Author: अनंत पांगारकर
संगमनेर – दूध उत्पादकांच्या जीवनात दुग्ध व्यवसायाच्या माध्यमातून आर्थिक स्थिरता निर्माण झाल्यामुळे सहकाराच्या माध्यमातून ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत झाली आहे. ग्रामीण भागात दुग्धव्यवसाय हा मुख्य व्यवसाय बनला आहे, असे प्रतिपादन संगमनेर दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह देशमुख यांनी केले. दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर दूध उत्पादकांना मोठी आर्थिक मदत देण्यात आली आहे. दूध संघाच्या माध्यमातून दिपावलीनिमित्त दूध दर फरक, दुधाचे पेमेंट, अनामत, कामगारांना बोनस व मेहनताना, व्यापारी देणे, चढ-उतार निधी असे एकूण दूध उत्पादकांना ४१ कोटी रूपये त्याचबरोबर दूध संघाशी संलग्न असणाऱ्या सहकारी दूध संस्थांनी सुध्दा ४१ कोटी रूपये असे एकूण ८२ कोटी रूपये दूध उत्पादकांना अदा करण्यात आले असल्याची माहिती देशमुख यांनी दिली.…
संगमनेर – संगमनेर तालुक्यातील नाभिक समाजाची अनेक दिवसांपासूनची ‘सभागृहाची’ मागणी आता पूर्णत्वास आली आहे. आमदार सत्यजीत तांबे यांनी केलेल्या अथक पाठपुराव्यामुळे अखेर नाभिक समाजाच्या सभागृह बांधकामासाठी १० लाख रुपयांचा महत्त्वपूर्ण निधी मंजूर झाला आहे, याशिवाय राहुरीच्या टाकळीमिया येथील विद्यावर्धिनी ग्रामीण शिक्षण संस्थेला स्कूलबस खरेदी करण्यासाठी देखील वीस लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे, अशी माहिती आमदार सत्यजित तांबे यांनी दिली. समाजाच्या प्रगतीसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या या निर्णयामुळे नाभिक समाजात आनंदाचे वातावरण आहे. संगमनेर तालुक्यातील नाभिक समाज हा आपल्या मेहनती आणि सामाजिक सक्रियतेमुळे ओळखला जातो. समाजाच्या या मूलभूत गरजेची जाणीव ठेवून आमदार तांबे यांनी निधी मंजुरीसाठी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला…
संगमनेर: दिवाळी सणाच्या तोंडावर एका बाजूला शेजारील सहकार महर्षि भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना, दूध संस्था आणि अमृत उद्योग समूहाशी संलग्न विविध संस्थांनी तब्बल १५० कोटी रुपये बाजारात आणल्याने संगमनेर परिसरातील बाजारपेठेची अर्थव्यवस्था बळकट होत असताना, दुसऱ्या बाजूला मात्र शेजारच्या प्रवरा सहकारी साखर कारखान्याच्या सभासद शेतकरी आणि कामगारांना ‘काळी दिवाळी’ साजरी करण्याची वेळ आली आहे. थकीत ऊस पेमेंट आणि अपुरा बोनस यामुळे विखे पिता-पुत्रांच्या कारभारावर प्रवरा परिसरातील शेतकरी मंडळाने तीव्र नाराजी व्यक्त करत जाहीर निषेध नोंदवला आहे. थकीत ऊस पेमेंटमुळे शेतकरी संकटात – ऊस उत्पादक आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिवाळी म्हणजे आनंदाचा सण असतो. मात्र, अतिवृष्टीमुळे आधीच आर्थिक संकटात असलेल्या…
