Author: अनंत पांगारकर
मुंबई । प्रविण पुरो (लेखक आपलं महानगरचे माजी निवासी संपादक आहेत) प्रिय पवार साहेब, गेल्या काही वर्षांपासून देशातील बदलत्या राजकीय वातावरणाची आपणास पूर्ण जाणीव असेल. विशेषत: महाराष्ट्रात या राजकारणाने घेतलेल्या निचत्तम पातळीने भाजप वगळता आपण सारेच घायाळ झालो आहोत. 2014पासून महाराष्ट्र एका वेगळ्या वळणावर आहे. लोकशाही नावाची संकल्पना ही केवळ नावापुरती शिल्लक राहिली असल्याचं आपण आणि आपल्या पक्षासह काँग्रेस आणि शिवसेनेच्या नेत्यांनी अनेकदा बोलून दाखवलं आहे. विरोधकांना जगणं मुष्कील करून ठेवण्याच्या या कृतीची करावी तितकी निर्भत्सना कमीच आहे. हे करतं कोण? घडवतं कोण? हे आपण जाणता. यात आपले कार्यकर्ते असलेले मंत्री अनील देशमुख, नवाब मलिक, सहकारी मित्र असलेले संजय राऊत…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क नवीन ट्रॅक्टर घेण्यासाठी पत्नीने माहेराहून पाच लाख रुपये आणावेत, या कारणासाठी तिचा छळ करुन खून केल्याच्या आरोपातून पती सुरेश पंकज बिबवे याच्याबरोबर सर्व आरोपींची संगमनेरच्या अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. संगमनेर तालुक्यातील निमज येथे २०१७ मध्ये हा प्रकार घडला होता. याप्रकरणी संगमनेर पोलीस ठाण्यात सुजीत पावसे याच्या तक्रारीवरुन विवाहितेचा पती सुरेश बिबवे, सासरा पंकज लक्ष्मण बिबवे, अमोल पंकज बिबवे, मंगल पंकज बिबवे, अविनाश लक्ष्मण बिबवे, सुरेखा अविनाश बिबवे, वच्छला लक्ष्मण बिबवे आणि लक्ष्मण बुवाजी बिबवे यांच्याविरोधात भारतीय दंड विधानाच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपींना अटक करत तत्कालिन पोलीस निरीक्षक…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क लंम्पी चर्मरोगाचा प्रादुर्भाव पुशधनामध्ये मोठ्या प्रमाणात वाढत आहे. एकट्या संगमनेर तालुक्यामध्ये लम्पी चर्मरोगाने मृत झालेल्या पशुधनाची संख्या मंगळवारपर्यत ६५ वर गेली आहे. यापैकी ४२ पशुधनाचे नुकसान भरपाईचे प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे सादर केले असून उर्वरित प्रस्ताव दाखल करण्याचे काम सुरु असल्याची माहिती तहसिलदार अमोल निकम यांनी दिली. राज्यात उद्भवलेल्या गो व महिप वर्गीय पशुधनातील लम्पी चर्मरोगावर नियंत्रण ठेवण्यासाठी गठीत करण्यात आलेल्या तालुकास्तरीय समितीची बैठक संगमनेरमध्ये तहसीलदार निकम यांच्या अध्यक्षतेखाली झाली. बैठकीसाठी गटविकास अधिकारी अनिल नागणे, सहाय्यक आयुक्त डॉ. जे. के. तिटमे, पशुधन विकास अधिकारी डॉ. नितीन जोंधळे, सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक जगन्नाथ…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क ऑक्टोंबरमध्ये झालेल्या पावसामूळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. प्रशासनाने या नुकसानीचे सरसकट पंचनामे करण्याच्या सूचना राज्याचे महसूल मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रशासनाला केल्या आहेत. तसेच येत्या दोन दिवसात मंत्री स्वत: नुकसानग्रस्त तालुक्यांची पाहणी करणार असून यावेळी सर्व शासकीय यंत्रणेने उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. महसूल, पशु संवर्धन व दूग्ध व्यवसाय विकासमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शनिवारी दुरदृष्य प्रणालीद्वारे बैठक घेत अतिवृष्टीमूळे जिल्ह्यात झालेले नुकसान, पशुधनावरील लंम्पी आजार, आनंदाचा शिधा किट वाटपाचा आढावा घेतला. बैठकीसाठी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील, जिल्हा कृषी अधीक्षक शिवाजी जगताप, जिल्हा कृषी…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क जोर्वे येथे एकविरा फौंडेशनच्या अध्यक्षा डॉ. जयश्रीताई थोरात यांनी अंगणवाडीतील मुलांसोबत अनोख्या पद्धतीने दिवाळी साजरी केली. ‘दिवाळी सण मोठा, नाही आनंदाला तोटा’ असे असले तरी अनेक लोकांना दिवाळीचा आनंद घेता येत नाही. याच हेतूने लहान बालकांची दिवाळी गोड व्हावी यासाठी या चिमुकल्यांना शैक्षणिक साहित्य आणि दिवाळीचा फराळ वाटप करीत एकविरा फाउंडेशनच्या अध्यक्ष डॉ. जयश्री थोरात यांनी या चिमुकल्यांचा दिवाळीचा आनंद द्विगुणीत केला. वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळत तरुणांनी ग्रामस्थांच्या मदतीने लोकसहभागातून गावातील अंगणवाडी डिजिटल बनविली. अनोखा आदर्श घालून देत डिजिटल बनविलेल्या या अंगणवाडीला जयश्री थोरात यांनी भेट दिली आणि डिजिटल अंगणवाडीचे कौतुक केले.
