Author: अनंत पांगारकर
रविवार, ११ ऑगस्ट राहाता | महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क राजकिय आकसापोटी कर्ज नाकारले जात असल्याच्या भावनेतुन श्रीगणेश सहकारी साखर कारखान्याच्या सभासद, शेतकरी व कामगारांचे जिल्हा बँकेच्या विरोधातील सोमवारी (दि. १२ ऑगस्ट) आयोजित केलेले आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे, अशी माहिती गणेश कारखान्याचे अध्यक्ष सुधीरराव लहारे पाटील व उपाध्यक्ष विजयराव दंडवते पाटील यांनी दिली. श्रीगणेश सहकारी साखर कारखान्याने सन २०२४-२०२५ या हंगामाकरिता कर्ज मागणीचा प्रस्ताव जिल्हा सहकारी बँकेकडे पाठविला होता. हा प्रस्ताव जिल्हा बँकेने राजकिय आकसापोटी नाकारला. मागील हंगामातही ४० कोटी रुपये कर्ज मंजुर केले होते, ते मात्र शेवटच्या क्षणी नाकारले होते. याही वेळी कारखान्याने प्रस्ताव दाखल केला, तो नाकारला.…
विद्यार्थ्यांची आंदोलनं चिरडण्यासाठी लोकभावनेचा अनादर करायचा, विरोधकांना तुरुंगात डांबून ठेवायचं, सोशल मिडियावर निर्बंध घालायचे, इंटरनेटवर बंदी आणून जाणून घेण्याचा मार्ग रोखायचा आणि ज्यांनी आवाज उठवायचा त्या मिडियाला हाताशी घेऊन ती एकतर्फी कार्यरत राहील, आपले गुणगाण करेल असे मार्ग अवलंबल्याचा फटका म्हणजे आजची बांगलादेशची स्थिती होय. युनूस यांनी व्यक्त केलेल्या भावनांचा दुसर्या बाजूने विचार केला तर भारतात याहून वेगळं काही घडतं असं नाही. बांगलादेशमध्ये खासगीकरणाला नको इतकं महत्व दिल्याने सरकारी नोकर्या राहिल्या नाहीत. खासगी उद्योगांमध्ये आरक्षण हा मुद्दाच नसल्याने तिथे दाद मागायचा अधिकार राहिला नाही. भारतात याहून वेगळं काय सुरू आहे? भारतापासून फुटून निघालेल्या पाकिस्तान या देशाची इंदिराजींच्या नेतृत्वाखालील सरकारने प्रसंगी…
★ शिवसेना भगवा सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर शिवसैनिक म्हणतात… होय, आम्ही फक्त साहेबांचाच आदेश मानतो…! ★ राज्यात सर्वत्र भगवा सप्ताह आयोजनाच्या बैठका सुरू असताना संगमनेरात अद्यापही शांतता ★ शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांच्या आदेशाचे पालन करण्यासाठी अखेर शिवसैनिक सरसावले शनिवार, १० ऑगस्ट | संगमनेर शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ४ ते ११ सप्टेंबर या कालावधीत राज्यात भगवा सप्ताहाचे आयोजन केले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशावरून राज्यात भगवा सप्ताहाची तयारी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नियोजन बैठकांनी वेग घेतला असताना संगमनेरात मात्र अद्यापही शांतता दिसत आहे. यामुळे शिवसैनिकांमध्ये मात्र अस्वस्थता निर्माण झाली आहे. भगवा सप्ताह काळात विविध सामाजिक उपक्रमाचे…
शनिवार, १० ऑगस्ट शनिवारी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास संगमनेर शहर पोलिसांनी शहरातील दोन ठिकाणी तीन गॅस रिपेरिंग सेंटरवर छापे टाकले. या दोन्ही ठिकाणाहून भारत गॅस, एचपी गॅस, इंडेन गॅसच्या घरगुती वापराच्या टाक्यांसह, एक मारुती ओमनी कार, रिफिलिंगसाठी वापरण्यात येणारे सुमारे पंधरा लाख रुपयांचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. शहरातील अलकानगर परिसरात हावडा ब्रिजच्या पाठीमागे एका लोखंडी टपरीमध्ये व जोर्वे नाका या ठिकाणी ही कारवाई करण्यात आली. पहिल्या कारवाईत मोहसीन रफिक शेख, वय ३५ वर्ष, इम्रान रऊफ शेख वय ३८ वर्ष, व इम्तियाज रफिक शेख (तिघे रा. अलकानगर, संगमनेर) या तिघांवर तर दुसऱ्या कारवाईत सोहेल शकील शेख वय ३४ वर्ष, रा.…
शनिवार, १० ऑगस्ट अहमदनगर जिल्ह्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र ठरलेल्या महिलांची शुक्रवारी सायंकाळपर्यंतची आकडेवारी समोर आली आहे. योजनेसाठी २१ ते ६५ वयोगटातील तब्बल सात लाख आठ हजार महिलांचे अर्ज आले असून त्यापैकी २५ हजार महिलांच्या अर्जात त्रुटी आढळून आल्या आहेत. योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज भरण्याची मुदत ३१ ऑगस्टपर्यंत आहे. त्यामुळे या संकेत मोठ्या संख्येने वाढ होण्याची चिन्हे आहेत. दाखल झालेल्या अर्जांपैकी जवळपास दाखल झालेल्या अर्जांपैकी जवळपास २५ हजार अर्ज अपात्र ठरविण्यात आले असून या सर्वांना योजनेचा फायदा घेण्यासाठी नव्याने अर्ज भरावे लागणार आहे. त्यानंतर या अर्जांची पुर्नपडताळणी केली जाणार आहे. शुक्रवारी सायंकाळपर्यंत योजनेसाठी पात्र ठरलेल्या लाभार्थी महिलांची संख्या…
