Author: अनंत पांगारकर
मुंबई – राज्यातील नागरिकांना आवश्यक त्या सेवा सुलभतेने उपलब्ध होण्याच्या दृष्टीने ‘आपले सरकार सेवा पोर्टल’द्वारे सद्यस्थितीत ५३६ ऑनलाईन सेवा दिल्या जात आहेत, त्याचा नागरिकांना व्यापक प्रमाणात उपयोग होत आहे. या पार्श्वभूमीवर या ऑनलाईन सेवांमध्ये वाढ करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्य सेवा हक्क आयोगाची बुधवारी आढावा बैठक सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे पार पडली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी संबंधित अधिकार्यांना महत्त्वाचे निर्देश दिले. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, गतिमान पारदर्शक कार्यपद्धतीच्या दृष्टीने लोकांना उपयुक्त ठरत असलेल्या ‘आपले सरकार सेवा पोर्टल’द्वारे ऑनलाईन सुविधा उपलब्ध करुन देणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य होते. अधिक सक्रियतेने आणि सुलभरित्या व्यापक स्वरुपात…
संगमनेर – वडगाव पान (ता. संगमनेर) येथे असलेल्या मिळकती संदर्भात सुरू असलेल्या वादात उपविभागीय अधिकाऱ्यांच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यास जाणीवपूर्वक टाळाटाळ होत असल्याच्या कारणावरून येत्या २६ जानेवारीला कुटुंबीयांसह उपविभागीय अधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा संगमनेरमधील रहिवाशी गणेश अनंत रासने यांनी दिला आहे. या संदर्भात दिलेल्या उपोषणाच्या नोटीसमध्ये रासने यांनी म्हटले आहे की, त्यांच्या मालकीची वडगाव पाण्याचे सर्वे नंबर १३/१ जुना सर्वे नंबर १३/१ (अ) क्षेत्र ०.६१ आर ही मिळकत असून या मिळकतीशी दुरान्वये कोणताही संबंध नसलेले जनार्दन साधू गायकवाड यांच्यासह अन्य काही जणांनी रासने यांच्या मालकीच्या मिळकतीत वहिवाटीस हरकत, अडथळा सुरू केला होता. तसेच दक्षिण उत्तर बांधून रासने यांच्या मालकीचे क्षेत्र…
मुंबई, दि. ९ : शासकीय रुग्णालयात रुग्णांसाठी अधिकाधिक सेवा अद्यावत करून त्या अधिक दर्जेदार द्याव्यात. वैद्यकीय शिक्षण अंतर्गत असलेल्या सर्व शैक्षणिक संस्थांचे बळकटीकरण करा. औषध व अन्नपदार्थ मधील भेसळीला प्रतिबंध करण्यासाठी काटेकोर उपाययोजना करावी. भविष्यातील आव्हाने ओळखुन प्रशासन गतिमान करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्या. सह्याद्री अतिथीगृह येथे वैद्यकीय शिक्षण, अन्न व औषध प्रशासन व सामान्य प्रशासन विभाग यांच्या पुढील १०० दिवस आराखड्याच्या अनुषंगाने बैठक झाली, या बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, राज्यमंत्री योगेश कदम यावेळी उपस्थित होते.…
मुंबई – नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांनी संगमनेरशी संबंधित विविध प्रश्न हिवाळी अधिवेशनात उपस्थित करत शासनाचे लक्ष वेधले होते. या अनुषंगाने तांबे यांनी पुन्हा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. तांबे यांनी या भेटीत पुन्हा एकदा संगमनेरशी संबंधित मागण्यांचा राज्यातील जनतेच्या हिताच्या प्रश्नांसंदर्भात सविस्तर चर्चा केली आहे. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सर्व मागण्या ऐकून घेत याविषयी सकारात्मक पावलं उचलली जातील असा विश्वास दिला असल्याचे म्हटले आहे. या प्रश्नांवर तांबे यांनी केली उपमुख्यमंत्र्यांची चर्चा… 📌 नाशिक-पुणे औद्योगिक महामार्गाचे काम लवकरात लवकर तडीस नेण्यासह या महामार्गाच्या रेखांकनात संगमनेर शहरासाठी इंटरचेंज प्रस्तावित करा. 📌 संगमनेर शहरातील अतिक्रमणीत झोपडपट्टी भागात व भाड्याच्या…
दिल्ली – रस्ते अपघातातील जखमींना दिलासा देणारी मोठी घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे. गडकरी यांनी देशभरात कॅशलेस ट्रीटमेंट योजना जाहीर केले असून या योजनेच्या माध्यमातून केंद्र सरकारकडून जखमींवर दीड लाखापर्यंतचा खर्च केला जाणार आहे. योजनेअंतर्गत सात दिवसांपर्यंत सरकार या उपचाराचा खर्च करेल. मार्च महिन्यापर्यंत ही योजना सुरू केली जाणार – देशभरातील सर्व राज्यांमधील वाहतूक मंत्र्यांची दिल्लीत भारत मंडपम येथे मंगळवारी बैठक झाली. या बैठकीत गडकरी देशात वाढत्या रस्ते अपघातांच्या घटनांना आळा घालण्यासाठी अपघातग्रस्तांना सात दिवसांसाठी दीड लाख रुपयांपर्यंत कॅशलेस उपचार देण्यासाठी सुरू असलेल्या प्रायोगिक उपक्रमाचा मार्च २०२५ पर्यंत विस्तार केला जाणार असल्याची घोषणा…
