Author: अनंत पांगारकर

महाराष्ट्र संवाद न्यूज हॉटेल बंद झाल्यानंतर जेवण मागितले, मात्र हॉटेल मालकाने जेवण दिले नाही या कारणावरून हॉटेल मालक, त्यांचा मुलगा, वॉचमन यांना मारहाण करून हॉटेलमध्ये गोंधळ घालत खुर्च्यांची फेकाफेक करीत हॉटेल मालकाची सोन्याची चैन आणि रोख रक्कम लंपास करणाऱ्या चौघा जणांविरोधात संगमनेर शहर पोलीस ठाण्यात जबरी चोरी आणि मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. योगेश सूर्यवंशी, सम्राट हासे, विकास डमाळे डमाळे व दीपक रणसुरे (पूर्ण नाव पत्ते माहित नाही सर्व रा. संगमनेर) अशी चौघा गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. या चौघा जणांविरोधात हॉटेल व्यवसायिक अंकुश सुरेश अभंग यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भारतीय दंड विधान संहिता कलम 394, 452, 427, 323,…

Read More

गोवंश कत्तलीसाठी कत्तलीसाठी वापरली जाणारी पत्र्याचे शेड केली नेस्तनाबूत! महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर –  गेल्या काही दिवसांपासून संगमनेरच्या पोलीस उपाधीक्षकांनी लक्ष घातलेले बेकायदेशीर कत्तलखाने आता चोरी-चुपके सुरू आहेत. अशाच एका कत्तलखान्यावर बुधवारी पोलिस उपाधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांच्या पथकाने कारवाई केली. या कारवाईत गोवंश जनावरांची मोठ्या प्रमाणात कत्तल केल्याचे पोलिसांना आढळून आले. तब्बल तीन हजार किलो गोवंश जनावरांच्या कत्तल केलेल्या मांसासह सुमारे सात लाख रुपयांचा मुद्देमाल या कारवाईत हस्तगत करण्यात आला असून तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच कत्तलीसाठी वापरली जाणारी पत्र्याची शेड प्रथमत:च या कारवाईमध्ये नेस्तनाबूत करण्यात आली आहे. पोलिसांच्या शेकडो कारवायानंतर देखील सुरू संगमनेर मधील कत्तलखाने सुरूच…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज @ अनंत पांगारकर संगमनेर – आज मिळेल, उद्या मिळेल या आशेवर गेल्या दोन वर्षांपासून असलेल्या दूधगंगा नागरी पतसंस्थेतील ठेवीदारांचा संयम अखेर सुटला आहे. घोटाळेबाज भाऊसाहेब कुटे यांच्यासह फरार असलेल्या आरोपींना अटक करावी, ठेवीदारांच्या ठेवी परत मिळाव्यात या मागणीसाठी ठेवीदार-खातेदार शनिवारी (१४ ऑक्टोंबर) प्रांताधिकारी कार्यालयासमोर जन आक्रोश व उपोषण करणार आहे. दुधगंगा नागरी सहकारी पतसंस्थेमध्ये ठेवीदारांच्या तब्बल ८१ कोटी रुपयांच्या रकमेचा राजकीयदृष्ट्या प्रतिष्ठित असलेल्या चेअरमन भाऊसाहेब कुटे याच्यासह त्याच्या नातेवाईक आणि अन्य काहीजणांनी अपहार केला असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात चेअरमन व राजकीय प्रतिष्ठित असलेल्या भाऊसाहेब कुटे याच्यासह तब्बल २१ जणांविरोधात विविध कलमान्वये गुन्हा…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – संगमनेर