Author: अनंत पांगारकर
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क ११ विज्ञान व १२ विज्ञान शाखेमधील प्रवेशीत सर्व मागासवर्गीय विद्यार्थ्यांना ‘जात प्रमाणपत्रा’अभावी ‘जात वैधता प्रमाणपत्र’ मिळण्यात अडचणी येतात. तेव्हा ’मंडणगड पॅटर्न‘ च्या धर्तीवर अहमदनगर जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती विद्यार्थ्यांना ‘जात प्रमाणपत्र’ मिळवून देण्यासाठी सहाय्य करणार आहे. यामुळे विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी ऐनवेळी विद्यार्थ्याची होणारी धावपळ वाचणार आहे. अशी माहिती अहमदनगर जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समितीचे अध्यक्ष तथा अपर जिल्हाधिकारी (निवड श्रेणी) विकास मारूती पानसरे यांनी आज येथे दिली. ‘मंडणगड पॅटर्न’ च्या धर्तीवर महाविद्यालयातच ”जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र” देण्याचा उपक्रमास अहमदनगर जिल्ह्यात सुरूवात करण्यात येणार आहे. यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक व संबंधित काम पाहणारे…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क वाहतुकीच्या दृष्टीने नगर जिल्ह्यातील सर्वाधिक महत्त्वाचा असलेल्या अहमदनगर- मनमाड या महामार्गाच्या दुरुस्तीच्या कामामुळे अवजड वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली होती. मात्र रस्ता दुरूस्तीचे काम अद्याप पूर्ण न झाल्यामुळे पुन्हा १९ नोव्हेंबर २०२२ पर्यंत अहमदनगर-मनमाड महामार्गाची वाहतूक पर्यायी मार्गानेच सुरू राहणार आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. अहमदनगर – मनमाड या महामार्गावरील अवजड वाहतूकीस विळद घाट व पुणतांबा फाटा येथून खालील पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे. अहमदनगर-पुणे-सोलापूरकडून मनमाडकडे जाणारी वाहतूक कल्याण बायपास चौक -अहमदनगर कल्याण महामार्गावरून आळेफाटा- संगमनेर मार्गे नाशिककडे किंवा विळद घाट – दूध डेअरी चौक- शेंडी बायपास, अहमदनगर…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क पक्ष चिन्ह गोठविण्याच्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या विरोधात शिवसेना उद्धव ठाकरे गटाने दाखल केलेली याचिका दिल्ली हायकोर्टाने फेटाळून लावली आहे. याशिवाय पक्ष चिन्हाचा निर्णय तातडीने घेण्याचे आदेश निवडणूक आयोगाला देण्यात आले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेतून बंड केलेल्या आमदारांनी शिंदे यांचे नेतृत्वाखाली आपला गट स्थापन करत आमचीच खरी शिवसेना असल्याचा दावा केला होता. यावरून ठाकरे आणि शिंदे गटांमध्ये रंगलेले युद्ध थेट न्यायालयापर्यंत जाऊन पोहोचले. अंधेरी पोट निवडणुकीपूर्वी निवडणूक आयोगाने शिवसेना हे पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह गोठविले. आणि उद्धव ठाकरे यांच्या गटाला शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव आणि ‘मशाल’ निवडणूक चिन्ह दिले तर,…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क राज्यात आता पूर्वीचे सरकार राहिलेले नाही, त्यामुळे तुम्हाला एखाद्या गोष्टीला विरोध करायचा असेल तर तो नियमात राहूनच करावा लागेल. आधी राज्यांमध्ये गुंडाराज सरकार होते, आता मात्र चांगले सरकार सत्तेवर आल्याचे उपमुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी म्हटले आहे. राष्ट्रवादीचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या संदर्भातील विचारलेल्या प्रश्नावर बोलताना त्यांनी हे उत्तर दिले आहे. आव्हाड यांच्या विरोधात ज्या महिलेने विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे, त्या संदर्भात अधिक भाष्य न करता त्यांनी याबाबत तिच्याशी बोलेन त्यानंतरच यावर बोलणे उचित राहील असे त्या म्हणाल्या. मात्र आता महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत नाहीये, त्यामुळे कोणते खोटे होणे आता दाखल होणार नाही हे…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क पालिकेतील विद्यमान पदाधिकाऱ्यांचा कालावधी संपत असतांना करण्यात आलेल्या रस्त्यांच्या कामाचा वर्षाच्या आतच बोजवारा उडाला आहे. रस्ते बनवितांना पुरेसे डांबर न वापरल्याने खडी उघडी पडली, क्रॉक्रीटीकरण करतांना निकृष्ठ व पुरेसे सिमेंट वापरले नाही. जे रस्ते किमान पाच वर्ष टिकणे अपेक्षित होते, त्याची वर्षातच दुरवस्था झाल्याचे भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या रस्ते निरीक्षण पाहणीत समोर आले. येत्या निवडणूकीत रस्त्याचा विषय कळीचा मुद्दा बनविण्यासाठी त्याचे चित्रीकरण करण्यात आले आहे. रस्ते निरीक्षण पाहणी अभियानात भाजपाचे माजी नगरसेवक व शहराध्यक्ष श्रीराम गणपुले, माजी नगरसेवक शिरीष मुळे, माजी नगरसेवक ज्ञानेश्वर कर्पे, माजी उपनगराध्यक्ष व शहर संगठन सरचिटणीस