Author: अनंत पांगारकर
मुंबई, दि. १९ : भारताच्या ७६ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त २६ जानेवारी २०२५ रोजी ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ राज्यभर एकाच वेळी सकाळी ९.१५ वाजता आयोजित करण्यात येणार आहे. या मुख्य शासकीय समारंभात निमंत्रितांना सहभागी होता यावे, यासाठी या दिवशी सकाळी ८.३० ते १० या दरम्यान ध्वजारोहणाचा किंवा इतर कोणताही शासकीय किंवा अर्ध शासकीय समारंभ आयोजित करण्यात येऊ नये, असे राजशिष्टाचार विभागामार्फत कळविण्यात आले आहे. मुंबई येथील मुख्य शासकीय समारंभात राज्यपाल यांच्या हस्ते व मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत शिवाजी पार्क दादर मुंबई येथे ध्वजारोहण व समारंभपूर्वक संचलन कार्यक्रम होईल. विभागीय आणि जिल्हा स्तरावर पुढे दर्शविल्याप्रमाणे मंत्री अथवा राज्यमंत्री ध्वजारोहण करतील. ठाणे – उपमुख्यमंत्री…
संगमनेर – अलिबाग (जि. रायगड) येथील साईभक्त वाहनातून शिर्डी येथे जात असताना कौठे कमळेश्वर (ता. संगमनेर) येथील गावच्या पुढे आल्यानंतर त्यांच्या वाहनाला चार अज्ञात लुटारूंनी कार आडवी लावत मारहाण करून रोख रक्कम व सोन्याचे दागिने लंपास केले. एकूण ९३ हजार रुपयांचा मुद्देमाल लुटून नेला. ही घटना शनिवारी (ता.१८) पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास घडली. तालुका पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, की अलिबाग येथील साईभक्त प्रवीण वसंत नाईक, अभय रवींद्र ठाकूर, गणेश दत्तात्रय मेस्त्री, ऋषिकेश पडवळ, जयेश जयराज कोंडे, राजेंद्र ठाकूर हे सर्व साईभक्त वाहनातून शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनासाठी जात होते. शनिवारी पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास कौठे कमळेश्वर गावच्या पुढे विमानतळाकडे जाणाऱ्या रस्त्यावर…
अहिल्यानगर – स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पथकाने मध्यप्रदेशातून ताब्यात घेतलेल्या आरोपीने संगमनेर शहरात घरफोडी केल्याचे समोर आले आहे. या आरोपीच्या दुसऱ्या साथीदार फरार असून पोलिसांनी संबंधित आरोपींकडून सुमारे सहा लाख रुपयांचे दागिने हस्तगत करण्यात यश मिळविले. गेल्या वर्षी (६ डिसेंबर) संगमनेर शहरातील मालपाणी नगरमध्ये राहत असलेल्या रुपेश मुरलीधर भालेराव (वय ४८, रा. मालपाणीनगर, सुदर्शन बंगला, संगमनेर) यांच्या बंगल्याच्या टेरेस वरील दरवाजाचा कडीकोयंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी बंगल्यात प्रवेश मिळवत ३ लाख ७ हजार रूपये किंमतीचे सोन्याचे दागीने चोरून नेले होते. याबाबत संगमनेर शहर पोलीस स्टेशनला अज्ञात आरोपी विरुद्ध गु.र.नं. १०१३/२०२४ बीएनएस कलम ३०५ (अ), ३३१ (४) प्रमाणे घरफोडीचा गुन्हा दाखल केला…
अहिल्यानगर – गेल्या काही दिवसापासून जिल्ह्यात सुरू असलेल्या जिल्हा विभाजनासंदर्भात जलसंधारण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाष्य केले आहे. अहिल्यानगर जिल्ह्याच्या विभाजना संदर्भात कोणताही प्रस्ताव नाही. एवढेच नव्हे तर राज्यातील कोणत्याही जिल्ह्याच्या विभाजनाचा प्रस्ताव सरकार समोर नसल्याची माहिती त्यांनी दिली आहे. जलसंधारण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील अहिल्यानगर शहरात पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, अहिल्यानगर जिल्हा विभाजनाचा प्रश्नच नाही. आपण महसूल मंत्री असताना जिल्हा विभाजनाचा कोणताही प्रस्ताव आला नव्हता. जिल्हा विभाजनाच्या बातम्या कोण उडवतात हेच कळत नाही. जिल्हा बँकेचा कारभार पारदर्शक आणि भरती प्रक्रियेचे समर्थन – जिल्हा सहकारी बँकेच्या कारभार पारदर्शक असून, देशपातळीवर बँकेचे काम उत्तम पद्धतीने सुरू आहे. बँकेची भरती…
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या पक्ष मुख्यालयाच्या उद्घाटन सोहळ्यातील भाषणाने प्रस्थापितांचा चांगलाच तिळपापड झाला आहे. देशाची सत्ता ही आपला सर्वाधिकार असल्याचा समज झालेले सत्ताधारी भाजपचे पुढारी आणि संघाचे धुरीण विरोधी पक्ष नेत्यांच्या भाषणाचं कधीच कौतुक करू शकत नाहीत. सत्तेची गुलामी करणार्या माध्यमांनी तर आपली लाज गेल्या दहा वर्षांपासून खुंटीला टांगून ठेवल्याने राहुल यांच्या भाषणावर आग ओकण्याचे उद्योग यथासांग सुरू ठेवलेत. सरकारविरोधी चार शब्द बोललं की बुडाला आग लागावी असं चित्र माध्यमांचं आहे. काँग्रेस मुख्यालयाच्या उद्घाटनाच्या भाषणानिमित्त त्यांनी ती हौस भागवण्याचा प्रयत्न चालवला आहे. भाजपच्या सत्तेविषयी आणि त्यांच्या निर्णयांविषयी चांगलं काही बोलता येत नसलं की विरोधी पक्ष नेत्याला झोडा, त्याच्या…
