Author: अनंत पांगारकर
मंगळवार, १२ नोव्हेंबर पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर पोलीस उपनिरीक्षकावर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना नाशिक शहरातील पंचवटी पोलीस ठाण्याजवळ सोमवारी रात्री काढली. जखमी पोलीस उपनिरीक्षकावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. दरम्यान हल्लेखोर अंधाराचा फायदा घेत पसार झाल्याची माहिती समोर येत आहे. प्रकाश अभिमान नेमाणे असे जखमी पोलीस उपनिरीक्षकाचे नाव असून पोलीस उपनिरीक्षकावरच हल्ल्याचा प्रकार घडल्याने या घटनेमुळे नाशिकच्या पंचवटी परिसरात खळबळ उडाली आहे. या हल्ल्यात नेमाणे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्या नाकाचे हाड फ्रॅक्चर झाले असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. पंचवटी परिसरात दुसऱ्यांदा पोलीस अधिकाऱ्यावर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना समोर आले असून पोलीस संशयितांचा शोध घेत आहे. अशी घडली घटना……
मंगळवार, १२ नोव्हेंबर सर्वधर्म समभावाचे आणि शांतता असलेल्या संगमनेरमध्ये हिंदू-मुस्लिम गुण्यागोविंदाने नांदत असताना काही राजकीय शक्ती फक्त राजकारणासाठी विनाकारण दोन समाजात वाद पेटवत आहे. सोमवारी मारहाण झालेल्या घटनेतील साधू आणि मारहाण करणारे दोन्ही हिंदू समाजाचे असून केवळ बुद्धिभेद करून दोन समाजात तेढ निर्माण करणाऱ्यांकडे लक्ष देऊ नका. ज्यांनी साधूना मारहाण केली त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी संगमनेर शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) माजी शहरप्रमुख अमर कतारी यांनी केली आहे. कतारी यांनी म्हटले आहे की, सध्या राज्यभर निवडणुकीचे वातावरण आहे. संगमनेर शहर हे शांतता प्रिय आहे. परंतु काही शक्ती संगमनेर शहरात तणाव निर्माण करण्यासाठी सक्रिय झाल्या आहेत. हिंदू-मुस्लीम तेढ निर्माण करून आपली…
संगमनेर – मोहसीन शेख सर्वसामान्यांच्या प्रश्नांचा कळवळा असल्याचे भासविणाऱ्या महायुती आणि महाविकास आघाडी सरकारने आपल्या कार्यकाळात महागाईचा उच्चांक गाठला आहे. महायुतीच्या काळात उद्योगधंदे दुसऱ्या राज्यात पळविले जात हाताला काम नसल्याने सामान्य माणसाचे जीवनमान अवघड बनत चालले आहे. या पार्श्वभूमीवर सामान्यांच्या प्रश्नाची जाण असलेला वंचित बहुजन आघाडी हाच एकमेव पक्ष असून तोच आश्वासनपूर्ती करेल, यासाठी राज्यातील मतदार, संगमनेरकरांनी वंचित बहुजन आघाडीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन संगमनेर विधानसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अब्दुल अजीज वोहरा यांनी केले आहे. कोणतीही मोठी आर्थिक ताकद पाठीशी नसताना वैयक्तिक गाठीभेटीवर भर देत उमेदवार अजीज वोहरा यांनी तालुक्यातील मतदारांचे संपर्क करत आपली भूमिका…
मंगळवार १२ नोव्हेंबर अहिल्यानगर – अहिल्या नगर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रात मुंबई पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७(१)(३) अन्वये २४ नोव्हेंबर २०२४ च्या मध्यरात्री १२ वाजेपर्यंत शस्त्र व जमावबंदी आदेश जारी केला आहे. सदरचे आदेश धार्मिक कार्यक्रम, लग्नकार्य, लग्न मिरवणुका किंवा प्रेतयात्रेच्या जमावास लागू राहणार नाहीत. तसेच हा आदेश पोलीस अधिकारी, कामावर असलेल्या इतर शासकीय अधिकारी, कर्मचारी यांना, सभा अगर मिरवणूका काढण्यास रितसर परवानगी घेतली असलेल्या व्यक्तींना लागू नाही. आदेशाचा भंग करणाऱ्या विरोधात कारवाई करण्यात येईल, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे. सध्या राज्यात विधानसभा निवडणूक सुरू आहे. राज्यभरातील…
सोमवार, ११ नोव्हेंबर संगमनेर – शहरातील नवीन नगर रस्त्यालगत असलेल्या जठार हॉस्पिटल पाठीमागे सोमवारी दुपारी चार साधूंना दोन जणांनी मारहाण करण्याची घटना घडली. मारहाणीत जखमी झालेल्या साधूंवर घुलेवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान मारहाण करणाऱ्या दोन्ही आरोपींची ओळख पटली असून त्यांचा शोध सुरू असल्याची माहिती शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांनी दिली आहे. पोलीस निरीक्षक देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी (११ नोव्हेंबर) दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास साधू वेश्यातील चार लोक जठार हॉस्पिटल पाठीमागून नवीन नगर रस्त्याकडे जात असताना दोन अनोळखी तरुणांनी त्यांना रस्त्यात आढळून मारहाण केली. मारहानीनंतर आरोपी…
