Author: अनंत पांगारकर

शनिवार १३ जुलै  खरेदी केलेल्या शेत जमिनीची रजिस्ट्री करण्याकरिता लाचेची मागणी करणाऱ्या दुय्यम निबंधकासह दोन मुद्रांक विक्रेत्यांवर लाच घेतल्याप्रकरणी लाच लुचपतच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या कारवाईनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बालाजी शंकरराव उत्तरवार (दुय्यम निबंधक, उपनिबंधक कार्यालय हदगाव), मुद्रांक विक्रेता खासगी इसम समीउल्ला अजमतउल्ला शेख उर्फ शमी व शेख अबूबकर करीम सिद्दिकी उर्फ बाबू अशी गुन्हा दाखल झालेल्या लाचखोर आरोपींची नावे असून नांदेडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली आहे. लाच लुचपत विभागाकडे तक्रार करणाऱ्या तक्रारदाराने मौजे हदगाव (नांदेड) येथे २० गुंठे शेत जमीन खरेदी केली होती. या शेत जमिनीची नोंदणी करण्यासाठी तक्रारदाराने सोमवारी (ता. ८ जुलै) हदगाव येथील उपनिबंधक कार्यालयात…

Read More

स्थानिक गुन्हे शाखेचे पीआय, पीएसआय आणि कर्मचारी हप्तेखोर आर्थिक लोभापाई दोन आस्थापनांचा कारभार एकाच निरीक्षकाकडे हप्ते गोळा करणाऱ्या कर्मचारी, अधिकाऱ्यांची बघा नावानिशी यादी साई मंदिरच्या सुरक्षा विभागात नेमणूक असलेला रवींद्र कर्डिले मास्टरमाईंड आठवडाभरापूर्वी महाराष्ट्र संवाद न्यूजने टाकला होता प्रकाश! शनिवार १३ जुलै गेल्या काही दिवसापासून संपूर्ण नगर जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरलेली आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांचा वरदहस्त लाभलेली अहमदनगरची स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी) नगरचे खासदार निलेश लंके यांच्या रडारवर आली असून या गुन्हे शाखेचा कारभाराचा भांडाफोड करत लंके यांनी थेट मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते, पोलीस महासंचालक, पोलीस महानिरीक्षक यांच्याकडे लेखी तक्रार केली असल्याने नगर जिल्ह्याच्या पोलीस दलात मोठी खळबळ उडाली…

Read More

विशेष प्रतिनिधी | मुंबई  पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनी महाराष्ट्र विधानसभेच्या येऊ घातलेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या प्रचारात सहभाग घेणार असल्याचे संकेत दिले आहेत. बॅनर्जी मुंबई दौऱ्यावर आहेत. त्या मुकेश अंबानींच्या पुत्राच्या विवाह सोहळ्यासाठी आल्या होत्या. त्यांनी आघाडीचे नेते उद्धव ठाकरे तसेच शरद पवार यांची भेट घेऊन महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीचा आढावा घेतला. लोकसभा निवडणुकीनंतर देशातील वातावरण बदलले असून विरोधी पक्षातील सदस्यांना महत्त्व प्राप्त झाले आहे. इंडिया आघाडीबरोबर असलेल्या आणि भारतीय जनता पक्षाला सातत्यानं टक्कर देणाऱ्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी अनंत अंबानी यांच्या विवाह सोहळ्यानिमित्तान मुंबईत आल्या आहेत. विवाह सोहळ्याचं निमित्त असलं तरी या दौऱ्यात राजकीय…

