Author: अनंत पांगारकर

महाराष्ट्र संवाद न्यूज अहमदनगर : १४ मार्चपासून शासकीय कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला आहे. संप काळात अत्यावश्यक सेवा नियमितपणे सुरू राहतील याची दक्षता घेण्यासोबतच नागरिकांची गैरसोय होणार नाही, याची काळजी सर्व विभाग प्रमुखांनी घेण्याचे आदेश अहमदनगरचे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी प्रशासनाला दिले आहेत. संपाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी सालीमठ यांच्या उपस्थितीत सर्व विभाग प्रमुखांच्या आढावा बैठकीचे सोमवारी आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी हे आदेश दिले. जिल्हाधिकारी सालीमठ म्हणाले, शासकीय-निमशासकीय कर्मचाऱ्यांनी संपामध्ये सहभागी होणे, ही बाब गैरवर्तणूक असल्याची सूचना सर्व कर्मचाऱ्यांना देण्यात यावी. संप काळात संपावर असणाऱ्या कर्मचाऱ्यास कार्यालयाकडून कारणे दाखवा नोटीस काढण्यात यावी. कर्मचाऱ्यांनी संपात सहभागी न होता, नेहमीप्रमाणे कार्यालयात उपस्थित राहण्यासाठी…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज मुंबई : राज्यातील शेतकरी संकटात सापडला आहे, अशा स्थितीत राज्य सरकारने कांद्याला प्रती क्विंटल तीनशे रुपये अनुदान जाहीर केले आहे. ते अत्यंत तुटपुंजे असून कांदा उत्पादनासाठी येणाऱ्या खर्चाचा विचार करता सरकारने हे अनुदान किमान पाचशे रुपये करावे, अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. विधान भवन परिसरात थोरात माध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले, अवकाळी पावसाने शेतातील उभे पीक वाया गेले. सोयाबीन, कापूस, तूर, हरभरा, भाजीपाला, कांद्याला बाजारात भाव नाही. त्यामुळे शेतकरी आपल्या पिकांवर नांगर फिरवत आहे. कांद्याने शेतकऱ्यांसमोर मोठे आर्थिक संकट निर्माण केले आहे. एक क्विंटल कांदा उत्पादनासाठी साधारणता अकराशे ते बाराशे रुपये…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज शहर पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारताच गुन्हेगारीचा बिमोड करण्यासाठी पाऊले टाकणाऱ्या पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या नेतृत्वाखाली दुचाकी चोरट्यांची टोळी पकडण्यात पोलीस पथकाला यश आले आहे. एका अल्पवयीन आरोपीसह चौघा आरोपींच्या टोळीकडून पथकाने सुमारे साडेतीन लाख रुपये किमतीच्या चोरीच्या सात दुचाकी हस्तगत करण्यात यश मिळविले आहे. गेल्या काही महिन्यांपासून गुन्हेगारांनी संगमनेर मध्ये उच्छाद मांडला आहे. तत्कालीन पोलीस अधिकाऱ्यांनी या गुन्हेगारांकडे दुर्लक्ष केल्याने या गुन्हेगारांचे मनोधैर्य वाढले असतानाच नव्या निरीक्षकांनी गुन्हेगारी नियंत्रणासाठी उचललेली पावले कौतुकास्पद ठरली आहे. नवीन निरीक्षक मथुरे आपल्या कामाची छाप संगमनेरकरांमध्ये कशा पद्धतीने पाडतात, हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईलच. अल्पवयीन बालकासह सुमित संजय कदम (रा.…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर: कोल्हार-घोटी राज्यमार्गावर संगमनेरनजीक निमगाव जाळी गावाजवळ चिंचपूर फाटा येथे रस्ता ओलांडण्याच्या प्रयत्नात असलेल्या बिबट्याला अज्ञात वाहनाने उडविले आहे. धडकेत बिबट्या गंभीर जखमी झाला असून पायांसह कमरेखालील भाग निकामी झाल्याचे सांगितले जाते. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी मोठ्या प्रयत्नांनी बिबट्याला उपचारासाठी निंबाळे येथील वन विभागाच्या रोपवाटिकेत आणले. सोमवारी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास संगमनेर लोणी रस्त्यावर चिंचपूर फाटा येथे असलेल्या अस्मिता दूध डेअरीजवळ ही घटना घडली. बिबट्याला दिलेल्या जोराच्या धडकेनंतर वाहन चालक वाहन घेऊन पसार झाला. तर गंभीर जखमी झालेला बिबट्या वाहनाच्या धडकेने उडून जवळच्या झुडपात जाऊन पडला होता. त्याच्या विव्हळण्याचा आवाजाने येणाऱ्या-जाणाऱ्यांच्या हा प्रकार लक्षात आला. नागरिकांनी याची माहिती वनविभागाच्या…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेरः संस्कृत भाषेच्या अभ्यासासाठी शब्दकोष समृद्ध करून शब्दज्ञान अत्यावश्यक आहे.  असे प्रतिपादन डॉ. रवींद्र मुळे यांनी केले. श्री दामोदर मालपाणी मेमोरिअल ट्रस्ट, संस्कृत संवर्धन मंडळ व महाविद्यालय शाळा समूह योजना संगमनेर केंद्र व संगमनेर महविद्यालयातील संस्कृत भाषा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने संस्कृत विविध गुणदर्शन मराठी, इंग्रजी वक्तृत्व स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभाप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर दामोदर मालपाणी मेमोरिअल ट्रस्टचे प्रमुख विश्वस्त व शिक्षण प्रसारक संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. संजय मालपाणी, श्रीमती सुवर्णा मालपाणी, प्राचार्य डॉ. प्रो. डॉ. अरुण गायकवाड, प्राचार्य मुकुंद डांगे, प्रा. अरुण लेले, संस्कृत विभाग प्रमुख डॉ. अनिरुद्ध मंडलिक, स्पर्धा समन्वय अधिकारी डॉ. रोशन भगत आदी उपस्थित होते. डॉ. मुळे म्हणाले, वर्णोच्चारण स्थानाचे ज्ञान, आवाजातील चढ-उतार, शब्दस्वरूप या…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर: जुनी पेन्शन योजना लागू करावी या मुख्य मागणीसह अन्य मागण्यासाठी राज्यभरातील विविध शासकीय, निमशासकीय कर्मचाऱ्यांनी मंगळवारपासून (१४ मार्च) संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे या संपामध्ये संगमनेर नगर परिषदेतील कर्मचारीदेखील सहभागी होणार आहेत. संपामध्ये सहभागी होत असल्याच्या आशयाचे पत्र नगर परिषदेचे मुख्याधिकारी राहुल वाघ यांना देण्यात आले आहे. या संपामध्ये अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी देखील सहभागी होणार असल्याने पालिकेतील अत्यावश्यक सेवा कोसळण्याची चिन्हे आहे. राज्यातील नगरपरिषदा, नगरपंचायती, संवर्ग अधिकारी, स्थानिक नगर परिषद कर्मचारी, रोजंदारी कर्मचारी यांच्या विविध मागण्या तसेच जुनी पेन्शन लागू करणेबाबत वेळोवेळी नगरपरिषद प्रशासन संचनालय यांना निवेदन देण्यात आलेले आहे. तसेच नगर विकास मंत्री यांच्यासोबत बैठक…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज रंगपंचमीचा जल्लोष सुरू असताना अहमदनगरच्या श्रीगोंदा तालुक्यातील दुःखद बातमी समोर आली आहे. घरासमोरील शेततळ्यात बुडून दोघा लहान भावंडाचा रविवारी दुपारी मृत्यू झाला. श्रीगोंदा तालुक्यातील लोणी व्यंकनाथ येथे ही घटना घडली. आर्यन बंडोपंत साळुंखे (वय 9 वर्ष) आणि अनिकेत बंडोपंत साळुंखे (वय 8 वर्षे) अशी