सोमवार, ११ नोव्हेंबर बटेंगे तो कटेंगे म्हणविणाऱ्यांनी महाराष्ट्रातील युवकांचा रोजगार काटला आहे. महायुतीचा निवडणूक जाहीरनामा नुकताच अमित शहा यांनी जाहीर केला आहे. पंधरा लाख रुपये हा निवडणूक जुमला होता, असे सांगणारे हेच ते अमित शहा आहे. त्यामुळे महायुतीचा हा जाहीरनामा म्हणजे नवा जुमला असल्याचे प्रतिपादन खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केले. महाविकास आघाडीचे संगमनेरमधील उमेदवार बाळासाहेब थोरात यांच्या प्रचारार्थ खासदार कोल्हे यांच्या उपस्थितीत संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे येथे रविवारी महाविकास आघाडीच्या वतीने भव्य युवक मेळावा आयोजित करण्यात आला होता. युवकांच्या या मेळाव्यात खासदार कोल्हे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर उमेदवार बाळासाहेब थोरात यांच्यासह राज्याचे माजी मंत्री अमित देशमुख, नगर दक्षिणचे खासदार…
सोमवार, ११ नोव्हेंबर संगमनेर – राजकारणाच्या हल्लीच्या बजबजपुरीतील नेत्यांची ओळख टक्केवारीमुळे होत आहे. मात्र संगमनेरच्या नेतृत्वाची ओळख राज्यभरात कर्तुत्वाने होत आहे. राज्याच्या राजकारणातील सुसंस्कृत, स्वच्छ प्रतिमा आणि निष्कलंक नेतृत्व असलेल्या आमदार थोरात यांनी सततच्या विकास कामातून तालुक्याचा कायापालट केला आहे. सुसंस्कृत नेत्यांची परंपरा जपणारे हे नेतृत्व असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री अमित देशमुख यांनी केले. संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे येथे रविवारी काँग्रेस, महाविकास आघाडीच्या वतीने देशमुख यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या युवक निर्धार मेळाव्यात ते बोलत होते. व्यासपीठावर काँग्रेसचे विधिमंडळ पक्ष नेते आमदार बाळासाहेब थोरात, शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे, खासदार निलेश लंके, खासदार भाऊसाहेब वाकचौरे, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, डॉ.…
संगमनेर हादरले, सुभाष लोळगे यांच्या कान्हा ज्वेलर्सवर दरोडा दुचाकीवरून आले पाच दरोडेखोर… सोमवार, ११ नोव्हेंबर संगमनेर – संगमनेरच्या साकुरमधून खळबळ माजविणारी घटना समोर आली आहे. हवेत गोळीबार करत दरोडेखोरांनी ज्वेलर्स दुकानावर दरोडा टाकत दागिन्यांची लूट केली आहे. साकुर मधील सुभाष लोळगे यांच्या कान्हा ज्वेलर्स या दुकानात दुपारी पावणेदोन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असून परिसरात यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. साकुर बस स्थानकाजवळ गजबजलेल्या परिसरात निखिल सुभाष लोळगे यांचे ‘कान्हा ज्वेलर्स’ नावाने सोन्याचे दागिने विक्रीचे दुकान आहे. पावणे दोन वाजण्याच्या सुमारास दुकानातील कामगार जेवण करण्यासाठी गेले असता दुकानात एक कामगार असल्याचे संधी साधून पल्सर दुचाकीवरून आलेल्या पाच जणांनी दुकानासमोर हवेत…
सोमवार, ११ नोव्हेंबर संगमनेर – मोहसीन शेख राज्यात विविध समाज त्यांच्या हक्कासाठी वाटत असताना मुस्लिम समाजाने देखील निवडणूक आपल्या स्वाभिमानाची असल्याची जाणीव ठेवत वंचित बहुजन आघाडीच्या मागे उभे राहण्याची आवश्यकता आहे. समाजाचे प्रश्न सोडविण्याचे ताकद वंचित चे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्यात आहे. त्यांची ताकद वाढविण्यासाठी संगमनेर मधून मुस्लिम समाजाने वंचितला मतदान करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अब्दुल अजीज वोहरा यांनी केले. राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी प्रमुख उमेदवारांच्या प्रचाराने वेग पकडला आहे. संगमनेर विधानसभा मतदारसंघात प्रस्थापिताविरोधात वंचित बहुजन आघाडीने अब्दुल अजीज वोहरा यांना उमेदवारी दिली आहे. या मतदारसंघात सुरुवातीलाच वोहरा यांची उमेदवारी जाहीर झाल्याने त्यांना प्रचारासाठी मोठा अवधी मिळाला.…
सोमवार, ११ नोव्हेंबर मुंबई – विधानसभा निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराविरुद्ध बंडखोरी करणाऱ्या राज्यातील २१ जणांवर काँग्रेस पक्षाने ६ वर्षांसाठी निलंबनाची मोठी कारवाई केली आहे. निलंबनाची कारवाई करण्यात आलेल्यामध्ये अहमदनगर शहरमधून मंगल विलास भुजबळ यांचा देखील समावेश आहे. काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या आदेशावरून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या निर्देशाने ही कारवाई करण्यात आली असल्याची माहिती काँग्रेसचे उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना गावंडे यांनी दिली आहे. विधानसभा निवडणुकीत १६ मतदार संघात महाविकास आघाडीचे उमेदवार तसेच काँग्रेसच्या अधिकृत उमेदवारांविरोधात बंडखोरी झाले आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षाने या सर्व बंडखोरांवर सहा वर्षांसाठी निलंबनाची कारवाई केली. या बंडखोर उमेदवारांवर झाली निलंबनाची कारवाई… (कंसात मतदार संघ) आनंदराव गेडाम,…
