Author: अनंत पांगारकर
शनिवार, ०४ जानेवारी संगमनेर – गेल्या काही दिवसांपासून संगमनेर मध्ये सातत्याने धार्मिक वादाच्या घटना घडत आहे. शनिवारी सायंकाळी अशीच घटना पुन्हा एकदा घडल्याने शहरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरातील संवेदनशील असलेल्या दिल्ली नाका परिसरात एका पान स्टॉलवर पान घेण्यासाठी गेलेल्या तीन तरुणांना किरकोळ कारणावरून बेदम मारहाण करण्याची घटना घडली आहे. दरम्यान घटनेची माहिती समजताच माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या कन्या एकविरा फाउंडेशनच्या संस्थापक डॉ. जयश्री थोरात यांनी रुग्णालयात जाऊन जखमी तरुणांची भेट घेतली. यावेळी तरुणांच्या नातेवाईकांनी मारहाण करणाऱ्या विरुद्ध मोठा संताप व्यक्त केला. शांतता असलेल्या संगमनेरमध्ये धार्मिक तेढ निर्माण होईल असे वर्तन कोणीही करू नये, मारहाण करणाऱ्या विरुद्ध कायदेशीर…
खा. श्रीमंत शाहू छत्रपती महाराज व विजय वडेट्टीवार यांच्या उपस्थितीत १२ जानेवारीला पुरस्कार वितरण शनिवार, ०४ जानेवारी संगमनेर – ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी भाऊसाहेब थोरात व कृषी क्रांतीचे प्रणेते डॉ. अण्णासाहेब शिंदे स्मृती पुरस्काराची घोषणा शनिवारी करण्यात आली आहे. स्वातंत्र्य सेनानी भाऊसाहेब थोरात यांच्या नावाने दिला जाणारा स्मृती पुरस्कार यंदा ज्येष्ठ विचारवंत प्राध्यापक डॉ. रावसाहेब कसबे यांना देण्यात येणार आहे. तर अण्णासाहेब शिंदे यांच्या नावाने दिला जाणारा स्मृती पुरस्कार वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटला व सहकारातील आदर्श नेतृत्वाचा पुरस्कार राज्याचे माजी मंत्री राजेश टोपे यांना जाहीर करण्यात आला आहे. यांनी केली घोषणा – नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे व युवक काँग्रेस अध्यक्ष…
शनिवार, ०४ जानेवारी मुंबई – मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत राज्य सरकारी कर्मचारी व अधिकारी यांना खाते उघडण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत मंजुरी देण्यात आली. याआधी प्रवीण दरेकर यांना सायन येथील कोट्यवधी रुपयांची जमीन नाममात्र दरात उपलब्ध करून देण्यास एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना मंजुरी देण्यात आली होती, त्यामुळे प्रवीण दरेकर यांच्यावर राज्य सरकारची कृपादृष्टी असल्याची टीका विरोधकांनी केली आहे. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राज्यात दरेकर यांच्या बँकेत शासकीय कर्मचाऱ्यांना खाते उघडण्यास मान्यता देण्यात आली आहे. शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन आणि भत्ते प्रदान करण्यासाठी तसेच महामंडळ, सार्वजनिक उपक्रम यांच्याकडील अतिरिक्त निधीच्या…
अहिल्यानगर दि.४ – शेतकऱ्यांना अखंडित वीज उपलब्ध व्हावी यासाठी राज्य शासनाने मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत जिल्ह्यात सौर प्रकल्पासाठी प्रशासनाने जमीन उपलब्ध करून दिली असून प्रकल्पांच्या कामांना संबंधित संस्थेने गती द्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी केले. जिल्ह्यातील सौर प्रकल्पांबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस पोलीस अधीक्षक राकेश ओला (दूरदृश्यप्रणालीद्वारे), जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, महावितरण आणि वन विभागाचे अधिकारी उपस्थित होते. सालीमठ म्हणाले, जामखेड तालुक्यातील रत्नापूर येथे दोन ते तीन दिवसात काम सुरू करावे. कर्जत तालुक्यातील निमगाव डाकू…
विशेष प्रतिनिधी / मुंबई केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्तेचा विषय सातत्याने लावून धरणारे भाजप आमदार सुरेश धस यांनी आणखी एक मोठा दावा केला आहे. करुणा मुंडे यांच्या कारमध्ये पिस्तूल ठेवणारी व्यक्ती पोलीस दलातील आहे. त्या व्यक्तीचं नाव मला माहित आहे, असा खळबळजनक दावा धस यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. करुणा शर्मा-मुंडे ५ सप्टेंबर २०२१ रोजी परळीत गेल्या होत्या. त्या आधी त्यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर अतिशय गंभीर आरोप केले होते. त्यातून बराच संघर्ष उफाळला. करुणा मुंडे परळीत असताना त्यांच्या कारमध्ये पिस्तूल आढळून आलं होतं. त्या प्रकरणात त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता. त्याच प्रकरणाचा धागा पकडत…