शनिवार, १० ऑगस्ट मराठा आरक्षण आंदोलकांचे नेते मनोज जरांगे सोमवारी नगर शहरात शांतता रॅली काढणार असल्याने या रॅलीच्या पार्श्वभूमीवर नगर शहर व उपनगरातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. शिक्षण विभागाकडून तसे परिपत्रक सर्व शाळांना पाठविण्यात आले आहे. जरांगे यांच्या शांतता रॅली वेळी होणाऱ्या गर्दीचा विचार करून विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी शिक्षण विभागाने हा निर्णय घेतला आहे. यासंबंधीचे परिपत्रक प्राथमिक शिक्षणाधिकारी भास्कर पाटील व माध्यमिक शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांनी संयुक्तपणे नगर शहर व उपनगरातील शाळांना पाठविले. जरांगे सोमवारी पुण्याहून नगर मध्ये येत आहे. यावेळी केडगाव उपनगरात त्यांचे स्वागत करण्यात येणार असून तेथून माळीवाडा, बस स्थानक परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला…
शनिवार, १० ऑगस्ट मुंबईतील दोघा व्यावसायिकांनी अहमदनगरमधील एका व्यावसायिकाची ७५ लाख ४४ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. कंपनीतून पाठविलेल्या प्लायवूड आणि पार्टिकल बोर्डच्या मालाचे पैसे न देता ही फसवणूक झाल्याचे व्यावसायिकाने आपल्या तक्रारीत म्हटले आहे. या संदर्भात नगरमधील व्यावसायिक सुरेंद्र मोतीलाल लोढा (रा. माणिकनगर, आनंदऋषी हॉस्पिटल मागे, नगर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नगरच्या कोतवाली पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हरीकिसन भट्टड आणि ब्रिजेश भट्टड (पूर्ण नाव माहित नाही दोघे रा. १०४, बालाजी भवन, नरिमन पॉईंट, मुंबई) अशी फसवणूक करणाऱ्या आणि गुन्हा दाखल झालेल्या मुंबईतील व्यावसायिकांची नावे आहे. लोढा यांचे एस. मोतीलाल इंडस्ट्रीज नावाची कंपनी…
शनिवार, १० ऑगस्ट लोकसभा निवडणुकीवेळी प्रचारासाठी आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आपण शरद पवार यांच्यावर काही बोलू नये, अशी विनंती पुण्यात केली होती, पण मोदींनी प्रचार सभेत शरद पवारांचा उल्लेख ‘भटकती आत्मा’ असा केला. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत त्याचा मोठा फटका महायुतीला बसला असल्याची कबुली उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. नाशिक दौऱ्यावर असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत छगन भुजबळ यांच्या येवला येथील कार्यालयात महायुतीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांची बैठक झाली. यावेळी महाराष्ट्रातील जागा कमी का झाल्या याबाबत चर्चा करताना अजित पवार यांनी उपस्थित त्यांना निवडणुकीवेळी घडलेला हा किस्सा सांगितला. बैठकीत नाशिक लोकसभा मतदारसंघातील पराभवाबाबत चर्चा झाली. एका विधानसभा निवडणुकीत नाशिक जिल्ह्यातून महायुतीच्या…
शुक्रवार, ०९ ऑगस्ट विशेष प्रतिनिधी / मुंबई राज्यात आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अनेक नेत्यांचे दौरे सुरू झाले असून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचाही मराठवाडा दौरा सुरू झाला आहे. सोलापूर जिल्ह्यातून राज ठाकरेंच्या दौऱ्याला सुरुवात झाली. मात्र, या दौऱ्यादरम्यान महाराष्ट्राला आरक्षणाची गरज नाही, असं विधान राज ठाकरेंनी केल्यानंतर मराठा समाज आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. धाराशिव जिल्ह्यात मराठा आंदोलकांनी राज ठाकरेंच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन केलं. राज ठाकरेंविरुद्ध घोषणाबाजीही करण्यात आली होती. त्यानंतर, राज ठाकरे आणि मराठा आंदोलकांमध्ये संवादही झाल्याचं पाहायला मिळालं. आता, हिंगोलीतून राज ठाकरेंचा दौरा बीड जिल्ह्यात पोहोचला असता, शिवसेना ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी राज ठाकरेंचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला. राज ठाकरे…
शुक्रवार, ०९ ऑगस्ट संगमनेर – जिल्ह्याचे पालकमंत्री तथा विद्यमान महसूल मंत्री यांनी संगमनेरमध्ये महसूल सप्ताहानिमित्त विविध दाखल्यांच्या वितरणाचा कार्यक्रम ठेवला. मात्र या कार्यक्रमात लाभार्थी आणि नागरिकांनी मोठी उदासीनता दाखवली, कार्यक्रमाला सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना उपस्थिती बंधनकारक करून कार्यक्रम करणे चुकीचे असल्याची टीका काँग्रेसचे शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे यांनी केली आहे याबाबत पत्रकाद्वारे दिवटे यांनी म्हटले आहे की, सरकारच्या योजना ह्या सर्वसामान्य जनतेच्या असतात. सरकार हे कोणत्याही एका व्यक्तीचे नसते. मात्र अहमदनगर जिल्ह्यात संपूर्णपणे चुकीचे चित्र निर्माण केले जात आहे. पालकमंत्र्याच्या नावाखाली भाजपचे काही कार्यकर्ते संगमनेरमध्ये दमदाटी करत आहेत. अशा वर्तनामुळे महसूलमंत्र्यांच्या कार्यक्रमाला लाभार्थी व नागरिकांनी मोठी उदासीनता दाखवली असल्याचे म्हटले आहे. काही…
