Author: अनंत पांगारकर

महाराष्ट्र संवाद न्यूज मुंबई – राज्यात दररोज मोठ्या संख्येने मुली आणि महिला बेपत्ता होत आहेत. “राज्यातल्या महिला झाल्या बेपत्ता, सरकारला नाही पत्ता” अशी सध्या स्थिती असून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अनिल देशमुख यांनी गेल्या पाच महिन्यात म्हणजेच जानेवारी ते मे राज्यात किती मुली आणि महिला बेपत्ता झाल्या याबाबत गेल्या आठवड्यात सभागृहात धक्कादायक माहिती दिली आहे. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आजचा सातवा दिवस आहे. राज्यातून मुली आणि महिला मोठ्या संख्येने बेपत्ता होत आहे. याच मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अनिल देशमुख यांनी आज सभागृहात सांगितले की, जानेवारी 23 मे 23 या पाच महिन्याच्या कालावधीत राज्यातून 19533 मुली आणि महिला बेपत्ता झाल्या आहेत. आता मात्र…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – गेल्या तीन महिन्यांपासून मणिपूरमध्ये हिंसाचाराचा आगडोंब उसळला आहे. महिलांवरील अत्याचारामुळे संपूर्ण देशभरात संतापाची लाट निर्माण झाली आहे. केंद्र आणि राज्य सरकार परिस्थिती नियंत्रणात आणण्यात अपयशी ठरल्याने मणिपूर हिंसाचाराचा निषेध करण्यासाठी संगमनेरमध्ये बुधवारी (ता. 26 जुलै) महिलांचा निषेध मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. संगमनेर बस स्थानकापासून बुधवारी दुपारी तीन वाजता नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा निघणार आहे. मणिपूरमधील महिलांवर अत्याचाराच्या घटना घडत असून या अमानवीय कृत्यामुळे संपूर्ण देश हादरला आहे. गुन्हेगारीला जात, धर्म, पंथ काही नसून तो गुन्हेगार मानवतेचा दुश्मन असतो. मणिपूरमध्ये सध्या हिंसाचाराबरोबरच महिलांवर अत्याचाराच्या घटना घडत आहे. भारताच्या बहुतांशी भागात…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – मणिपूर हिंसाचाराच्या विरोधात देशभर शांततावादी नागरिकांनी निषेध व्यक्त केला आहे. या पार्श्वभूमीवर संगमनेर मध्ये देखील शांतता प्रिय स्त्री-पुरुष नागरिकांचा शांती मोर्चा येत्या शुक्रवारी (ता.28 जुलै) आयोजित केल्याची माहिती समाजवादी जन परिषदेच्या राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. निशा शिवूरकर यांनी दिली. शिवूरकर यांनी म्हटले आहे की, गेल्या काही महिन्यांपासून मणिपूर अशांत आहे. केंद्र आणि राज्य सरकार मणिपूरमध्ये शांतता निर्माण करू शकलेले नाही. मणिपूर मधील हिंसाचार आणि तेथे स्त्रियांवर झालेल्या अत्याचाराने देशातील संवेदनाशील नागरिक अस्वस्थ झाले आहेत. सरकारने मणिपूर मधील इंटरनेट सेवा बंद केल्याने दहशतीत वाढ झाली आहे. सुमारे 60 हजारावर नागरिक बेघर झाले आहे. दीडशेवर स्त्री-पुरुष मारले गेले.…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – गुणवत्तापूर्ण शिक्षणाने देशात अग्रगण्य असलेल्या अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेच्या नवीन सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात कृषी महाविद्यालयास मान्यता मिळाली असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे व नोडल ऑफिसर प्रा. जी. बी बाचकर यांनी दिली. याबाबत अधिक माहिती देताना अनिल शिंदे म्हणाले, काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात व माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली अमृतवाहिनी शिक्षण संस्थेने मागील 40 वर्षात गुणवत्तेने देशात आपला नावलौकिक निर्माण केला. या संस्थेच्या सर्व शाखा आयएसओ मानांकित आहे. सर्व आधुनिक सुविधांमुळे अमृतवाहिनी हे शिक्षणाचे केंद्र बनले आहे. या संस्थेच्या नवीन सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात कृषी महाविद्यालयास नव्याने महात्मा…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – नशापाणी करण्यासाठी सार्वजनिक जागांचा वापर करणाऱ्या आणि सामाजिक स्वास्थ धोक्यात आणणाऱ्या नशेखोरांवर पोलीस प्रशासनाने कारवाईचे पाऊल टाकले आहे. पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणी कारवाया करत नशेखोरांवर गुन्हे दाखल केले आहे. पोलिसांनी अनपेक्षित केलेल्या या कारवाईमुळे नशेखोरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. संगमनेर शहरातील मोकळ्या जागा, मैदाने, नगरपरिषदेने निर्माण केलेले विविध गार्डन, प्रवरा नदीपात्र, राज हॉटेल ते स्वामी समर्थ मंदिरा दरम्यानचा रस्ता आधी विविध ठिकाणचा वापर दारुडे, गर्दुल्ले, गांजाडी लोक सर्रासपणे करत असल्याने सामाजिक स्वास्थ्याला धोका निर्माण होण्याची चिन्हे होती. पोलिसांकडे या संदर्भात सातत्याने येत असलेल्या तक्रारीची गंभीर दाखल संगमनेरचे पोलीस उपाधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी घेतली. नशेखोरांमुळे परिसरातील…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज