Author: अनंत पांगारकर

महाराष्ट्र संवाद न्यूज शिर्डी – जलजीवन मिशन अंतर्गत गावोगावी सुरु असलेल्‍या पाणी पुरवठा योजनांवर लोकांचा अधिकार आहे. या योजनेच्‍या कामाची पूर्तता करताना नागरिकांना विश्‍वासात घेऊन ग्रामस्‍थांच्‍या सूचनांप्रमाणे योजनेच्‍या आराखड्यात पुन्‍हा बदल करा. योजनेच्‍या यशस्‍वितेसाठी अधिकाऱ्यांनी सुध्‍दा जबाबदारीने काम करावे. केवळ ठेकेदारांवर विसंबून योजनेची अंमलबजावणी नको. जिल्‍हाधिकारी, मुख्‍य कार्यकारी अधिकाऱ्यांनी कामाच्‍या ठिकाणी अचानक भेटी देवून वस्‍तुस्थिती पहावी, अशा स्‍पष्‍ट शब्दात राज्याचे महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी रविवारी आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना धडे दिले. राहाता, श्रीरामपूर, संगमनेर आणि राहुरी तालुक्‍यात सुरु असलेल्‍या जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजनांच्‍या कामांचा आढावा महसूलमंत्री विखे पाटील यांनी घेतला. माजी मंत्री आण्‍णासाहेब म्‍हस्‍के पाटील,…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांचे हे जन्मशताब्दी वर्ष असून त्यांनी सुरू केलेले पर्यावरण संवर्धनाचे दंडकारण्य अभियान हे राज्यासाठी दिशादर्शक ठरले आहे. झाडे लावणारा माणूस हे पुस्तक वाचून त्यांनी हे वृक्षारोपणाचे मिशन सर्वांना दिले. मागील सतरा वर्षात उघडे-बोडके डोंगर हिरवीगार दिसू लागले असून यावर्षीही जेथे जागा असेल तेथे झाडे लावा. वृक्ष संवर्धन संस्कृती आपल्या तालुक्यात वाढली आहे. वृक्ष जपणे हे प्रत्येकाचे मूलभूत कर्तव्य असून वनराई असेल तर जीवनात खऱ्या अर्थाने समृद्धी निर्माण होईल, असे प्रतिपादन काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले. पिंपळगाव कोंझिराच्या काळा खडक येथील डोंगरावर जयहिंद लोकचळवळ व अमृतवाहिनी उद्योग समूहाच्या विद्यमाने आयोजित…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – महाराष्ट्राच्या राजकारणात दररोज नवनवीन घडामोडी घडत आहे. शिवसेनेतून अनेक जण बाहेर पडून गद्दार मिंधे गटात सामील झाले असले, तरी शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांची लोकप्रियता कमी झालेली नाही. उलट ती दिवसेंदिवस वाढत आहे. याचा फटका निवडणुकीत बसणार असल्याचे समोर दिसत असल्याने राज्यातील भाजपचे सरकार कोणत्याही निवडणुका घेत नाही. उलट निवडणुका घेण्यासाठी टाळाटाळ करत आहे, असे असले तरी आगामी निवडणुकांसाठी शिवसेनेसोबत युवा सेनेने देखील काम सुरू केल्याचे सांगत युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी विरोधकांवर संगमनेरात तोफ डागली. उद्धव ठाकरे युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचे हात बळकट करण्यासाठी काम करण्याचे आवाहन केले. संगमनेरमध्ये शिवसेना प्रणित युवा सेनेचा युवा संपर्क…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज रविवार विशेष लेख | प्रवीण पुरो कर्माचं फळ काय असतं, हे किरीट सोमय्या यांना आज कळून चुकलं असेल. ते कसं पचवावं याच्या चिंतेत ते गर्क असतील. ते या संकटातून सहीसलामत सुटोत, अशी सदिच्छा त्यांना आपण देऊयात. ही मराठी महाराष्ट्राची संस्कृती आहे. संकटात माणसाला मदतीचा हात द्यावा. त्याला आणखी खायित लोटू नये, आपल्या महाराष्ट्राची संस्कृती ही अशी आहे. वर्षानुवर्ष महाराष्ट्रात राहून जी किरीट सोमय्या या माणसाला कधी कळलीच नाही. कारण डोक्यात अहंकार होता महाराष्ट्राच्या बदनामीचा. महाराष्ट्राच्या बदनामीत या माणसाने इतकं टोक गाठलं की जगातला भ्रष्ट कारभार हा एकट्या महाराष्ट्रातच होत असावा आणि केवळ विरोधकच तो करत असावा, असं…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – जिवंत गोवंश जनावरांची कत्तल सुरू असल्याची माहिती मिळाल्याच्या कारणावरून संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी टाकलेल्या छाप्यात तब्बल 76 हजार रुपये किमतीचे गोमांस आढळून आले. याप्रकरणी पोलिसांनी कत्तलखाना चालक जावेद लियाकत शेख (वय 29 वर्षे रा. अलकानगर) याला अटक केली. शहरातील मदिना नगरमध्ये गोवंश जनावरांची कत्तल केल्याची माहिती मिळतात पोलीस कॉन्स्टेबल विशाल कर्पे, विजय खाडे रोहिदास शिरसाठ व अजित कुर्हे यांनी घटनास्थळी जात छापा टाकला असता तेथे त्यांना मोठ्या प्रमाणात गोवंश जनावरांची कत्तल केल्याचे आढळून आले. पथकाने तेथे असलेले गोमांस ताब्यात घेत त्याची मोजणी केली. कारवाई मध्ये पथकाला 76 हजार रुपये किमतीचे 380 किलो गोमांस आढळून…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – रिक्षातून प्रवास करणाऱ्या महिलेकडील पंच्याहत्तर हजार रुपयांचे रोकड दुसऱ्या सहप्रवासी