Author: अनंत पांगारकर
महाराष्ट्र संवाद न्यूज – संगमनेर व्यक्ती आणि संघटनांना बेकायदेशीर ठरवण्याचे अमर्याद अधिकार राज्य सरकारला देणाऱ्या प्रस्तावित जनसुरक्षा विधेयकाविरोधात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने (माकप) काल (मंगळवार,२२ एप्रिल) संगमनेरमध्ये मोठे शक्तिप्रदर्शन केले. अकोले आणि संगमनेर तालुक्यातील हजारो श्रमिक या निषेध मोर्चामध्ये सहभागी झाले आणि त्यांनी सरकारच्या धोरणांचा तीव्र निषेध केला. जनसुरक्षा विधेयक विरोधी कृती समितीच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले आणि त्याला जनतेचा मोठा प्रतिसाद मिळाला. राज्य सरकार शहरी नक्षलवादाचा नायनाट करण्यासाठी हे विधेयक आणत असल्याचे सांगत असले, तरी प्रत्यक्षात सरकारच्या धोरणांविरुद्ध संघर्ष करणाऱ्या आणि आवाज उठवणाऱ्या कोणत्याही व्यक्ती किंवा संघटनेवर कारवाई करण्याचे प्रचंड अधिकार या विधेयकामुळे सरकारला मिळणार आहेत. सरकारच्या धोरणांवर टीका करणाऱ्या…
महाराष्ट्र संवाद न्यूज – संगमनेर आज (बुधवारी, २३ एप्रिल) पहाटे पाच वाजता संगमनेरच्या भारत नगरमधील कादरी मस्जिदच्या मागील बाजूस गल्ली नंबर १ येथे एका वाड्यात गोवंश जनावरांची कत्तल होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. संगमनेर मध्ये पोलिसांकडून सातत्याने कत्तलखाना चालकांवर कारवाया केल्या जात आहे. संगमनेर शहर पोलीस, पोलीस उपअधीक्षक आणि अहिल्यानगर च्या स्थानिक गुन्हे शाखेच्या माध्यमातून संगमनेर मधील कत्तलखान्यांवर सातत्याने छापेमारी केली जात आहे. यातून वारंवार या अवैधरित्या चालणाऱ्या कत्तलखान्यांमध्ये गोवंश जनावरांची हत्या होत असल्याचे समोर आले आहे. या शिवाय वारंवार तेच तेच आरोपी निष्पन्न होत आहेत. संगमनेर चे नवनिर्वाचित आमदार अमोल खताळ यांनी कत्तलखाने बंद करण्याचे आदेश दिल्यानंतर नगरपालिकेने…
महाराष्ट्र संवाद न्यूज – मुंबई महाराष्ट्र शासनाच्या वतीने आयोजित ‘राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियान’ स्पर्धेत संगमनेर नगर परिषदेचे मुख्याधिकारी रामदास कोकरे यांनी उत्कृष्ट कामगिरी करत राज्याचा प्रतिष्ठित पुरस्कार पटकावला आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. महाराष्ट्र शासनाच्या वतीने नागरी सेवा दिन २०२५ च्या निमित्ताने राज्यातील नगरपालिका, महानगरपालिका तसेच शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी ‘राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता प्रगती अभियान’ अंतर्गत सन २०२३-२०२४ आणि सन २०२४-२०२५ या वर्षांसाठी राज्यस्तरीय स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत शासकीय अधिकारी म्हणून मुख्याधिकारी रामदास कोकरे यांनी वृक्ष संगोपन व संवर्धनासाठी ‘सीड बँक’ ही नाविन्यपूर्ण संकल्पना सादर केली. कोकरे यांच्या…
महाराष्ट्र संवाद न्यूज – संगमनेर संगमनेर तालुक्यातील सावरगाव घुले येथील बेलसोंडा वाडीजवळ पाण्याच्या टँकरचा टायर फुटल्याने तो सुमारे २०० फूट खोल दरीत कोसळला. या दुर्घटनेत तुकाराम गोविंद घुले (वय ५०) या शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर त्यांच्यासोबत असलेले सिताराम गणपत घुले हे गंभीर जखमी झाले आहेत. ही हृदयद्रावक घटना आज (मंगळवार, २२ एप्रिल) घडली. मिळालेल्या माहितीनुसार, तुकाराम घुले आणि सिताराम घुले हे दोघेही बेलसोंडा फाट्यावरून बेलसोंडा वस्तीकडे ट्रॅक्टरद्वारे पाणी घेऊन जात होते. दरम्यान, अचानक ट्रॅक्टरचा टायर फुटल्याने चालकाचा ताबा सुटला आणि ट्रॅक्टर थेट २०० फूट खोल दरीत कोसळला. ट्रॅक्टर दरीत कोसळल्याचा मोठा आवाज ऐकून वस्तीतील ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळाकडे धाव घेतली.…
महाराष्ट्र संवाद न्यूज – संगमनेर संगमनेरचे प्रांताधिकारी शैलेश हिंगे यांची पदोन्नतीने बदली झाली असून ते आता अहिल्यानगरचे अपर जिल्हाधिकारी असतील. राज्यभरात तीसहून अधिक महसूलच्या अधिकाऱ्यांना शासनाने बढत्या दिल्या असल्याची माहिती समोर येत असून त्यात हिंगे यांचा समावेश आहे. हिंगे यांच्या रिक्त जागेवर अद्याप नवीन नियुक्ती करण्यात आली नसली तरी शासनाकडून बदल्यांचे आदेश अद्यापही सुरू असल्याने लवकरच संगमनेरच्या रिक्त जागेवर प्रांत अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाईल, असे संकेत मिळाले आहे. संगमनेरला येण्यापूर्वी हिंगे वाशीम येथे कार्यरत होते. लोकसभा, विधानसभा निवडणूक हिंगे यांच्या कार्यकाळात शांततेत पार पडली होती. सध्या संगमनेरच्या सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी देखील ते निवडणूक निर्णय अधिकारी…
