Author: अनंत पांगारकर
महाराष्ट्र संवाद न्यूज राहाता – गेली आठ वर्ष प्रवरेने गणेश कारखाना चालवताना, गणेशच्या सभासद, शेतकरी बांधवांना प्रवरेपेक्षा 200 ते 300 रुपये कमी भाव देऊन गणेश परिसरातील शेतकऱ्यांची शेकडो कोटी रुपयांची लूट केली, गणेशच्या तत्कालीन अध्यक्षांनी तेव्हा प्रवराच्या नेतृत्वाला जाब का विचारला नाही? तुमचे तोंड तेव्हा गप्प का होते? असा सवाल करत नऊ वर्ष सभासद, शेतकरी आणि कामगारांची पिळवणूक करणाऱ्यांनी गणेश कारखान्याचा कळवळा असल्याचा खोटा आव आणू नये, असा टोला गणेश साखर कारखान्याचे चेअरमन सुधीर लहारे यांनी सदाफळ यांना लगावला. गणेशचे अध्यक्ष लहारे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, गणेश कारखान्यासमोर दररोज अडचणींचा डोंगर उभा केला जात आहे, ज्येष्ठ नेते…
रविवार विशेष लेख @ प्रवीण पुरो महाराष्ट्र संवाद न्यूज भारतात कोणताही नवा उद्योग सुरू करायचा असल्यास पूर्वी उद्योगपतींकडून सर्वाधिक पसंती ही महाराष्ट्राला असायची. गेल्या 35 वर्षांच्या काळात महाराष्ट्राने उद्योग क्षेत्रात घेतलेली उडी, यासाठी निर्माण केलेल्या सुविधा आणि त्याकरता आकारण्यात आलेले करांचे दर याची उत्तम मांडणी या आधारे महाराष्ट्र हे उद्योगाच्या क्षेत्रातील देशात पहिल्या क्रमांकाचं राज्य ठरलं. अगदी केंद्रातल्या मोदी सरकारने राज्यातील उद्योगांचा फडशा पाडण्याचं ठरवूनही महाराष्ट्राचं महत्व कमी झालं नाही. याला पूर्वजांच्या कर्तुत्वाची जोड हे एकमेव कारण आहे. सरकार कोणाचंही असलं राज्याने उद्योग प्रगतीचा आलेख कधी खाली आणला नाही. उद्योगांचं क्षेत्र असं फोफावत असताना राज्यातल्या राजकारण्यांनीही सहकाराच्या माध्यमातून महाराष्ट्राचा आलेख…
शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या जागेबाबत पालकमंत्री विखेंच्या उपस्थितीत लवकरच बैठक – अमोल खताळ पाटील
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजाचे स्मारक उभारण्याकरीता पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी निधीची उपलब्धता करून दिल्याने अनेक वर्षाची संगमनेरकर नागरीकांची इच्छा पूर्ण होणार असून स्मारकाच्या उभारणीबाबत पालकमंत्र्यासोबत लवकरच बैठक आयोजित करून जागेबाबतचा निर्णय केला जाणार असल्याची माहीती अमोल खताळ पाटील यांनी दिली. संगमनेर शहरात छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात यावा अशी शिवप्रेमींची इच्छा होती. यासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे पाठपुरावा सुरू होता. या मागणीची पूर्तता करण्यासाठी जिल्हा नियोजन व विकास समितीच्या बैठकीत जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे पूर्णाकृती स्मारक उभारण्याकरीता निधीची उपलब्धता करून देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. यामध्ये प्रामुख्याने लोणी…
महाराष्ट्र संवाद न्यूज जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे जिल्हा पर्यावरण समिती गठीत करण्यात आली असून या समितीच्या अशासकीय सदस्यपदी संगमनेरमधून गणेश बोऱ्हाडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हास्तरावर पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी तसेच पर्यावरण विषयक व्यापक जगजागृतीच्या कार्यक्रमाच्या यशस्वी व सक्षम अंमलबजावणी करण्यासाठी, पर्यावरणाशी संबंधित विभागांशी समन्वय करून स्थानिक पर्यावरणीय समस्या शोधून त्यावरील उपाययोजनांची शिफारस वरिष्ठ पातळीवर करण्यासाठी ही समिती कार्यरत राहणार आहे. समितीचा कालावधी दोन वर्षांसाठी असेल. जिल्ह्यातील शासकीय अधिकाऱ्यांचा समावेश असलेल्या या समितीमध्ये पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्या सेवाभावी संस्थेच्या दोन प्रतिनिधींची निवड केली जाते. जिल्हाधिकाऱ्यांनी या पदावर बोऱ्हाडे यांची एकमेव निवड केली आहे. बोऱ्हाडे यांच्याशिवाय या…
महाराष्ट्र संवाद न्यूज मुंबई : आमदार आदित्य ठाकरे यांच्यासह काही नेत्यांनी १६ नोव्हेंबर रोजी लोअर परळ येथील डेलिसल ब्रिजचं उद्घाटन केलं आहे. कोणत्याही परवानगीशिवाय हा पूल प्रवाशांसाठी खुला केल्याने आदित्य ठाकरे यांच्यासह ठाकरे गटाचे नेते सुनील शिंदे व सचिन अहिर यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मुंबई महापालिकेच्या एका अधिकाऱ्याने एनएम जोशी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केल्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे आदित्य ठाकरेंसह सुनील शिंदे आणि सचिन अहिर यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. ‘एएनआय’ वृत्तसंस्थेनं या संदर्भातील वृत्त दिले आहे. आदित्य ठाकरे, सुनील शिंदे आणि सचिन अहिर यांच्याविरुद्ध एन. एम. जोशी पोलीस ठाण्यात आयपीसीच्या कलम १४३, १४९, ३२६…
