Author: अनंत पांगारकर

महाराष्ट्र संवाद न्यूज – पनवेल संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकणाऱ्या सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिंद्रे हत्या प्रकरणात आज पनवेल सत्र न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. न्यायालयाने मुख्य आरोपी अभय कुरुंदकर याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. या गुन्ह्यात सहभागी असलेले इतर दोन आरोपी, कुंदन भंडारी आणि महेश फाळणीकर, यांना प्रत्येकी सात वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. या निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेले होते. मिरा रोड परिसरात २०१६ साली सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिंद्रे यांची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली होती. या हत्याकांडाचा मुख्य सूत्रधार अभय कुरुंदकर आणि अश्विनी बिंद्रे यांच्यामध्ये वैयक्तिक वाद होते, असा आरोप होता. हत्येनंतर आरोपींनी अश्विनी बिंद्रे यांच्या…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज – संगमनेर येथील डॉ. सौरभ श्रीकृष्ण गिते यांनी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक यांच्या MD (आयुर्वेद) या पदव्युत्तर परीक्षेत उत्कृष्ट यश संपादन केले आहे. त्यांच्या या महत्त्वपूर्ण कामगिरीबद्दल कुटुंबीय, मित्रपरिवार आणि वैद्यकीय क्षेत्रातील सहकाऱ्यांकडून त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन होत आहे. डॉ. सौरभ हे विधिज्ञ श्रीकृष्ण चांगदेव गिते आणि माणिक श्रीकृष्ण गिते यांचे सुपुत्र आहेत. तसेच, ते डॉ. सुशांत गिते यांचे बंधू आहेत. त्यांनी आपले बीएएमएस (BAMS) आणि एमडी (MD) पर्यंतचे शिक्षण कोल्हापूर येथील यशवंत आयुर्वेद महाविद्यालयातून पूर्ण केले. यापूर्वी, त्यांनी संगमनेरच्या दिगंबर गणेश सराफ विद्यालयात शालेय शिक्षण आणि सह्याद्री ज्युनियर कॉलेजमध्ये महाविद्यालयीन शिक्षण घेतले आहे. डॉ. सौरभ यांच्या…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज – संगमनेर निळवंडे धरणाच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना बंदिस्त पाइपलाइनद्वारे पाणीपुरवठा करण्याचा विचार सुरू असल्याची माहिती राज्याचे जलसंपदा मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. अकोले तालुक्यातील शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी संगमनेर येथे आयोजित बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला आमदार डॉ. किरण लहामटे, आमदार अमोल खताळ, माजी आमदार वैभव पिचड, तहसीलदार धीरज मांजरे, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रदीप हापसे, कैलास ठाकरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्रीनिवास वर्पे यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते. निळवंडे धरणाचे लाभक्षेत्र मोठे असल्याने शेवटच्या शेतकऱ्यांपर्यंत पाणी पोहोचवण्यासाठी मध्यप्रदेशातील मोहनपुरा आणि कुंडलिया जलाशयांप्रमाणे स्काडा प्रणालीचा वापर करून बंदिस्त पाइपलाइनद्वारे पाणीपुरवठा करण्याचा प्रस्ताव…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज – संगमनेर संगमनेर शहरातील मदिनानगर येथे गोवंश जनावरांची कत्तल केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुलाम साबेर कुरेशी याच्यासह एका अनोळखी व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केला. आरोपीच्या शेडमधून सुमारे ९०० किलो रिट्स कार मधून ६०० किलो गोमांस आणि कत्तल करण्यासाठी बांधून ठेवलेली चार जनावरे जप्त केली आहेत. संगमनेरचे पोलीस उपअधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे यांना मदिनानगरमध्ये गोवंश जनावरांची कत्तल होत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे त्यांनी आपल्या कार्यालयातील पोलीस कॉन्स्टेबल राहुल सारबंदे, पोलीस नाईक राहुल डोके यांना कारवाईचे आदेश दिले. पोलीस अधीक्षकांच्या पथकातील राहुल सारबंदे आणि राहुल डोके यांनी रविवारी रात्रपाळीच्या गस्तीवर असलेल्या संगमनेर…

