Author: अनंत पांगारकर
संगमनेर – अनेकदा राजकीय भूमिकेतून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह महायुतीवर टीका करणाऱ्या त्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या एका विधानाचा धागा पकडत योग्य व्यासपीठावर योग्य मुद्दा मांडल्याचे स्पष्ट करत त्यांचे कौतुक केले. थोरात यांच्या या विधानाची चर्चा राजकीय वर्तुळात रंगले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री अनुक्रमे एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्यासह बहुतांश मंत्री रविवारी अहिल्यानगर जिल्हा दौऱ्यावर होते. जिल्ह्यातील एका कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस यांनी साखर कारखानदारीवर मोठे भाष्य केले. फडणवीस यांच्या या वक्तव्याची चर्चा राज्यभरात सुरु आहे. थोरात सोमवारी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या गाळप…
संगमनेर – सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना यावर्षी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रति टन 3200 रुपये भाव देणार आहे. विक्रमी ऊस भावाची घोषणा करतानाच राज्य सरकारचे अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधत यावर्षी चांगला पाऊस झाला असला तरी, राज्यात अनेक ठिकाणी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांचे संसार उघड्यावर पडले आहेत, त्यामुळे सरकारने तातडीने शेतकऱ्यांची सरसकट संपूर्ण कर्जमाफी करावी. याचबरोबर, पंजाब सरकारप्रमाणे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 50 हजार रुपयांची मदत देण्याची मागणी राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याचा 2025-26 च्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्नीप्रदीपन समारंभ आज (सोमवारी, ६…
संगमनेर: आगामी संगमनेर नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी भावी नगराध्यक्षांची निवड थेट जनतेतून होणार असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर, आज (सोमवार, ०६ ऑक्टोबर) होणाऱ्या आरक्षण सोडतीकडे संपूर्ण संगमनेरकरांचे तसेच इच्छुक उमेदवारांचे आणि राजकीय पक्षांच्या धुरिणांचे लक्ष लागले आहे. आजच्या सोडतीत नगराध्यक्षपद कोणत्या प्रवर्गासाठी राखीव होणार, यावर आता निवडणुकीची पुढील दिशा ठरणार आहे. नगराध्यक्षपदाच्या आरक्षणाबाबत गेल्या अनेक दिवसांपासून विविध राजकीय आडाखे बांधले जात होते. मात्र, आजच्या सोडतीमुळे हे सर्व आडाखे संपुष्टात येणार आहेत. ज्या प्रवर्गासाठी हे पद आरक्षित होईल, त्या प्रवर्गातील इच्छुकांमध्ये उमेदवारी मिळवण्यासाठी मोर्चेबांधणीला आणि प्रयत्नांना तात्काळ वेग येईल. राज्यातील २४७ नगरपरिषदा आणि १२७ नगरपंचायतींच्या नगराध्यक्षपदांचे आरक्षण आज निश्चित केले जाणार आहे. ही सोडत मुंबईतील…
मेष रास: आजचा दिवस परोपकारात व्यतीत होईल. जुन्या प्रकल्पांची कामे पूर्ण होतील आणि वरिष्ठांकडून कौतुक मिळेल. कार्यक्षेत्रात काही बदल तुमच्या बाजूने होतील, ज्यामुळे सहकारी थोडे हताश होऊ शकतात, पण तुम्ही तुमच्या समजुतीने वातावरण सामान्य कराल. आर्थिक खर्चावर लक्ष द्या. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. वृषभ रास: आजचा दिवस शुभ फलदायी आहे. तुमच्या व्यवहारात संयम बाळगावा लागेल. नोकरीत प्रगती होण्याची शक्यता आहे आणि नवीन जबाबदारी मिळू शकते. व्यापार व नोकरीत नवीन करारांमुळे पद आणि प्रतिष्ठा वाढेल. पैशांची आवक चांगली राहील. मिथुन रास: आज तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि प्रगती साधता येईल. सर्जनशील कामांमध्ये यश मिळेल आणि सहकाऱ्यांकडून मदत मिळेल. कोणालातरी दिलेले पैसे आज परत…
संगमनेर – राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याबद्दल संपूर्ण युवकांना मोठे आकर्षण आहे. मात्र सध्याच्या परिस्थितीत काही युवक भरकटले आहेत. यापुढे जातिभेद निर्माण करणाऱ्या शक्तींना ताकद देऊ नका. उमाजी नाईक यांचा वारसा आपल्याला आहे, त्यामुळे एकजुटीने काम करून संगमनेरचा नावलौकिक वाढवावा. रामोशी समाजाने नेहमीच प्रामाणिक आणि एकनिष्ठ राहावे, समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना थारा देऊ नये, असे आवाहन ‘बिग बॉस’ फेम अभिनेता सुरज चव्हाण यांनी केले. आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या २३४ व्या जयंतीनिमित्त आयोजित भव्य रॅलीत ‘बिग बॉस’ फेम अभिनेता सुरज चव्हाण यांनी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या विकासकामांचे तोंडभरून कौतुक केले. यावेळी व्यासपीठावर माजी मंत्री बाळासाहेब थोरात,…