संगमनेर – गेल्या अनेक महिन्यांपासून वादग्रस्त ठरलेला संगमनेरचा टोल नाका बंद करण्याच्या मागणीसाठी निघालेल्या मोर्चा नंतर सरकारने घेतलेल्या भूमिकेमुळे टोल नाका बंद होण्याची आशा मावळली आहे. तसेच या टोल नाक्याच्या ठेकेदाराचे भाजप कनेक्शन असल्याचा आरोप शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे माजी शहरप्रमुख अमर कतारी यांनी केला आहे. समाज माध्यमात एका पोस्टच्या माध्यमातून कतारी यांनी याचा उलगडा केला आहे. कोणी कितीही आरडाओरडा केला तरी हा टोल बंद होऊ शकत नाही. भाजप-शिवसेनेशी (शिंदे गट) संबंधित आंदोलकांना थेट नागपूरहून फोन आल्याने या कार्यकर्ते, आंदोलकाचा टोल नाक्या विरोधातील आवाज बंद झाला आहे. त्यामुळे संगमनेरात या टोलनाक्यावरून मोठे वादंग होऊन देखील टोल नाका बंद करण्याची मागणी…
संगमनेर – संगमनेरचे नवनिर्वाचित आमदार अमोल खताळ यांनी पुढाकार घेतल्यानंतर रस्त्यावरच हातगाड्यांच्या माध्यमातून अतिक्रमणे करून वाहतुकीची कोंडी निर्माण करणारी बस स्थानकाबाहेरील अतिक्रमण पालिकेच्या माध्यमातून हटविण्यात आली आहे. पालिकेच्या माध्यमातून कोणतेही नुकसान न होता व्यावसायिकांनी अतिक्रमणे काढून घेतल्याने वारंवार या परिसरात अतिक्रमण मोहीम हटावचा फार्स ठरलेली ही अतिक्रमणे खरंच कायमस्वरूपी हटविली गेली का, याबाबत प्रश्नचिन्ह कायम आहे. मंगळवारी ही कारवाई करण्यात आली. बस स्थानक परिसर मोकळा करण्यात आला असला तरी शहराच्या अन्य भागात नगरपालिकेने ही कारवाई करण्याची आवश्यकता नागरिकांमधून व्यक्त होत आहे. वारंवार होणारी अतिक्रमणे संगमनेरकरांसाठी डोकेदुखी बनली असून ही अतिक्रमणे काढण्याची संकेत मुख्याधिकारी रामदास कोकरे यांनी दिले होते. याचाच एक…
संगमनेर – सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या जयंती महोत्सवानिमित्त संगमनेरमध्ये स्व. डॉ. शरदकुमार दीक्षित (अमेरिका) यांच्या स्मरणार्थ लायन्स क्लब ऑफ संगमनेरच्यावतीने ११, १२ व १३ जानेवारी २०२५ रोजी मोफत प्लास्टिक सर्जरी शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती प्रकल्प प्रमुख डॉ. सुचित गांधी व डॉ. प्रवीण पानसरे, लायन्स क्लबच्या अध्यक्षा राखी करवा यांनी दिली आहे. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी सहकारातून संगमनेर तालुक्यात समृद्धी निर्माण केली आर्थिक शिस्त विकासाची परंपरा घेऊन लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर तालुक्याला वैभवशाली बनवले आहे. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी संगमनेरमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन होते. यावर्षी ही जयंती व डॉ. शरदकुमार दीक्षित यांच्या स्मरणार्थ…
मुंबई – महात्मा फुले जन आरोग्य योजना ही महाराष्ट्रातील सर्व नागरिकांच्या दृष्टीने एक जीवनदायी योजना ठरलेली आहे. २०१७ पासून सुरू करण्यात आलेल्या या योजनेमुळे समाजातील सर्वसामान्य माणसाला खूप मोठा दिलासा मिळतोय. तथापि, या योजनेत आणखी सुधारणा करण्यास नक्कीच वाव आहे. योजनेअंतर्गत निश्चित करण्यात आलेले उपचार दर मुंबई, पुणे आणि सर्वच जिल्ह्यांसाठी सारखेच आहेत. त्यामुळे या मोठ्या शहरांमधील रुग्णालये योजनेत समाविष्ट होण्यासाठी उत्सुक दिसत नाहीत. तसेच पुरेशा बेड अभावी किंवा एखादा आजार योजनेत बसत नाही म्हणून रुग्णांना नाकारले जाते. त्यामुळे सर्वसामान्य रुग्णांची ससेहोलपट होते. त्यामुळे आणखी आजारांचा यात समावेश करण्याची व रुग्णालयांची संख्या वाढविण्याची गरज आहे. तसेच आयुर्वेद, होमिओपॅथी व दातांवरील…
विशेष प्रतिनिधी / मुंबई देशातील सार्वत्रिक आणि विविध राज्यांच्या मतदानात विरोधकांनी ईव्हीएमवर घेतलेला आक्षेप मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी निकालात काढला. जागतिक किर्तीचे तज्ज्ञ एलन मस्क यांनी केलेला ईव्हीएम हॅकिंगचा दावा मोडीत काढताना ज्या देशात ईव्हीएम वापरले जात नाहीत त्या देशातील लोकंच ईव्हीएमला दोष देत असल्याचा दावा कुमार यांनी केला. केंद्रीय निवडणूक आयोगाने मंगळवारी दिल्ली विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला तेव्हा राजीव कुमार बोलत होते. दिल्लीतील सर्व ७० विधानसभा जागांसाठी ५ फेब्रुवारी २०२५ रोजी मतदान होणार असून ८ फेब्रुवारी रोजी निकाल जाहीर होणार आहे. यावेळी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी, विरोधकांनी ईव्हीएमबाबत केलेले सर्व आरोप फेटाळले. मात्र, राजीव…