महिलेने लांबविल्याचा प्रकार समोर आला आहे. या संदर्भात शहर पोलीस ठाण्यात अज्ञात महिला चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुक्रवारी अमृतवाहिनी इंजिनिअरिंग कॉलेज येथून ब्युटी पार्लर व्यावसायिक महिला उज्वला सातपुते या रिक्षाने जवळ असलेली पंच्याहत्तर हजार रुपयाची रोख रक्कम घेऊन मैत्रिणीच्या बँक खात्यात एचडीएफसी बँकेत भरण्यासाठी संगमनेरकडे येत असताना ही घटना घडली. सकाळी 11 वाजता त्या सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या गेटवरून प्रवासी रिक्षात बसून संगमनेरकडे येत होत्या. यावेळी रिक्षात त्या एकट्याच होत्या. दरम्यान रिक्षा घुलेवाडी जवळील म्हसोबा मंदिराजवळ आल्यानंतर दोन महिलांनी रिक्षाला…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – भाजपा हा धर्माच्या नावावर राजकारण करत असून शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादी पक्ष त्यांनी फोडला. हे लोकशाहीसाठी अत्यंत घातक असून महाराष्ट्रातील जनतेला हा प्रकार मान्य झालेल नाही. राज्यघटना व लोकशाहीवर विश्वास असलेल्या काँग्रेस पक्षाला आगामी काळ चांगला आहे. फक्त राजकारणासाठी मंजूर झालेल्या विकास कामांना विद्यमान सरकारने स्थगिती दिली होती. मात्र याबाबत विधानसभेत आवाज उठवल्याने पुन्हा विकास कामे सुरू झाल्याचे प्रतिपादन काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले आहे. थोरात यांच्या पाठपुराव्यातून झालेल्या रणखाबवाडी ते कुंभारवाडी वरवंडी व दरेवाडी ते कवठे मलकापूर या रस्त्यांच्या कामाच्या शुभारंभप्रसंगी कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – योगाला क्रीडा प्रकाराचा दर्जा मिळाला आहे. यापुढील काळात योग हा क्रीडा प्रकार आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्यासाठी आगामी काळामध्ये अधिक प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन शिक्षण प्रसारक संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. संजय मालपाणी यांनी केले. संगमनेर महाविद्यालयात क्रीडा विभागाचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ महाराष्ट्र राज्य ऑलिंपिक असोसिएशनचे सेक्रेटरी इन जनरल नामदेव शिरगावकर यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी अध्यक्ष स्थानावरून डॉ. मालपाणी बोलत होते. क्रीडा संवर्धन समिती सदस्य नरेंद्र चांडक, रवींद्र पवार, संदीप चोथवे यांच्यासह श्रमिक ज्युनियर महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. राजेंद्र ढमक आदी यावेळी उपस्थित होते. डॉ. मालपाणी म्हणाले, नियमित अभ्यासासोबत मानसिक व शारीरिक विकासासाठी खेळ आणि योगसाधना आयुष्याला दिशा देण्याचे…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज लोणी – राज्याचे महसूल व पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील लोणी बुद्रुक मधील पाथरे रस्त्यावर असलेल्या शेतामध्ये वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात पाच-सहा वर्षे वयाचा नर बिबट्या शुक्रवारी रात्री जेरबंद झाला. विखे पाटील यांच्या शेतात जेरबंद झालेला हा चौथा बिबट्या असल्याचे सांगण्यात आले. लोणी परिसरामध्ये गेल्या काही दिवसात बिबट्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढल्याचे समोर आले आहे. या परिसरात आतापर्यंत जवळपास 15 बिबटे जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले आहे. पाथरे रस्त्यावर महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची शेती आहे. मोठ्या लोकवस्तीच्या परिसरात असलेल्या या शेतामध्ये अनेक दिवसांपासून बिबट्यांचा वावर वाढला असल्याचे दिसून आल्याने या बिबट्यांना पकडण्यासाठी वनविभागाने मंत्री विखे…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – कोणत्याही व्यवसायाच्या माध्यमातून आपले उद्दिष्ट मानव जातीसाठी व्यापक असायला हवे. त्यासाठी अंतर्मनातून आवड असायला हवी. केवळ पैसा हे एकमेव उद्दिष्ट समोर न ठेवता त्यातून समाजहित साधले जायला हवे. पैशांऐवजी जर आपण उद्दिष्टांसाठी व्यवसाय करणार असाल तर त्या क्षेत्रामध्ये आपण व्यापक यश प्राप्त करू शकतो, असे प्रतिपादन प्रेरणादायी वक्ते व एमएफडी सुनील कडलग यांनी केले. येथील सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट आयोजित संगमनेर व नाशिक गोदावरी चॅप्टर यांच्यावतीने शुक्रवारी (दि.२१ जुलै) सायंकाळी आयोजित ‘गोष्ट अर्थ साक्षरतेची’ या उपक्रमाअंतर्गत कडलग यांनी अर्थ साक्षरता वृद्धीसाठी दिलेल्या योगदानाचा प्रेरणादायी प्रवास उलगडणार्‍या मुलाखतीचे आयोजन करण्यात आले होते. संदीप गुंजाळ यांनी ही…

Read More