Author: अनंत पांगारकर
महाराष्ट्र संवाद न्यूज प्रवीण पुरो @ 9869991868 प्रचंड तटबंदी असलेल्या लोकसभेच्या सभागृहात दोन तरुणांनी अनाहुत केलेल्या प्रवेशाने सारा देश अचंबित झाला. असुक्षित म्हणून ज्या जुन्या संसद भवनावर बोट दाखवणार्या सत्ताधार्यांनी उभ्या केलेल्या नव्या संसद भवनाचा तट ओलांडून थेट संसदेच्या सभागृहात उड्या मारत हल्ला करता येऊ शकतो, हे या तरुणांनी सार्या देशाला आणि जगाला दाखवून दिलं. नवं संसद भवन आणि त्याला असलेली सुरक्षा किती तकलादू आणि कामचलाऊ आहे, याचं प्रत्यंतर या घटनेने देशाला दिलं आहे. आता या तरुणांचे पाठीराखे कोण याचा शोध घेऊन त्या घटनेशी काँग्रेस वा इतर विरोधकांचा संबंध जोडण्याचा प्रयत्न होईल. लातूर आणि चेन्नईच्या नावामुळे त्या चर्चेला ऊत आला…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – एरव्ही त्याच्या दहशती आणि जीवघेण्या कृत्याबद्दल सर्वच ऐकून होते. शुक्रवारच्या सकाळीच त्याने नासिक-पुणे महामार्ग ओलांडत मालपाणी लॉन्समध्ये प्रवेश केला. थोडा वेळ तेथे रेंगाळल्यानंतर त्याने भिंतीवरून उडी घेत थेट मागच्या बाजूला असलेल्या पद्मनगर तेथून जवळच्याच आदर्श कॉलनीमध्ये प्रवेश केला. थांबण्यासाठी तेथे त्याला पत्र्याचे शेड दिसली आणि त्याने तेथेच काही काळ मुक्काम ठोकला. परिसरासह आसपास असलेल्या नागरिकांचे भीतीने गाळण उडाली आणि बघता बघता ही वार्ता शहरात पसरली. शुक्रवारी सकाळी पावणे सातच्या सुमारास नाशिक पुणे हायवेलगत असलेल्या मालपाणी लॉन्स मध्ये एका बिबट्याने प्रवेश केला होता. रस्त्याने जाणाऱ्या एका व्यक्तीने हा प्रकार पाहिल्यानंतर त्याने लगेचच तेथील कर्मचाऱ्यांना याची माहिती…
महाराष्ट्र संवाद न्यूज धुळे – शालेय विद्यार्थी सनी साळवे यांच्या खून प्रकरणात धुळे न्यायालयाने चार आरोपींना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली तर उर्वरित तिघांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. विशेष म्हणजे जातीय अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार झालेली ही जन्मठेपेची राज्यातील पहिलीच ऐतिहासिक घटना असल्याचे सांगण्यात येत आहे. धुळ्यातील देवपूर भागात २०१८ मध्ये झालेल्या सशस्त्र हल्ल्यात सनी साळवे याचा खून करण्यात आला होता. देवपूरमधील नरसिंह बियर बार जवळ गाडीला कट मारल्याच्या कारणातून झालेल्या वादात सनी साळवे, सुमेध सूर्यवंशी आणि सागर साळवे यांना बेदम मारहाण करण्यात आली होती. त्यानंतर जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आरोपींनी रुग्णालयातही जाऊन जखमींना धमकावण्याचा प्रयत्न केला. या मारहाणीत…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – नगरपरिषद प्रशासनाने शहरातील घरांच्या संकलित करामध्ये दहा टक्के दरवाढ प्रस्तावित केली आहे. ही दरवाढ अन्यायकारक असून महागाई, बेरोजगारी व व्यापार मंदीच्या काळात नागरिकांना परवडणारी नाही. त्यामुळे प्रस्तावित करण्यात आलेली ही दरवाढ तातडीने रद्द करावी, अशी मागणी काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात व नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांनी सरकारकडे केली. यामुळे वाढीव दरवाढीस स्थगिती मिळण्याची चिन्हे असून यामुळे शहरवासीयांना दिलासा मिळणार आहे. या संदर्भात थोरात म्हणाले, संगमनेर नगर परिषद हद्दीत संकलित कर आकारणीबाबत चतुर्थ वार्षिक रिविजन पूर्ण झाली असून सन २०२३-२४ या वर्षासाठी प्राथमिक कर निर्धारण करण्यात आले आहेत. यात शहरातील घरांच्या संकलित करात…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – शालेय जिल्हास्तरीय रस्सीखेच क्रीडा स्पर्धेत ध्रुव ग्लोबल स्कूल अव्वल ठरली. जिल्ह्यातील विविध शाळांच्या ३७ संघाचा समावेश असलेल्या या स्पर्धेत ध्रुवच्या १४, १७ व १९ वर्षांखालील रस्सीखेच खेळाडूंनी २७ सुवर्णसह १९ कांस्यपदकांची कमाई केली. स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणार्या ध्रुवच्या खेळाडूंची विभागीय रस्सीखेच स्पर्धेसाठी निवड झाली आहे. अहमदनगर जिल्हा क्रीडा कार्यालयाच्यावतीने संगमनेरातील ध्रुव ग्लोबल स्कूलच्या प्रांगणात या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. चौदा वर्षांखालील मुलींच्या गटात खेळतांना ध्रुव ग्लोबल स्कूलच्या पूर्वा पवार, आर्या पाटील, श्रद्धा साठे, ज्ञानेश्वर देवकर, पालवी चुत्तर, कादंबरी, तन्वी ठोंबरे, वैष्णवी तनपुरे व स्वरा वलवे यांनी सुवर्ण पदके पटकाविली. तर, याच वयोगटातील मुलांमध्ये श्रेयस…