सार्वजनिक ठिकाणी असलेल्या अनेक वस्तू काळाच्या ओघात विस्मृतीत जातात. त्यातीलच एक म्हणजे ‘सार्वजनिक फळा’. काळानुसार लोकांची गरज संपते आणि ही ठिकाणे किंवा वस्तू दुर्लक्षित होतात. पण एक काळ असा होता, जेव्हा सार्वजनिक फळा केवळ एक लाकडी बोर्ड नव्हता, तर लोकांच्या भावनांना व्यक्त करणारा आणि जनमत तयार करण्याचे एक महत्त्वाचे साधन होते. हा सार्वजनिक फळा आठवण्याचे कारण म्हणजे काल-परवा घडलेला एक प्रसंग. माळी पंचांच्या मारुती मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ असलेला एक खूप जुना सार्वजनिक फळा होता, ज्याला आम्ही हल्ली ‘मरण वार्ता देणारा फळा’ म्हणायचो. मंदिराच्या सुशोभीकरणासाठी नवीन कारभाऱ्यांनी तो काढून टाकला. या घटनेने साठीच्या पुढे गेलेल्या आमच्या पिढीला एक गोष्ट स्पष्ट झाली: आम्ही,…
प्रवीण पुरो – देशातील जनतेला असलेल्या मतदानाच्या मौलिक अधिकाराची पायमल्ली करणार्या देशाच्या निवडणूक आयोगाची कधी झाली नाही अशी बेईज्जती जगभर झाली आहे. आयोगाच्या अधिकार्यांना लोकांपुढे तोंड दाखवायला जागा राहिली नाही. काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सुरू केलेल्या ‘व्होटचोर’ मोहिमेने आयोगाची त्रेधा उडाली आहेच. पण मी नाही त्यातली, असं दाखवण्याचा केलेला प्रयत्नही आयोगाच्या आणि आयोगाचे प्रमुख ज्ञानेशकुमार गुप्ता यांच्या चांगलाच अंगलट आला. एकूणच लोकांच्या विश्वासापासूनही आयोग पुरता पारखा झाल्याचं चित्र निर्माण झालं आहे. टी. एन. शेषन यांच्या काळातील आयोग आणि ज्ञानेशकुमार यांच्या नेतृत्वातील आयोग यातला फरक आता सुस्पष्ट झाला आहे. शेषन यांच्या नेतृत्वातील आयोगाची शान आणि मान…
मेष (Aries): आजचा दिवस तुमच्यासाठी अनुकूल आहे. तुम्हाला कठोर परिश्रमाचे फळ मिळेल. नोकरीच्या शोधात असलेल्यांना चांगल्या संधी मिळू शकतात. आर्थिक क्षेत्रात केलेले प्रयत्न यशस्वी होतील. मात्र, कामाच्या ठिकाणी किंवा वैवाहिक जीवनात वादविवाद टाळणे आणि बोलण्यावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. वृषभ (Taurus): व्यापार-व्यवसायाच्या दृष्टीने दिवस सकारात्मक राहील. नवीन संधी प्राप्त होतील आणि भागीदारीच्या कामात यश मिळेल. मालमत्ता किंवा भूमी संबंधित काही चांगल्या बातम्या मिळू शकतात. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल आणि तुमचे कार्यक्षेत्र वाढेल. शांत आणि तणावमुक्त राहण्याचा सल्ला आहे. मिथुन (Gemini): आज तुम्हाला गुरूकृपा लाभेल आणि तुमचे मानसिक स्वास्थ्य व समाधान उत्तम राहील. तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवल्यास, तुमचा मूड हलका होईल आणि…
संगमनेर: गोवंश हत्या बंदी कायद्यामुळे निर्माण झालेल्या गंभीर समस्यांवर राज्य सरकारने कोणताही तोडगा न काढल्याने शिव आर्मी शेतकरी संघटना आता आक्रमक झाली आहे. या कायद्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत असल्याचा आरोप करत, संघटनेने थेट नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्ग (NH 60) रोखण्याचा इशारा दिला आहे. सरकारला स्पष्ट शब्दांत ‘अल्टीमेटम’ देण्यात आला असून, मागण्या मान्य न झाल्यास कोणत्याही क्षणी महामार्गावर ‘चक्का जाम’ करण्याची तयारी संघटनेने केली आहे. गोवंश हत्या बंदीच्या विषयावर तोडगा काढण्यासाठी आज (शनिवारी ४ ऑक्टोंबर) संगमनेर येथील दुर्वे नाना हॉलमध्ये संघटनेची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत कायद्यातील जाचक तरतुदी दूर कराव्यात, भाकड (दूध न देणाऱ्या) जनावरांची योग्य दरात खरेदी…
संगमनेर – अहिल्यानगर एलसीबीच्या पोलीस पथकाने संगमनेरमध्ये केलेल्या कारवाईत पोलिसांनी अवैध दारू विक्री करणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले आहे. तसेच कारवाई दरम्यान पकडलेली दारू ही वेदांत वाईन्समधून घेतल्याची कबुली आरोपींनी दिली असली तरी वेदांत वाईन्समधून अशा प्रकारे कुठल्याही प्रकारे मद्याची नियमबाह्य विक्री झालेली नसून याप्रकरणीचे दावे फेटाळताना संबंधितांनी एक-दोन बाटल्यांच्या माध्यमातून अवैध साठा करून त्याची विक्री केल्याची शक्यता वेदांत वाईन्सच्या संचालकांनी वर्तवली आहे. एलसीबीच्या कारवाईत अवैध मद्य विक्री केल्याप्रकरणी संबंधित आरोपींसह वेदांत वाईन्सच्या चालक-मालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले, या अनुषंगाने संबंधितांनी सर्व आरोप फेटाळून लावत यासंबंधी एका पत्रकार परिषदेच्या माध्यमातून खुलासा केला आहे. संबंधित प्रकार व्यापारी स्पर्धेतून बदनामीचा असल्याचे त्यांनी म्हटले…
