Author: अनंत पांगारकर
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क सहकारी साखर कारखाना चालविणे येड्या गबाळ्याचे काम नाही. कारखान्याने एखादे कर्ज पाच-सात वर्षात फेडणे अपेक्षित आहे. मात्र आख्खी पिढी गेली तरी कारखान्याच्या कर्जाचा बोजा कायम आहे. ऋण काढून सण साजरा करण्यासारखं कर्ज काढून भाव द्यायचा नसतो, असे सहकाराचे धडे देत जर संचालक मंडळाने माझ्या सूचना अमलात आणल्या नाही तर येथेच सभा घेऊन या संचालक मंडळाला निवडून दिल्याची चूक केल्याचे जाहीररित्या सांगेल, अशा कानपिचक्या राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी नव्या संचालक मंडळाला दिल्या. अकोलेच्या अगस्ती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत सत्तांतर घडल्यानंतर 29 व्या ऊस गळीत हंगामाचा व आसवानी प्रकल्पाचा शुभारंभ माजी उपमुख्यमंत्री व विरोधी पक्ष नेते…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क पाण्यात उतरलेल्या वीज प्रवाहामुळे चार भावंडांचा मृत्यू झाल्यानंतर बर्डे कुटुंबीयांच्या सांत्वनासाठी राजकीय पदाधिकाऱ्यांचा ओघ सुरू झाला आहे. सोमवारी (ता. १७ ऑक्टोंबर) सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी देखील अकलापुरमध्ये जाऊन या कुटुंबियांचे सांत्वन केले. राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्याशी तात्काळ मोबाईलवरून संवाद साधला. त्यानंतर या कुटुंबियांना जास्तीत जास्त मदत करण्याच्या सूचनाही त्यांनी अधिकार्यांना दिल्या. संगमनेर तालुक्यातील खंदरमाळवाडी गावांतर्गत असलेल्या वांदरकडा येथे तुटून पाण्यात पडलेल्या विज वाहिनीचा प्रवाह पाण्यात उतरल्याने विजेचा धक्का बसून अनिकेत अरुण बर्डे, ओंकार अरुण बर्डे, दर्शन अजित बर्डे, विराज अजित बर्डे या चार भावंडांचा दुर्दैवी मृत्यूची झाल्याची…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क म्युच्युअल फंड हा गुंतवणुकीचा उत्तम पर्याय आहे. म्युच्युअल फंडाच्या एसआयपीद्वारे देखील सामान्य व्यक्ती करोडपती होऊ शकतो. अशी स्वप्न आपण पाहिली पाहिजेत, असे प्रतिपादन म्युच्युअल फंड वितरक व कडलग इन्व्हेस्टमेंटचे व्यवस्थापकीय संचालक सुनील कडलग यांनी केले. भारत सरकारच्या श्रम मंत्रालयाच्या निर्देशानुसार येथील श्री सिद्धिविनायक कार्पोरेशनतर्फे आयोजित सुतारांसाठीच्या कौशल्य निर्मिती ‘संवाद ‘ प्रशिक्षण कार्यशाळेत सुतारांनी आर्थिक नियोजनाचे धडे गिरविले. ‘भारतीय अर्थव्यवस्था व सामान्य गुंतवणूकदारांचे संपत्ति निर्माण’ या विषयावर कडलग यांनी मार्गदर्शन केले. अध्यक्षस्थानी सिद्धिविनायकचे संचालक संदीप चोथवे तर अतिथी म्हणून ग्रीन प्लाईचे व्यवस्थापक राहुल साहू, मेरीनो लैमिनेट्सचे शाखा व्यवस्थापक जितेन्द्र पाटील, यूनिकोलचे नायर उपस्थित होते. कडलग म्हणाले, सद्यस्थितीत…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क संगणक विषयक सेवा पुरवणाऱ्या व्यावसायिकांच्या कॉम्प्युटर असोसिएशन ऑफ संगमनेर या संस्थेच्या अध्यक्षपदी मोहित मंडलिक, उपाध्यक्षपदी चेतन कोतुळकर तर संस्थेच्या सेक्रेटरीपदी संदीप जोंधळे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. संस्थेची नुकतीच वार्षिक बैठक पार पडली. या बैठकीत संस्थेच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या. संगमनेर शहराचा झपाट्याने विकास होतो आहे. शहरात सुमारे ६० पेक्षा जास्त व्यावसायिक या उद्योगात आहेत. ग्राहकांना योग्य दरात जास्तीत जास्त चांगली सेवा कशी देता येईल याची या बैठकीत चर्चा झाली. बैठकीमध्ये ऑनलाइन मार्केटमुळे बाजारात निर्माण झालेली स्पर्धा तसेच ग्राहकांच्या बदलत जाणाऱ्या आवडींविषयी यावर उपाध्यक्ष कोतुळकर यांनी चर्चा केली. तसेच संबंधित व्यावसायिकांनी या संस्थेचे सभासद…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क सुप्रसिध्द चित्रपट गीतकार बाबासाहेब सौदागर यांची मुंबई येथील अखिल भारतीय मराठी चित्रपट निर्माते महामंडळाच्या संचालकपदी निवड झाली आहे. कवी बाबासाहेब सौदागर हे २५ वर्षांपासून मराठी चित्रपट क्षेत्रात गीतकार पटकथा संवाद लेखक म्हणून कार्यरत आहेत. यशवंत भालकर यांच्या ‘सत्ताधीश’ चित्रपटात त्यांनी पहीला अभंग लिहीला. हे गीत सुरेश वाडकर यांच्या आवाजात ध्वनिमुद्रित झाले होते. या चित्रपटात भजनी मंडळ प्रमुखांच्या भुमिकेपासून त्यांनी अभिनयासाठी सुरुवात केली. यानंतर त्यांनी गीतलेखन क्षेत्रात पंचविस वर्षांत अनेक चित्रपटात गीत लेखनासोबत पटकथा संवाद लेखन आणि