संगमनेर – प्रतिनिधी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना निवडणुकीत माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची राजकीय खेळी यशस्वी ठरली आहे. सोमवारी ६८ उमेदवारांनी माघार घेतल्याने २१ जागांपैकी २० जागा बिनविरोध झाल्या आहेत. धांदरफळ गटातील एका जागेचा निर्णय बाकी असून, तोही लवकरच होऊन कारखाना निवडणूक पूर्णपणे बिनविरोध होण्याची शक्यता आहे. बुधवारी (दि. ९) अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी १३३ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. सोमवारी (दि. १५) छाननीत २० अर्ज बाद झाले, तर चार उमेदवारांनी माघार घेतली. त्यामुळे २१ जागांसाठी १०९ उमेदवार रिंगणात होते. मात्र, बाळासाहेब थोरात यांच्या आवाहनाला मान देत अनेक उमेदवारांनी अर्ज माघार घेतल्याने २० जागा बिनविरोध झाल्या.…
महाराष्ट्र संवाद न्यूज – मुंबई पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे झालेल्या तनिषा भिसे यांच्या मृत्यूप्रकरणी राज्य सरकारने कठोर पाऊल उचलले आहे. या प्रकरणी डॉ. सुश्रुत घैसास यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे निर्देश पोलीस आयुक्तांना देण्यात आले आहेत, तर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला १० लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. यासोबतच, धर्मादाय रुग्णालयांमध्ये रुग्णांकडून अनामत रक्कम घेण्यास मनाई करणारी कायदेशीर तरतूद करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारने तयार केला आहे. उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, भिसे प्रकरणानंतर धर्मादाय रुग्णालयांसाठीच्या नियमावलीत मोठे बदल प्रस्तावित करण्यात आले असून, याबाबतचे आदेश लवकरच जारी केले जातील. नवीन नियमांनुसार, धर्मादाय म्हणून नोंदणीकृत असलेल्या सर्व रुग्णालयांमधील रुग्णसेवा पूर्णपणे ऑनलाईन करावी लागेल. त्याचे…
अहिल्यानगर, दि. २१ – राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियानात अहिल्यानगर जिल्ह्याने उत्कृष्ट कामगिरी करत तब्बल तीन पुरस्कार पटकावले आहेत. मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात आयोजित शानदार सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. तत्कालीन अतिरिक्त जिल्हाधिकारी सुहास मापारी, देवळाली प्रवरा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विकास नवले आणि राहाता येथील मंडळ अधिकारी मोहसीन शेख यांचा या पुरस्काराने गौरव करण्यात आला. याप्रसंगी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मंत्री मंगल प्रभात लोढा आणि राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांची प्रमुख उपस्थिती होती. जिल्ह्यातील अवैध गौण खनिज वाहतुकीवर अंकुश लावण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रभावी वापर करण्याच्या नाविन्यपूर्ण उपक्रमाची राज्य स्तरावर दखल घेण्यात आली. या उत्कृष्ट…
अहिल्यानगर पोलिस कारवाईतून सुटका व्हावी आणि अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी चक्क दोन लाख रुपये उकळणाऱ्या एका शिक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. विजय बाबासाहेब गर्जे (वय ४८, रा. पाथर्डी) असे या आरोपी शिक्षकाचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. ४ एप्रिल रोजी पाथर्डी पोलिसांनी एका तक्रारदाराच्या टपरी व्यवसायासाठी लागणारी सुगंधी तंबाखू, सुपारी आणि मावा त्याच्या घराशेजारील पत्र्याच्या शेडमधून जप्त केला होता. ही कारवाई सुरू असतानाच तक्रारदाराला एका ओळखीच्या व्यक्तीने विजय गर्जे या शिक्षकाला भेटण्याचा सल्ला दिला. या भेटीत गर्जेने तक्रारदाराला सांगितले की, त्याच्या भावावर मोठ्या कलमांनुसार गुन्हा दाखल होऊ नये आणि तपासात मदत मिळावी यासाठी सहाय्यक पोलिस निरीक्षकांना…
संगमनेरात तरुणावर प्राणघातक हल्ला; डोक्यात दगड मारून जीवे मारण्याचा प्रयत्न, परिसरात दहशतीचे वातावरण
महाराष्ट्र संवाद न्यूज – संगमनेर शहरातील अकोले नाका परिसरात शनिवारी (दि. १९) सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास एका तरुणावर चार जणांच्या टोळक्याने प्राणघातक हल्ला चढवला. नीलेश सोमनाथ मंडलिक (वय ३६, रा. ढोलेवाडी) असे गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. हल्लेखोरांनी त्यांना बेदम मारहाण करत डोक्यात दगड मारून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याप्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात अनिकेत मंडलिक (रा. माळीवाडा, संगमनेर), साई सूर्यवंशी, अक्षय चव्हाण (दोघेही रा. अकोले नाका) आणि एका अनोळखी व्यक्ती अशा चार जणांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सचिन भाऊसाहेब…
