरे, राजेंद्र लांडगे आणि अपर्णा यशपाल वर्मा यांच्या विरोधात चंदननगर…

Read More

अहिल्यानगर, दि. १६ – शेती अधिक शास्त्रशुद्ध, फायदेशीर व पर्यावरणपूरक बनावी यासाठी शेतकऱ्यांनी पारंपरिक शेती पद्धतीत बदल करून कृत्रिम बुद्धिमत्तेसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करणे आवश्यक आहे. शेतीसाठी उपयुक्त माहिती शेतकऱ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी कृषी विभागाने कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर करावा, असे निर्देश राज्याचे जलसंपदा व जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित खरीप हंगामपूर्व आढावा व नियोजन बैठकीत पालकमंत्री विखे बोलत होते. बैठकीस आमदार अमोल खताळ, आमदार विठ्ठलराव लंघे, आमदार काशिनाथ दाते, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, शिर्डीचे अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर, अहिल्यानगरचे अपर जिल्हाधिकारी शैलेश हिंगे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज – अहिल्यानगर  स्वस्तात सोने देण्याचे आमिष दाखवून संगमनेर तालुक्यातील एका व्यापाऱ्याला जामखेडमध्ये बोलावून लुटणाऱ्या टोळीतील तीन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. या दरोड्यात व्यापाऱ्याकडून दहा लाख रुपये आणि सोन्याचे दागिने लुटण्यात आले होते. पोलिसांनी तत्पर कारवाई करत या टोळीतील तीन सदस्यांना बेड्या ठोकल्या असून, उर्वरित सात आरोपींचा शोध सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेंद्र दिलीप मैड (वय ३५, रा. आश्वी, ता. संगमनेर) यांना अश्विनी नावाच्या महिलेने १५० ग्रॅम सोने १० लाख रुपयांना देण्याचे आमिष दाखवले होते. त्यानुसार मैड हे जामखेड तालुक्यातील कुसडगाव येथे गेले असता, अश्विनी आणि तिच्या ८ ते १० साथीदारांनी त्यांना मारहाण…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर : संगमनेर शहर गेल्या तीन-चार वर्षांपासून प्रशासकीय राजवटीच्या बेड्यांमध्ये जखडले आहे. विकासकामांची चाके जाम झाली आहेत आणि नागरी समस्यांचा डोंगर वाढतच चालला आहे. या निष्क्रियतेमुळे संतप्त झालेल्या संगमनेरकरांनी आता आरपारची लढाई पुकारली आहे. माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी नागरिकांच्या शिष्टमंडळाने नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांच्या कार्यालयावर धडक मारली. शहरातील प्रलंबित प्रश्नांची जंत्री त्यांच्यासमोर मांडत, येत्या १५ दिवसांत या समस्यांवर ठोस तोडगा काढण्याचा अल्टिमेटम दिला. अन्यथा, नगरपरिषदेला हादरवून सोडणारे जनआंदोलन उभे करण्याचा निर्धार या वेळी व्यक्त करण्यात आला. शहरातील नागरिक अनेक दिवसांपासून मूलभूत नागरी सुविधांसाठी तरसत आहेत. पावसाळा तोंडावर असताना गटारे तुंबलेली आहेत, रस्त्यांवर जीवघेणे खड्डे पडले आहेत,…

Read More

संगमनेर –  संगमनेर तालुक्यातील शेंडेवाडी, साकूर, पिंपळगाव, कौठे मलकापूर आणि कर्जुले पठार भागातील दगडखाणींवर अत्यंत हालाखीच्या परिस्थितीत काम करत असलेल्या ३८ वेठबिगार आणि ३१ बालकामगारांची प्रशासनाने आज (गुरुवारी) यशस्वीरित्या सुटका केली. या घटनेमुळे संगमनेर तालुक्यात खळबळ उडाली आहे. जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांना सकाळी मिळालेल्या तक्रारीनंतर प्रशासनाने तातडीने आणि प्रभावीपणे ही कारवाई केली. मुक्त करण्यात आलेल्या ३८ वेठबिगार कामगारांमध्ये २२ पुरुष आणि १६ महिलांचा समावेश आहे. या गंभीर प्रकरणी संबंधित ठेकेदारावर घारगाव पोलीस ठाण्यात वेठबिगार प्रतिबंधक कायद्यासह कठोर कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी तातडीने कार्यवाहीचे आदेश दिले. त्यानुसार, संगमनेरचे प्रभारी उपविभागीय अधिकारी माणिक आहेर,…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज शिर्डी: श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाची निवड प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत, राज्याच्या सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेत प्रशासकीय कामकाज सुरळीतपणे पार पाडण्यासाठी एका प्रशासकीय समितीची नियुक्ती केली आहे. यासंबंधी गुरुवारी (१५ फेब्रुवारी २०२४) विशेष आदेश जारी करण्यात आला. या समितीच्या अध्यक्षपदी राज्याचे विद्यमान पालकमंत्री आणि स्थानिक आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या प्रशासकीय समितीमध्ये प्रशासकीय आणि राजकीय क्षेत्रातील व्यक्तींचा समावेश असून जिल्ह्याचे प्रशासकीय प्रमुख असलेले जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांची सहअध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त, स्थानिक आमदार आणि लोकप्रतिनिधी यांचाही समितीत समावेश आहे. संगमनेरचे आमदार अमोल खताळ, कोपरगाव मतदारसंघाचे आमदार आशुतोष काळे हे…

Read More