Author: अनंत पांगारकर
अहिल्यानगर, दि. ७ मार्च – प्रतिनिधी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या बदलीमुळे रिक्त झालेल्या अहिल्या नगरच्या जिल्हाधिकारी पदाचा पदभार नवे जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांनी आज स्वीकारला. प्रभारी जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर यांनी त्यांचे स्वागत करत त्यांना पदभार सोपवला. डॉ. आशिया हे २०१६ च्या तुकडीचे भारतीय प्रशासकीय सेवेतील (आयएएस) अधिकारी आहेत. येथे रुजू होण्यापूर्वी ते यवतमाळ येथे जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यापूर्वी डॉ. आशिया जळगाव येथे मुख्य कार्यकारी अधिकारी, भिवंडी महानगरपालिकेचे आयुक्त, नाशिक जिल्ह्यातील कळवण येथे उपविभागीय अधिकारी म्हणून कार्यरत होते. डॉ. आशिया यांच्या भारतीय प्रशासकीय सेवेची सुरुवात यवतमाळ जिल्ह्यातून झाली आहे. या सेवेत आल्यानंतर एक वर्ष परिविक्षाधीन कालावधीत आर्णी येथे नगरपरिषदेचे…
संगमनेर, दि. ७ मार्च – प्रतिनिधी सह्याद्रीच्या पायथ्याशी असलेला संगमनेर व पारनेर तालुका हा पर्जन्य छायेतील तालुका आहे. तालुक्यात माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली अनेक दिवसांच्या कामांमधून तालुक्यात विकास साधला आहे. मुंबई–नाशिक-पुणे या गोल्डन ट्रँगलवर असलेल्या संगमनेर व पारनेर तालुक्यामध्ये नव्याने मोठी एमआयडीसी उभारावी, अशी मागणी नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांनी विधान परिषदेत केली आहे. मुंबईत सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात बोलताना आमदार तांबे म्हणाले, अहिल्यानगर जिल्हा हा विस्ताराने मोठा आहे. संगमनेर व पारनेर तालुके हे दुष्काळी तालुके आहेत. बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर तालुक्यात मागील ३५-४० वर्षांमध्ये सततच्या विकास कामांमधून मोठे परिवर्तन झाले आहे. गावोगावी विकासाच्या योजना…
अहिल्यानगर, दि. ७ मार्च – महाराष्ट्र संवाद न्यूज महसूलच्या पथकाने पकडलेले वाळू वाहतुकीचे दोन वाहने सोडवून देण्यासाठी दोन लाखाची लाच मागणाऱ्या पैठणच्या तहसीलदारासह महसूल सहाय्यक आणि एका खासगी व्यक्तीवर अहिल्यानगरच्या लाच लुचपत पथकाने कारवाई केली आहे. या तिघा लाचखोराविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खाजगी इसम सलील करीम शेख (वय- ३८ वर्षे, व्यवसाय शेती, रा. लक्ष्मीनगर, ता. पैठण, जि. छत्रपती संभाजीनगर), हरिष शिंदे (महसूल सहाय्यक, वर्ग ३, तहसिल कार्यालय पैठण, जि. छत्रपती संभाजीनगर) आणि तहसीलदार सारंग भिकूसिंग चव्हाण, वय ४८ वर्ष, रा. ए विंग, फ्लॅट नंबर ३०५, द प्राईड इग्निमा, सुतगिरणी चौक, गारखेडा परिसर छत्रपती संभाजीनगर) अशी तिघा…
मुंबई, दि. ७ मार्च – प्रतिनिधी सत्तेत आल्यापासून महायुती सरकारने सुरू केलेल्या आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा धडाका अद्यापही सुरूच आहे. गुरुवारी रात्री राज्यातील आठ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. अहिल्यानगरच्या रिक्त झालेल्या जागेवर यवतमाळ येथून पंकज आशिया जिल्हाधिकारी पदाचा पदभार घेतील. आशिया आता अहिल्यानगरचे नवे जिल्हाधिकारी असतील. राज्य सरकारने गेल्या आठवड्यात सात सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या होत्या. अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांची बदली पुण्याचे साखर आयुक्त म्हणून करण्यात आली होती. सालीमठ यांच्या जागेवर आता पंकज आशिया यांची नेमणूक करण्यात आली आहे. बघा कोणत्या अधिकाऱ्याची कुठे झाली बदली? १) यवतमाळ जिल्ह्याचे जिल्हाधिकारी पंकज अशिया यांची अहिल्यनगरच्या जिल्हाधिकारीपदी नियुक्ती. २) MMRDA चे…
संगमनेर, दि. ६ मार्च – प्रतिनिधी संगमनेर तालुक्यात प्रस्तावित करण्यात आलेल्या आश्वी बुद्रुक येथील अपर तहसील कार्यालयाचा वाद सुरूच असून आता घारगाव पाठोपाठ तळेगाव येथे अपर तहसील कार्यालय करण्याची मागणी करण्यात आली आहे. अपर तहसिल कार्यालयाची निर्मिती होणार असेल तर नेहमीच वंचित राहीलेल्या तळेगाव येथे हे कार्यालय सुरू करून न्याय देण्याची मागणी आज तळेगाव आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी प्रांताधिकारी शैलेंद्र हिंगे यांच्याकडे केली आहे. यासंदर्भात लाडकी बहीण योजनेचे तालुका अध्यक्ष शरद गोर्डे, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष रावसाहेब दिघे, सरपंच घनशाम भारस्कर, महेश उदमले, गोविंद कांदळकर, कोंडाजी खेमनर, मच्छिंद्र घुले, निखिल सानप यांच्या शिष्टमंडळांने प्रांताधिकार्यांना निवेदन दिले आहे. तळेगाव आणि पंचक्रोशीत मोठ्या प्रमाणात…
