Author: अनंत पांगारकर

संगमनेर (महाराष्ट्र संवाद न्यूज) कर्नाटकमध्ये मोठ्या बहुमताने होत असलेला काँग्रेसचा विजय हा तेथील जनतेचा विजय आहे. भाजपचे दहशत आणि जातीभेदाचे राजकारण देशातील नागरिकांना मान्य नाही. कर्नाटक विधानसभा निकालने देशात परिवर्तनाची सुरुवात झाली आहे. देश व राज्यात काँग्रेस सरकारची गरज असून भाजपची घसरण सुरू झाल्याचे या निवडणूक निकालाने समोर आले आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली. कर्नाटक विधानसभा निवडणुकीत होत असलेल्या काँग्रेसच्या मोठ्या विजयाचा आनंद संगमनेरमध्ये जल्लोषात साजरा करण्यात आला. थोरात यांच्यासह श्रीरामपूरचे काँग्रेस आमदार लहू कानडे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र नागवडे, कॅन्सर तज्ञ डॉ. जयश्री थोरात, काँग्रेसचे शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी कार्यकर्ते या…

Read More

(महाराष्ट्र संवाद न्यूज) ‘द केरला स्टोरी’ या बहुचर्चित चित्रपटाचे धर्म जागृती मोहिमेअंतर्गत विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाने संगमनेरमध्ये ३ शोचे मोफत आयोजन केले होते. संगमनेरकरांचा याला चांगला प्रतिसाद मिळाला. “द केरला स्टोरी” हा चित्रपट धर्मांतर व लव्ह जिहाद या विषयावर आधारित असून कट्टरपंथी जिहादी व आतंकवादी संघटना, देश विघातक संस्थाच्या षडयंत्राद्वारे महाविद्यालयीन विदयार्थीनी व अल्पवयीन मुली आपल्या जाळ्यात ओढून सिरिया- अफगाणिस्तान सारख्या देशांत पाशवी बलात्कार व अत्याचार करण्यासाठी पाठविल्या जातात. अश्या धर्मांध वृत्तीपासूनच्या अमानवीय कृत्यापासून हिंदू मुली व महिला भगिनींना वाचवण्यासाठी त्यांचे प्रबोधन म्हणून हा मोफत चित्रपट दाखवण्याचा संकल्प करण्यात आला होता. हिंदू धर्मजागृती मोहीम अंतर्गत विहिंप, बजरंग दल,…

Read More

सोनई (महाराष्ट्र संवाद न्यूज) माजी मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुरलेले राजकारणी नाहीत. गद्दारांच्या खेळीला वैतागून त्यांनी राजीनाम्याचा निर्णय घेतला असला तरी येणाऱ्या निवडणुकीत जनता उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीला साथ देईल असा विश्वास माजी खासदार यशवंतराव गडाख यांनी व्यक्त केला. अहमदनगर जिल्ह्यातील दिग्गज राजकारणी आणि संयमी नेते म्हणून ओळख असलेल्या साहित्यिक यशवंतराव गडाख यांच्या वाढदिवसानिमित्त माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शुक्रवारी त्यांच्या भेटीला आले होते. ठाकरे-गडाख भेटीत गडाख यांनी ठाकरेंचे तोंड भरून कौतुक करत ठाकरे आणि पवार यांच्यासोबतच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. गडाख म्हणाले, ठाकरे कुटुंबाशी आमची मैत्री जुनी आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि माझे संबंध मैत्रीपूर्ण होते. तेच संबंध…

Read More

नागपूर (महाराष्ट्र संवाद न्यूज) सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्षांना सर्व अधिकार दिले आहेत आणि वाजवी वेळही दिली आहे आणि तरीही कोणी अध्यक्षांवर दबाव आणण्याचा प्रयत्न करत असेल तर ती व्यक्ती मुक्त आणि न्याय्य प्रक्रियेच्या विरोधात आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर राज्यातील सत्ता संघर्षाबाबत विविध राजकीय पक्षांच्या वर्तुळातून प्रतिक्रिया उमटत आहे. सुप्रीम कोर्टाने १६ आमदारांच्या अपात्रतेबद्दल निर्णय घेण्याचा अधिकार विधानसभा अध्यक्षांना दिला आहे. याकरिता रिझनेबल वेळ देखील दिला आहे. दरम्यान यावर अध्यक्षांनी १५ दिवसांत निर्णय घ्यावा, अशी मागणी ठाकरे गटाकडून करण्यात आली आहे. या मागणीला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्तुत्तर दिल. ते म्हणाले, विधानसभा अध्यक्ष हे…

Read More

नागपूर (महाराष्ट्र संवाद न्यूज) जाऊ द्या.. ते ज्येष्ठ नेते आहेत.. बोलत असतात.. इतकं लक्ष द्यायचं नसतं! अशा शब्दात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांने केलेल्या टीकेला उत्तर देताना म्हटलं आहे. सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा द्यावा अशी मागणी शिवसेना (ठाकरे) प्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपा आणि नैतिकता यांचा काही संबंध आहे असं मला वाटत नाही असा टोला लगावला होता. त्यानंतर विशेषत: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या विधानाची दखल घेत शरद पवारांनाही फडणवीसांनी प्रत्युत्तर…

