Author: अनंत पांगारकर

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क अनाथ युवतीवर शिर्डीत सामूहिक अत्याचार झाल्याची घटना समोर आल्यानंतर याप्रकरणी दोघांना अटक केली आहे. तर आणखी एकाला ताब्यात घेतले असून पोलीस त्याची अधिक चौकशी करीत आहेत. अनाथालयात राहत असलेली ही युवती रागाच्या भरात निघून गेली होती. त्यानंतर तिच्यावर शिर्डीत पाच जणांनी सामूहिक अत्याचार केल्याचं समोर आलं. पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी व्यक्तिशः या प्रकरणात लक्ष घालत शिर्डीत भेट देत तपासासाठी सूचना केल्या होत्या. त्यानंतर पोलीस तपासाला गती आली. या युवतीवर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. तिने दिलेल्या जबाबावरून पाच जणांविरूध्द सामुहिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनाथ युवतीवरील सामूहिक अत्याचारप्रकरणी दोघांना अटक केल्याची माहिती सहायक निरीक्षक…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क  अचानकपणे रस्ता ओलांडण्याच्या प्रयत्नात असलेल्या शाळकरी मुलीला वाचविण्यासाठी कार चालकाने अचानक कारचा ब्रेक दाबल्याने कार पलटी झाली. या अपघातात कारमधील एकजण जागीच ठार झाला. तर मुलीसह आठजण गंभीर जखमी झाले आहेत. विजय शंकर डेरे (वय-६२, रा. नारायणगाव, जि. पुणे) असे मृत्यू झालेल्या कारमधील व्यक्तीचे नाव आहे. शुक्रवारी दुपारी तीन वाजता नाशिक-पुणे महामार्गावरील डोळासने शिवारामध्ये बाबळेवाडी येथे हा अपघात झाला. अपघातात विजय शंकर डेरे यांचा मृत्यू झाला असून कारमधील रोहित विजय डेरे (वय-२३), उज्वला विजय डेरे (वय-४८), मोहित विजय डेरे (वय-३०), सविता अनिल शेटे (वय-४८), शैला दिलीप वारुळे (वय-५८), विनायक शिवाजी डेरे (वय-५०) (सर्व रा. नारायणगाव, पुणे),…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क लाखभर रुपयांच्या कर्जासाठी शेतकरी आत्महत्या करतात. शेतकऱ्यांचे लाखाचे कर्ज माफ होत नाही मात्र, उद्योगपतींना कोट्यावधी रुपये माफ केले जातात. देशाचे पंतप्रधान आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी प्रेमाने जर शेतकऱ्यांचा आवाज ऐकला, त्यांना मदत केली तर शेतकरी आत्महत्या करणार नाहीत. देशाच्या कानाकोपऱ्यात आज भाजपने हिंसा द्वेष आणि दहशत पसरविली आहे. या दहशत द्वेष आणि हिंसेविरोधात ही भारत जोडो यात्रा सुरू असल्याचे प्रतिपादन काँग्रेस नेते, खासदार राहुल गांधी यांनी केले. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो यात्रा आज शेगाव मध्ये आली. यावेळी झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी के. सी. वेणुगोपाल, एच. के. पाटील, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ पक्षनेते…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क अहमदनगर महापालिकेचे तत्कालिन महापौर, नगरसेवक आणि अधिकाऱ्यांना हाताशी धरुन पदाचा गैरवापर करत महापालिकेकडून कोट्यावधी रुपयांची थकबाकी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व खासदार डॉ. सुजय विखे पाटील या पिता-पुत्रांनी माफ करुन घेतल्याचे प्रकरण समोर आले आहे. याप्रकरणी मंत्री राधाकृष्ण विखे, खासदार डॉ. सुजय विखे, तत्कालिन महापौर आणि दोन सूचक अनुमोदक नगरसेवकांवर गुन्हा दाखल करावा व त्यांना अपात्र ठरवावे, अशी तक्रार शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख गिरीष जाधव यांनी केली आहे. जाधव यांनी तक्रारीसोबत पुरावे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पाठविले आहे. पदाचा दुरुपयोग करत कोट्यावधी रुपयांची थकबाकी माफ करुन समोर आल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. तक्रार अर्जाच्या प्रती जाधव यांनी मुख्यमंत्री…