Read More

संगमनेर – प्रतिनिधी  राज्याचे माजी मंत्री, काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखालील सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याने वीज निर्मिती क्षेत्रात उत्कृष्ट आणि सातत्यपूर्ण कामगिरीचा राष्ट्रीय पुरस्कार पटकावला आहे. विशेष म्हणजे, या पुरस्काराने कारखान्याचा सलग दुसऱ्या वर्षी गौरव करण्यात आला आहे, जो कारखान्याच्या उत्कृष्ट कार्याचा हा पुरस्कार गौरव ठरला आहे. पुणे येथील बाणेरमध्ये नॅशनल को-जनरेशन फेडरेशनच्या वतीने आयोजित शानदार सोहळ्यात ज्येष्ठ राष्ट्रीय नेते शरद पवार यांच्या हस्ते हा पुरस्कार कारखान्याचे चेअरमन बाबा ओहोळ यांनी स्वीकारला. या प्रसंगी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, जयप्रकाश दांडेगावकर, राज्य साखर संघाचे अध्यक्ष पी. एन. पाटील, प्रतापराव…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज – छत्रपती संभाजी नगर पोलिसातून निलंबित असलेले वादग्रस्त पोलीस अधिकारी रणजीत कासले यांना १८ एप्रिल २०२५ रोजी अखेर पोलीस दलातून बडतर्फ करण्यात आले आहे. छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विरेंद्र मिश्रा यांनी ही कारवाई केली आहे. सध्या कासले एका ॲट्रॉसिटीच्या गुन्ह्यात पुणे पोलिसांच्या ताब्यात असून, शिवाजीनगर पोलिसांनी त्यांना अटक केली असून तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. बीड जिल्हा पोलीस दलातील सायबर विभागात कार्यरत असताना, एका गुन्ह्याच्या तपासासाठी गुजरातला गेलेल्या कासले यांनी पैशांच्या बदल्यात आरोपीला सोडले होते, या संबंधीचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. यासोबतच, नागरिकांना सायबर गुन्हे दाखल करण्याच्या धमक्या दिल्याचाही त्यांच्यावर आरोप आहे.…

Read More

केंद्राच्या नव्या शैक्षणिक धोरणातील हिंदी भाषा सक्तीने महाराष्ट्रातलं वातावरण ढवळून निघालं आहे. राज्यातील महत्वाच्या प्रश्‍नांच्या सोडवण्यातील अडचणींना तोंड देता देता युती सरकारने विद्यार्थ्यांवर हिंदी सक्तीची तलवार उगारली आहे. राज्यातील सगळ्याच शाळांना पहिलीपासून सक्तीने हिंदी शिकवावी लागणार आहे. राष्ट्रभाषा म्हणून हिंदी स्वीकारावीच लागेल, असं मुख्यमंत्र्यांनी आधीच जाहीर केल्याने यातील गुंतागुंत वाढली आहे. केंद्राने कोणताही निर्णय घेतला की त्या निर्णयाचा अंमल करण्यासाठी देशातील काही ठराविक राज्यांवर समर्थनाची सक्ती असते. त्यात महाराष्ट्र येतं. महाराष्ट्रासह गुजरात, मध्यप्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, उत्तरप्रदेश, बिहार अशा राज्यांनी निर्णयाचा अंमल आधी करायचा. या राज्यांना केंद्राने घेतलेल्या निर्णयाला विरोध करण्याचा अधिकार भाजप शासनप्रक्रियेने केव्हाच गुंडाळला आहे. निर्णय काहीही असो त्याची…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज – पुणे  दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील गर्भवती महिला तनिषा भिसे यांच्या दुर्दैवी मृत्यू प्रकरणी अखेर १७ दिवसानंतर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. अलंकार पोलीस ठाण्यात रुग्णालयातील प्रमुख स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. सुश्रुत घैसास यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम १०६(१) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ससून रुग्णालयाच्या पुनर्तपासणी अहवालात डॉ. घैसास यांच्या वैद्यकीय निष्काळजीपणाचा स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे. याच अहवालाच्या आधारावर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. पोलीस आयुक्तालयाने दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी ससून प्रशासनाला विचारलेल्या चार प्रश्नांचा अहवाल आज प्राप्त झाला. या अहवालात डॉक्टरांनी वैद्यकीय निष्काळजीपणा केल्याचे नमूद आहे, त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संदर्भात अधिक माहिती…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज – अहिल्यानगर  ग्रामीण भागात टँकरद्वारे पाणी पुरवठ्यासाठी स्वतंत्र ॲप तयार करावे. टँकर सुरू असलेल्या गावात पाणी पुरवठ्याचे वेळापत्रक जाहीर करावे, जेणेकरून ग्रामस्थांना टँकरची वाट पाहावी लागणार नाही. तालुका पातळीवर पाणी पुरवठ्यासाठी जबाबदार अधिकाऱ्याची नियुक्ती करावी, असे निर्देश जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले. शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पाणी टंचाई आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीसाठी आमदार काशिनाथ दाते, अमोल खताळ, विठ्ठलराव लंघे, विक्रम पाचपुते, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, महापालिका आयुक्त यशवंत डांगे, उप वनसंरक्षक धर्मवीर साळविठ्ठल, अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे आदी…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज – अहिल्यानगर  अहिल्यानगर जिल्ह्यात वाढत्या अवैध धंद्यांविरोधात जलसंपदा मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी कठोर भूमिका घेतली आहे. जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर पोलिसांनी निर्भयपणे आणि मोहीम स्तरावर कारवाई करावी, असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले आहेत. शनिवारी (१९एप्रिल) जिल्हाधिकारी कार्यालयात अवैध व्यवसायांवर कारवाईबाबत आयोजित बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला आमदार काशिनाथ दाते, आमदार अमोल खताळ, आमदार विठ्ठलराव लंघे, आमदार विक्रम पाचपुते, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते. पालकमंत्री विखे पाटील यांनी यावेळी जिल्ह्यातील अवैध धंद्यांचा पाढाच वाचला. ते म्हणाले, “अंमली…

Read More