Read More

संगमनेर (महाराष्ट्र संवाद न्यूज) माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या अधिपत्याखाली असलेल्या संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी शंकरराव खेमनर यांची फेरनिवड तर उपसभापतीपदी गीताराम गायकवाड यांची निवड करण्यात आली. बाजार समितीचे सभापती उपसभापती निवडीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी सर्जेराव कांदळकर यांच्या अध्यक्षतेखाली नूतन संचालकांची बैठक बोलाविण्यात आली होती. सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून सचिव सतीश गुंजाळ यांनी काम पाहिले. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात झालेल्या या बैठकीत अध्यक्षपदासाठी शंकरराव खेमनर यांच्या नावाचे सूचना संचालक कैलास पानसरे यांनी मांडली. संचालक निलेश कडलग यांनी त्यांच्या नावास अनुमोदन दिले. उपसभापती पदासाठी गीताराम गायकवाड यांच्या नावाचे सूचना संचालक अरुण वाघ यांनी मांडली. या सूचनेला संचालक…

Read More

संगमनेर (महाराष्ट्र संवाद न्यूज) तहसील कार्यालयाच्या इमारतीमध्ये विनापरवाना चालविल्या गेलेल्या सेतू कार्यालयाचे थकलेले १८ लाख ४७ हजार ४५६ रुपये भाडे संबंधितांकडून तात्काळ वसूल केले जावे अथवा २०१४ पासून आतापर्यंत येथे कार्यरत असलेल्या तहसीलदारांच्या पगारांमधून या भाड्याची रक्कम वसूल करावी तसेच शासनाचे आर्थिक नुकसान केल्याप्रकरणी तत्कालीन तहसीलदार नायब तहसीलदार यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते अमोल खताळ यांनी म्हटले आहे. तसेच या संदर्भात महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. खताळ यांच्या या मागणीमुळे संगमनेरच्या सेतूचा विषय पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. संगमनेर तहसील कार्यालयाच्या इमारतीमध्ये ऑगस्ट २०१४ पासून मार्च २०२३ पर्यंत अनधिकृतरित्या शारदा पतसंस्था…

Read More

राजुर (महाराष्ट्र संवाद न्यूज) चोरट्यांनी चोरी करताना केलेल्या मारहाणीत अकोले तालुक्यातील वाकी येथे मधुकर किसन सगभोर यांचा खून झाल्याची घटना दोन दिवसांपूर्वी घडली होती. दोन दिवसांच्या पोलीस तपासानंतर हे प्रकरण वेगळाच वळणावर येऊन थांबले. सातत्याने होणाऱ्या वादाला कंटाळून पत्नीने पतीचा खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्यामुळे या प्रकरणामागील बनाव देखील उघडा पाडण्यात पोलीस यशस्वी ठरले. मधुकर सगभोर हे सातत्याने दारू पिऊन पत्नी, मुलांना मारहाण करणे, मद्यप्राशन करून घरामध्ये राडा करणे अशा प्रकारचे कृत्य करत असल्याने कारणाने वैतागलेल्या पत्नीच्या हातून पतीचा खून झाल्याचे समोर आले. घटनेच्या दिवशी देखील मुलाने त्यांना मद्यप्राशन करण्यासाठी पैसे दिले नाही म्हणून त्यांनी मुलाला मारहाण देखील…

Read More

संगमनेर (महाराष्ट्र संवाद न्यूज) कोणत्याही परिस्थितीमध्ये महाविकास आघाडीचे सरकार पाडण्याकरता घेतले गेलेले सर्व निर्णय हे बेकायदेशीर होते. यामध्ये तत्कालीन राज्यपाल यांचे निर्णय, शिवसेनेतून बाहेर पडलेल्या फुटीर गटाचा व्हीप याचा समावेश आहे. म्हणजे कोणत्याही पद्धतीने सरकार पाडणे आणि सत्तेवर जाणे ही सत्तेची अभिलाषा ठेवून केलेली ही कृती असल्याचे निकालातून स्पष्ट दिसते आहे. त्यामुळे सध्याचे महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकार हे बेकायदेशीर असून नैतिकतेच्या मुद्द्यावर विद्यमान मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते व माजी महसूल मंत्री, आमदार बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाच्या निकालानंतर बोलताना थोरात म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालात अगदी स्पष्टपणे म्हटले आहे की, महाविकास आघाडी सरकारच्या काळात…

Read More

संगमनेर (महाराष्ट्र संवाद न्यूज) परभणी जिल्ह्यातील सेलू येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय फ्लोअरबॉल स्पर्धेत संगमनेरच्या ध्रुव ग्लोबल स्कूलने घवघवीत यश मिळविले. या स्पर्धेत सतरा वर्षांखालील गटाच्या अंतिम सामन्यात लातूरचा तर, एकोणावीस वर्षांखालील गटात नागपूरच्या संघाचा पराभव करीत ध्रुव ग्लोबलच्या संघाने चॅम्पियनशीपचा किताब पटकाविला. परभणी जिल्हा आणि सेलू तालुका क्रीडा कार्यालयाने या स्पर्धांचे आयोजन केले होते. पुणे विभागाचे प्रतिनिधीत्व करणार्‍या संगमनेरच्या ध्रुव ग्लोबल स्कूलच्या 17 वर्षांखालील संघाने साखळी सामन्यात मुंबईचा 2 विरुद्ध शून्य असा एकतर्फी तर कोल्हापूरचा 2 विरुद्ध 1 अशा फरकाने पराभव करीत अंतिम फेरीत धडक घेतली. अतिशय अतितटीच्या अंतिम सामन्याच्या दुसर्‍या सत्रात ध्रुवच्या खेळाडूंनी आघाडी घेत लातरच्या संघाला 4 विरुद्ध…

Read More