Author: अनंत पांगारकर
महाराष्ट्र संवाद न्यूज – श्रीरामपूर श्रीरामपूर येथील अशोक सहकारी साखर कारखान्याला साईकृपा शुगर अँड अलाइड लिमिटेडने दिलेला २० लाख रुपयांचा धनादेश अनादरित झाल्याप्रकरणी श्रीगोंदा मतदारसंघाचे विद्यमान आमदार विक्रम बबनराव पाचपुते यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. श्रीरामपूर न्यायालयाने या प्रकरणी आमदार पाचपुते यांच्यासह साईकृपा शुगर अँड अलाइड लिमिटेडच्या व्यवस्थापकांनाही पकड वॉरंट बजावले आहे. न्यायालयाच्या या कठोर कारवाईमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. हिरडगाव येथील साईकृपा शुगर अँड अलाइड लिमिटेडचे माजी अध्यक्ष आणि विद्यमान आमदार विक्रम बबनराव पाचपुते आणि कारखान्याचे व्यवस्थापक यांच्याविरुद्ध श्रीरामपूर येथील अशोक सहकारी साखर कारखान्याने २० लाख रुपयांचा धनादेश अनादरित केल्याची तक्रार दाखल केली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने श्रीरामपूर…
महाराष्ट्र संवाद न्यूज – अहिल्यानगर पोलिस अधीक्षक राकेश ओला यांच्या थेट आदेशानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पथकांनी जिल्ह्यात अवैध धंद्यांविरुद्ध जोरदार मोहीम उघडली आहे. एकाच वेळी जिल्ह्यातील २३ ठिकाणी धाडी टाकून एलसीबीने अवैध व्यावसायिकांचे धाबे दणाणून सोडले आहेत. या धडक कारवाईत अवैध दारू विक्री, जुगार आणि इतर अवैध धंद्यांमध्ये गुंतलेल्या ३४ आरोपींना अटक करण्यात आली असून, तब्बल २ लाख ८३ हजार ८७५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. एलसीबीच्या या ‘सर्जिकल स्ट्राईक’मुळे जिल्ह्यातील अवैध धंदे चालवणाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्याचे निर्देश दिल्यानंतर, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक दिनेश आहेर यांनी…
महाराष्ट्र संवाद न्यूज – अकोले अकोले तालुक्यातील कळस बुद्रुक येथे काल दुपारी (दि. ७ मे) एक दुर्दैवी घटना घडली. वादळी वाऱ्यामुळे कोल्हार घोटी रस्त्यालगत असलेले एक मोठे झाड अचानक कोसळले. या दुर्घटनेत शिवाजी विश्वनाथ वाकचौरे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, काल दुपारी बाराच्या सुमारास कळस परिसरात पावसाचे वातावरण निर्माण झाले होते. शेतात असलेले कांदे झाकण्यासाठी शिवाजी वाकचौरे (वय अंदाजे ६० वर्षे) आपल्या मोटारसायकलवरून त्यांच्या सुनेसोबत जात होते. त्याचवेळी जोरदार वाऱ्यामुळे रस्त्याच्या कडेला असलेले एक मोठे महारुखचे झाड त्यांच्या अंगावर पडले. या अपघातात त्यांच्या सुनेला कोणतीही दुखापत झाली नाही, तर शिवाजी वाकचौरे यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्यांना तातडीने संगमनेर…
महाराष्ट्र संवाद न्यूज – संगमनेर पुणे-नाशिक महामार्गावर आंबीखालसा फाटा येथे गुरुवारी मध्यरात्री पोलिसांनी केलेल्या कारवाईत गोवंश जनावरांची अवैध वाहतूक उघडकीस आली. याप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतले असून, सुमारे १४ लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. अधिक माहिती अशी की, ०८ मे २०२५ रोजी मध्यरात्री १ वाजेच्या सुमारास पोलीस स्टेशनमध्ये बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी ठाणे अमलदारांना कत्तलीच्या उद्देशाने गोवंश जनावरांची वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती दिली. पुणे-नाशिक महामार्गावरून एम.एच. २५ यु १४५५ क्रमांकाच्या ट्रक मधून गोवंश जनावरे कत्तलीसाठी घेऊन जाणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस हेड कॉन्स्टेबल दिवटे यांनी तात्काळ पोलीस निरीक्षकांना याबाबत कळवले. त्यांच्या आदेशानुसार रात्रगस्तीवर असलेले पो. कॉ.…
नेत्याचा मुलगा आमदार झाला, खासदार झाला, मंत्री झाला तरी चर्चेचा विषयच बनत नाही, परंतु एका गरीब शेतकऱ्यांच्या पोरगा भावी मुख्यमंत्री म्हणून चर्चेत असलेल्या ४० वर्ष सत्तापदावर असणाऱ्या बलाढ्य नेत्यांला दहा हजार मतांचे फरकाने चितपट करून संदेश देतो की “राजा का बेटा राजा नहीं बन शकता, जो हकदार होगा वही राजा बनेगा.” खरंतर संगमनेर विधानसभा २०२४ निवडणुकीचा निकाल लागला, मतदानाचे सर्व ओपिनियन पोल खोटे ठरवून राजकीय चाणक्याच्या चाणक्य करत अमोलभाऊंनी ऐतिहासिक विजय मिळवला. खरंतर एकीकडे सत्ता, संस्था, संपत्ती आणि कार्यकर्त्यांची लागलेली रीघ, अनेक वर्षापासूनची तालुक्यात निर्माण केलेली वचक व सत्तेमुळे सामान्य लोकांवर आलेले दडपण अशा परिस्थितीमध्ये संगमनेरमध्ये तुल्यबळ उमेदवार शोधण्याची अडचण…
