Author: अनंत पांगारकर

शुक्रवार २० डिसेंबर अहिल्यानगर – जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी मुंबई पोलिस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) (३) अन्वये २१ डिसेंबर २०२४ ते ३ जानेवारी २०२५ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत शस्त्र व जमावबंदी आदेश जारी केला आहे. सदरचे आदेश धार्मिक कार्यक्रम, लग्नकार्य, लग्न मिरवणुका किंवा प्रेतयात्रेच्या जमावास लागू राहणार नाहीत. तसेच हा आदेश पोलीस अधिकारी, कामावर असलेल्या इतर शासकीय अधिकारी, कर्मचारी यांना, सभा अगर मिरवणूका काढण्यास रितसर परवानगी घेतली असलेल्या व्यक्तींना लागू नाही. आदेशाचा भंग करणाऱ्या विरोधात कारवाई करण्यात येईल, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

Read More

शुक्रवार २० डिसेंबर संगमनेर – परभणी येथील घटना व देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी सभागृहामध्ये भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी अवमानकारक वक्तव्य केले. भाजपला आंबेडकरांविषयी असलेला राग या वक्तव्याच्या निमित्ताने समोर आला आहे. या वक्तव्यामुळे देशवासीयांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. यामुळे संगमनेरमध्ये शनिवारी सकाळी नऊ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ निषेध आंदोलन करण्यात येणार आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, नाशिक पदवीधर मतदारसंघाचे माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, डॉ. जयश्री थोरात यांच्या उपस्थितीमध्ये महाविकास आघाडीच्या वतीने हे निषेध आंदोलन होत असल्याची माहिती काँग्रेसचे शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे यांनी दिली आहे. दिवटे म्हणाले, संसदेमध्ये संविधानावर चर्चा…

Read More

शुक्रवार २० डिसेंबर संगमनेर – अंत्योदय अन्न योजना लाभार्थ्यांची निवड आणि योजनेची अंमलबजावणी यासंदर्भात प्रशासनाची भूमिका संशयास्पद वाटत आहे. या योजनेचा लाभ गरीब झोपडपट्टी धारक, अल्पभूधारक, छोटे व्यवसाय, टपरीधारक, हातगाडीवर व्यवसाय करणारे, विधवा, ज्येष्ठ नागरिकांना व पात्र गरजूंना देण्यात यावा, अशी मागणी करत यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करेल असा इशारा निवेदनाद्वारे प्रशासनाला देण्यात आला आहे. गरीब गरजू नागरिक व शिवसेनेच्यावतीने गुरुवारी (१९ डिसेंबर) प्रांताधिकार्‍यांना यासंदर्भातील निवेदन देण्यात आले. गरजूंना या योजनेचा लाभ मिळत नसून सध्या दिवसेंदिवस वाढणारी महागाई आणि बेरोजगारी यामुळे अंत्योदय योजनेतून अनेक गरीब कुटुंबांचा उदरनिर्वाह होतो, मात्र या योजनेचा लाभ गरजूं ऐवजी नोकरदार…

Read More

शुक्रवार २० डिसेंबर  संगमनेर – एकीकडे दिवसेंदिवस जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किमती, वाढत असलेली महागाई, शेतमालाचे वाढते भाव आणि दुसरीकडे सातत्याने पाडले जात असलेले शेतीमालाचे भाव यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. शेतीमालाचे भाव सरकारकडून विचार करूनच पाडले जाताय की काय? असा प्रश्न आता प्रत्यक्ष शेतकऱ्यालाच पडू लागलेला आहे. यावरून आता शिवसेना उद्धव ठाकरे आक्रमक झाली असून सरकारचे डोके ठिकाणावर आहे का असा प्रश्न शेतकरी शिवसैनिक पंकज पडवळ यांनी उपस्थित केला आहे. पडवळ म्हणाले, गेल्या दोन वर्षापासून आम्ही संगमनेर, अकोले व श्रीरामपूर तालुक्यातील शेतकरी सातत्याने दूध दरावर आंदोलन करत आहोत. परंतु यावरही तात्पुरती मलमपट्टी करून सरकार शेतकऱ्यांचीच गळचेपी करण्याची भूमिका सातत्याने घेत…

Read More

शुक्रवार २० डिसेंबर नागपूर – राज्यातील शेतकरी, युवा वर्ग, ज्येष्ठ नागरिक, वंचित घटकाला दिलेली आश्वासने पूर्ण केली जातील. शासनाच्या सुरु असलेल्या योजना बंद होऊ देणार नाही, राज्यातील लाडक्या बहिणींना त्यांचा देय हप्ता अधिवेशन संपल्यावर देण्यात येईल, अशी ग्वाही देत महाराष्ट्र कालही नंबर एक होता, आजही नंबर एक आहे आणि उद्याही नंबर एकच राहील, महाराष्ट्राशी कोणीही स्पर्धा करू शकत नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिमानाने व आत्मविश्वासाने विधानसभेत स्पष्ट केले. नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात राज्यपाल महोदयांच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. महाराष्ट्र थेट परकीय गुंतवणुकीत पहिल्या क्रमांकावर… मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्रात १ जुलै…

