Author: अनंत पांगारकर
महाराष्ट्र संवाद | रविवार विशेष गौतम अदानींना जाणीवपूर्वक टार्गेट केलं जातं आहे, पूर्वी टाटा, बिर्ला यांचीही अशीच नावं घेतली जायची, या प्रकरणाची जेपीसी चौकशीची आवश्यकता नाही, जेसीपीत सत्ताधाऱ्यांचा भरणा असतो, मोदींना त्यांच्या शिक्षणावरील मुद्यावर जाणीवपूर्वक अडवलं जात आहे. ही सारी वक्तव्य बारामतीच्या पवार कुटुंबाकडून उघडपणे येऊ लागली तेव्हाच पाल चुकचुकली. काहीतरी विपरीत घडतं असल्याची चाहूल लागली. देश मोदींच्या नावाने खडे फोडत असताना बारामतीच्या शरद पवारांना आणि त्यांचे पुतणे अजित पवारांना अदानी आणि मोदींचं भरतं आलेलं पाहून सारा देश चकित झाला. देशाच्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणात हे दोघं नवा अध्याय तयार करायला निघाले आहेत असा साऱ्यांचा समज होता. त्यांना वाटलं लोक आपल्या…
संगमनेर | महाराष्ट्र संवाद न्यूज भारताचे संविधान हे जगातील अतिशय उत्कृष्ट असे संविधान असून मानवतेच्या दृष्टीने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे कार्य अतिशय मोलाचे आहे, असे प्रतिपादन माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे औचित्य साधत संगमनेर साहित्य परिषदेच्या वर्धापनदिन समारंभात ते बोलत होते. संगमनेर साहित्य परिषदेचा वर्धापनदिन महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या शुभदिनी हॉटेल सत्यशिवमध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरवातीस डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी संगमनेर साहित्य परिषदेचे अध्यक्ष अरविंद गाडेकर, उपाध्यक्ष मेजर लक्ष्मण ढोले, सचिव दिलीप उदमले, वाचन मंडळ प्रमुख मनोज साकी, प्रकल्पप्रमुख गिरीश सोमाणी, प्रा. शशांक गंधे,…
महाराष्ट्र संवाद न्यूज ३० एप्रिलला राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले असून संगमनेरच्या न्यायालयात होणाऱ्या या लोक अदालतीचा लाभ घेण्याचे आवाहन तालुका विधी सेवा प्राधिकरण आणि वकील संघाने केले आहे. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, अहमदनगर जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, संगमनेर तालुका वकील संघ, संगमनेर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्या माध्यमातून प्रलंबित दिवानी दावे, मोटार अपघात नुकसान भरपाई प्रकरणे, नियमांतर्गत तडजोड होणारी फौजदारी प्रकरणे, धनादेश न वटल्याची प्रकरणे, घरगुती हिंसाचार, विद्युत कायद्याअंतर्गत येणारी प्रकरणे, बँकांकडील वसुली दावे, भू-संपादन, लवाद अर्ज व दरखास्त आदी स्वरूपांच्या प्रकरणांचा निपटारा या लोक अदालतीमध्ये करण्यात येणार आहे. राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये सहभागी…
संगमनेर | महाराष्ट्र संवाद न्यूज जलजीवन मिशनच्या कामाचा ठेका घेतलेल्या ठेकेदाराचा हलगर्जीपणा एका बालिकेच्या जीवावर बेतला. संगमनेर तालुक्यातील निळवंडे येथे जलजीवन मिशन अंतर्गत खोदकाम सुरू आहे. खोदलेल्या चारीतील पाण्यात पडून सात वर्षाच्या बालिकेचा मृत्यू झाला आहे. मधुबाला शाम साळुंखे (रा. बेलापूर, ता. श्रीरामपूर) असे या दुर्दैवी बालिकेचे नाव आहे. एकीकडे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने सर्वत्र उत्सवाचे वातावरण असताना दुसरीकडे संगमनेर तालुक्यातील निळवंडे येथे शुक्रवारी (ता.१४) दुपारी ही घटना घडल्याचे समोर आले आहे. नारायण जगन्नाथ पवार यांनी दिलेल्या माहितीवरून संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात यासंदर्भात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मधुबाला ही नारायण जगन्नाथ पवार यांचे नात असून ते…
शिर्डी | महाराष्ट्र संवाद न्यूज काँग्रेसचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी शिर्डी येथील पाळणा दुर्घटनेतील जखमींच्या कुटुंबियांची भेट घेत त्यांना एसएमबीटी रुग्णालयातून वैद्यकीय मदत उपलब्ध करून देण्याच्या सूचना संबंधितांना देण्यात आल्या. रामनवमी उत्सवावेळी शिर्डीमध्ये झालेल्या पाळणा दुर्घटनेमध्ये साळवे आणि साबळे या सर्वसामान्य कुटुंबातील पाच जण जखमी झाले. त्यांच्यावर नाशिकच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या जखमींच्या कुटुंबीयांची माजी मंत्री थोरात यांनी भेट घेत आस्थेवाईकपणे विचारपूस केली. त्यांना वैद्यकीय मदतीची गरज असल्याचे लक्षात आल्यानंतर थोरात यांनी तातडीने धामणगाव येथील एसएमबीटी या सेवाभावी रुग्णालयाच्या माध्यमातून वैद्यकीय मदत उपलब्ध करून देण्याच्या सूचना संबंधितांना केल्या. थोरात यांच्या माध्यमातून या कुटुंबीयांना वैद्यकीय मदत उपलब्ध होणार आहे.…
