Author: अनंत पांगारकर
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन मेष (Aries): आजचा दिवस तुमच्यासाठी नवीन संधी घेऊन येऊ शकतो. कामाच्या ठिकाणी तुमचे महत्त्व वाढेल. आर्थिक व्यवहार काळजीपूर्वक हाताळा. कुटुंबासोबत वेळ घालवल्याने मन शांत होईल. वृषभ (Taurus): आज तुम्हाला तुमच्या मेहनतीचे फळ मिळेल. पैशांची आवक वाढेल. आरोग्याची काळजी घ्या. मित्रांसोबत बाहेर जाण्याचा योग येऊ शकतो. मिथुन (Gemini): आज महत्त्वाचे निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या. अनावश्यक खर्च टाळा. जोडीदारासोबतच्या नात्यात गोडवा राहील. विद्यार्थ्यांसाठी दिवस चांगला आहे. कर्क (Cancer): आज तुम्ही भावनिक आणि संवेदनशील राहाल. कामाच्या ताणामुळे थोडे अस्वस्थ वाटू शकते. ध्यान आणि योगामुळे तुम्हाला फायदा होईल. प्रवासाचे योग आहेत. सिंह (Leo): आज तुमचे नेतृत्व गुण दिसून येतील.…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन | अनंत पांगारकर संगमनेर – पाच दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर संगमनेरमध्ये बोलविण्यात आलेल्या गणेश मंडळाच्या बैठकीत शुक्रवारी जोरदार चर्चा झाली. चर्चेत शांतता समिती संदर्भात मुद्दे उपस्थित झाल्यानंतर गणेश मंडळांमधील वादावरून शाब्दिक गुद्द्याची बाचावाची आणि नेहमीच्या गणेशोत्सवाच्या अनुषंगाने येणाऱ्या समस्यांवर जोरदार चर्चा झाली. या पार्श्वभूमीवर दोन मंडळांमधील वाद सामंजस्याने मिटणार नसेल तर दोघांनाही परवानगी देऊ नका अशा स्पष्ट सूचना श्रीरामपूर विभागाचे अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी स्थानिक पोलीस आणि प्रशासनाला दिल्या. येत्या बुधवारी (२७ ऑगस्ट) श्री गणेशाचे आगमन होणार आहे. या पार्श्वभूमीवर शहर पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांनी गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष, पदाधिकारी, सदस्य, शासकीय विभागाचे…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर, प्रतिनिधी: नाशिक–पुणे सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प हा महाराष्ट्राच्या प्रादेशिक तसेच राष्ट्रीय विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणारा उपक्रम आहे. या प्रकल्पाचा मूळ मंजूर मार्ग कायम ठेवण्याची तातडीची गरज असल्याचे सांगत आमदार सत्यजीत तांबे यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना स्मरणपत्र दिले आहे. या पत्रात आमदार तांबे यांनी स्पष्ट केले आहे की मूळ मार्गानुसार नाशिक – पुणे या दरम्यान सिन्नर, संगमनेर, आळेफाटा, नारायणगाव व राजगुरुनगर अशा भागातून जातो. या सर्व भागांना औद्योगिक व आर्थिक विकासाची संधी मिळावी यासाठीच मूळ मार्ग निश्चित करण्यात आला होता. परंतु सध्या प्रकल्पाचा मार्ग शिर्डीकडे वळविण्याचा विचार सुरू असून त्यामुळे हा भाग वंचित राहील.…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन अहिल्यानगर: शहरातील कोतवाली पोलिस स्टेशनमध्ये कार्यरत असलेले सहायक फौजदार राजेंद्र प्रभाकर गर्गे आणि चळवळीतील ज्येष्ठ नेते अशोक रामचंद्र गायकवाड यांना लाच प्रकरणी एसीबी ने ताब्यात घेतले आहे. गांजा प्रकरणात मदत करण्यासाठी ५ लाख रुपयांची मागणी करून दीड लाख रुपयांची लाच घेताना नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) त्यांना रंगेहाथ पकडले. या घटनेने अहिल्यानगर शहरासह जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. कोतवाली पोलिस स्टेशनमध्ये दाखल असलेल्या एका गांजा प्रकरणात तक्रारदाराला आरोपी न बनवता साक्षीदार बनवण्यासाठी सहायक फौजदार राजेंद्र गर्गे यांनी ५ लाख रुपयांची मागणी केली. तडजोडीअंती ही रक्कम १.५० लाख रुपये निश्चित झाली. पोलिस निरीक्षक नेहा सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखालील…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर, प्रतिनिधी: संगमनेरच्या रोटरी क्लब आणि रोटरी आय केअर ट्रस्टने, दर्शन रोटरी नेत्र रुग्णालया अंतर्गत एक अत्याधुनिक ‘रोटरी डोळ्यांचा फिरता दवाखाना’ सुरू केला आहे. मंगळवारी (१९ ऑगस्ट) मालपाणी लॉन्स येथे एका शानदार कार्यक्रमात या फिरत्या दवाखान्याचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी उद्योजक राजेश मालपाणी, रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३२ चे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर सुधीर लातुरे, आणि आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे अध्यक्ष ओमप्रकाश शेटे यांच्या हस्ते रिमोट कंट्रोलद्वारे या व्हॅनचे अनावरण करण्यात आले. संजय आणि गिरीश मालपाणी यांच्यासह संपूर्ण मालपाणी परिवार या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होता. प्रकल्प