Read More

विशेष प्रतिनिधी | मुंबई  राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचं शुक्रवारी सूप वाजलं. येत्या तीन महिन्यांत विधानसभा निवडणूक होणार असल्याने विरोधकांनी यंदाच्या विधिमंडळ पावसाळी अधिवेशनात सत्ताधाऱ्यांना घेरण्याचा प्रयत्न केला. काल शेवटच्या दिवशी विधान परिषदेत २६० अनव्ये प्रस्ताव आणि अंतिम आठवडा प्रस्तावावर चर्चा करण्यात आली. यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी महाराष्ट्रातील गुन्हेगारीवरून सरकारवर परखड टीका केली. अंबादास दानवे म्हणाले, देशात एकूण ३५ लाख ६१ हजार ३७९ गुन्हे दाखल झाले असून त्यातील ३ लाख ७४ हजार ३८ गुन्हे एकट्या महाराष्ट्रात नोंदविले गेले आहेत. हा दर १०.२ टक्के इतका असून महाराष्ट्र देशात गुन्हेगारीत क्रमांक दोनवर आहे. देशात स्त्री अत्याचाराचे ४ लाख ४५ हजार…

Read More

मुंबई | प्रवीण पुरो विधान परिषदेच्या ११ जागांसाठी आज मतदान पार पडलं. या निवडणुकीत १२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यानने चुरस वाढली होती. महायुती आणि महाविकास आघाडीने आपापल्या उमेदवाराच्या विजयासाठी जय्यत तयारी केली होती. अंतिम निकालात महायुतीचे ९ उमेदवार विजयी झाले असून महाविकास आघाडीत कॉंग्रेसच्या प्रज्ञा सातव, शिवसेनेचे मिलिंद नार्वेकर यांचा विजय झाला आहे. विजयी उमेदवारात पंकजा मुंडे, योगेश टिळेकर, अमित गोरखे, परिणय फुके, प्रज्ञा सातव, राजेश विटेकर, शिवाजीराव गर्जे , भावना गवळी, कृपाल तुमाने आणि सदाभाऊ खोत यांचा समावेश आहे. तर अकराव्या जागेसाठी मिलिंद नार्वेकर आणि जयंत पाटील यांच्यात चुरस झाली. यात शेवटच्या फेरीत जयंत पाटील पराभूत झाले. ठाकरे गटाकडून…

Read More

शुक्रवार १२ जुलै सुसंस्कृत संगमनेरला अवैध धंद्यांचा लागलेला कलंक पुसण्यात स्थानिक पोलिसांपासून जिल्हा पोलीस दलापर्यंतची पोलीस यंत्रणा अयशस्वी ठरली आहे. शहरातील शांततामय वातावरणाला गालबोट लागू शकेल अशी गंभीर घटना घडण्याची पोलीस वाट बघत आहे की त्यांना अवैध धंदे सुरू असलेल्या शक्तिमान टॉवरचा पत्ता सापडत नाही, असा संशय निर्माण झाला आहे. चार दिवसांपूर्वी ‘महाराष्ट्र संवाद न्यूज’ने संगमनेर शहराच्या मध्यवस्तीतील महापुरुषांच्या स्मारकाजवळ सुरू असलेल्या अवैध धंद्यांवर प्रकाश टाकत हॉटस्पॉट बनलेल्या या ठिकाणी गंभीर घटना घडण्याची चिन्हे असल्याचा संशय वर्तविला होता. त्यानंतर पोलिसांकडून या अवैध व्यवसायांवर कारवाई होईल, अशी अपेक्षा फोल ठरल्याने पोलिस आणि अवैध व्यावसायिकांमधील मधुर अर्थपूर्ण संबंधांच्या चर्चांना अप्रत्यक्षरीत्या दुजोरा मिळू…

Read More

शुक्रवार १२ जुलै  केंद्र सरकारने २५ जून हा दिवस संविधान हत्या दिन म्हणून घोषित केला आहे. केंद्र सरकारने यासंदर्भात अधिसूचनाही जारी केली आहे. त्यात केंद्राने म्हटले आहे की, २५ जून १९७५ रोजी देशात आणीबाणी लागू करण्यात आली होती, त्यामुळे आता भारत सरकारने दरवर्षी २५ जून हा दिवस ‘संविधान हत्या दिन’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. हा दिवस १९७५ च्या आणीबाणीच्या अमानुष वेदना सहन करणाऱ्या सर्वांच्या अतुलनीय योगदानाचे स्मरण करेल, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ट्विट केले आहे. https://x.com/AmitShah/status/1811710314901307552?s=19 आपल्या ट्विटमध्ये शहा यांनी म्हटले आहे की, ‘२५ जून १९७५ रोजी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आपली हुकूमशाही मानसिकता दाखवत…

