Author: अनंत पांगारकर

अहिल्यानगर, दि. १६ – शेती अधिक शास्त्रशुद्ध, फायदेशीर व पर्यावरणपूरक बनावी यासाठी शेतकऱ्यांनी पारंपरिक शेती पद्धतीत बदल करून कृत्रिम बुद्धिमत्तेसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करणे आवश्यक आहे. शेतीसाठी उपयुक्त माहिती शेतकऱ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी कृषी विभागाने कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर करावा, असे निर्देश राज्याचे जलसंपदा व जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित खरीप हंगामपूर्व आढावा व नियोजन बैठकीत पालकमंत्री विखे बोलत होते. बैठकीस आमदार अमोल खताळ, आमदार विठ्ठलराव लंघे, आमदार काशिनाथ दाते, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, शिर्डीचे अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर, अहिल्यानगरचे अपर जिल्हाधिकारी शैलेश हिंगे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज – अहिल्यानगर  स्वस्तात सोने देण्याचे आमिष दाखवून संगमनेर तालुक्यातील एका व्यापाऱ्याला जामखेडमध्ये बोलावून लुटणाऱ्या टोळीतील तीन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. या दरोड्यात व्यापाऱ्याकडून दहा लाख रुपये आणि सोन्याचे दागिने लुटण्यात आले होते. पोलिसांनी तत्पर कारवाई करत या टोळीतील तीन सदस्यांना बेड्या ठोकल्या असून, उर्वरित सात आरोपींचा शोध सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेंद्र दिलीप मैड (वय ३५, रा. आश्वी, ता. संगमनेर) यांना अश्विनी नावाच्या महिलेने १५० ग्रॅम सोने १० लाख रुपयांना देण्याचे आमिष दाखवले होते. त्यानुसार मैड हे जामखेड तालुक्यातील कुसडगाव येथे गेले असता, अश्विनी आणि तिच्या ८ ते १० साथीदारांनी त्यांना मारहाण…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर : संगमनेर शहर गेल्या तीन-चार वर्षांपासून प्रशासकीय राजवटीच्या बेड्यांमध्ये जखडले आहे. विकासकामांची चाके जाम झाली आहेत आणि नागरी समस्यांचा डोंगर वाढतच चालला आहे. या निष्क्रियतेमुळे संतप्त झालेल्या संगमनेरकरांनी आता आरपारची लढाई पुकारली आहे. माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी नागरिकांच्या शिष्टमंडळाने नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांच्या कार्यालयावर धडक मारली. शहरातील प्रलंबित प्रश्नांची जंत्री त्यांच्यासमोर मांडत, येत्या १५ दिवसांत या समस्यांवर ठोस तोडगा काढण्याचा अल्टिमेटम दिला. अन्यथा, नगरपरिषदेला हादरवून सोडणारे जनआंदोलन उभे करण्याचा निर्धार या वेळी व्यक्त करण्यात आला. शहरातील नागरिक अनेक दिवसांपासून मूलभूत नागरी सुविधांसाठी तरसत आहेत. पावसाळा तोंडावर असताना गटारे तुंबलेली आहेत, रस्त्यांवर जीवघेणे खड्डे पडले आहेत,…

Read More

संगमनेर –  संगमनेर तालुक्यातील शेंडेवाडी, साकूर, पिंपळगाव, कौठे मलकापूर आणि कर्जुले पठार भागातील दगडखाणींवर अत्यंत हालाखीच्या परिस्थितीत काम करत असलेल्या ३८ वेठबिगार आणि ३१ बालकामगारांची प्रशासनाने आज (गुरुवारी) यशस्वीरित्या सुटका केली. या घटनेमुळे संगमनेर तालुक्यात खळबळ उडाली आहे. जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांना सकाळी मिळालेल्या तक्रारीनंतर प्रशासनाने तातडीने आणि प्रभावीपणे ही कारवाई केली. मुक्त करण्यात आलेल्या ३८ वेठबिगार कामगारांमध्ये २२ पुरुष आणि १६ महिलांचा समावेश आहे. या गंभीर प्रकरणी संबंधित ठेकेदारावर घारगाव पोलीस ठाण्यात वेठबिगार प्रतिबंधक कायद्यासह कठोर कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी तातडीने कार्यवाहीचे आदेश दिले. त्यानुसार, संगमनेरचे प्रभारी उपविभागीय अधिकारी माणिक आहेर,…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज शिर्डी: श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाची निवड प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत, राज्याच्या सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेत प्रशासकीय कामकाज सुरळीतपणे पार पाडण्यासाठी एका प्रशासकीय समितीची नियुक्ती केली आहे. यासंबंधी गुरुवारी (१५ फेब्रुवारी २०२४) विशेष आदेश जारी करण्यात आला. या समितीच्या अध्यक्षपदी राज्याचे विद्यमान पालकमंत्री आणि स्थानिक आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या प्रशासकीय समितीमध्ये प्रशासकीय आणि राजकीय क्षेत्रातील व्यक्तींचा समावेश असून जिल्ह्याचे प्रशासकीय प्रमुख असलेले जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांची सहअध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त, स्थानिक आमदार आणि लोकप्रतिनिधी यांचाही समितीत समावेश आहे. संगमनेरचे आमदार अमोल खताळ, कोपरगाव मतदारसंघाचे आमदार आशुतोष काळे हे…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज – अहिल्यानगर जिल्ह्यात श्रीरामपूर पोलिसांनी मोठी कारवाई करत १३ कोटी ७५ लाख ४१ हजार रुपये किमतीचा तब्बल ४०८ किलो वजनाचा अल्प्राझोलम या अंमली पदार्थाचा साठा जप्त केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका टेम्पो चालकाला अटक केली असून पुणे जिल्ह्यातील एका रसायन अभियंत्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी मिनीनाथ विष्णू राशिनकर (वय ३८, रा. धनगरवाडी, राहाता, अहिल्यानगर) या टेम्पो चालकाला अटक केली आहे. तर, विश्वनाथ कारभारी शिपणकर (रा. दौंड, पुणे) याच्याविरुद्ध श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ विरोधी कायद्यान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे, अशी माहिती श्रीरामपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. बसवराज शिवपुजे यांनी दिली. अहिल्यानगर जिल्ह्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात…