मुंबई – दीर्घकाळ रखडलेली पालकमंत्र्यांची यादी जाहीर करण्यास राज्य सरकारला अखेर मुहूर्त लाभला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोली जिल्ह्याचे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे आणि मुंबई शहराचे तर दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बहुचर्चित असलेल्या बीड आणि पुणे जिल्ह्याचे पालकत्व स्वीकारले आहे. याशिवाय चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे नागपूर व अमरावती या दोन जिल्ह्याचे पालकमंत्री पद असेल. नव्याने जाहीर करण्यात आलेल्या पालकमंत्र्यांमध्ये वादग्रस्त ठरलेल्या मंत्री धनंजय मुंडे यांच्यासह बहुचर्चित असलेल्या भरत गोगावले, योगेश कदम आणि इतर तिघा मंत्र्यांना डच्चू देण्यात आला असून अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री पद मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे सोपविण्यात आले आहे. याशिवाय काही जिल्ह्यांना सह पालकमंत्री देण्यात आले…
संगमनेर – दुचाकीवरून नाशिक पुणे मार्गाने संगमनेरकडे येणारे दोघेजण रस्त्यात आडव्या असलेल्या पतंगीच्या मांज्याला अडकून जखमी झाले आहे. यातील एकाची प्रकृती चिंताजनक असून दुसरा किरकोळ जखमी झाला आहे. जखमींवर संगमनेर मधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. दरम्यान शुक्रवारी दुपारी घडलेल्या या घटने संदर्भात शनिवारी सायंकाळपर्यंत संगमनेर शहर पोलीस ठाण्यात कोणताही गुन्हा दाखल झाला नव्हता.अनिकेत संजय कटारनवरे (वय २२ वर्ष रा. सिन्नर, जि. नाशिक) व प्रफुल्ल घुसळे (वय २८ वर्ष रा. संगमनेर) अशी दोघा जखमींची नावे असून अनिकेत कटारनवरे याची प्रकृती चिंताजनक असून मांजामुळे त्याच्या गळ्याला मोठी जखम झाली असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली. शुक्रवारी सायंकाळी नासिक-पुणे महामार्गावर संगमनेरच्या बाह्यवळण रस्त्यावर…
संगमनेर – जय मल्हार क्रांती संघटनेच्या महाराष्ट्र राज्य महासचिवपदी संगमनेरचे नंदकुमार बोऱ्हाडे यांची निवड करण्यात आली. सांगोला (सोलापूर) येथे पार पडलेल्या संघटनेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या बैठकीत संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष, लोकनेते दौलत नाना शितोळे यांच्या अध्यक्षतेखाली संघटनेचे राज्यातील पदाधिकारी निवडण्यात आले. या बैठकीत संघटनेच्या जिल्हास्तरीय कामाचा आढावा घेण्यात आला. संघटनेचे राष्ट्रीय नेते म्हणून दौलत नाना शितोळे यांची निवड करण्यात आली तर संघटनेच्या राज्य अध्यक्षपदी अंकुश जाधव यांची निवड करण्यात आली. राज्यस्तरीय पदाधिकारी, विविध आघाडी आणि समित्यांच्या निवडी देखील यावेळी पार पडल्या. यावेळी संघटनेचे राज्यातील पदाधिकारी, अठरापगड संघटनेचे प्रमुख नेते यावेळी उपस्थित होते. राज्य अध्यक्षपदी अंकुश जाधव, युवक अध्यक्षपदी सुधीर नाईक, राज्य…
नागपूर – राज्यात महायुतीची सत्ता स्थापन होऊन देखील अद्यापपर्यंत पालकमंत्र्यांचा पेच सुटू शकलेला नाही. २६ जानेवारीचा प्रजासत्ताक दिन समोर असताना देखील अद्यापही पालकमंत्री निवडीस मुहूर्त लागू शकलेला नाही. पालकमंत्री निवडीवरून महायुतीत मतभेद असल्याचे बोलले जात आहे, या पार्श्वभूमीवर महसूल मंत्री व भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोठे भाष्य करत २६ जानेवारी पूर्वी सर्व जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांचे नाव जाहीर झालेले असेल असं म्हटले आहे. शुक्रवारी नागपुरात मंत्री बावनकुळे पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, पालकमंत्री नियुक्तीचा कोणताही पेच नाही. महायुतीचे सरकार असल्याने घटक पक्षांना विचारात घेऊन निर्णय घ्यावा लागतो. येत्या २६ जानेवारीपूर्वी सर्व जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांचे नाव जाहीर झालेले असेल. यापूर्वी बावनकुळे यांनी १५…
अहिल्यानगर – अहिल्या नगरचे पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी विधानसभा निवडणुकीत आचारसंहितेच्या काळात अकार्यकारी पदावर बदली केलेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षक (एपीआय), पोलीस उपनिरीक्षक (पीएसआय) अशा २० अधिकाऱ्यांच्या जिल्हा अंतर्गत बदल्या केल्या आहेत. शुक्रवारी ओला यांनी या बदल्यांचे आदेश काढले. बदल्या झालेल्या अधिकाऱ्यांना बदलीच्या ठिकाणी हजर होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. संगमनेर पोलीस उपअधीक्षकांचे वाचक असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्पेश दाभाडे यांची घारगाव (संगमनेर) पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली आहे. याशिवाय कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मारूती मुळुक यांचीही बदली करण्यात आली आहे. त्यांना अर्ज शाखा, पोलीस अधीक्षक कार्यालयात नियुक्ती देण्यात आली आहे. तसेच त्यांच्याकडे टीएमसीचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे.…