Read More

शुक्रवार २० डिसेंबर अहिल्यानगर – जिल्ह्यात सध्या कडाक्याची थंडी जाणवत असून तापमान वारंवार १० अंश सेल्सिअसच्या खाली घसरत आहे. आगामी काळातही थंडीची लाट कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी थंडीपासून बचावासाठी आवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवाहन प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी तसेच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी शाहूराज मोरे यांनी केले आहे. थंडीच्या लाटेबाबत स्थानिक हवामान अंदाज रेडिओ, टीव्ही व वर्तमानपत्रांद्वारे नियमित तपासावा. नागरिकांनी स्वेटर, मफलर, कानटोपी, हातमोजे, पायमोजे तसेच चादर यांसारखे पुरेसे उबदार कपडे वापरावेत. शक्यतो थंड वाऱ्यात बाहेर जाणे टाळावे व शरीर कोरडे ठेवावे. शरीर ओले झाल्यास त्वरीत कपडे बदलून शरीरातील उष्णता टिकवावी. निरोगी अन्न, विशेषतः…

Read More

गुरुवार १९ डिसेंबर संगमनेर – विधानसभा निवडणूक होऊन बराच काळ झाला आहे, तरीदेखील विरोधकांकडून सातत्याने ईव्हीएमच्या संदर्भात खोटा प्रचार सुरू असून खोट्या बातम्या, खोटे फोटो, व्हिडिओ असे प्रसारित केले जात आहे. अशा प्रकारे खोटे वृत्त प्रसारित करणाऱ्या विरोधात निवडणूक आयोगाने गुन्हे दाखल करण्याची मागणी संगमनेरच्या भारतीय जनता पक्षाने केली असल्याची माहिती दिनेश सोमाणी यांनी दिली आहे. यांना दिले निवेदन – विरोधकांकडून केली जात असलेले कृती लोकशाहीच्या विरोधात असून या संदर्भातील मागणीचे निवेदन संगमनेरचे प्रांताधिकारी शैलेश हिंगे यांना देण्यात आले आहे. यासाठी केली मागणी – भारतीय कायद्यानुसार लोकांमध्ये गैरसमज पसरवणे, अफवा पसरवणे, संभ्रम पसरवणे गुन्हा आहे. हे माहिती असून सुद्धा जर…

Read More

गुरुवार १९ डिसेंबर मुंबई – संगमनेरच्या अतिक्रमणित झोपडपट्टी व भाड्याच्या घरात राहणाऱ्या संगमनेरकरांसाठी आमदार सत्यजित तांबे यांनी विधान परिषदेत मोठी मागणी केली आहे. पंतप्रधान योजनेतून दिल्या जाणाऱ्या घरकुलासंदर्भात त्यांनी सभागृहात आवाज उठविला आहे. या योजनेअंतर्गत राज्य व केंद्र शासनाच्या माध्यमातून दिला जाणारा निधी हा अपुरा असून यात वाढ करण्याची मागणी तांबे यांनी केली आहे. राज्यपालांच्या अभिभाषणाचा धागा पकडत आपल्या सभागृहातील भाषणात शासनाचे लक्ष वेधताना तांबे म्हणाले, प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुलासाठी राज्य शासनातर्फे एक लाख रुपये व केंद्र शासनातर्फे एक लाख रुपये असे दोन लाखाची मदत शहरी भागासाठी दिली जाते. संगमनेर शहरात अडीच हजारावर कुटुंब अशी आहेत की जी भाड्याच्या घरात…

Read More

गुरुवार, १९ डिसेंबर  मुंबई – लोकसभा निवडणुकीत अवघ्या ४८ मतांनी पराभूत झालेल्या शिवसेना गटाचे (ठाकरे गट) नेते अमोल कीर्तीकर यांची निवडणूक याचिका उच्च न्यायालयाने गुरुवारी फेटाळली. कीर्तीकर यांनी मुंबईतील उत्तर पश्चिम मतदार संघातील शिवसेनेचे शिंदे गट नेते रवींद्र वायकर यांच्या निवडीला न्यायालयात आव्हान दिले होते. कीर्तीकर यांचा वायकर यांच्याकडून ४८ मतांनी पराभव झाला होता. वायकर यांना ४,५२,६४४, तर कीर्तीकर यांना ४,५२,५९६ मते मिळाली होती. मतमोजणीच्या दिवशीच तफावत आढळून आल्याने पुन्हा मतमोजणीसाठी अर्ज दाखल केला होता, असा दावा करून उत्तर-पश्चिम मतदारसंघातील खासदार म्हणून वायकरांची निवड रद्दबातल करावी, तसेच, आपल्याला निर्वाचित उमेदवार म्हणून घोषित करण्याची मागणी कीर्तीकर यांनी या निवडणूक याचिकेतून केली…

Read More

गुरुवार १९ डिसेंबर मुंबई – अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या अध्यक्षा अलका लांबा यांच्या आदेशाने महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या राज्य, जिल्हा आणि ब्लॉकस्तरीय सर्व समित्या तत्काळ प्रभावाने विसर्जित करण्यात आल्या आहेत. संघटनात्मक बांधणी मजबूत करण्यासाठी आणि महाराष्ट्र राज्यातील महिला काँग्रेसच्या सदस्यत्व मोहिमेला गती देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षापदी संध्या सव्वालाखे या कायम राहून नवीन समित्या स्थापन करण्याच्या प्रक्रियेचे नेतृत्व करणार आहेत. राज्यातील महिला काँग्रेसची सदस्य मोहीम पुढे नेण्यासाठी आणि नारी न्याय सभासदत्व सत्कार समारंभ आयोजित करणे आणि महाराष्ट्रातील महिला काँग्रेस संघटनेच्या उभारणीसाठी संध्या सव्वालाखे यांच्या सोबत खालील विधानसभा क्षेत्रातील महिला पदाधिकारी सहकार्य करणार आहेत. १) दिपाली लालाजी…

Read More