जावेद जहागीरदार, उपाध्यक्ष सुनील खरे, भाऊ…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क जाती-धर्माच्या नावावर देशात राजकारण सुरू असून वाढलेली महागाई, बेरोजगारी याविरुद्ध आवाज उठवत प्रेमाचा व एकतेचा संदेश देणारी खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो यात्रा ही महात्मा गांधींच्या नेतृत्वाखालील दांडीयात्रेप्रमाणे ऐतिहासिक ठरणार असल्याचे गौरवोद्गार भारत जोडो यात्रेचे समन्वयक कॉग्रेसचे ज्येष्ठ नेते, आमदार बाळासाहेब थोरात यांनी काढले आहे. खासदार राहुल गांधी यांची ‘कन्याकुमारी ते काश्मीर’ ही सुरू असलेली भारत जोडो यात्रा सध्या महाराष्ट्रात असून महाराष्ट्रातील सर्व ठिकाणच्या तयारीचे व नियोजन जबाबदारी विधिमंडळ पक्षनेते आमदार थोरात यांचेवर असून ते यात्रेचे समन्वयक आहेत. थोरात म्हणाले, भारत जोडो यात्रेमध्ये देशभरातील पुरोगामी विचारांच्या संघटना आणि मित्र पक्षांचा मोठा पाठिंबा लाभत आहे.…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क हे कायद्याचे राज्य आहे. सरकार नियमानुसार चालते. लोकशाही मार्गाने आंदोलन केले जाऊ शकते. परंतु कायदा हातात घेणे कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नाही असा सज्जड इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार जितेंद्र आव्हाड विनयभंग प्रकरणावर दिला आहे. आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर काही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. नासिक-मुंबई महामार्गावर जाळपोळ करण्यात आली, यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारले असता त्यांनी स्पष्ट प्रतिक्रिया दिली. मुख्यमंत्री म्हणाले कोणत्याही प्रकारचा राजकीय दबाव पोलिसांवर नाही. तसा दबाव टाकला ही जाणार नाही. पोलीस नियमानुसार गुन्ह्याची चौकशी करतील. तपास करतील, पडताळणी करतील. जी काही तक्रार असेल त्यात तर त्या…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क शिवसेना ठाकरे गटाचे प्रवक्ते खासदार आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी मंत्री आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावरील खोटे गुन्हे मागे घेतल्यास मी तीन सहकारी नगरसेविकांसह बिनशर्त शिंदे गटामध्ये प्रवेश करण्यास तयार आहे. अशा आशयाचे पत्र नाशिकच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माजी नगरसेविका किरण गामणे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठविले आहे. विरोधकांवरच गुन्हे दाखल होत असून त्यांच्यावरच सरकार सूडबुद्धीने कारवाई करतय असा आरोप होत असतानाच आता नाशिकच्या ठाकरे गटाच्या एका माजी नगरसेविकेने यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना या पत्राद्वारे लक्ष करत त्यांच्यावर निशाना साधला आहे. त्यांच्या या उपरोधिक पत्राची आता चांगलीच…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क संगमनेर येथील शिक्षण प्रसारक संस्थेच्या महाविद्यालयात मागील दहा वर्षांपासून पुणे विद्यापीठाचे पदव्युत्तर पत्रकारिता पदविका अभ्यासक्रमाचे वर्ग चालविले जातात. नुकताच सन २०२१ -२२ या वर्षाचा निकाल जाहीर झाला आहे आणि पुढील वर्षाची प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. कोणत्याही विद्याशाखेची पदवी असलेल्यांना या अभ्यासक्रमाला प्रवेश घेता येईल, अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण गायकवाड यांनी दिली आहे. ज्येष्ठ मुक्त पत्रकार डॉ. संतोष खेडलेकर यांच्या मार्गदर्शनाखाली मागील दहा वर्षांपासून हा अभ्यासक्रम सुरु आहे. पत्रकारिता करू इच्छिणाऱ्यांबरोबरच शिक्षक, वेगवेगळ्या आस्थापनात प्रसिद्धी प्रमुख म्हणून काम करणारे किंवा करू इच्छिणाऱ्यांना हा पदविका अभ्यासक्रम उपयुक्त आहे. वेगवेगळ्या प्रकारचे उत्तम लेखन कौशल्य, दूरचित्रवाणीवरील विविध…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क शनिवारी झालेल्या राष्ट्रीय लोक न्यायालयाच्या माध्यमातून संगमनेर पंचायत समितीने तालुक्यातील विविध ग्रामपंचायतीच्या थकलेल्या घरपट्टी व पाणीपट्टीची तब्बल साठ लाख रुपयांची वसुली करण्यात यश मिळविले आहे अहमदनगर जिल्ह्यात अशा प्रकारची वसुली करण्यात संगमनेर पंचायत समिती अव्वल ठरली. गावच्या विकासात ग्रामपंचायतीचे योगदान महत्वाचे आहे. त्याकरीता घरपट्टी व पाणीपट्टीची वसूली देखील महत्वाची आहे. जनतेने सदरचा कर वेळेत भरल्यास विकासाच्या प्रक्रियेला हातभार लागण्यास मदत होते. नागरिकांनी कोणत्याही सरकारी कराचा भरणा करणे त्यांच्या हिताचे असते, मात्र ग्रामपंचायतीचा घरपट्टी, पाणीपट्टीचा कर थकविणारे अनेक महाभाग आहेत. वारंवार मागणी करून देखील घरपट्टी पाणीपट्टीचा भरणा न करणाऱ्या संगमनेर तालुक्यातील १०२२० खातेदारांविरोधात थकबाकीचा भरणा करण्यासंबंधीच्या नोटीसा…
