Author: अनंत पांगारकर
मंगळवार दि. २ एप्रिल संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दैनंदिन भाजीपाला लिलावासोबत टोमॅटोचे देखील सोमवारपासून (१ एप्रिल) लिलाव सुरू करण्यात आल्याची माहिती बाजार समितीचे सभापती शंकरराव खेमनर व सचिव सतीश गुंजाळ यांनी दिली आहे. पहिल्याच दिवशी या लिलावास शेतमाल निर्मिती करणाऱ्या शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद लाभला आहे. लिलावामुळे व्यापाऱ्यांमध्ये शेतीमाल खरेदी करण्यासाठी स्पर्धात्मक वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे शेतकऱ्याच्या मालाला देखील चांगला भाव मिळत आहे. सकाळी आठ ते दुपारी एक वाजेपर्यंत कृषी उत्पन्न बाजार समितीचे आवारामध्ये टोमॅटोचे लिलाव सुरू आहेत. प्रतवारी करून आपला शेतमाल विक्रीसाठी आणण्याचे आवाहन केल्यानंतर त्याला चांगला प्रतिसाद लाभला आहे. शेतकऱ्यांनी माल विक्री केल्यानंतर बाजार समितीकडून तात्काळ पक्की…
सोमवार दि. १ एप्रिल निवडणुकीचा रणसंग्राम सुरू झाला असून महायुती व महाविकास आघाडीसह अन्य पक्षीयांच्यावतीने उमेदवारांची यादी जाहीर जाहीर केली जात असली तरी देखील महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यातील काही जागांचा तिढा अद्यापही काही केल्या संपताना दिसत नाही. महायुतीच ९ तर मविआच १३ जागांवर अडलं आहे. लोकसभा निवडणुकीसाठी ४८ जागांवर उमेदवार देण्याचे प्रक्रिया सर्वच पक्षांकडून सुरू आहे. यासाठी जागा वाटपाचा फॉर्म्युलाही निश्चित असला तरी काही जागांवर मात्र अद्यापही उमेदवार निश्चित होत नाहीये. त्यासाठी बैठकांचे सत्र सुरूच असून महायुतीचे अजूनही ९ जागांवरचे उमेदवार ठरलेले नाहीत. तर महाविकास आघाडीचे १३ जागांवरचे उमेदवार निश्चित होताना दिसत नाहीत. विशेष म्हणजे महाविकास आघाडी सोबत युतीची…
रविवार दि. ३१ मार्च राज्यातील कोणत्याही ठिकाणच्या कोणत्याही प्रकारच्या मालमत्तेची किमान किंमत राज्य शासनाद्वारे ठरविली जाते, याला रेडी रेकनर दर म्हणतात. उद्या १ एप्रिल २०२४ पासून सुरू होणाऱ्या नव्या आर्थिक वर्षात या रेडी रेकनरच्या दरात कोणताही बदल न करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यामुळे मुद्रांक शुल्कात कोणताही बदल होणार नाही. सरकारकडून दरवर्षी त्या-त्या भागातील म्हणजेच औद्योगिक, शेती, रहिवासी भागातील संबंधित बाबीच्या संशोधनावरून राज्य शासन हे दर निश्चित करत असते. गेल्या तीन वर्षात या दरात कोणताही बदल करण्यात न आल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. राज्य शासनाकडून या दरात कोणती वाढ करण्यात न आल्याने सर्वसामान्य माणसाचे घराचे स्वप्न पूर्ण होण्यास मदत…
रविवार दि. ३१ मार्च नगरमधील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार निलेश लंके यांनी उमेदवारी मिळताच मध्यरात्री संगमनेर गाठीत काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांची भेट घेतली. दीड तासाच्या या भेटीत लंके यांनी थोरात यांच्याशी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा केली. ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्याकडून विजयाचा कानमंत्र घेत ते मतदार संघात परतले. राज्यातील महत्त्वाच्या लढतीमध्ये अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदार संघाचा समावेश आहे. महाविकास आघाडीच्या जागा वाटपात ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाला गेली आहे. शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटातील आमदार निलेश लंके यांना येथून उमेदवारी दिली. त्यासाठी दोनच दिवसांपूर्वी डंके यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला होता. निलेश…
रविवार दि. ३१ मार्च विद्यार्थ्यांच्या जीवनात परिवर्तनासाठी शिक्षण दिशादर्शक ठरते. त्यामुळे विद्यार्थ्यांना घडविणाऱ्या शाळा भौतिक व शैक्षणिकदृष्ट्या विकसित व्हायला हव्या, त्याकरिता शाळेला गावाचा आधार आणि गावाला शाळेचा अभिमान वाटला पाहिजे. धांदरफळच्या देशमुख मळा शाळेने उपक्रमशील शिक्षकांच्या उपक्रमांमधून आणि लोकसहभागातून केलेली प्रगती ही शिक्षण क्षेत्रात राज्यासाठी दिशादर्शक ठरेल, असे प्रतिपादन संगमनेर डाएटचे अधिव्याख्याता अरुण भांगरे यांनी केले. “मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा” या उपक्रमात द्वितीय क्रमांकाद्वारे दोन लाखाचे बक्षीस पटकावणाऱ्या जिल्हा परिषदेच्या देशमुख मळा येथील शाळेत उपक्रमशील शिक्षिका वृषाली कडलग यांनी स्वखर्चातून विद्यार्थ्यांना ३२ डिजिटल पाट्या वितरित केल्या, त्याप्रसंगी ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. डिजिटल पाट्या मिळाल्याने विद्यार्थ्यांचे चेहरे हरखून…