Read More

लोकांचा भाजपावर विश्वास वाढत असल्याने सत्ताधाऱ्यांच्या पायाखालची वाळु सरकू लागलीय! महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्यासाठी जागेसह यापूर्वीच पालिकेने ५० लाखाचा निधी मंजूर केल्याचा आणि आमदार बाळासाहेब थोरात, आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या नेतृत्वाखाली छत्रपतींचा अश्वारुढ पुतळा साकारणार असल्याचा माजी नगरसेवक सोमेश्वर दिवटे यांच्या विधानाचा माजी उपनगराध्यक्ष जावेद जहागिरदार यांनी समाचार घेत सर्व आरोप खोटे असल्याचे म्हटले आहे. जहागिरदार यांनी एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे पालिकेतील कारभार कसा चालतो, याची माहिती देत दिवटेंना ‘माझ्याकडे ट्युशन लावा, म्हणजे पालिकेचा कारभार माहिती होईल’ अशा शब्दात त्यांच्या आरोपांना उत्तरे दिली आहे. ४० वर्षापासून आमदार बाळासाहेब थोरात शहर व तालुक्याचे नेतृत्व करतात. डॉ. सुधीर…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क राज्यातील गायरान जमिनींवरील आक्रमणे काढण्याबाबत उच्च न्यायालयाने निर्णय घेतला असून ग्रामीण भागामध्ये गोरगरीब नागरिक गायरान जमिनीवर गेल्या अनेक वर्षांपासून वास्तव्य करीत आहेत. या नागरिकांना दिलासा देण्याकरिता राज्य सरकारने ही कार्यवाही थांबवण्यासाठी तातडीने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करावी, अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात व नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी राज्य सरकारकडे केली आहे.गायरान जमिनीबाबत उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे राज्यभरातील ग्रामीण भागातील गोरगरीब व आदिवासी नागरिकांमध्ये अस्वस्थतेचे व भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात व नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी एका पत्राद्वारे…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क उत्तर नगर जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाने राबविलेल्या ‘धन्यवाद मोदीजी’ अभियानाने राज्यात वरचे स्थान मिळविले आहे. अभियानात उत्तर नगर जिल्ह्याचा समावेश पहिल्या पाच जिल्ह्यात करण्यात आला असल्याची माहिती देण्यात आली आहे. भारतीय जनता पार्टीचे उत्तर नगर जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तर नगर जिल्ह्यात ‘धन्यवाद मोदीजी’ अभियान कार्यक्षमतेने राबविले. अभियानाने राज्यात पहिल्या पाच जिल्ह्यात स्थान प्राप्त केल्याने अभियानाचे संयोजक राजेंद्र सांगळे, सहसंयोजक अनिल भनगडे, अंकुश काळे यांच्यासह भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष श्रीराज डेरे यांच्यासह उत्तर नगर जिल्ह्यातील कार्यकर्त्यांचे अभिनंदन होत आहे. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात हे अभियान राबविण्यात आले. एकट्या उत्तर नगर…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांविरोधी वक्तव्य केल्याने राज्यात विविध पक्ष त्यांचा निषेध करत असतानाच आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही या वादात ऊडी घेतली आहे. राहुल गांधी यांना काळे झेंडे दाखवा असा आदेश मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना दिला आहे. खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो यात्रा उद्या शेगावमध्ये दाखल होत आहे. शेगावमध्ये त्यांच्या सभेचे आयोजन देखील करण्यात आले असून या सभेची जय्यत तयारी केली जात आहे. सावरकर विरोधी वक्तव्य करणाऱ्या गांधी यांना शेगावमध्ये जाऊन काळे झेंडे दाखवा, असे आदेश मनसे प्रमुखांनी दिल्याने उद्या शेगाव मध्ये मनसैनिक मोठ्या संख्येने दाखल होण्याची शक्यता आहे.…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क अवघ्या 18 जणांच्या साक्षीने प्रबोधनकारांच्या खोलीमध्ये शिवसेनेची स्थापना झाली. मराठी माणसाचे हित जोपासण्यासाठी स्थापन झालेल्या या शिवसेनेची पाळेमुळे महाराष्ट्रभर रुजली आहे. शिवसेनेच्या जोरावर मोठी पदे मानसन्मान मिळविणाऱ्या अनेकांनी शिवसेना सोडत तिला कमकुवत करण्याचे प्रयत्न केले, मात्र प्रत्येक वेळी शिवसेना नव्या जोमाने उभी राहिल्याचे चित्र आहे. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हा या शिवसेनेचा आत्मा राहिला आहे. सामाजिक संघटना ते राजकीय पक्ष या शिवसेनेच्या इतिहासाचे अनेक जण साक्षीदार आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आज हयात नसले तरीदेखील याच नावाभोवती समाजकारणच नाही तर सत्ताकारणही केंद्रीभूत झाल्याचे दिसते. दहा वर्षानंतर देखील या नावाची जादू अद्यापही ओसरली नाही उलट, हे नाव…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क बड्या राजकीय नेत्यांची धक्क्यांची मालिका संपण्याची चिन्हे नाहीत, आता राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्या अधिपत्याखाली असलेला जळगाव दूध संघ ताब्यात घेण्यासाठी भाजप आणि शिंदे गट एकत्र आले आहे. यामुळे दूध संघाची निवडणूक गाजण्याची चिन्हे निर्माण झाली असून वातावरण चांगलेच तापले आहे. भाजपचे आमदार मंगेश चव्हाण यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेली याचिका औरंगाबाद खंडपीठाने फेटाळली आहे, चव्हाण यांच्या उमेदवारीला हरकत घेणारी ही याचिका फेटाळल्याने दूध संघाच्या निवडणूकीत खडसे यांच्यासमोरील अडचणीत वाढ झाली असल्याचे मानले जाते. भाजपचे आमदार मंगेश चव्हाण हे मुक्ताईनगर तालुक्यात सभासद नसतांना त्यांनी दाखल केलेली उमेदवारी रद्द करावी, या मागणीसाठी मंदाकिनी खडसे यांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका…

Read More