अभिनय केला. त्यांना अनेक प्रतिष्ठेचे पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. ‘अंतर्दाह’ चित्रपटातील गीत लेखनासाठी भारत सरकारच्या सह्याद्री वाहिनी मुंबई दुरदर्शनचा देखील…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याची सहकार क्षेत्रात लौकिकास्पद वाटचाल सुरू आहे. गतवर्षी कारखान्याने 15 लाख 53 हजार मेट्रिक टन विक्रमी गाळप करत चांगला भाव दिला होता. यावर्षी देखील कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादकांना 176 रुपये प्रोत्साहन पर अनुदान दिले जाणार आहे. कारखान्याच्या माध्यमातून दिले जाणारे ऊस उत्पादक व कामगारांसाठीचे 26 कोटी रुपये बाजारात येणार असल्याची माहिती काँग्रेसचे विधिमंडळ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी दिली. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ माजी मंत्री थोरात यांच्या हस्ते झाला. अध्यक्षस्थानी कारखान्याचे अध्यक्ष बाबा ओहोळ होते. तर व्यासपीठावर पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे, बाजीराव खेमनर,…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क आमदार रमेश लटके यांच्या दुर्दैवी निधनानंतर अंधेरी (पूर्व) मध्ये पोट निवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने उमेदवार देऊ नये येथून ‘ऋतुजा लटके आमदार होतील हे पाहावं’ अशा आशयाचं पत्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविले आहे. यासंदर्भात त्यांनी ट्विट करून माहिती दिली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे दिवंगत आमदार लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर भारतीय जनता पक्षाने मुरजी पटेल यांना लटके यांच्या विरोधात निवडणुकीच्या मैदानात उतरविले आहे. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलेल्या पत्रामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना…
रविवार विशेष महाराष्ट्रातील राजकारणाने घेतलेली निचत्तम पातळी ही राज्यातल्या राजकारण्यांना, त्यांच्या राजकीय पक्षांना आणि पक्षाच्या नेत्यांची लाज रस्त्यावर आणणारी ठरू लागली आहे. राज्याच्या इतिहासात राजकारणाचा स्तर इतका खाली गेल्याचं ऐकायलाही मिळत नाही. देशात प्रगल्भ राजकारणाचं केंद्र म्हणून एककाळी बोलबाला असलेल्या महाराष्ट्राविषयीची देशभरात होणारी चर्चा खूपच चिंता व्यक्त करणारी आहे. एका राजकीय पक्षाला राजकारणाच्या पटलावरून हद्दपार करण्याइतका निर्दयीपणा आजवरच्या चढ उतारात दिसला नाही. तोही शिवसेनेसारख्या कडवट हिंदुत्ववादी पक्षाबाबत होऊ लागल्याने साऱ्यांच्याच भुवया उंचावणं स्वाभाविक आहे. ५६ वर्षांच्या कालखंडात सेनेला असंख्य धक्के बसले. अनेक बडे नेते या पक्षाला सोडून गेले. शिवसेना कमजोर झाली पण संपली नाही. गणेश नाईक तर सत्ता असताना बाहेर…
वाचन प्रेरणा दिन विशेष प्रशासकीय कामांच्या रहाटगाड्यात अनेक अधिकारी वेळात वेळ काढून आपला वाचन छंद जोपासत आहेत. “शरीराला सुदृढ ठेवण्यासाठी व्यायाम करण्याची आवश्यकता आहे. मनाला स्थिर, सजग ठेवण्यासाठी वाचनाचा छंद जोपासणंही गरजेचं आहे. वाचनाने जीवनाप्रती सजगता येऊन कामात सकारात्मकता येते. दैंनदिन कामात ऊर्जा येते. निर्णय प्रक्रियेत गतिमानता येते”, अशा प्रतिक्रिया जिल्ह्यातील अधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा १५ ऑक्टोबर जन्मदिन राज्यभरात “वाचन प्रेरणा दिवस” म्हणून साजरा केला जातो. यानिमित्ताने जिल्ह्यातील विविध विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांनी आजपर्यंत केलेले वाचन, सध्या वाचन असलेले पुस्तक व एकूण वाचन संस्कृतीविषयी त्यांच्या भावना व्यक्त केल्या. त्याचा शिर्डी माहिती कार्यालयाचे माहिती अधिकारी…
रविवार विशेष :- २०२०-२०२१ या आर्थिक वर्षांची देशासह जगाकरिता अतिशय अडचणीचे वर्ष म्हणून इतिहास नोंद घेईल, नव्हे तर या शतकातील सर्वात अडचणीचे वर्ष म्हणून संबोधले जाईल चर्चा होती. केवळ ‘करोना’ या गंभीर आजाराच्या साथीबाबत एका बाजूला असे चित्र निर्माण झाले की जणू काही आता जगाचे विकासाचे चाक थांबणार मात्र हेच वर्ष संगमनेर तालुक्यासाठी अतिशय महत्त्वाचे ठरले आहे. या काळात करोनाची तीव्र लाट असतानाही पुणे-नाशिक या सेमी हायस्पीड रेल्वेची घोषणा करीत त्यासाठी लागणाऱ्या निधीची महाराष्ट्र सरकारने तरतूद केली. हा प्रकल्प सुमारे सोळा हजार कोटींचा असून तो २२० किलोमीटर लांबीचा असून हा रेल्वेचा मार्ग पुणे, अहमदनगर व नाशिक जिल्ह्यातून जात आहे यात…