तालुक्यातील पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या चंदनापुरी गावच्या शिवारात एका बेकायदेशीर डिझेल विक्री केंद्रावर पोलीस उपाधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली छापा सोमवारी टाकण्यात आला. या छाप्यात या डिझेल पंपाच्या माध्यमातून अवैधरित्या, असुरक्षित अवैध चोरटी डिझेल विक्री होत असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघाजणांवर गुन्हा दाखल केला आहे. नासिक-पुणे मार्गावरील चंदनापुरी शिवारात असलेल्या हॉटेल पांडुरंग समोर एका बंद ढाब्याच्या पाठीमागे बेकायदेशीर डिझेल विक्री सुरू असल्याची माहिती संगमनेरचे पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांना मिळाली होती. वाकचौरे यांनी संगमनेर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक देविदास ढुमणे यांना या संदर्भात कारवाईचे आदेश दिले होते. नासिक-पुणे मार्गावरील हिवरगाव पावसा…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या प्रयत्नातून ‘संगमनेर बस स्थानक ते इंजिनिअरिंग कॉलेज’ या हॅप्पी हायवेच्या चौपदरीकरणासह पथदिवे व सुशोभीकरणाचे काम झाले. हॅपी हायवेच्या लोकार्पण सोहळ्यात संपूर्ण शहरवासीय सहभागी झाले. मात्र हा आनंद काही लोकांना पहावत नसल्याने त्यांनी लाईट बंद करण्यासाठी अनेक उद्योग केले. चांगल्या कामात खोडा घालण्याचा प्रयत्न केला. आज तेच लोक लाईट चालू करण्यासाठी निवेदन देतात ही प्रसिद्धीसाठी केवीलवाणी स्टंटबाजी असल्याची टीका शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे यांनी केली आहे. सोमेश्वर दिवटे यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, गणेशोत्सवाच्या काळामध्ये आमदार बाळासाहेब थोरात यांच्या संकल्पनेतून संपूर्ण शहरवासीय एकत्र येत हॅपी हायवेचा मोठा आनंद…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज @ संगमनेर पुणे-नाशिक महामार्गावरील बंद पडलेले पथदिवे तातडीने सुरु करावेत, पथदिवे सुरु करण्यात अडचणी असतील तर या संपूर्ण कामाची चौकशी करुन संबंधित ठेकेदार कारवाई करण्याची मागणी भारतीय जनता पक्षाच्यावतीने प्रांताधिकारी शैलेश हिंगे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. पथदिवे लवकर सुरु न झाल्यास आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे. आठ दिवसांपूर्वी पुणे-नाशिक महामार्गावरील पथदिव्यांचे उद्घाटन करण्यात आले होते. मात्र उद्घाटन झाल्यानंतर एकही दिवस हे पथदिवे सुरु झालेले नाहीत. ही बाब भाजपाच्या शिष्टमंडळाने प्रांताधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली. या महामार्गाच्या सुशोभिकरणासाठी केंद्र सरकारने निधीची उपलब्धतता करुन दिली आहे. पथदिव्यांचे कामही पूर्ण झाल्यामुळे याचे उद्घाटनही करण्यात आले. परंतू उद्घाटन झाल्यानंतर पथदिवे…