रविवार दि. ३१ मार्च ईडी, सीबीआय, आयकर विभागाचा ससेमिरा मागे लागलेल्या नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला किंवा एनडीएत सहभागी झाले की त्यांच्या मागच्या सगळ्या चौकशा बंद होतात. हे नेते भाजपच्या ‘वाशिंग मशीन’मधून स्वच्छ होऊन निघतात. महाराष्ट्रासह देशभरात भाजपचे हे ‘वाशिंग मशीन’ जोरात सुरू असल्याचे दिसते. एकेकाळी ज्या नेत्यांवर भाजपने कोट्यवधींच्या घोटाळ्याचे आरोप केले आता तेच नेते त्यांच्यासोबत सत्तेत मांडीला मांडी लावून बसत आहेत. यावरून विरोधी पक्ष सातत्याने भाजपवर हल्ला चढवत आहेत. विरोधकांकडून होणाऱ्या या आरोपांवर आता केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी एका कार्यक्रमात उत्तर दिले. मात्र त्यांच्या उत्तरामुळे पक्षाची गोची झाली आहे. ‘निवडणुकीच्या तोंडावर दोन मुख्यमंत्र्यांना तुरुंगात टाकण्यात आले. विरोधी पक्षांच्या…
असंख्य अटी घातल्या, ज्यांच्याबरोबर आघाडी करायची त्यांना शहाणपणा शिकवला, त्यांच्यावर टीका-टिपण्ण्या केल्या, दुषणांची बरसात केली आणि अखेर आघाडीला दूर करत वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आपली मूळ भूमिका पुन्हा वठवली. आंबेडकर हे भाजपचे प्यादे आहेत, असा जो आरोप व्हायचा त्याला पुरक अशी भूमिका घेत भाजप विरोधकांची मतं फोडण्याचं पाप आंबेडकर हे करत आहेत. भाजप विरोधात आघाडी करायची म्हणून ज्या आघाडीला आंबेडकरांनी झुलवत ठेवलं. त्याच आघाडीतून बाहेर पडत आंबेडकर यांनी सार्या महाराष्ट्राचं दुषण घेतलं आहे. आघाडीची शक्यता वर्तवायची आणि हव्या तशा अटी टाकायचा हा खेळ आंबेडकरांनाच जमू शकतो, हे पुन्हा एकदा सिध्द झालं. देशात निर्माण झालेल्या विचित्र राजकीय परिस्थितीपासून महाराष्ट्राला वाचवण्याची…
शनिवार दि. ३० मार्च राज्यातील १८ लोकांना निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणूक लढविण्यास अपात्र ठरविले आहे. त्यामुळे या १८ जणांना राज्यात कोठेही लोकसभेची निवडणूक लढवता येणार नाही. देशात लोकसभा निवडणुकीचे वारं वाहत असताना आयोगाने निवडणुकीतील खर्चाचे तपशील सादर न केल्यामुळे निवडणूक लढविण्यास अपात्र ठरविलेल्या लोकांची यादी जाहीर केली आहे. त्यामुळे या लोकांना लोकसभा निवडणूक लढविता येणार नाही. अपात्र ठरवण्यात आलेल्या उमेदवारांची यादी… मोहम्मद मेहमूद सय्यद शाह : मुंबई उत्तर- मध्य विधानसभा मतदारसंघ गायकवाड दिनकर धारोजी : जिंतूर विधानसभा मतदारसंघ परभणी अमर शालिकराम पांढरे : आमगाव विधानसभा मतदारसंघ गोंदिया उमेशकुमार मुलचंद सरोटे : आमगाव विधानसभा मतदारसंघ गोंदिया दीपक चंद्रभान गाडे : अंबरनाथ…
शनिवार दि.३० मार्च शिर्डी लोकसभा मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडीने आजी-माजी खासदारांना निवडणुकीच्या मैदानात उतरवले आहे. त्यामुळे २०१४ च्या लोकसभा निवडणुकीप्रमाणे या आजी-माजी खासदारात लढत निश्चित झाले असतानाच आता वंचितच्या रूपाने तिसरा उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची चिन्हे निर्माण झाली आहे. राज्य महिला आयोगाच्या सदस्य व काँग्रेस नेत्या उत्कर्षा रूपवते यांनी मुंबईत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांची भेट घेतल्याने त्यांच्या उमेदवारीच्या चर्चा मतदारसंघात सुरू झाल्या आहे. २०२४ च्या निवडणुकीत बौद्ध उमेदवार हवा असा मतप्रवाह गेल्या काही दिवसापासून सुरू होता. त्यादृष्टीने रूपवते यांनी या मतदारसंघात भेटीगाठी घेत मोर्चेबांधणी करण्याचा प्रयत्न देखील केला. महाविकास आघाडीतील काँग्रेसचे मातब्बर नेते माजी मंत्री आमदार…
शनिवार दि. ३० मार्च राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाने शनिवारी लोकसभेसाठीची आपली पहिली यादी जाहीर केली. गेल्या काही दिवसांपासून राज्यात चर्चेचा विषय ठरलेल्या नगर दक्षिणमधून शुक्रवारी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिलेल्या निलेश लंके या राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या शिलेदाराला शरद पवारांनी संधी दिली आहे. राज्यातील महत्त्वपूर्ण लढतीमध्ये या नगर दक्षिणच्या लढतीचा समावेश आहे. पहिल्याच यादीत लंके यांचे नाव जाहीर झाल्याने नगरचा सामना देखील आता ठरला आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेत लोकसभेसाठीची पहिली यादी जाहीर केली. अहमदनगरमधून निलेश लंके, बारामतीतून विद्यमान खासदार सुप्रिया सुळे, शिरूरमधून खासदार डॉ. अमोल कोल्हे, वर्ध्यातून अमर काळे तर दिंडोरीतून भास्कर भगरे…