मुंबई – बनावट कागदपत्रांच्या आधारे राज्यात 14 लाख 28 हजार शेतकऱ्यांनी केंद्र सरकारच्या ‘पीएम किसान’ योजनेवर डल्ला मारला असल्याचे समोर आले आहे. यातून या शेतकऱ्यांनी 1754 कोटी रुपयांची केंद्राची मदत लाटली आहे. केंद्र सरकारच्या आदेशानंतर आता राज्य सरकारने शेतकऱ्याकडून या रकमेची वसुली सुरू केली असून आत्तापर्यंत एक लाख शेतकऱ्यांकडून 93 कोटी रुपयांची वसुली करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या धरतीवर राज्य सरकार देखील शेतकऱ्यांसाठी येत्या ऑगस्ट महिन्यापासून ‘नमो शेतकरी महासन्मान’ योजना लागू करण्यापूर्वीच हा घोटाळा समोर आला आहे. केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेद्वारे शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपयांची मदत दिली जाते. ऑगस्ट पासून राज्य सरकार देखील…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर- रविवारी पहाटे पोलिसांनी जमजम कॉलनी परिसरात केलेल्या कारवाईत साडेसहाशे किलो गोमांस आढळून आले. यावेळी चार जिवंत गोवंश जनावरे देखील कत्तलीसाठी बांधून ठेवल्याचे निदर्शनास आल्याने पोलिसांनी या जनावरांची कत्तल होण्यापूर्वीच मुक्तता केली आहे. रविवारी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी केलेल्या कारवाईत सुमारे साडेपाच लाखाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. एका वाहनातून गोमांस वाहतूक केली जात असल्याची माहिती पोलीस उपाधीक्षकांना मिळाली होती. त्यानंतर पोलीस पथकाने जमजम कॉलनी परिसरात जात मिळालेल्या माहितीच्या आधारे कारवाई केली असता त्यांना एम.एच. 06 जी 3431 या क्रमांकाच्या मॅक्स पिकअप मध्ये मोठ्या प्रमाणावर गोमांस आढळून आले. जवळच कत्तलीच्या उद्देशाने बांधलेले चार गोवंश जनावरे देखील…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज मुंबई – शिंदे-फडणवीस सरकारने सत्तेत येताच महाविकास आघाडी सरकारच्या काळात घेतलेल्या विकास कामांना दिलेली स्थगिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उठविली आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारने प्रस्तावित केलेल्या विकास कामांचा मार्ग मोकळा झाला आहे. महाविकास आघाडीचे सरकार कोसळल्यानंतर राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर शिंदे-फडणवीस सरकार सत्तेवर आले सत्तेवर आल्यानंतर या सरकारने महाविकास आघाडी सरकारच्या काळात घेतलेल्या विकास कामांना स्थगिती दिली होती. अद्यापही ही स्थगिती कायम होती. स्थगिती उठवितांना दिलेल्या निधीमध्ये पुन्हा एकदा अजित दादांची ‘दादागिरी’ कायम राहिली आहे. राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपूर्वी महत्त्वाच्या घडामोडी घडल्या होत्या. शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील होत अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची तर त्यांच्यासोबतच्या आठ आमदारांनी…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज पुणे – पोलीस दलातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. अमरावती पोलीस दलात सहाय्यक आयुक्त असलेल्या भरत गायकवाड यांनी आपली पत्नी आणि पुतण्याची गोळी घालून सोमवारी पहाटेच्या वेळी हत्या केली. त्यानंतर त्यांनी स्वतःवर गोळी झाडून घेत आत्महत्या केली असल्याची माहिती समोर येत आहे. पोलीस दलात या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे. अमरावती पोलीस दलात सहाय्यक आयुक्त असलेले गायकवाड पुण्यातील बाणेर परिसरात कुटुंबियासह वास्तव्यास आहे. या घटनेचे कारण अद्याप समोर आलेले नाही. गायकवाड यांनी सोमवारी पहाटे चार वाजता पत्नी मोनी गायकवाड (वय 44 वर्षे) व त्यापाठोपाठ दीपक गायकवाड (वय 35 वर्ष) या पुतण्याची गोळी झाडून हत्या केली. दोघांची हत्या…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर तालुक्यातील तलाठ्यांच्या अनागोंदी कारभाराने शेतकरी मेटाकुटीला आला आहे. शेतीशी निगडित नोंदीला हजारो रुपयांची मागणी केली जात असून पैसे न दिल्यास नोंद होत नाही. त्यासाठी शेतकऱ्यांना तलाठी, मंडळ अधिकारी, भूमी अभिलेख कार्यालयात हेलपाटे मारावे लागत असल्याने मानसिक व आर्थिक नुकसान होत आहे. तरी तलाठ्यांना, मंडळ अधिका-यांना सूचना करून गावागावात शिबिर आयोजित करून शेतकऱ्यांची पिळवणूक थांबवून शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवावेत अशी मागणी शिवप्रतिष्ठाण संघटनेचे संस्थापक, प्रदेशाध्यक्ष राहुल ढेंबरे यांनी निवेदनाद्वारे संगमनेरच्या तहसीलदारांकडे केली. यासाठी तालुक्यातील शेतकऱ्यांसह तहसील कार्यालयासमोर आंदोलनं करणार असल्याचा इशारा दिला आहे. तालुक्याच्या ग्रामीण भागात बहुतांश गावातील तलाठी आपल्या सज्जामध्ये प्रामुख्याने हजर राहत नाहीत. तर त्यांचे हाताखालील…

Read More