Author: अनंत पांगारकर
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – ‘कीस करायचा आहे, माझ्यासोबत हॉटेलवर चल’ म्हणत विकृताने 23 वर्षीय विवाहित महिलेचा विनयभंग केल्याची घटना संगमनेर शहरात बसस्थानकावर घडली आहे. मुळच्या मनमाड येथील व हल्ली नाशिक येथे राहत असलेल्या पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीवरून संगमनेर शहर पोलीस ठाण्यात बुधवारी लोणी येथील किरण किसन आहेर याच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चुकून हाय केल्या गेलेल्या व्हाट्सअप मेसेजचा गैरफायदा घेत दररोज हाय, हॅलो, गुड मॉर्निंग, गुड नाईट करत आरोपीने पिडितेशी संपर्क वाढवला. पीडित महिलेने देखील आरोपीकडे लोणी गावामध्ये असलेल्या कॉलेजवर नोकरी भेटेल का अशी विचारणा केली असता आरोपी किरण आहेर याने पीडित महिलेला संगमनेरमध्ये माझे डॉक्टर…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – येथील संगमनेर महाविद्यालयातील सेवानिवृत्त प्राध्यापक, स्वरसंगम संगीत प्रसारक संस्थेचे ज्येष्ठ सदस्य प्रा. डॉ. डी. एम. देशमुख यांच्या पत्नी सौ. सुरेखा (वय ८२) यांचे नासिक येथे वृद्धापकाळाने निधन झाले. संगमनेर शहरातील विविध सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमात त्यांचा सक्रीय पुढाकार असायचा. त्यांच्या पश्चात नासिक येथील सुप्रसिद्ध त्वचारोग तज्ज्ञ डॉ. मिलिंद देशमुख, अमेरिका स्थित कन्या माधवी मराठे आणि पती प्रा. डॉ. डी. एम. देशमुख असा परिवार आहे.
महाराष्ट्र संवाद न्यूज अहमदनगर – अहमदनगर जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पर्जन्यमान झाल्यामुळे जनावरांच्या चाऱ्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेत पुढील दोन महिने जिल्ह्याबाहेर चारा वाहतुकीवर निर्बंध घालण्यात आले आहे. जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी हा निर्णय घेतला आहे. हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांनी वर्तविलेल्या अंदाजानुसार दक्षिण पॅसिफिक महासागरातील अल-निनोचा देशातील मान्सून पर्जन्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. भंडारदरा निळवंडे मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील अपवाद वगळता जिल्ह्यात पावसाने सर्वत्र पाठ फिरविली आहे. कमी पर्जन्यमानामुळे जिल्ह्यात चाऱ्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता जिल्ह्यात उत्पादित होणारा चारा, मुरघास आणि टोटल मिक्स रेशन जिल्ह्याबाहेर वाहतूक करण्यास निर्बंध घालण्यात आले आहे. गतवर्षीच्या पेरणी अहवालानुसार जिल्ह्यात 1 एप्रिल 2023…
महाराष्ट्र संवाद न्यूज मुंबई : विधानसभेचे सभागृह अत्यंत महत्त्वाचे असून या सभागृहात जनतेच्या प्रश्नांवर विवाद होत असतो. अनेक समस्या सोडवल्या जातात. त्यामुळे अधिवेशनाचा कालावधी पूर्ण करून ते ४ ऑगस्टपर्यंत अधिवेशन चालवावे, अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी केली. सभागृहात सुरू असलेल्या चर्चेच्या दरम्यान बोलत असताना थोरात म्हणाले, विधिमंडळाचे हे सभागृह अत्यंत महत्त्वाचे आहे, धोरणात्मक बाबी सोबतच अनेक आमदार आपल्या मतदारसंघाचे प्रश्न घेऊन सभागृहात बोलत असतात. सभागृह चालल्याने त्यांना संधी मिळते. उशिरापर्यंत सभागृह चालवले जाते. त्याबद्दल विधानसभा अध्यक्षांचे आभार व्यक्त करत चर्चा अधिक विस्ताराने होण्याच्या दृष्टीने आणि मतदारसंघातील प्रश्नांना अधिक न्याय मिळण्याच्या हेतूने अधिवेशनाचा कालावधी पूर्ण करण्यात यावा.…
मणिपूरमधील घटना मानवतेला काळीमा- सौ दुर्गाताई तांबे महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – मणिपूरमध्ये आदिवासी महिलांवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ संगमनेर शहरात नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांच्या नेतृत्वाखाली हजारो महिलांनी काळ्या साड्या व काळे ड्रेस परिधान करत मोर्चा काढून या घटनेचा तीव्र निषेध केला. ही घटना मानवतेला काळीमा फासणारी असून यामुळे जगात देशाची नाचक्की झाली असल्याचा तीव्र संताप नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांनी व्यक्त केला आहे. जयहिंद महिला मंच व संगमनेरमधील विविध महिला संघटनांच्यावतीने संगमनेर बस स्थानक ते नवीन नगर रोड- मेन रोड- चावडी मार्गे शहरात भव्य निषेध मोर्चा काढण्यात आला. दुर्गाताई तांबे म्हणाल्या, मणिपूरची घटना मानवतेला काळीमा फासणारी आहे. देशात महिला असुरक्षित झाल्या…