शेततळ्यात बुडून मृत्यू झालेल्या भावंडांची नाव आहेत. या घटनेमुळे रंगपंचमीच्या उत्सवाला दुःखाची किनार लाभली. लोणी व्यंकनाथ ते येळपणे रस्त्यावर बंडोपंत साळुंखे यांचे कुटुंबीय राहावयास आहे. शेतीच्या पाण्याची सोय व्हावी, यासाठी त्यांनी आठ दिवसापूर्वी घरासमोर शेततळे केले होते. साळुंखे दांपत्य रविवारी दुपारी दुसऱ्याच्या शेतात कामासाठी गेले होते. रविवारची सुट्टी असल्याने आर्यन आणि अनिकेत ही…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज मुंबई : पोलंडहून भारतात नोकरी निमित्त आलेल्या एका परदेशी महिलेवर मुंबईत तब्बल सात वर्ष बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पीडित महिलेने अंबोली पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी फरार आरोपीचा शोध सुरू केला आहे. पोलंडहून एक महिला भारतात 2016 मध्ये नोकरीसाठी आली होती. तिला Asian Business Exhibitions and Conferences Ltd (ABECL)चे मुख्य कार्यकारी अधिकारी मनिष गांधी यांनी नोकरीची ऑफर देऊ केली. सुरुवातीचे काही महिने व्यवस्थित गेले. मात्र, त्यानंतर मनिष गांधी पीडितेला त्रास देऊ लागला. तिच्या मोबाईलवर अश्लिल चित्रफित पाठवून तिच्याशी जवळीक साधू लागला. त्यानंतर, जर्मनीमध्ये एका प्रदर्शनासाठी दोघेही गेले होते. तेथे एका हॉटेलवर मनिषने पीडितेवर बलात्कार केला.या…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर: संगमनेर तालुक्यातील जनतेने आपल्यावर प्रेम केले आहे. सत्ता असो अथवा नसो, तरीदेखील आपण तालुक्यातील विकास कामांचा वेग कायम राखला असून जनतेचे जीवनमान उंचावण्यासाठी काम केले असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले. शहरालगत नव्याने स्थापित झालेल्या ढोलेवाडी ग्रामपंचायत स्थापनेच्या लोकार्पण सोहळ्यामध्ये ते बोलत होते. यावेळी रामायणाचार्य हभप रामराव महाराज ढोक, आमदार सत्यजित तांबे, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, राष्ट्रवादीचे नेते आबासाहेब थोरात आदि व्यासपीठावर उपस्थित होते. थोरात म्हणाले, गुंजाळवाडी ग्रामपंचायतचे विभाजन झाले असून ढोलेवाडीला स्वतंत्र ग्रामपंचायतचा दर्जा मिळाला. 34 कोटी रुपयांच्या निधीतून ढोलेवाडी व गुंजाळवाडी ग्रामपंचायतसाठी पाणीपुरवठा योजना राबविली आहे.…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज अहमदनगर: जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यामध्ये असलेल्या मढी येथील यात्रेत गाढवाच्या बाजारामध्ये पंजाबी संकरित तीन गाढवांपैकी एक गाढव तब्बल एक लाख रुपयाला विकले गेले आहे. त्यामुळे यात्रेतील हे गाढव लाख मोलाचे ठरलं. याशिवाय या यात्रेमधील गाढवाच्या बाजारात काठेवाडी गाढवांची टंचाई निर्माण झाल्याचे दिसून आले. काठेवाड गुजरात येथून बाजारासाठी पायी येत असलेल्या तीनशे पैकी एकशे तीस गाढवांची रस्त्यातच विक्री झाली. त्यामुळे मढीच्या बाजारात पोहोचेपर्यंत अवघी 170 गाढवेच शिल्लक राहिली होती. मढीची गाढवांची यात्रा देशभर प्रसिद्ध आहे. या यात्रेत भरणाऱ्या बाजारामध्ये आंध्र प्रदेश, कर्नाटक, गुजरात, तेलंगणा राज्यातून मोठ्या प्रमाणात व्यापारी येत असतात. पाथर्डी तालुक्यापासून 12 किलोमीटर अंतरावर मढी येथे कानिफनाथ देवस्थान…

Read More