Author: अनंत पांगारकर
संगमनेर | प्रतिनिधी ग्रामीण भागाच्या विकासासाठी केंद्र व राज्य सरकारकडून राबवल्या जाणाऱ्या ‘जलजीवन मिशन’ आणि ‘घरकुल’ यांसारख्या लोककल्याणकारी योजनांची अंमलबजावणी अत्यंत संवेदनशीलपणे होणे आवश्यक आहे. या योजना केवळ कागदावर न राहता, अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी जाऊन पाहणी करावी आणि त्यातील त्रुटी तातडीने दूर कराव्यात. कामात दिरंगाई किंवा निकृष्ट दर्जा खपवून घेतला जाणार नाही, अशा कडक सूचना आमदार अमोल खताळ यांनी प्रशासनाला दिल्या. संगमनेर पंचायत समितीच्या सभागृहात आयोजित विविध विभागांच्या महत्त्वपूर्ण आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी गटविकास अधिकारी प्रवीण सिनारे, सहाय्यक गटविकास अधिकारी राजेंद्र ठाकूर यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीत बोलताना आ. खताळ म्हणाले की, जेव्हा ग्रामीण भागातील नागरिक…
नेवासा | महाराष्ट्र संवाद न्यूज वीज चोरीच्या कारवाईत तडजोड करून दंड कमी करण्यासाठी १ लाख २५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी करून, त्यापैकी ५० हजार रुपयांचा पहिला हप्ता स्वीकारताना महावितरणच्या दोन अधिकाऱ्यांना अहिल्यानगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहाथ पकडले आहे. या कारवाईत किरण गजेंद्र मोरे (वय ३४, सहाय्यक अभियंता, महावितरण उपविभाग नेवासा) आणि शिवकुमार नारायण आचारी (वय ४७, प्रधान तंत्रज्ञ, महावितरण नेवासा ग्रामीण) या दोन लोकसेवकांना अटक करण्यात आली असून त्यांच्याविरुद्ध नेवासा पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेची सविस्तर पार्श्वभूमी अशी की, या प्रकरणातील तक्रारदाराचे नेवासा शहरात राहते घर व पाण्याचा प्लांट आहे. २२ डिसेंबर…
संगमनेर, प्रतिनिधी- येणाऱ्या मकर संक्रांतीच्या सणाच्या पार्श्वभूमीवर शहरात पतंगबाजीचा उत्साह वाढत असला तरी, नायलॉन मांजाचा धोका पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या जीवघेण्या नायलॉन मांजाची विक्री व वापरावर शहरात कडक बंदी घालून दोषींवर गुन्हे दाखल करावेत, या मागणीसाठी ‘राहुल गांधी समर्थक संघाच्या’ (RGSS) वतीने संगमनेर नगर परिषदेचे मुख्याधिकारी देविदास गोरे, पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांना सविस्तर निवेदन देण्यात आले. RGSSने दिलेल्या निवेदनात पुढे म्हटले आहे की, नायलॉन मांजा हा प्लास्टिक मिश्रित आणि अविघटनशील असल्याने तो सहजासहजी तुटत नाही. दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या गळ्याला हा मांजा अडकून गंभीर दुखापत होण्याच्या किंवा मृत्यू होण्याच्या घटना दरवर्षी घडत असून मानवी जीव धोक्यात आला…
संगमनेर, प्रतिनिधी- राज्यात यंदा रब्बी हंगामासाठी निसर्गाची साथ लाभल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने पेरण्या केल्या आहेत. मात्र, पिके ऐन जोमात असतानाच राज्यात युरिया खताचा तीव्र तुटवडा निर्माण झाला असून, यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. या गंभीर परिस्थितीची दखल घेत माजी कृषिमंत्री तथा काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी राज्य सरकारवर कडक शब्दांत टीका केली आहे. “शेतकऱ्यांच्या संयमाचा अंत न पाहता शासनाने तातडीने सर्वत्र युरिया उपलब्ध करून द्यावा,” अशी आग्रही मागणी त्यांनी केली आहे. प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, यावर्षी संगमनेर तालुक्यासह संपूर्ण महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण समाधानकारक राहिले. यामुळे रब्बी हंगामातील गहू, हरभरा, मका या पिकांसह कांद्याचे उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्यांनी मोठी…
संगमनेर, प्रतिनिधी- संगमनेर विधानसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी आमदार अमोल खताळ यांनी मांडलेला विकासाचा ‘धडाका’ आता कोट्यावधी रुपयांच्या दाव्यात रूपांतरित झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सहकार्याने गेल्या अवघ्या एका वर्षात तब्बल ८४८ कोटी ९७ लाख रुपयांचा भरघोस निधी खेचून आणण्यात आ. खताळ यांना यश आले आहे. यामुळे मतदारसंघातील प्रलंबित कामांना मोठी गती मिळाली आहे. ग्रामीण विकासाचा कणा असलेले रस्ते मजबूत करण्यासाठी आ. खताळ यांनी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून ४५ कोटी तर जिल्हा वार्षिक योजनेतून १६ कोटी ८५ लाख रुपयांचा निधी मंजूर करून घेतला आहे. यामुळे पावसाळ्यात तुटणारा गावांचा संपर्क आणि…
मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी उत्साहाने भरलेला असेल. कामाच्या ठिकाणी तुमचे वर्चस्व राहील आणि वरिष्ठांकडून तुमच्या कामाचे कौतुक होईल. आर्थिक बाबींमध्ये नशिबाची साथ मिळाल्याने रखडलेली कामे मार्गी लागतील. कुटुंबातील वातावरण आनंदी राहील आणि जोडीदारासोबतचे संबंध अधिक दृढ होतील. आरोग्याच्या दृष्टीने दिवस चांगला आहे, फक्त आहारावर थोडे नियंत्रण ठेवा. वृषभ – आज तुम्हाला मानसिक शांतता लाभेल. प्रलंबित असलेल्या मालमत्तेच्या कामात यश मिळण्याची शक्यता आहे. नवीन गुंतवणूक करण्यासाठी आजचा दिवस शुभ आहे, मात्र अनुभवी व्यक्तींचा सल्ला घेतल्यास अधिक फायदा होईल. मित्रपरिवारासोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. विद्यार्थ्यांना अभ्यासात अधिक लक्ष केंद्रित करावे लागेल. जोडीदाराच्या भावनांचा आदर केल्यास नात्यात गोडवा टिकून राहील. मिथुन -…
अहिल्यानगर: जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था चोख राखण्यासाठी प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत. अपर जिल्हा दंडाधिकारी दादासाहेब गिते यांनी संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यात १३ जानेवारी २०२६ च्या मध्यरात्रीपर्यंत शस्त्रबंदी आणि जमावबंदी लागू करण्याचे आदेश दिले आहेत. मुंबई पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम ३७(१)(३) नुसार हे निर्बंध लादण्यात आले आहेत. नेमके काय आहेत निर्बंध?- या कालावधीत सार्वजनिक ठिकाणी शस्त्रे बाळगणे, एकत्र जमा होणे किंवा प्रक्षोभक कृती करणे यावर बंदी असेल. जिल्ह्यात कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये आणि शांतता अबाधित राहावी, हा यामागील मुख्य उद्देश आहे. कोणाला मिळणार सवलत? सर्वसामान्यांची गैरसोय टाळण्यासाठी काही महत्त्वाच्या बाबींना या आदेशातून वगळण्यात आले आहे: धार्मिक विधी व…
संगमनेर, प्रतिनिधी- राजकारण आणि समाजकारणाच्या मैदानात एकमेकांना खंबीरपणे साथ देणारे माजी आमदार डॉ. सुधीर तांबे आणि माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे आज चक्क क्रिकेटच्या मैदानात आमनेसामने पाहायला मिळाले. निमित्त होते संगमनेरच्या प्रतिष्ठेच्या ‘२६ व्या सहकारमहर्षी टी-२० क्रिकेट स्पर्धेचे’. जेव्हा दुर्गाताईंनी हातात चेंडू घेतला आणि समोर डॉ. सुधीर तांबे बॅटिंगसाठी सज्ज झाले, तेव्हा उपस्थितांच्या उत्साहाला उधाण आले. तांबे दांपत्याची ही खेळाडूवृत्ती पाहून उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला. सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुलात नववर्षाच्या पहिल्याच दिवशी गुरुवारी (१ जानेवारी) आमदार सत्यजित तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली जयहिंद लोक चळवळ व क्रिकेट असोसिएशन ऑफ संगमनेर यांच्या वतीने २६ व्या टी-२० क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ माजी आमदार डॉ. सुधीर…
श्रीरामपूर | महाराष्ट्र संवाद न्यूज- अहिल्यानगर जिल्ह्याच्या श्रीरामपूरमध्ये जर्मन बेकरी बॉम्ब स्फोट प्रकरणातील आरोपी बंटी जहागीरदार याची बुधवारी हत्या करण्यात आली. जहागीरदार याची गोळ्या घालून हत्या करणाऱ्या दोन आरोपींना पोलिसांनी अवघ्या २४ तासांत ताब्यात घेतले आहे. ३१ डिसेंबर रोजी दुपारी जर्मन रुग्णालयासमोर झालेल्या या थरारामुळे शहरात मोठी खळबळ उडाली होती. ३१ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी पावणे तीन वाजेच्या सुमारास, कब्रस्तान परिसरातील जर्मन रुग्णालयासमोर बंटी जहागीरदारवर अज्ञातांनी गोळीबार केला होता. या हल्ल्यात बंटीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर त्याच्यासोबत असलेला अमिन गुलाब शेख हा गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता आणि आर्म ऍक्टच्या विविध कलमान्वये गुन्हा…
संगमनेर, प्रतिनिधी – संगमनेर तालुक्यातील ऐतिहासिक आणि राजकीयदृष्ट्या महत्त्वाचे केंद्र असलेल्या राजापूर गावच्या महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीच्या अध्यक्षपदी शिवसेनेचे निष्ठावान कार्यकर्ते भाऊसाहेब हासे यांची निवड करण्यात आली आहे. ग्रामसभेत झालेल्या या निवडीमुळे राजापूरमध्ये उत्साहाचे वातावरण असून, तरुणांनी या निर्णयाचे मोठ्या जल्लोषात स्वागत केले आहे. राजापूर हे तालुक्यातील सर्वाधिक लोकसंख्या आणि मोठे बागायती क्षेत्र असलेले समृद्ध गाव आहे. या ऐतिहासिक गावात नागरी प्रश्नांची व्याप्ती मोठी असल्याने, गावातील छोटे-मोठे वाद पोलीस ठाण्यापर्यंत न जाता स्थानिक पातळीवर सामोपचाराने सुटावेत, अशी ग्रामस्थांची भावना होती. भाऊसाहेब हासे यांच्या जनसंपर्क आणि कार्यपद्धतीवर विश्वास ठेवून ग्रामस्थांनी ही महत्त्वाची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर सोपवली आहे. कट्टर शिवसैनिक म्हणून…
