Author: अनंत पांगारकर
सोमवार ९ डिसेंबर – संगमनेर संगमनेरमध्ये रोटरी क्लब ऑफ संगमनेर, सर्वोदय नागरी सहकारी पतसंस्था आणि रत्ननिधी चारिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून आयोजित दिव्यांग व्यक्तींसाठीच्या शिबिराने एक अभूतपूर्व सामाजिक सेवा उपक्रम यशस्वीरीत्या पार पाडला आहे. दोन दिवस चाललेल्या या मोफत तपासणी शिबिरात मुंबईहून आलेल्या तज्ज्ञ टीमच्या माध्यमातून २२८ रुग्णांची तपासणी करण्यात आली. यामध्ये १३६ रुग्णांची निवड करण्यात आली असून त्यांना १६२ साहित्यांचे एक ते दीड महिन्यांत मोफत वाटप करण्यात येणार आहे. या उपक्रमाचे विशेष महत्त्व – दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी बनविण्यासाठी आणि त्यांचे जीवन सुलभ करण्यासाठी LN-4 हात, पाय, आणि जयपूर फुट यासारखी अत्याधुनिक साधने देण्यात आली. येथील रुग्णांचा सहभाग – रुग्णांची तपासणी, निवड,…
सोमवार ९ डिसेंबर – अहिल्यानगर गेल्या काही दिवसांपासून संगमनेरमध्ये धूम स्टाईलने दुचाकीवरून येत महिलांच्या गळ्यातील दागिने ओरबाडून पळविण्याचे प्रकार सर्रासपणे सुरू आहे. दागिने पळविणाऱ्या अशाच एका टोळीला पकडण्यात अहिल्यानगर गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले असून पथकाने टोळीतील चार जणांना अटक केली. तर दोघे अद्याप फरार आहेत. या टोळीकडून संगमनेरमधील आठ आणि लोणी मधील एका गुन्ह्याची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. हे आहेत आरोपी – पोलिसांनी अटक केलेल्या आरोपी मध्ये मयूर संजय ब्राह्मणे (वय २२, रा. चर्चजवळ, वेताळबाबा चौक, लोणी, ता. राहता जि. अहिल्यानगर), निखिल सुरेश भुजबळ (वय २०, रा. गिरीम, ता. दौंड, जि. पुणे, हल्ली रा. भाने वस्ती, हसनापूर…
सोमवार, ०९ डिसेंबर – संगमनेर सात वर्षांपासून फरार असलेल्या एका गंभीर गुन्ह्यातील आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांचा पाठलाग सुरू असताना रात्रीच्या वेळी अंधाराचा अंदाज न आल्याने पोलीस पथकातील एक पोलीस कर्मचारी व आरोपी विहिरीत पडल्याची घटना शुक्रवारी रात्री संगमनेर तालुक्यातील सांगवी गावामध्ये घडली. काय होती घटना – याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, जुन्या वादाच्या कारणावरून तालुक्यामध्ये २०१६ साली हाणामारी झाल्याची एक घटना घडली होती. या घटनेतील आरोपीने आपल्या मामा आणि मामीला जमिनीच्या वादातून बेदम मारहाण केली होती. त्यामुळे सदर आरोपीविरुद्ध पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला होता. फरार गुन्हेगाराचा पोलिसांना मिळाला माग – गुन्हा दाखल झाल्यानंतर अटकेच्या भीतीने या आरोपीने पलायन केले होते.…
रविवार, ०८ डिसेंबर – मुंबई विधानसभा अध्यक्षपदासाठी महायुतीकडून भाजप नेते, आमदार राहुल नार्वेकर यांनी रविवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. नार्वेकर यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची विधानसभा अध्यक्षपदी बिनविरोध निवड होणार आहे. या निवडीची औपचारिकता बाकी आहे. यांच्या उपस्थितीत भरला अर्ज – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार, चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत राहुल नार्वेकर यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा आज अर्ज दाखल केला आहे. निवड निश्चित – विधानसभा अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल करण्याची आज (८ डिसेंबर ) दुपारी १२ वाजेपर्यंतची मुदत होती. त्यानुसार राहुल नार्वेकर यांनी अर्ज दाखल केला. परंतु, यावेळेत राहुल नार्वेकर यांच्या व्यतिरिक्त अन्य कोणीही अध्यक्षपदाचा…
रविवार, ०८ डिसेंबर – नाशिक बस स्थानकात उभ्या असलेल्या ईबस चालकाने बस सुरू करताच क्षणार्धात बसने उसळी घेत समोरील लोखंडी बार तोडत बस थेट स्थानकाच्या भिंतीवर आदळल्याने झालेल्या अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू झाला तर अन्य एक जण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गुन्हा दाखल – शनिवारी रात्री अपघाताची ही दुर्दैवी घटना मुंबई नाका परिसरातील महामार्ग बस स्थानकात घडली असून यासंदर्भात बसचालका विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून त्याला ताब्यात घेतले आहे. अशी आहेत नावे – अपघातात आंध्रप्रदेशची महिला बसखाली सापडून जागीच ठार झाली. अंजली थट्टीकोंडा – नागार्जुन (२३, रा. पटछवा, जि. प्रकाशम, आंध्रप्रदेश) असे मृत्यूमुखी…