प्रमुख रो. संजय राठी यांनी या फिरत्या दवाखान्याची गरज आणि महत्त्व विशद केले,…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन मुंबई – जिल्हा नियोजन समितीच्या (डीपीडीसी) निधीवाटपात होणारा भेदभाव आणि मनमानी थांबवण्यासाठी राज्य सरकारने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या नवीन धोरणामुळे पालकमंत्र्यांचे निधी वाटपाचे सर्वाधिकार मर्यादित झाले आहेत. आता निधी वाटपात अधिक पारदर्शकता आणि समानता आणण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. नवीन धोरणाची गरज का – आतापर्यंत डीपीडीसी निधीचे वाटप पालकमंत्र्यांच्या अखत्यारीत होते. अनेकदा सत्ताधारी पक्षांच्या आमदारांना अधिक निधी मिळतो, तर विरोधी पक्षांच्या आमदारांकडे दुर्लक्ष होते, अशा तक्रारी समोर येत होत्या. यामुळे निधीचा वापर समान आणि योग्य पद्धतीने होत नव्हता. या वाढत्या तक्रारींमुळे सरकारने निधी वाटपाचे नवीन धोरण तयार केले आहे. नवीन धोरणातील प्रमुख बदल पालकमंत्र्यांच्या अधिकाराला…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन मेष: आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला आहे. महत्त्वाच्या कामांमध्ये यश मिळेल. मित्र आणि कुटुंबीयांचे सहकार्य मिळेल. आर्थिक स्थिती सामान्य राहील. आरोग्याची काळजी घ्या. वृषभ: आज कामामध्ये जास्त लक्ष देण्याची गरज आहे. घाईत कोणताही निर्णय घेऊ नका. कुटुंबासोबत वेळ घालवा, ज्यामुळे मानसिक शांतता मिळेल. खर्च जपून करा. मिथुन: तुमच्यासाठी आजचा दिवस लाभदायक आहे. व्यवसाय किंवा नोकरीत प्रगती होऊ शकते. नवीन संधी मिळतील. आरोग्याची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. कर्क: आज तुम्हाला भावनिकदृष्ट्या थोडे अस्थिर वाटू शकते. कोणताही निर्णय घेण्याआधी विचार करा. नातेसंबंधांमध्ये गैरसमज टाळण्याचा प्रयत्न करा. आज शांत राहणे फायदेशीर ठरेल. सिंह: तुमच्यासाठी आजचा दिवस खूप उत्साहाचा आहे. तुमची…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर, प्रतिनिधी: संगमनेर तालुक्यात राजकीय आरोप-प्रत्यारोपांचे सत्र सुरू असून, माजी आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या आजच्या शांती मोर्चा नंतर आमदार अमोल खताळ यांनी माजी आमदारांवर हल्ला चढवला आहे. जनतेने पराभव करून तुमचा खुळखुळा केला आहे, आता तुमच्याविषयी कोणतीही सहानुभूती राहिलेली नाही, अशी टीका खताळ यांनी केली. तालुक्यातील विकासकामांची घडी बसत असल्यानेच तुम्हाला मोर्चे काढावे लागत आहेत, मात्र जनतेला तुमचे बेगडी हिंदुत्व ओळखता आले आहे, असेही ते म्हणाले. गुरुवारी निघालेल्या शांती मोर्चानंतर आमदार खताळ यांच्या कार्यालयाकडून प्रसिद्धी पत्रक देण्यात आले यात खताळ यांनी माजी आमदारांवर कटकारस्थानाचा आरोप करत, त्यांच्या स्विय सहायकानेच कीर्तनात गोंधळ घातला आणि आता…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन मुंबई, दि. २१ ऑगस्ट २०२५: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांना आलेल्या धमकीच्या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी विरोधक भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे. बाळासाहेब थोरात यांच्या केसालाही धक्का लावण्याची धमक नथुराम गोडसेच्या औलादीत नाही, असे ठामपणे सांगत, गरजणारे ढग बरसत नाहीत, असा टोला त्यांनी लगावला. तोंडी राम आणि बगलेत सुरी ही भाजपची कार्यपद्धती – या प्रकरणावर बोलताना सपकाळ म्हणाले की, “तोंडी राम आणि बगलेत सुरी” ही भाजपची जुनी कार्यपद्धती आहे. महात्मा गांधींची हत्या करण्यापूर्वी नथुराम गोडसे त्यांच्या पाया पडला आणि नंतर त्याने तीन गोळ्या झाडल्या, हा इतिहास आहे. आजही भाजप गोडसेच्या…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर, प्रतिनिधी: राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांना नथुराम गोडसे होऊन जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या तथाकथित संग्राम भंडारेचा निषेध करण्यासाठी माजी मंत्री बाळासाहेब थोरात-आमदार सत्यजित तांबे यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर तालुका आपली अस्मिता जपत एकवटला. हजारो नागरिकांनी एकत्र येऊन भव्य शांती मोर्चा काढला. या वेळी, संगमनेरच्या शांततापूर्ण विकासाला खीळ घालू पाहणाऱ्या गावगुंडांचा बंदोबस्त करण्याची हाक काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी दिली. तथाकथित संग्राम भंडारेचा निषेध करण्यासाठी स्वाभिमानी संगमनेर तालुका, सकल हिंदू समाज, विविध पुरोगामी संघटना, महाविकास आघाडी, आध्यात्मिक व वारकरी संप्रदाय आणि इतर राजकीय पक्षांच्या वतीने हा भव्य सद्भावना शांती मोर्चा काढण्यात आला. व्यक्तिगत बाळासाहेब थोरात…