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क कमी पटसंख्येच्या कारणावरून राज्यभरातील हजारो शाळा बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. सरकारच्या या धोरणाचा निषेध म्हणून छात्रभारती संघटनेने राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना काळा आकाश कंदील भेट पाठविला आहे. कमी पटसंख्येच्या शाळा बंद केल्याने ग्रामीण भागातील वाड्या-वस्त्यांवरील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची मोठी गैरसोय होणार आहे. दूरवर असलेल्या शाळांमध्ये विद्यार्थी-विद्यार्थिनी जाणार नाहीत. त्यामुळे अनेक विद्यार्थी-विद्यार्थिनी सरकारच्या या धोरणामुळे मुकण्याची शक्यता आहे. राज्य सरकारने कमी पटसंख्येच्या शाळा बंद केल्यास या विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होणार असल्याने छात्रभारती संघटनेने सरकारच्या या निर्णयाला विरोध दर्शविला आहे. विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहा बाहेर जाणार असल्याने छात्रभारती संघटनेने अनेक शाळांवर जाऊन यासंबंधीच्या सर्वे…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क जाणता राजा म्हणून ओळख असलेले शरद पवार केंद्रात कृषी मंत्री होते. या पवारांनीच राज्यातील सहकारी साखर कारखानदारी संपविली. अशी गंभीर टीका राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी नाशिकमध्ये केली. नाशिक साखर कारखान्याच्या पळसे येथील गळीत हंगामाचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आणि पालकमंत्री दादा भुसे, खासदार हेमंत गोडसे, आमदार देवयानी फरांदे यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी मंत्री विखे बोलत होते. विखे पाटील म्हणाले, पवार कृषिमंत्री असताना पंधरा वर्षांपूर्वीच साखर कारखानदारी संदर्भात निर्णय व्हायला हवे होते. इथेनॉल बद्दल धोरण राबवायला हवे होते. त्यांनी त्यावेळी योग्य धोरण राबविले असते तर आज राज्यातील साखर कारखाने कवडीमोल भावाने विकले…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क सहकारी साखर कारखानदारीत अवघ्या देशासाठी अनुकरणीय ठरलेल्या संगमनेरच्या सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष बाबा ओहोळ यांची महाराष्ट्र राज्य सहकारी साखर संघाच्या संचालकपदी निवड करण्यात आली आहे.माजी मंत्री काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते आणि विद्यमान आमदार बाळासाहेब थोरात यांच्या अधिपत्याखाली असलेल्या सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात साखर कारखान्याने साखर कारखानदारीत वेगवेगळे उच्चांक प्रस्थापित केले आहेत. ऊस उत्पादकांना सर्वाधिक भाव देणारा साखर कारखाना म्हणून या कारखान्याने राज्यभरात ख्याती मिळविली आहे. या कारखान्याला राष्ट्रीय पातळीवरील उत्कृष्ट ऊस विकासाचा पुरस्कार देखील मिळालेला आहे. याशिवाय या कारखान्याचे कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनादेखील गोवा येथे एका कार्यक्रमात उत्कृष्ट कार्यकारी संचालक म्हणून गौरविण्यात…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क सांत्वनपर भेटीच्या चढाओढीनंतर अखेरीस संगमनेर तालुक्यातील त्या विजेच्या दुर्घटनेत मृत पावलेल्या चार भावंडांच्या वारसांना पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते प्रत्येकी चार लाख रुपये मदतीचे धनादेश शुक्रवारी देण्यात आले. राज्याचे महसूल मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री असलेल्या राधाकृष्ण विखे पाटील यांनी शुक्रवारी पुन्हा एकदा बर्डे कुटुंबीयांची भेट घेतली. संगमनेर तालुक्यातील खंदरमाळच्या वांदरकडा येथे वीजवाहक तार पाण्यात पडल्याने झालेल्या दुर्घटनेत अनिकेत अरूण बर्डे, ओंकार अरुण बर्डे, दर्शन अजित बर्डे व विराज अजित बर्डे या चार कुमारवयीन भावंडांचा मृत्यू झाला होता. या मृत मुलांच्या वारसांना मंत्री विखे पाटील यांच्या हस्ते प्रत्येकी चार लाख रुपयांचे धनादेश आणि जनसेवा फाउंडेशनच्या वतीने…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क बापानेच आपल्या स्वत:च्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना संगमनेरमध्ये समोर आली आहे. या प्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात नातीवर झालेल्या या अत्याचाराची मुलाविरोधात आजीनेच तक्रार दिल्याने हा प्रकार समोर आला. या विकृताची पत्नी दहा वर्षापूर्वीच त्याला सोडून गेली आहे. त्यावेळेपासून दोन नातवंड व त्यांच्या वडील मुलाचा सांभाळ फिर्यादी करत आहे. मोलमजुरी करुन ही वृध्दा मुलगा आणि नातवंडाचा सांभाळ करते. आरोपी कामधंदा न करता घरीच असतो. गेल्या आठवड्यात नातीने आपल्या पोटात दुखत असल्याची तक्रार आजीकडे केली. त्यामुळे आजीने तिला घुलेवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात तपासण्यासाठी नेले. तेथून औषधे घेवून घरी आल्यानंतर आजीने नातीस पोट दुखण्याचे कारण विचारले असता…