रविवार, ०८ डिसेंबर – नवी दिल्ली मोदी सरकार जीएसटीमध्ये नवीन कर टप्पा तयार करण्याच्या तयारीत असून यामध्ये जनतेसाठी जीवनावश्यक ठरलेल्या वस्तूंवरील जीएसटी करामध्ये वाढ करण्याची योजना आखली जात आहे. तर उद्योगपतींना सूट दिली जात आहे या पार्श्वभूमीवर सरकारच्या नवीन कर धोरणावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी प्रश्न उपस्थित केले आहे. राहुल गांधी म्हणाले की, असे ऐकण्यात येत आहे की, जीएसटीच्या वाढत्या संकलनादरम्यान, सरकार एक नवीन कर टप्पा आणणार आहे. आपल्याला आवश्यक असलेल्या गोष्टींवर जीएसटी वाढवण्याची योजना आहे. तसेच, जरा विचार करा सध्या लग्नाचा हंगाम सुरू आहे, लोक पैसे जमा करत आहेत आणि दरम्यान सरकार १५०० रुपयांच्या वरच्या कपड्यांवरील जीएसटी १२…
रविवार, ०८ डिसेंबर – मुंबई विधानसभा अध्यक्षपदाची निवड उद्या होत आहे, या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांनी रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत अध्यक्षपदाच्या निवडणुकीपूर्वी महाविकास आघाडीला विधानसभा उपाध्यक्षपद आणि विरोधी पक्षनेते पद मिळावं, असा प्रस्ताव फडणवीसांसमोर ठेवल्याची माहिती समोर येत आहे. या नेत्यांनी घेतली भेट – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणाऱ्यांमध्ये महाविकास आघाडीतील भास्कर जाधव, नाना पटोले, विजय वडेट्टीवर यांचा समावेश होता. बहुमत बघता विधानसभा अध्यक्षपदासाठी राहुल नार्वेकर यांची निवड निश्चित असल्याने या नेत्यांनी महाविकास आघाडीच्या वतीने उपाध्यक्षपदाची मागणी केली आहे. विधानसभा अध्यक्ष पदासाठी नार्वेकर निश्चित – विधानसभा निवडणुकीत प्रचंड बहुमत मिळवत महायुतीने सरकार स्थापन केलं. सध्या…
रविवार, ०८ डिसेंबर – अहिल्यानगर अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात धक्कादायक घटना समोर आली असून गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता असलेल्या व काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष असलेले मिठुभाई शेख यांचा मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत शनिवारी आढळून आला आहे. या प्रकारामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. शेख गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता होते. या संदर्भात त्यांच्या नातेवाईकांनी गेल्या महिन्यात २५ नोव्हेंबरला पाथर्डी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविलेली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने पोलिसांचा तपास देखील सुरू होता. शनिवारी त्यांचा मृतदेह खेर्डा फाटा येथील एका शेतात छिन्नविछिन्न अवस्थेत आढळून आल्याचे समोर येत आहे. घटनास्थळी पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे, उपनिरीक्षक निवृत्ती आगरकर, पोलीस कर्मचारी अभयसिंग लबडे, राम सोनवणे आदींनी माहिती मिळताच…
राज्याचे व्यक्ती सापेक्ष एकवीसावे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी पद आणि गोपनियतेची शपथ घेतली आणि लागलीच नव्याने राज्य उभारणीची घोषणा केली. आजवर नव्हतं असं प्रचंड संख्याबळ त्यांच्या मागे असल्याने आता त्यांना राज्य चालवणं घडवणं अजिबात अवघड नाही. विरोधी पक्ष नसल्यागतच असल्याने तीही अडचण आपसूक निकाली निघाली आहे. विरोधकांपेक्षा सत्ताधारी म्हणून एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या गटातील आमदारांकडूनच काही संकटं आलीच तर त्यांना तोंड देण्याची वेळ फडणवीस यांच्यावर येईल, हे मात्र नाकारता येत नाही. पार पडलेल्या निवडणुकीतील यशावर आजही कोणाचा विश्वास नाही. सामान्य माणूस आणि जाणत्या नागरिकालाही भाजप युतीला एकहाती सत्ता मिळाली याचं आश्चर्य आहे. जो भेटतो तो आजही…
शनिवार ०७ डिसेंबर – विशेष प्रतिनिधी / मुंबई राज्यात पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत झालेल्या गैरप्रकारांचा निषेध म्हणून निवडून आलेल्या विरोधी पक्षाच्या आमदारांनी शपथविधी कार्यक्रमावर बहिष्कार घालत स्वतःही शपथ घेण्यास नकार दिला. या कृतीने देशभर निवडणूक आयोगाची निर्भत्सना होऊ लागली आहे. आज विरोधकांपैकी कोणीही शपथ घेतली नसल्याची माहिती महाविकास आघाडीच्या नेत्यांनी विधानभवनात पत्रकारांशी बोलताना दिली. यावेळी शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे, माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, शरदचंद्र पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाने नेते जितेंद्र आव्हाड, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, मुंबई काँग्रेस अध्यक्ष वर्षा गायकवाड, सुनील प्रभू आणि महाविकास आघाडीचे नवनिर्वाचित आमदार उपस्थित होते. शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे म्हणाले, निषेध म्हणून आज शपथ घेतली जाणार…