मुंबई, दि. ६ मार्च – युवकांच्या रोजगारासाठी संगमनेरमध्ये स्वतंत्र औद्योगिक निर्माण शेतकऱ्यांची गरज लक्षात घेऊन कृषी प्रक्रिया उद्योग आणि शितगृहाची उभारणी करावी, नासिक पुणे रेल्वे मार्ग प्रस्तावित आराखड्याप्रमाणे संगमनेरमधून नेला जावा, यासह विविध मागण्या आमदार अमोल खताळ यांनी अधिवेशनामध्ये बुधवारी केल्या आहे. राज्यपालांच्या अभीभाषणावर आभार दर्शक ठरावावेळी खताळ बोलत होते. राज्याच्या विकासासाठी महायुती सरकार कटिबद्ध असून, त्यादृष्टीने होत असलेल्या निर्णयाचे आणि धोरणांचे त्यांनी स्वागत केले. महाराष्ट्र राज्य हे देशाच्या आर्थिक विकासाचा स्तंभ असून,राज्याला औदयोगीक विकास, कृषी परंपरा मोठी आहे. त्याला गती देण्याचे काम शासनाच्या माध्यमातून होत असल्याचे सांगत महायुती सरकारच्या माध्यमातून संगमनेर तालुक्यात स्वतंत्र औद्योगिक वसाहतीचा प्रस्ताव मंजूर करावा अशी…
संगमनेर, दि. ६ मार्च – प्रतिनिधी कोयत्यासह घातक शस्त्रांचा धाक दाखवून दहशत निर्माण करत लूटमार करणाऱ्या संगमनेरमधील कोयता गॅंगला पोलीस उपाधीक्षक कुणाल सोनवणे यांच्या पथकाने पकडले आहे. पकडलेल्या पाच आरोपींमध्ये दोघा अल्पवयीन आरोपींचा समावेश असून त्यांच्याकडून घारगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दोन गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. गणेश बबन कुरकुटे (वय २३), सार्थक उल्हास कुरकुटे (वय २०) व प्रथमेश शांताराम दुधवडे (वय १९, सर्व रा. कुरकुटवाडी, ता. संगमनेर, जि. अहिल्यानगर) अशी पोलिसांनी पकडलेल्या आरोपींची नावे असून यांच्यासह दोन अल्पवयीन मुलांचा आरोपीमध्ये समावेश आहे. आरोपींना न्यायालयाने शुक्रवार पर्यंत पोलीस कोठडी दिली असून आरोपींकडून आणखी गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता वर्तवली जात…
संगमनेर, दि. ६ मार्च – प्रतिनिधी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी सन २०१३ मध्येच संपूर्ण पूर्तता केली होती. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी कोणतेही अडचण राहिली नव्हती. प्रत्येक वेळी यात काही ना काही निमित्त आडवे आले, राजकारण सुद्धा झाले. मात्र, हा दर्जा मिळण्यासाठी तब्बल अकरा वर्षे का लागली हे मात्र न समजण्यासारखे असल्याची खंत मराठी अभिजात भाषा समितीचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक प्रा. रंगनाथ पठारे यांनी व्यक्त केली. बुधवारी (५ मार्च) सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात महाविद्यालयातील के.बी. दादा सभागृह येथे जयहिंद लोकचळवळ व सह्याद्री परिवार यांच्यावतीने प्राध्यापक पठारे यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिकृती देत त्यांचा…
नाशिक, दि. ५ मार्च – राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना नाशिकच्या जिल्हा व सत्र न्यायालयाने दोन वर्षाची शिक्षा ठोठावली होती. बुधवारी (५ मार्च) न्यायालयाने या शिक्षेला कोकाटे बंधू विरोधात अपील चालेपर्यंत स्थगिती देण्याचे आदेश दिले आहे. त्यामुळे मंत्री कोकाटे यांच्यावरील शिक्षेचे बालंट तूर्तास तळले आहे. १९९५ साली कागदपत्रात फेरफार आणि फसवणूक करून फ्लॅट लाटल्याप्रकरणी कोकाटे बंधू विरोधात न्यायालयात खटला सुरू होता. नासिक जिल्हा सत्र न्यायालयाने या खटल्यात कोकाटे यांना पन्नास हजार रुपये दंड आणि दोन वर्षांची शिक्षा ठोठावली होती. यासंदर्भात न्यायालयाने सरकारी वकील आणि कोकाटे यांच्या वकिलाची बाजू ऐकून घेत आपला निर्णय राखून ठेवला होता. या संदर्भात १ मार्च रोजी…
संगमनेर, दि. ५ मार्च – प्रतिनिधी संगमनेर शहरात सुरू असलेल्या अवैध धंद्यांकडे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याने आता संगमनेरात पान टपऱ्यांवर गांजा मिळू लागल्याचे पोलिसांच्या कारवाईत समोर आले आहे. या कारवाईत पोलिसांनी एका आरोपीला पकडले आहे. गेल्या काही दिवसांपासून संगमनेरमध्ये अवैध धंद्यांनी उच्छाद मांडला आहे. या धंद्यांवर कारवाया होत नसल्याने तसेच संबंधितांचे आर्थिक लागेबांधे असल्याने आता हे धंदे चोरून लपून नव्हे तर उघड्यावर राजरोसपणे सुरू आहे. पान टपरी मधून गांजा बाळगणाऱ्या आणि त्याची विक्री करणाऱ्या एकाला संगमनेर शहर पोलिसांनी पकडले असून या कारवाईमुळे अवैधरित्या अमली पदार्थ विक्रेत्यांनी पुन्हा डोके वर काढले असल्याचे दिसत आहे. यामुळे पोलिसांच्या कारवाई देखील फार्स…