आज अमावस्या (दर्श अमावस्या) श्रीलक्ष्मी-कुबेर पूजन, दीपावली, धनलक्ष्मी योग. आजचा दिवस अनेक राशींसाठी चांगला असून चंद्र आणि मंगळ यांच्या युतीमुळे काही राशींना विशेष लाभ मिळण्याची शक्यता आहे. तसेच काही राशींनी आरोग्याच्या आणि महत्त्वाच्या निर्णयांच्या बाबतीत सावधगिरी बाळगावी. मेष (Aries) – कार्यक्षेत्रात नवीन संधी मिळतील आणि व्यापारामध्ये वाढ होण्याचे संकेत आहेत. मोठा व्यावसायिक ऑर्डर मिळण्याची शक्यता आहे. आरोग्य चांगले राहील आणि प्रेम व संततीची स्थितीही उत्तम असेल. वृषभ (Taurus) – कामाची मागणी जास्त राहील, पण पुरवठा कमी होऊ शकतो. गुंतवणुकीतून लाभ होण्याची शक्यता आहे. थोडा चढ-उतार असूनही अखेरीस विजय तुमचाच होईल. आरोग्याकडे मात्र लक्ष देणे आवश्यक आहे. मिथुन (Gemini) – तुमच्या…
संगमनेर – नाशिक-पुणे महामार्गाची दुरवस्था सण-उत्सवाच्या काळात प्रवाशांसाठी ‘विकतचे दुखणे’ ठरत आहे. टोल भरूनही खड्डे आणि वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर, आमदार सत्यजित तांबे यांनी महामार्गाची समस्या आणि सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाच्या दिरंगाईवर तीव्र नाराजी व्यक्त करत, प्रवाशांना भेडसावणारा फटका तात्काळ थांबवण्याची मागणी केली आहे. दीपावलीसारख्या महत्त्वाच्या सणासुदीच्या दिवसांत पुण्यात किंवा मुंबईत राहणारे संगमनेरकर किंवा नाशिककर याच महामार्गाचा वापर करतात. इतकेच नव्हे, तर समृद्धी महामार्गामुळे विदर्भ आणि मराठवाड्यात तसेच उत्तर महाराष्ट्रातील धुळे, जळगाव, नंदुरबारला जाणारे लोक देखील याच महत्त्वाच्या महामार्गाने जात आहेत. मात्र, आज या महामार्गाची परिस्थिती अत्यंत बिकट असून, टोल भरूनही प्रवाशांना खड्ड्यांच्या…
मुंबई – महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाने दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अधिकाऱ्यांसाठी मोठी भेट जाहीर केली आहे. विभागाने तब्बल ४७ उपजिल्हाधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांना अपर जिल्हाधिकारी (निवडश्रेणी) या पदांवर पदोन्नती दिली आहे. या निर्णयामुळे महाराष्ट्राला ४७ नवे अपर जिल्हाधिकारी मिळाले आहेत. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे महसूल अधिकाऱ्यांशी संवाद साधून ही आनंदाची बातमी दिली. गेल्या अनेक वर्षांपासून महसूल विभागातील अधिकाऱ्यांच्या पदोन्नत्या प्रलंबित होत्या, यामुळे प्रशासकीय कामांवर परिणाम होत होता. महसूल विभागाने यंदा दिवाळीपूर्वीच ही पदोन्नती देऊन अधिकाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण केले आहे. प्रशासकीय कारभारात सुधारणा करण्याच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वपूर्ण मानला जात आहे. या शासन आदेशानुसार, पदोन्नत झालेल्या अधिकाऱ्यांनी ३० दिवसांच्या आत…
श्रीरामपूर – श्रीरामपूरच्या स्थानिक राजकारणात मोठा राजकीय ‘बदल’ झाला आहे. भारतीय जनता पक्षाचे प्रभावी आणि हिंदुत्ववादी विचारसरणीचे ज्येष्ठ नेते प्रकाश चित्ते यांनी कार्यकर्त्यांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश केला आहे. मुंबईत मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. या प्रवेशामुळे श्रीरामपूर नगरपालिका निवडणुकीचे संपूर्ण राजकीय समीकरण बदलण्याची शक्यता आहे. भाजपमध्ये ओबीसी सेलचे माजी उपाध्यक्ष राहिलेले प्रकाश चित्ते यांच्यामुळे शिंदे गटाला शहरातील ओबीसी मतदारांचा आणि हिंदुत्ववादी संघटनांचा मजबूत आधार मिळेल. सूत्रांनुसार, आगामी नगरपरिषद निवडणुकीत शिंदे गट भाजपसोबत युती न करता माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वतंत्र पॅनल उभे करण्याच्या तयारीत आहे. या पॅनलमध्ये नगराध्यक्षपदासाठी…