शुक्रवार ३ जानेवारी संगमनेर – नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांनी शुक्रवारी पत्नी डॉ. मैथिली यांच्यासह स्वामी समर्थ सेवा केंद्रात जात आरती करत जनतेच्या सुख समृद्धी आणि निरामय आरोग्यासाठी प्रार्थना केली. या आरती मागील कारण स्वतः तांबे यांनी समाज माध्यमावर सांगितले आहे. आमदार तांबे म्हणाले, संगमनेर शहरातील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात गुरुपौर्णिमेला आलो असताना या केंद्राच्या आवारात वीज वितरण कंपनीची डीपी आहे आणि या डीपीतून सातत्याने शॉर्ट सर्किट होत असल्याने केंद्रात येणारे सेवेकरी भयभीत आहेत, ही बाब निदर्शनास आली. याबाबत तातडीने वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना सूचना देऊन तिथली डीपी हलवली. याबाबत कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सर्व स्वामी सेवेकऱ्यांनी, केंद्राच्या…
शुक्रवार, ०३ जानेवारी मुंबई : वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त असणाऱ्या महिलांना, तसेच ज्यांच्या घरी चारचाकी आहे अशा महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही, असे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले. यामुळे मुख्यमंत्र्यांच्या काही लाडक्या बहिणी आता निवडणुकीआधी सरसकट योजनेचा लाभ देणाऱ्या सरकारसाठी ‘दोडक्या’ होणार आहेत. ‘लाडकी बहीण’ योजनेसंदर्भातील शासन निर्णयात कोणताही बदल केला जाणार नाही. मात्र काही अर्जांच्या बाबतीत आम्ही पडताळणीची प्रक्रिया करत असल्याचे त्यांनी सांगितले. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर त्या माध्यमांशी बोलत होत्या. कोणत्याही योजनेच्या रकमेत वाढ करायची असल्यास ती अध्येमध्ये न होता अर्थसंकल्पीय अधिवेशनातच होते. त्यामुळे ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेच्या हप्त्याची रक्कम वाढवून २१०० रुपये करण्याबाबत…
शुक्रवार, ०४ जानेवारी संगमनेर – संगमनेरमधील नासिक-पुणे मार्गावरील व्यावसायिकांच्या अतिक्रमणाचा मुद्दा चर्चेत असतानाच आता या व्यावसायिकांची रस्त्यावरील पार्किंग नागरिकांसाठी मनस्ताप ठरू लागली आहे. वाहतुकीला अडथळा ठरणारी जोशी स्वीट होम समोरील दुचाकीची पार्किंग काढण्यात यावी, अशी मागणी आरपीआयचे (आठवले पक्ष) शहराध्यक्ष कैलास कासार यांनी केली आहे. प्रशासनाकडून तात्काळ हालचाल न झाल्यास या विरोधात रस्त्यावर उतरण्याचा इशारा देखील त्यांनी दिला आहे. पोलीस स्टेशन-पडतानी कॉम्प्लेक्सकडून येणारी वाहने, मोमीनपुरा-छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याकडून येणारी वाहने, नासिक-पुणे महामार्गावरून धावणारी वाहने जोशी स्वीट होमसमोर एकत्रित येतात. यामुळे येथे वाहतुकीचा नेहमीच खोळंबा होत असतो. अशातच जोशी स्वीट होम या दुकानासमोर अस्ताव्यस्तपणे मोठ्या प्रमाणात दुचाकीस्वार आपल्याकडील दुचाकी पार्किंग करत…
भाजप आणि आमदार खताळ समर्थकांमधील वादाने दहशतीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर संगमनेर, ०३ डिसेंबर समाज माध्यमातील पोस्ट आणि एकमेकांना टाँट मारण्यावरून भाजपच्या दोघा कार्यकर्त्यांमध्ये वादाची ठिणगी पडली. त्याचे पर्यावरण थेट केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान आणि संगमनेरचे शिवसेना (शिंदे गट) आमदार अमोल खताळ यांच्या उपस्थितीत कार्यक्रमानंतर झालेल्या हाणामारीची चर्चा शहरात आणि समाज माध्यमात सुरू आहे. त्यामुळे पक्षाच्या प्रमुखांसमोर हाणामारी करणारे हे पदाधिकारी कार्यकर्ते कोण? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. तत्कालीन महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व माजी खासदार सुजय विखे पाटील यांचे कट्टर व विश्वासू समर्थक असलेल्या अमोल खताळ यांना अचानकपणे शिवसेनेकडून (शिंदे गट) उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. संगमनेर विधानसभा निवडणुकीमध्ये…
बाभळेश्वर कृषी विज्ञान केंद्रात शेतकऱ्यांशी संवाद शिर्डी, दि.३ – शेतकरी हा देशाचा प्राण आहे. शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी शेतीचे उत्पादन वाढविण्यास केंद्र शासनाने सर्वोच्च प्राधान्य दिले असून यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे, असे प्रतिपादन केंद्रीय कृषी, शेतकरी कल्याण व ग्रामीण विकासमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी केले. राहाता तालुक्यातील बाभळेश्वर कृषी विज्ञान केंद्र (पायरेन्स) येथे शेतकरी परिसंवादात चौहान यांनी स्थानिक शेतकऱ्यांशी संवाद साधला. याप्रसंगी राज्याचे जलसंपदा मंत्री (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) राधाकृष्ण विखे पाटील, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत पाटील, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या पुणे शाखेचे संचालक…