Read More

सरकारच खेळतय सामान्यांच्या जीवाशी.. ही तर संपूर्ण मंत्रिमंडळाची जबाबदारी… वर्षभरात असे काय घडले की ज्यामुळे आरोग्य यंत्रणा अपयशी ठरू लागली? महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – राज्यात आरोग्य व्यवस्थेचा पुरता बोजवारा उडाला आहे. सामान्य माणसांच्या जीवाशी खेळ सुरू आहे. नांदेडसह राज्यातील शासकीय रुग्णालयांमध्ये मृत्यूचे तांडव निर्माण झाले, ही परिस्थिती नेमकी का उद्भवली? नेमके दोष कुठे होते? औषध पुरवठ्याची स्थिती काय होती? यंत्रणेमध्ये इतका गलथानपणा का आला? या प्रश्नांची उत्तरे महाराष्ट्राला हवी आहेत. त्यामुळे सरकारने आरोग्याची श्वेतपत्रिका काढून सत्य समोर मांडावे, अशी मागणी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते, माजी मंत्री, आमदार बाळासाहेब थोरात यांनी एका पत्राद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. थोरात यांनी…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – सर्वसामान्य माणसाकरीता उपलब्ध असलेले नगरपालीकेचे कॉटेज रुग्णालय ज्यांनी बंद पाडले, ज्यांना अडीच वर्षाच्या मंत्रीपदाच्या कार्यकाळात उपजिल्हा रुग्णालय तालुक्यात सुरू करता आले नाही, त्यांना महायूती सरकारमधील मंत्र्यांचा राजीनामा मागण्याचा कोणताही अधीकार नाही. तालुक्यात सर्व सुवीधांनी परीपूर्ण अशा रुग्णालयांची उभारणी करण्यात आलेल्या अपयशाची जबाबदारी स्वीकारुन आ. थोरात यांनीच आधी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी माजी उपनगराध्यक्ष, भारतीय जनता पक्षाचे नेते जावेद जहागिरदार यांनी केली आहे. माजी मंत्री आ. बाळासाहेब थोरात यांच्या मागणीचा समाचार घेताना, जावेद जहागिरदार यांनी पत्रकात म्हटले आहे की, अनेक वर्षे सता असताना तालुक्याच्या आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा ज्यांच्या हलगर्जीपणाने उडाला त्यांनी राज्याच्या मंत्रीमंडळाच्या राजीनाम्याची…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज @ जागतिक टपाल दिन विशेष लेख आज ०९ ऑक्टोबर, जागतिक टपाल दिन… टोकियोत १९६९ मध्ये आयोजित केल्या गेलेल्या युनिव्हर्सल पोस्टल काँग्रेसच्या संमेलनात जागतिक टपाल दिनाची घोषणा करण्यात आली होती. १८७४ मध्ये युनिव्हर्सल पोस्टल युनियन (UPU) निर्मितीच्या वर्धापन दिनानिमित्त स्वित्झर्लंड राजधानी बर्न या शहरात २२ देशांनी एकत्र येऊन करारावर सही केली होती. १ जुलै १८७६ ला भारत ‘युनिवर्सल पोस्टल युनियन’ चा सदस्य होणारा पहिला आशियाई देश ठरला. या वर्षी युनिव्हर्सल पोस्टल युनियनने “टुगेदर फॉर ट्रस्ट” या थीमवर जागतिक टपाल दिनाचे आयोजन केले आहे. संपूर्ण भारतभर हा आठवडा राष्ट्रीय टपाल सप्ताह म्हणून साजरा केला जातो. या पूर्ण आठवड्यात पोस्टाच्या…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज कळस – हिंदु तरुणांना धर्मरक्षणासाठी एकत्र करण्याचे काम देवस्थानांनी केले पाहिजे. यासाठी व्यायामशाळा व वाचनालय सुरु करावे. तेच युवक आपले मंदिरे वाचवतील, असे मत कालीचरण महाराज यांनी व्यक्त केले. कळस बुद्रुक येथील कळसेश्वर देवस्थान येथील प.पू. सुभाष पुरी महाराज व माता वैष्णवी देवी दर्शन घेण्यासाठी आले. त्यावेळी कालीचरण महाराज यांनी भाविकांशी संवाद साधला. कळसेश्वर टेकडीचा प.पू. सुभाष पुरी महाराज यांनी केलेला कायापालट पाहून कालीचरण महाराज भारावले. यावेळी ईश्वरदास महाराज, ट्रस्टचे अध्यक्ष विठ्ठल महाराज वाकचौरे, सरपंच राजेंद्र गवांदे, भाजप सरचिटणीस भाऊसाहेब वाकचौरे पाटील, सचिव गोपीनाथ पाटील ढगे, ट्रस्टचे उपाध्यक्ष विष्णु वाकचौरे, विश्वस्त प्रदीप वाकचौरे आदी उपस्थित होते. कालीचरण…

Read More