आज नरक चतुर्दशी असल्याने आणि दिवाळीचा सण असल्याने अनेक राशींसाठी आजचा दिवस उत्साहाचा आणि लाभदायक ठरू शकतो. ग्रह-नक्षत्रांची स्थिती आज काही राशींसाठी विशेष शुभ योग घेऊन येत आहे. मेष (Aries): आजचा दिवस तुमच्यासाठी उत्साहवर्धक आणि शुभ फलदायी राहील. भाग्याची साथ मिळाल्याने आर्थिक लाभात वाढ होऊ शकते. नोकरीच्या ठिकाणी आणि कुटुंबात मोठ्यांकडून आदर आणि सहकार्य मिळेल. क्रोध आणि वाणीवर नियंत्रण ठेवणे महत्त्वाचे आहे. आज गायीला गूळ खाऊ घाला. वृषभ (Taurus): आजचा दिवस भाग्यवर्धक ठरू शकतो. नोकरी आणि व्यवसायात आर्थिक लाभाचे योग आहेत. धैर्य आणि मेहनतीने केलेल्या कामाचे चांगले फळ मिळेल. कुटुंबातील ज्येष्ठांचे मार्गदर्शन आणि आशीर्वाद मोलाचे ठरतील. नवीन गुंतवणूक करण्यासाठी शुभ…
संगमनेर – माजी मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली प्रगतशील व वैभवशाली असलेले संगमनेर शहर राज्यातील विकसित शहर म्हणून ओळखले जाते. माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांच्या नेतृत्वाखाली नगरपालिकेने केलेल्या विविध पर्यावरणपूरक व स्वच्छता कामांमुळे ‘माझी वसुंधरा’ अभियानांतर्गत संगमनेर नगरपरिषदेला १.५ कोटींचा निधी (बक्षीस) मंजूर झाला आहे. या बक्षीस रकमेतून विविध पर्यावरणपूरक विकास कामे मार्गी लागणार असल्याची माहिती आमदार सत्यजीत तांबे यांनी दिली आहे. महाराष्ट्र सरकारच्या ‘माझी वसुंधरा ४.०’ अंतर्गत पर्यावरणीय कामाबद्दल संगमनेर नगर परिषदेला हे १.५ कोटींचे बक्षीस मिळाले आहे. या बक्षीस रकमेतून शहरात महत्त्वपूर्ण विकासकामे मार्गी लावता येणार आहेत. तत्कालीन नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांनी ‘स्वच्छ संगमनेर, सुंदर संगमनेर, हरित…
मुंबई – आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा ‘लाव रे तो व्हिडीओ’ हे अस्त्र उपसत केंद्र आणि राज्यातील सत्ताधाऱ्यांवर जोरदार निशाणा साधला आहे. मुंबईतील गोरेगाव येथील नेस्को मैदानात आज (१९ ऑक्टोबर) मनसे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी बोगस मतदार याद्यांचा गंभीर मुद्दा उपस्थित करत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते महायुतीमधील आमदारांपर्यंत सर्वांचे जुने व्हिडीओ जाहीर सभेमध्ये दाखवून त्यांची पोलखोल केली. राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात स्थानिक पक्ष संपवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप केला. माझ्याकडे आलेल्या खात्रीशीर माहितीनुसार, जवळपास ९६ लाख मतदार यादीत घुसवले आहेत. प्रत्येक शहरात लोकं घुसवले आहेत. असे होणार असेल…
