Author: अनंत पांगारकर

मुंबई:  सरकारला प्रश्न विचारणाऱ्यांना ‘भाडे के तट्टू’ किंवा ‘बघून घेईन’ अशा धमक्या देणे राज्याच्या मुख्यमंत्र्यांना शोभत नाही आणि ‘देवेंद्र फडणवीस म्हणजे महाराष्ट्र नाही’ हे त्यांनी लक्षात ठेवावे, असा घणाघाती हल्लाबोल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.  मुंबईत प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी सरकारच्या कथित भ्रष्टाचारावर आणि शेतकरी विरोधी धोरणांवर कडक शब्दांत आक्षेप घेतला. हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले की, सुसंस्कृत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या तोंडी ‘कुत्रे’ किंवा ‘भाड्याचे तट्टू’ यांसारखे शब्द शोभा देत नाहीत, कारण ही टपोरी लोकांची भाषा आहे. लोकशाहीत सरकारच्या कामावर प्रश्न विचारण्याचा जनतेला आणि विरोधी पक्षांना पूर्ण अधिकार आहे. काँग्रेस पक्षाने मिसिंग लिंकच्या कामातील कथित भ्रष्टाचाराची पोलखोल करून फडणवीसांना ‘डिझास्टर…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: संगमनेर शहरात मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी सांडपाणी साचले असून, पिण्याच्या पाण्याच्या जलवाहिन्यांमध्ये हे दूषित पाणी मिसळून नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची तीव्र शक्यता निर्माण झाली आहे. प्रशासनाने तात्काळ नियमित पाणी तपासणी करून शुद्ध पाणीपुरवठा करावा, अन्यथा संगमनेरकरांच्या आरोग्याशी होणारा खेळ खपवून घेतला जाणार नाही, असा थेट आणि आक्रमक इशारा शिवसेनेच्या (शिंदे गट) एकमेव विरोधी नगरसेविका साक्षी विनोद सूर्यवंशी यांनी नगरपालिका प्रशासनाला दिला आहे. शहरातील गंभीर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी मुख्याधिकारी दयानंद गोरे यांना यासंबंधीचे निवेदन देत तातडीने युद्धपातळीवर उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. सूर्यवंशी यांच्या या आक्रमक पवित्र्यानंतर आता संगमनेर नगरपालिका प्रशासन खडबडून जागे होणार का, याकडे संपूर्ण…

Read More

आजचे राशिभविष्य मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी मान-सन्मान वाढवणारा आणि उत्तम ठरेल. हाती घेतलेल्या कामात यश मिळेल आणि रखडलेली कामे पुन्हा वेगाने सुरू होतील. आपल्या मतांविषयी तुम्ही आग्रही राहाल. मात्र, आर्थिक बाबतीत कोणताही मोठा निर्णय घेताना घाईगडबड करणे टाळावे, अन्यथा खर्चात अनावश्यक वाढ होऊ शकते. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. वृषभ – आर्थिक दृष्टिकोनातून आजचा दिवस अत्यंत लाभदायी ठरेल. आई-वडिलांच्या आशीर्वादाने कठीण कामे सुलभ होतील आणि काही नवीन मोठे प्रकल्प तुमच्या हाती येण्याची शक्यता आहे. जोडीदाराचे उत्तम सहकार्य लाभेल. आरोग्याच्या बाबतीत काही जुन्या तक्रारी उद्भवू शकतात, त्यामुळे खाण्यापिण्याची विशेष काळजी घ्या आणि कामाचा ताण टाळा. मिथुन – गेल्या अनेक दिवसांपासून चालत…