महाराष्ट्र संवाद न्यूज छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा बस स्थानक परिसरातच व्हावा, यासाठी आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार सत्यजित तांबे यांनी सातत्याने पाठपुरावा केला आहे. छत्रपतींचा अश्वारूढ पुतळा व भव्य दिव्य शहीद स्मारक बस स्थानक परिसरात करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांनी दिली आहे. नुकत्याच झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत सर्व तालुक्यांमध्ये शिवस्मारक बांधण्यासंदर्भातील घोषणा करण्यात आली आहे. याचे स्वागत करत तांबे यांनी म्हटले आहे की, संगमनेरमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यासाठी जिल्हा नियोजन समितीने एक कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. हे अश्वारूढ पुतळा बस स्थानक परिसरात व्हावा, यासाठी आमदार सत्यजित तांबे यांनी पालकमंत्री…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर शिवसेनेच्यावतीने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शुक्रवारी दिवंगत शिवसेनाप्रमुख हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यात आले. शुक्रवारी सकाळी दहा वाजता संगमनेर बस स्थानकाच्यासमोर ठाकरे यांच्या पवित्र स्मृतींचा जागर करत त्यांच्या प्रतिमेस शिवसेना पदाधिकाऱ्यांसह शिवसैनिकांनी अभिवादन केले. यावेळी दिवंगत ठाकरे यांच्या आठवणींना पदाधिकाऱ्यांनी उजाळा दिला. अभिवादन कार्यक्रमावेळी शिवसेनेचे शहरप्रमुख अमर कतारी, तालुकाप्रमुख भाऊसाहेब हासे, दिव्यांग सहाय्यसेना जिल्हाप्रमुख जालिंदर लहामगे, ग्राहक संरक्षण कक्ष प्रमुख योगेश बिचकर, युवा सेना जिल्हाप्रमुख अमित चव्हाण, शिव आरोग्य सेनेचे शिर्डी लोकसभा प्रमुख अजीज मोमीन (मुस्लिम मावळा), माजी शहर प्रमुख प्रसाद पवार, माजी पंचायत समिती सदस्य अशोक सातपुते, युवा सेना शहर…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेरमधील दुय्यम कारागृहातील गज कापून आश्चर्यकारकरीत्या पलायन करणाऱ्या चौघाही आरोपींना पुन्हा पकडल्यानंतर त्यांना मदत करणारे पोलिसांच्या रडारवर आले आहेत. पळून जाणाऱ्या चारही आपल्या घरी जेवणाचा पाहुणचार देणाऱ्या आणखी एका आरोपीला पोलिसांनी मालेगावमधून अटक केली आहे. यामुळे चार मुख्य आरोपींसह आता अटक केलेल्या आरोपींची संख्या दहावर पोहोचली आहे. पोलीस उपाधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी दिलेल्या माहितीनुसार मोहम्मद रिजवान मोहम्मद अकबर उर्फ रिजवान बॅटरीवाला असे या आरोपीचे नाव असून त्याला गुरुवारी रात्री अटक करण्यात आली. त्याला न्यायालयासमोर हजर केला असता २० नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे. खुनाचा प्रयत्न, खून, पोक्सो, बलात्कार प्रकरणातील न्यायालयीन कोठडीत असलेल्या राहुल देविदास काळे, मच्छिंद्र मनाजी…
महाराष्ट्र संवाद न्यूज अहमदनगर – महसुल विभागातील प्रांत अधिकारी व तहसिलदार यांना नव्याने मंजूर झालेल्या वाहनांचे वितरण राज्याचे महसुल, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर आदी उपस्थित होते. शासनाकडून प्राप्त झालेल्या नऊ वाहनांचे अहमदनगर व कर्जतच्या प्रांत अधिकाऱ्यांसह पाथर्डी, शेवगाव, अहमदनगर, कोपरगाव, संगमनेर, जामखेड व राहुरीच्या तहसीलदारांना पालकमंत्री विखे पाटील यांच्या हस्ते वाहनांच्या चाव्या वितरित करण्यात आल्या.
महाराष्ट्र संवाद न्यूज मुंबई – लोकशाहीर विठ्ठल उमप फाऊंडेशनतर्फे देण्यात येणाऱ्या मानाच्या ‘मृदगंध पुरस्कारा’ची घोषणा करण्यात आले आहे. ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांना यंदाचा ‘मृदगंध जीवनगौरव पुरस्कार’ देण्यात येणार असल्याची घोषणा फाऊंडेशनचे अध्यक्ष नंदेश उमप यांनी केली आहे. सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्तींना ‘मृदगंध पुरस्कार’ देण्यात येतो. यंदाचा १३ वा लोकशाहीर विठ्ठल उमप स्मृती संगीत समारोह व विठ्ठल उमप फाऊंडेशनचा ‘मृदगंध पुरस्कार’ वितरणाचा भव्य सोहळा येत्या २६ नोव्हेंबरला ठाण्यातील काशिनाथ घाणेकर सभागृहात सायंकाळी सहा वाजता होणार आहे. ज्येष्ठ अभिनेते प्रभावळकर यांच्यासह सुदेश भोसले (संगीत विभाग), आतांबर शिरढोणकर (लोकसंगीत), अनुराधा भोसले (सामाजिक कार्य), सुमित राघवन (अभिनय क्षेत्र), चिन्मयी सुमित…