महाराष्ट्र संवाद न्यूज – संगमनेर पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय सैन्याने केलेल्या धडक कारवाईचे आमदार अमोल खताळ यांनी जोरदार कौतुक केले आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत भारतीय जवानांनी दाखवलेल्या शौर्याचे आणि त्यांनी दहशतवाद्यांचे 9 अड्डे उद्ध्वस्त केल्याबद्दल आमदार खताळ यांनी सैन्याचे अभिनंदन केले. ही कारवाई केवळ दहशतवादी हल्ल्याचा बदला नसून, भारताच्या सार्वभौमत्वाचे संरक्षण करण्यासाठी दिलेले एक कणखर प्रत्युत्तर असल्याचे त्यांनी म्हटले आहे. आमदार खताळ म्हणाले, “देशाच्या सीमेचे रक्षण करण्यासाठी रात्रंदिवस तैनात असलेल्या आपल्या जवानांचे अभिनंदन करावे तेवढे थोडेच आहे. त्यांनी दाखवलेल्या अतुलनीय धैर्यामुळेच आज प्रत्येक देशवासी सुरक्षित असल्याची भावना व्यक्त करत आहे. या यशस्वी ऑपरेशनमागे जवानांची निष्ठा, संयम…
महाराष्ट्र संवाद न्यूज – संगमनेर ज्यांच्या हातात आता राजकारणासाठी कोणतेही मुद्दे शिल्लक राहिलेले नाहीत, तेच लोक आपल्या बगलबच्च्यांना हाताशी धरून शेतकऱ्यांमध्ये हेतुपुरस्सर दिशाभूल करणारे वातावरण तयार करत आहेत आणि त्यांच्यात विष पेरण्याचा प्रयत्न करत आहेत. जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि माझी प्रतिमा मलिन करून, हे काही लोक निळवंडे पाण्याच्या आड लपून राजकारण करत आहेत, अशी जोरदार टीका आमदार अमोल खताळ यांनी केली. संगमनेर तालुक्यात निळवंडेच्या पाण्यावरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर आमदार खताळ यांच्या कार्यालयाकडून प्रसिद्धी पत्रक माध्यमांना पाठविण्यात आले यात त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की, यापूर्वी जानेवारी महिन्यात देखील निळवंडे उजव्या आणि डाव्या कालव्यांना आवर्तन सोडण्यात आले…
अहिल्यानगर, दि. ७ – नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर, जिल्ह्यातील शिर्डी आणि शनिशिंगणापूर येथे आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी संबंधित यंत्रणांनी त्वरित आवश्यक निधीसह प्रस्ताव सादर करावेत, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी दिले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीसाठी आयोजित जिल्हा कार्यकारी समितीच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीत अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर, जिल्हा नियोजन अधिकारी दीपक दातीर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉ. विरेंद्र बडदे प्रत्यक्ष उपस्थित होते, तर संबंधित विभागांचे अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते. जिल्हाधिकारी डॉ. आशिया म्हणाले की, उत्तर प्रदेशातील कुंभमेळ्याच्या आयोजनामुळे धार्मिक पर्यटनात मोठी…
अहिल्यानगर दि. ७- शासनाच्या ‘वन स्टेट वन रजिस्ट्रेशन’ उपक्रमामुळे नागरिकांना कुठल्याही तालुक्यातील मिळकतीची दस्तनोंदणी जिल्ह्यातील कुठल्याही नोंदणी कार्यालयात करता येणार आहे, अशी माहिती सहजिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी महेंद्र एस. महाबरे यांनी दिली आहे. शासनाने १०० दिवसांच्या कृती कार्यक्रमात ‘वन स्टेट वन रजिस्ट्रेशन’ करण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार नोंदणी महानिरीक्षक रवींद्र बिनवडे यांनी युद्ध पातळीवर यंत्रणा राबवून एक जिल्हा एक नोंदणी हा उपक्रम १ मे पासून सुरु केला आहे. त्यामुळे आता एका जिल्ह्यातील समाविष्ट सर्व तालुक्यातील कुठल्याही गावाचे, मौजेचा दस्त जिल्ह्यातील कुठल्याही नोंदणी कार्यालयात नोंदविता येणार आहेत. हा उपक्रम यशस्वी झाल्यावर पुढील काळात ‘वन स्टेट वन रजिस्ट्रेशन’ यावर अंमलबजावणी होणार…
नवी दिल्ली- अखेर भारताने दहशतवाद्यांविरोधात कठोर पाऊल उचलले आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत भारतीय हवाई दलाने पाकिस्तानमध्ये एअर स्ट्राईक करत अनेक दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. या कारवाईमुळे देशभरात आनंदाचे वातावरण पसरले असून, प्रत्येक भारतीयाची अनेक दिवसांपासूनची इच्छा पूर्ण झाली असल्याची भावना व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय गुप्तचर यंत्रणांनी पाकिस्तानमधील दहशतवादी ठिकाणांची अचूक माहिती पुरवली होती. या माहितीच्या आधारे भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी लक्ष्यावर अचूक हल्ला चढवला. या कारवाईत मोठ्या संख्येने दहशतवादी मारले गेले असून, त्यांच्या पायाभूत सुविधांचेही मोठे नुकसान झाले आहे. या एअर स्ट्राईकनंतर देशात सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे. सीमाभागावर विशेष लक्ष ठेवले जात असून, कोणत्याही…