Read More

संगमनेर: आमदार सत्यजीत तांबे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला मोठे यश येण्याची चिन्हे असून संगमनेर येथे स्वतंत्र उपप्रादेशिक परिवहन कार्यालय स्थापन करण्याबाबत परिवहन मंत्री प्रतापराव सरनाईक यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. मुंबईत पार पडलेल्या एका महत्त्वपूर्ण बैठकीत आमदार तांबे यांनी परिवहन मंत्र्यांची भेट घेऊन संगमनेर आणि अकोले परिसरासाठी नव्या निकषांनुसार स्वतंत्र आरटीओ कार्यालय मंजूर करण्याची मागणी केली. यावर तातडीने कार्यवाही करत परिवहन मंत्र्यांनी नव्या शासन अध्यादेशातील निकषांच्या आधारे संगमनेरसाठीचा प्रस्ताव सकारात्मकरीत्या तयार करून शासनाकडे सादर करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. संगमनेर हे अहिल्यानगर जिल्ह्यातील एक मुख्य व्यापारी, शैक्षणिक आणि वाहतूक केंद्र असल्याने येथे दरवर्षी मोठ्या प्रमाणावर वाहनांची खरेदी-विक्री होते. मात्र, सध्या…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: निळवंडे धरणातून संगमनेर शहरासाठी राबविण्यात आलेली ऐतिहासिक थेट पाईपलाईन योजना पूर्णपणे यशस्वी झाली असून शहरवासीयांना दररोज स्वच्छ व मुबलक पाणी मिळत आहे. असे असताना २००९ च्या योजनेबाबत २०२६ मध्ये विधानसभेत अत्यंत खोटे, चुकीचे आणि अपूर्ण माहितीच्या आधारे आरोप करून संगमनेर शहर व तालुक्याची राज्यात बदनामी करण्याचे काम येथील नवीन लोकप्रतिनिधी करत आहेत. पालिका निवडणुकीत घरातील उमेदवारासह सर्वच जागांवर सपाटून मार खाल्ल्यामुळे आलेल्या वैफल्यग्रस्ततेतूनच हे आरोप केले जात असून, राज्य शासनाने जाहीर केलेल्या चौकशीचे आम्ही स्वागतच करतो. या चौकशीतून ‘दूध का दूध, पानी का पानी’ होऊन तोंडाच्या वाफा दवडणारे विरोधक तोंडघाशी पडतील, अशी घणाघाती टीका माजी…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन मुंबई: संगमनेर शहराच्या वाढीव पाणीपुरवठा योजनेच्या निविदा प्रक्रियेतील कथित अनियमिततेची नगर विकास विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय चौकशी केली जाईल आणि दोन महिन्यांत दोषींवर कडक कारवाई केली जाईल, अशी घोषणा नगर विकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी विधानसभेत केली. आमदार अमोल खताळ यांच्या कार्यालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, खताळ यांनी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात लक्षवेधी सूचनेद्वारे या गंभीर प्रकरणावर सभागृहात जोरदार आवाज उठवला होता. आमदार खताळ यांनी सभागृहात सांगितले की, जून २००९ मध्ये प्रसिद्ध झालेल्या या पाणीपुरवठा योजनेच्या निविदेला तब्बल ६९ टक्के वाढीव दराने मंजुरी देण्यात आली होती. महाराष्ट्राच्या इतिहासात एवढ्या मोठ्या प्रमाणावर वाढीव दराने निविदा मंजूर होण्याचे…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाइन संगमनेर: तालुक्यात गेल्या चार-पाच दिवसांपासून सुरु असलेल्या अखंडित भीज पावसामुळे ग्रामीण भागाला मोठा तडाखा बसला आहे. या सातत्यपूर्ण पावसामुळे अनेक ठिकाणी नागरिकांच्या घरांचे आणि शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. तालुक्यातील सावरगावतळ येथे तर बुधवारी सकाळी तीन शेतकऱ्यांची राहती घरे कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. सावरगावतळ येथील वयोवृद्ध शेतकरी कारभारी दशरथ थिटमे, दादाभाऊ एकनाथ नेहे आणि भाऊसाहेब विठोबा नेहे या तिघांच्या घरांच्या भिंती बुधवारी सकाळी अचानक कोसळल्या. यामध्ये घरांचे अतोनात नुकसान झाले असून कुटुंबे उघड्यावर आली आहेत. मात्र, अचानक ओढवलेल्या या संकटामुळे या सर्व कुटुंबांना मोठ्या आर्थिक फटक्याला सामोरे जावे लागले असून, त्यांच्यासमोर आता सुरक्षित निवाऱ्याचा…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन ​संगमनेर: संगमनेर आणि परिसरातील हजारो कामगार बांधवांसाठी एक आनंदाची आणि दिलासादायक बातमी आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले कामगार रुग्णालयाचे स्वप्न आता प्रत्यक्षात साकार होत असून, आमदार अमोल खताळ यांच्या सातत्यपूर्ण आणि प्रभावी पाठपुराव्यामुळे या रुग्णालयाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. शहरातील मुख्य ठिकाण असलेल्या जाणता राजा मार्गावरील, स्टेट बँकेसमोरील इमारतीमध्ये हे रुग्णालय उभारण्यात येत असून, लवकरच ते सर्वसामान्य नागरिकांच्या आणि कामगारांच्या सेवेत दाखल होणार आहे. ​आजवर कर्मचारी राज्य विमा योजनेअंतर्गत येणाऱ्या संगमनेरमधील हजारो कामगारांना किरकोळ तसेच गंभीर आजारांवरील उपचारांसाठी नाशिक किंवा अहिल्यानगर येथील रुग्णालयांवर अवलंबून राहावे लागत होते. या लांबच्या प्रवासामुळे कामगारांचा मोठा वेळ आणि पैसा…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: संगमनेर नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेचे थेट प्रक्षेपण करण्यात यावे, अशी आग्रही मागणी सामाजिक कार्यकर्ते मुजम्मील शेख (गुड्डू इंजिनिअर) यांनी मुख्याधिकारी दयानंद गोरे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. आजच्या आधुनिक आणि डिजिटल युगात प्रशासकीय कारभारात पूर्ण पारदर्शकता आणण्यासाठी हे हायटेक पाऊल उचलणे अत्यंत गरजेचे असल्याचे मुजम्मील शेख यांनी या निवेदनात म्हटले आहे. या मागणीच्या पूर्ततेकडे आता संगमनेरकरांचे लक्ष याकडे लागले आहे. नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेमध्ये शहराच्या विकासाचे महत्त्वाचे निर्णय, विविध विकासकामे, आर्थिक बाबी आणि नागरिकांच्या मूलभूत समस्यांवर खडाजंगी चर्चा होत असते. अशा वेळी सभागृहात आपण निवडून दिलेले लोकप्रतिनिधी नक्की काय भूमिका मांडतात, हे प्रत्येक नागरिकाला घरबसल्या कळावे यासाठी…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन आश्वी: पावसाळा सुरू होताच आश्वी खुर्द आणि परिसरात महावितरणच्या गलथान कारभाराचे दर्शन घडू लागले असून, रविवारी सकाळी एका शेतकरी दाम्पत्याला मृत्यूचा थरारक अनुभव आला. आश्वी खुर्द येथील प्रगतशील शेतकरी रामनाथ क्षिरसागर (वय ४४) आणि त्यांच्या पत्नी योगिता क्षिरसागर (वय ३८) हे सकाळी नऊ वाजेच्या सुमारास आपल्या गायींसाठी चारा कापत असताना, त्यांच्या अवघ्या दोन फुटांवर ११ केव्हीची उच्चदाब वीजवाहिनी अचानक तुटून कोसळली. सुदैवाने या तारेला रबराचे आवरण असल्याने आणि दाम्पत्य काही अंतरावर असल्याने एक मोठा अनर्थ टळला. मुख्य वीजवाहिनी जमिनीवर पडताना मोठा स्फोट झाला आणि हवेत ठिणग्या उडाल्याने काही काळ परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या…

Read More