महाराष्ट्र संवाद न्यूज मुंबई – राज्याच्या राजकारणातील मोठी बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेमका कुणाचा याची कायदेशीर लढाई आता सुरु झाली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका गटाला नोटीस बजावली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस मधील संघर्ष तीव्र होण्याची चिन्ह आहेत. गेल्या काही वर्षात राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहे. विशेषत: राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पडल्यानंतर या घडामोडींनी गेल्या वर्षभरात मोठा वेग घेतला. वर्षभरापूर्वी शिवसेनेत झालेल्या मोठ्या बंडखोरीनंतर राज्याच्या मुख्यमंत्री पदाची सूत्रे एकनाथ शिंदे यांच्या हाती आली. त्या पाठोपाठ महिन्याच्या प्रारंभी महाविकास आघाडी सरकार मध्ये असलेले तत्कालीन उपमुख्यमंत्री राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार…
खतांची लिंकिंग करणाऱ्या कंपन्यांना नोटीस पाठवल्याची कृषिमंत्र्यांची सभागृहात माहिती महाराष्ट्र संवाद न्यूज मुंबई : जर बियाणे निर्मिती कंपनीच्या बियाण्यातच दोष असेल, शेतकऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागत असेल तर त्यात कंपनीला दोषी ठरवायचे सोडून गावात असलेल्या छोट्या विक्रेत्यांना दोषी धरण्याचे काय कारण? ज्याप्रमाणे मेडिकलमध्ये आपण औषध निर्मिती कंपनीवर कारवाई करतो मेडिकल विक्रेत्यावर नाही, तसाच हा प्रकार आहे. मात्र आपण कृषी सेवा केंद्र चालकांवरच गुन्हे दाखल करता, असे प्रश्न ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी उपस्थित केले. प्रश्नोत्तराच्या तासात थोरात यांनी खते व बी बियाण्यांच्या विषयावरून सरकारला घेरले. थोरात म्हणाले, बीटी बियान्याशी संबंधित कायदा मी कृषिमंत्री असताना झाला. या माध्यमातून आम्ही बियाण्यांच्या किमतीवर…
महाराष्ट्र संवाद न्यूज नवी दिल्ली – कोळसा घोटाळा प्रकरणात दिल्लीच्या न्यायालयाने काँग्रेसचे माजी खासदार विजय दर्डा आणि त्यांचा मुलगा देवेंद्र, आणखी एक दोषी मनोज कुमार जयस्वाल यांना चार वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली असल्याची बातमी समोर येत आहे. 13 जुलैला दिल्लीतल्या विशेष न्यायालयाने त्यांना या प्रकरणात दोषी ठरवलं होतं. यासंदर्भात न्यायालयाने काही वेळांपूर्वीच या संबंधातील शिक्षेचा निर्णय दिला आहे. राज्यसभेचे माजी खासदार विजय दर्डा, मुलगा देवेंद्र दर्डा, कोळसा विभागाचे माजी सचिव एच. सी. गुप्ता, के. एस. क्रोफा, के. सी. सामरीया, मनोजकुमार जयस्वाल इत्यादींचा या प्रकरणात आरोपींमध्ये समावेश होता. यात दर्डा पिता-पुत्रासह जेएलडी यवतमाळ एनर्जी प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक मनोज कुमार जयस्वाल या…
इंस्टाग्राम अँपवर जुळले होते सूत बळजबरीने केलेल्या लग्नाला आरोपीच्या नातेवाईकांची होती उपस्थिती महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – अल्पवयीन शालेय मुलीला पळवून नेत संगमनेरातील कॅफे सेंटरमध्ये तिच्यावर बलात्कार केल्याचे प्रकरण ताजे असतानाच आता घारगावच्या पठार भागात एका महाविद्यालयीन तरुणीचे अपहरण करत पहिले लग्न झालेले असताना ते लपवून ठेवत तिच्याशी विवाह करून तिच्यावर लग्नाअगोदर आणि लग्नानंतरही बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी घारगाव पोलीस ठाण्यात पीडित युवतीने दिलेल्या तक्रारीवरून केशव बबन काळे याच्याविरोधात भारतीय दंड विधान कलम 363, 366, 376(2N) 506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपीला अद्याप अटक करण्यात आली नसल्याची माहिती मिळते. गेल्या तीन-चार दिवसातील ही दुसरी घटना…
आज तुम्ही तिकडे जाऊन बसला नाहीतर तुम्ही माझ्याबरोबर या विषयावर भांडला असतात… मंत्री भुजबळ आणि भुसे यांना थोरात यांनी काढला चिमटा मंत्र्यांकडून वाहतूक सुरळीत करण्याची ग्वाही… भविष्यात पायाभूत प्रकल्प निर्माण करत असताना पर्यायी व्यवस्था करण्याच्या अध्यक्षांकडून मंत्र्यांना सूचना. महाराष्ट्र संवाद न्यूज मुंबई – नाशिक मुंबई रस्ता वाहतूक कोंडीचा सापळा झाला आहे. काही मिनिटांच्या अंतरासाठी काही तासांच्या वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते. या प्रश्नावर मंत्रिमहोदय सांगतात ऑगस्ट 2024 पर्यंत हा त्रास सहन करावा लागेल, हे अत्यंत असंवेदनशील आणि चुकीचे उत्तर आहे, नाशिक-मुंबई रस्त्यावरील वाहतूक कोंडीवर तातडीने मार्ग काढा, अशा स्पष्ट शब्दात ज्येष्ठ नेते, आमदार बाळासाहेब थोरात यांनी सभागृहात मंत्र्यांना सुनावले. आमदार…