महाराष्ट्र संवाद न्यूज साखर कारखानदारीसाठी दिशादर्शक ठरलेल्या सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्यावतीने २०२४-२०२५ या गळीत हंगामात ऊस लागवड, खोडवा, निडवा पीक घेणाऱ्या ऊस उत्पादकांसाठी अमृत शक्ती दाणेदार सेंद्रिय खत ५० टक्के अनुदानावर सुरू करण्यात आल्याची माहिती कारखाना प्रशासनाकडून देण्यात आली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली वाटचाल करणाऱ्या सहकार महर्षी थोरात सहकारी साखर कारखान्याने उच्चांकी भावासोबतच ऊस उत्पादक शेतकरी, सभासद व कामगारांचे हित जोपासले आहे. कारखाना कार्यक्षेत्रात वाढीसाठी कारखान्याच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविले जात आहे. याच पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. शेतीमालासाठी सातत्याने रासायनिक खतांचा वापर होत असल्याने जमिनीची उत्पादक क्षमता देखील कमी होत आहे.…
महाराष्ट्र संवाद न्यूज प्रिय ददू, अनेक आशीर्वाद ! या वर्षी तू आमदार झालास तेव्हापासून सतत कामानिमित्त दौऱ्यांवर किंवा फिरतीवर असतोस. या आधी तुला कधी पत्र लिहावं असं वाटलं नाही. पण नागपूरच्या हिवाळी अधिवेशनासाठी यंदा तू पहिल्यांदाच आमदार म्हणून गेलास आणि मनात अनेक आठवणी जाग्या झाल्या. विधान परिषदेतली तुझी कामगिरी आम्ही बघत आहोत. लोकांच्या मनाला भिडणारे अनेक प्रश्न तू सभागृहात मांडत आहेस. तुझ्या अभ्यासपूर्ण मांडणीचं कौतुक वाटतं. पण आजचं हे पत्र त्याबद्दल नाही. तू नागपूरला गेल्यापासून एक प्रसंग मला राहून राहून आठवतोय. कदाचित तुला आज त्याची आठवण नसेल. तू फक्त ६-७ वर्षांचा होतास. खूप वर्षं लोटली त्या गोष्टीला. ९० च्या विधानसभा…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे येथे अज्ञात चोरट्यांनी मंगळवारी मध्यरात्री इंडियन ओव्हरसीज बँकेचे एटीएम फोडून सुमारे पाच लाख रुपयांची रोकड लांबविली असल्याची माहिती समोर येत आहे. मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी गॅस कटरच्या सहाय्याने हे एटीएम मशीन फोडले आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच संगमनेर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस पथक व उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे घटनास्थळी दाखल झाले होते. प्राथमिक माहितीनुसार या एटीएम मशीन मधून अज्ञात चोरट्यांनी चार लाख 84 हजार रुपयांची रोकड लंपास केली आहे. आरोपींच्या शोधासाठी पोलीस पथकाने नगरहून फिंगरप्रिंट व श्वानपथकाला घटनास्थळी पाचारण केले आहे. संबंधित बँकेचे अधिकारी घटनास्थळी आल्यानंतर या संदर्भात अधिक माहिती समोर येणार असून त्यानंतर संगमनेर…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – घारगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत अर्धवट जळालेल्या अवस्थेत सापडलेल्या मृतदेहाचा उलगडा करण्यात पोलीस यशस्वी झाले आहे. अनैतिक संबंधातून हा खून झाल्याचे समोर आले असून पोलिसांनी मृताच्या जावयासह आणखी एकाला अटक केली असल्याची माहिती संगमनेरचे पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी दिली आहे. घारगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत साकुर जवळील घाटामध्ये १६ डिसेंबरला फॉरेस्ट जमिनीत बांधावर एका पुरुषाचे अर्धवट जळालेल्या अवस्थेतील प्रेत आढळून आले होते. त्यावेळी ही व्यक्ती कोण आहे याचा खुलासा झाला नव्हता. हा घातपाताचा प्रकार असल्याचे लक्षात घेत पोलिसांनी त्या दृष्टीने तपास सुरू केला होता. खून झालेल्या व्यक्तीची ओळख पटविण्यापासून खून करणाऱ्यांचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर होते.…
महाराष्ट्र संवाद न्यूज नवी दिल्ली -हिवाळी अधिवेशनादरम्यान लोकसभा आणि राज्यसभेत सुरक्षेच्या मुद्द्यावरून गोंधळ घातल्याच्या कारणावरून तब्बल 78 खासदारांचे निलंबन करण्यात आले. यात लोकसभेतील 33 तर राज्यसभेतील 45 खासदारांचा समावेश आहे. संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा आज (18 डिसेंबर) 11 वा दिवस आहे. लोकसभेत सलग चौथ्या दिवशी सुरक्षेच्या मुद्द्यावरून गदारोळ झाला. सभापती ओम बिर्ला यांनी गोंधळ घालणाऱ्या 33 खासदारांना निलंबित केले. यामध्ये नेते अधीर रंजन चौधरी, काँग्रेसचे 11 खासदार, तृणमूल काँग्रेसचे 9, द्रमुकचे 9 आणि इतर पक्षांच्या 4 खासदारांचा समावेश आहे. यानंतर राज्यसभेतही गदारोळ झाला. त्यामुळे सभापती जगदीप धनखड यांनी 45 विरोधी खासदारांना संपूर्ण अधिवेशनासाठी (22 डिसेंबरपर्यंत) निलंबित केले. यापूर्वी 14 डिसेंबर रोजी…