Read More

शुक्रवार १२ जुलै  अहमदनगर जिल्हा परिषदेने तिघा बांधकाम ठेकेदारांचा परवाना एक वर्षासाठी निलंबित केला असून त्यांची सुरक्षा ठेवदेखील जप्त करण्यात आली तर बारा ठेकेदारांवर दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला आहे. विकास कामे प्रलंबित ठेवल्याच्या कारणावरून ही कारवाई केली असल्याचे सांगितले जाते. बांधकाम ठेकेदार आणि अधिकाऱ्यांचे संगणमत असल्याने विविध योजनांच्या कामात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार होत असतो. मात्र प्रथमत:च जिल्हा परिषद ॲक्शन मोडवर आली असून कारवाई सत्र सुरू केले आहे. २०२३-२०२४ या आर्थिक वर्षात विकास कामे प्रलंबित ठेवणाऱ्या ठेकेदारांवर ही कारवाई करण्यात आली आहे. सार्वजनिक बांधकामच्या उत्तर विभागामार्फत संगमनेर व नेवासा तालुक्यातील बारा प्रलंबित कामांसाठी तीन ठेकेदारांवर ही कारवाई करण्यात आली आहे. या…

Read More

गुरुवार ११ जुलै  गुजराती भारतीय नागरिकत्वाचा त्याग करून परदेशात स्थायिक होत आहेत. पासपोर्ट जमा करणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. भारतीय तरुणांच्या या पावलामागे अनेक आश्चर्यकारक कारणे समोर आली आहेत. भारतीय नागरिकत्व सोडणाऱ्यांची संख्या एका वर्षात दुप्पट झाली आहे… भारतीय पासपोर्ट सोडण्याचा गुजरातींचा कल वाढत आहे. २०२१ पासून आतापर्यंत ११८७ गुजरातींनी भारतीय नागरिकत्वाचा त्याग केला आहे आणि ते इतर देशांमध्ये स्थायिक झाले आहेत. कॅनडा गुजरातींची पहिली पसंती ठरत आहे. अशी अनेक प्रकरणे आहेत जी कॅनडाकडे गुजरातींचा कल दर्शवतात. कॅनडामध्ये शिक्षणासाठी गेलेले अनेक गुजराती कॅनडामध्ये स्थायिक झाले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, गुजरातचे तरुण कॅनडामध्ये शिक्षणासाठी जात आहेत. शिक्षण पूर्ण केल्यानंतर ते आपलं करिअर घडवण्यात…

Read More

गुरुवार ११ जुलै  काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते तथा माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या पाठपुराव्यातून संगमनेर तालुक्याच्या ग्रामीण भागातील सहा रस्त्यांच्या मजबुतीकरण व डांबरीकरण कामासाठी १७ कोटी ५८ लाख ९१ हजार रुपये निधी मंजूर झाला असल्याची माहिती थोरात कारखान्याचे संचालक इंद्रजीत थोरात यांनी दिली. काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुक्यातील प्रत्येक गावच्या विकासासाठी सातत्याने विविध विकासाच्या योजना राबवल्या जात आहेत. तालुका विस्ताराने मोठा असूनही प्रत्येक गावात व वाडी वस्तीवर विविध शासकीय योजनाच्या माध्यमातून रस्ते, आरोग्य, पाणी यांसह नागरिकांना मूलभूत सुख सुविधा निर्माण करून दिल्या आहेत. यामुळे संगमनेर तालुका हा विकासातून वैभवाकडे वाटचाल करत आहे. या रस्त्यांचा…

Read More