Read More

शिर्डी: मुंबईतील सोने व्यापारी विजयसिंह वसनाजी खिशी यांना शिर्डीत मोठा गंडा घालण्यात आला आहे. त्यांच्या हॉटेलच्या खोलीतून तब्बल ३ कोटी २६ लाख रुपये किंमतीचे सुमारे साडेतीन किलो सोन्याचे दागिने आणि ४ लाख रुपयांची रोकड चोरीला गेली आहे. या प्रकरणी खिशी यांनी त्यांचा चालक सुरेशकुमार भुरसिंह राजपुरोहित याच्यावर संशय व्यक्त केला असून शिर्डी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. विजयसिंह खिशी हे मुंबईतील त्यांच्या फर्ममधून सोन्याचे दागिने घेऊन ७ मे रोजी शिर्डीत आले होते. त्यांच्यासोबत कामगार चंद्रप्रकाश प्रजापती आणि चालक सुरेश कुमार होते. त्यांनी हॉटेल साई सुनीतामध्ये खोली क्रमांक २०१ मध्ये मुक्काम केला होता. खिशी हे परिसरातील सराफा दुकानांमध्ये सोने…

Read More

भाग – २ संगमनेर | अनंत पांगारकर अधिकृत गर्भपात केंद्र नसताना देखील रुग्णालयातील डॉक्टरने गर्भपातासंदर्भातील कायदा आणि नियम बाजूला ठेवत महिलेचा गर्भपात करण्याचे धाडस कसे दाखविले. महिलेची प्रकृती हाताबाहेर गेल्यानंतर तिला थेट दुसऱ्या तालुक्यातील रुग्णालयात हलविण्यात आल्यानंतर तेथे या महिलेच्या मृत्यू झाला. याची माहिती शहरात कानोकानी बहुतांश ठिकाणी पसरली. त्यामुळे आता या दुर्दैवी घटनेनंतर संगमनेर शहरातील महिला सामाजिक कार्यकर्त्या बानोबी शेख यांनी ‘ह्युमन इनोवेशन ऑर्गनायझेशन’ या संस्थेच्या माध्यमातून घडलेल्या प्रकरणावर आवाज उठवला आहे. त्यांनी सलग चार ते पाच दिवस या घटनेची सखोल माहिती मिळवली आणि २ मे २०२५ रोजी अहमदनगर जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडे एक विस्तृत तक्रार अर्ज दाखल केला. या…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज –  राहाता: शेतात खत टाकण्याचे काम आटोपून जवळच्या ओढ्यावर हातपाय धुण्यासाठी गेलेल्या दोन सख्ख्या चुलत भावांचा पाय घसरून पाण्यात पडल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. एकमेकांना वाचवण्याच्या प्रयत्नात दोघांनाही प्राण गमवावे लागले. ही हृदयद्रावक घटना राहाता तालुक्यातील गोगलगाव येथे घडली. मृत पावलेल्या मुलांची नावे साहिल दत्तात्रय चौधरी (वय १८) आणि किरण नारायण चौधरी (वय १५) असून दोघेही गोगलगावचे रहिवासी होते. किरणने नुकतीच ९ वीची परीक्षा उत्तीर्ण केली होती, तर साहिल औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत (आयटीआय) शिक्षण घेत होता. मिळालेल्या माहितीनुसार, किसन तुकाराम तनपुरे (वय ६०) हे बुधवारी सायंकाळी त्यांच्या शेतात पिकांना पाणी देत होते. त्याचवेळी त्यांच्या शेजारी राहणारे साहिल आणि…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज – संगमनेर तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे विट व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तयार करण्यासाठी ठेवलेल्या कच्च्या विटांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने विट उत्पादक आर्थिक अडचणीत सापडले आहेत. या नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी, यासाठी विट उत्पादकांनी शासनाकडे अनेक वर्षांपासून मागणी केली आहे, परंतु शासनाने अद्याप कोणतीही दखल घेतलेली नाही. शेतमालाला अवकाळी पावसामुळे नुकसान झाल्यास जशी विमा योजना लागू आहे, त्याच धर्तीवर विट व्यवसायासाठी देखील विमा योजना लागू करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. विट उत्पादकांनी विमा कंपन्यांकडे विमा पॉलिसीनुसार कच्च्या विटांचा विमा उतरवण्याची विचारणा केली असता, विमा कंपन्यांनी मात्र विट व्यवसायासाठी त्यांच्याकडे कोणतेही विशिष्ट धोरण…

Read More