शिर्डी, महाराष्ट्र संवाद न्यूज सावळविहिर व परिसरातील खंडकरी शेतकऱ्यांच्या जमिनींचा प्रश्न एका महिन्याच्या आत सोडविणार असून कोणतीही रेडी रेकनर आकारणी न करता वर्ग २ च्या जमिनी वर्ग १ मध्ये करण्यात येतील, अशी ग्वाही राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिली. राहाता तालुक्यातील सावळीविहिर येथील ७ कोटी ७८ लक्ष रूपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन व उद्घाटन मंत्री विखे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष शालिनी विखे-पाटील, प्रांताधिकारी गोविंद शिंदे, पोलीस उपविभागीय अधिकारी संजय सातव, तहसीलदार कुंदन हिरे, गटविकास अधिकारी जालिंदर पठारे, राहाता पंचायत समितीचे…
राज्यघटनेच्या विरुद्ध विचार मांडत जातीभेद निर्माण करून राजकारण..! माजी मंत्री, आमदार बाळासाहेब थोरात
संगमनेर – महाराष्ट्र संवाद न्यूज विविध भाषा, वेशभूषांच्या या देशांमध्ये संविधानाने सर्वांना एकत्रित ठेवले आहे. संविधानाचे तत्व जपण्याचे प्रत्येकाची जबाबदारी असताना काहीजण मात्र या राज्यघटनेच्याच तत्त्वाच्या विरुद्ध विचार मांडत आहे. आपसात जातीभेद निर्माण करून राजकारण केले जात आहे. एका विशिष्ट समाजाचे राज्य निर्माण करण्यासंदर्भातील विधाने दुर्दैवी असून सर्वांचा विकास आणि समता असलेला राज्यघटनेचा विचार शाश्वत असल्याचे प्रतिपादन राज्याचे माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले. संगमनेरमध्ये महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे होते. कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्री थोरात, राज्य महिला आयोगाच्या सदस्य उत्कर्षा रूपवते, प्रतिष्ठानचे अध्यक्ष बी.…
अहमदनगर – महाराष्ट्र संवाद न्यूज दुबईहून आलेले तीन दहशतवादी मुंबईत घुसले आहे. त्यांचा संबंध पाकिस्तानशी आहे, अशी माहिती देत पोलिसांची दिशाभूल केल्याप्रकरणी अहमदनगरमधून एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. यासिन सय्यद (वय ४७) असे आरोपीचे नाव असून त्याला महाराष्ट्र एटीएसने अहमदनगर येथे कारवाई करत ताब्यात घेतले. व्यक्तिगत वैमनस्यातून आरोपीने मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रूममध्ये ७ एप्रिलला फोन करुन खोटी माहिती दिल्याचे तपासात उघड झाले. आरोपी सय्यद याने मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रूमला फोन करून मुंबईत दहशतवादी घुसल्या संदर्भात माहिती दिली होती. दुबईहून आलेले तिघे दहशतवादी शुक्रवारी सकाळी मुंबईत घुसले असून त्यांचा संबंध पाकिस्तानशी आहे. यावेळी त्याने एका दहशतवाद्याचे नाव मुजीब सय्यद असे…
मुंबई – महाराष्ट्र संवाद न्यूज काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आमच्या संपर्कात असून योग्य वेळ आल्यानंतर हे सर्व आमदार भाजपमध्ये प्रवेश करतील, असं विधान राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांनी केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना पेव फुटले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत. या चर्चांवर राजकीय वातावरण तापलेल असतानाच फडणवीस यांनी केलेल्या या विधानामुळे राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे निर्माण झाली आहे. फडणवीस मुंबईत एका कार्यक्रमात बोलत होते. फडणवीस म्हणाले, अनेक आमदार आमच्या संपर्कात असतात. आपल्या आत्मविश्वासामुळे अनेक जण संपर्कात आहेत. गेल्या पाच वर्षात अनेक जण आमच्याकडे भाजपात आले. संपर्काच्या नात्यांमध्ये…
महाराष्ट्र संवाद न्यूज | अनंत पांगारकर संगमनेर शहरातील चार मोठ्या बँकांना बनावट सोन्याच्या दागिन्यांच्या आधारे तब्बल सहा कोटी रुपयांना गंडा घालणाऱ्या गोल्ड व्हॅल्यूअर जगदीश शहाणे आणि कर्जदारांचे प्रकरण ताजे असतानाच आता मनोली येथील दोघा भावंडांनी शहरातील एका पतसंस्थेच्या नावाने बनावट कागदपत्राच्या आधारे ७/१२ उताऱ्यावरील कर्जाचा बोजा परस्पर कमी करून पतसंस्थेची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. पोलीस ठाण्यात या संदर्भात श्री. कुलस्वामीनी को-ऑप क्रेडिट सोसायटी लिमीटेड या पतसंस्थेच्या संगमनेर शाखेचे व्यवस्थापक संदीप तानाजी संते (रा. नारायणगाव, ता. जुन्नर, जि. पुणे) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सुनील भास्कर शिंदे व सहकर्जदार संदीप भास्कर शिंदे (दोघे रा. मनोली, ता. संगमनेर, जि. अहमदनगर) या दोघां…
