Author: अनंत पांगारकर
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क राज्यात नवं सरकार सत्तारूढ झाल, त्यावेळी मी तुरुंगात होतो. देवेंद्र फडणवीसांनी घेतलेले काही निर्णय नक्कीच चांगले आहेत. आम्ही विरोधाला विरोध करणारे अजिबात नाही. राज्यातल्या सरकार तेच चालवत आहे आणि त्यांची लवकरच भेट घेणार आहे. याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांना देखील भेटणार असल्याचे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. राऊत यांच्या फडणीसांविषयीच्या कौतुकास्पद उद्गाराची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. पत्राचाळ घोटाळा प्रकरणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांची बुधवारी रात्री तुरुंगातून जामीनावर सुटका झाल्यानंतर त्यांनी आज प्रसार माध्यमांशी संवाद साधला. राऊत म्हणाले, राज्य सरकारने अनेक चांगले निर्णय घेतले आहेत.…
प्राथमिकच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी वेतनाचा निधी इतरत्र वळविल्याने शिक्षण संचालकांकडून कारणे दाखवा नोटीस
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क जिल्हा परिषदेतील शिक्षकांचे ऑक्टोबर महिन्याचे वेतन विहित मुदतीत न दिल्याच्या कारणावरून आणि उपलब्ध करून दिलेल्या अनुदानाचा गैरवापर करत शासनाची प्रतिमा मलीन केल्याच्या कारणावरून शिक्षण संचालकांनी जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकाऱ्यांना (प्राथमिक) कारणे दाखवा नोटीसा बजावल्या आहेत. जिल्हा परिषदेमधील शिक्षकांचे ऑक्टोबर महिन्याचे वेतन अदा करण्यासाठी संचालनालय स्तरावरून तेरा हजार सातशे दहा कोटी सात लाख चौदा हजार रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आले होते. असे असताना देखील राज्यातील जिल्हा परिषद शिक्षकांचे वेतन अदा करण्यात आले नाही. पुरेसे अनुदान उपलब्ध करून देऊन देखील वेळेत शिक्षकांचे पगार झाले नसल्याने शिक्षकांमध्ये प्रशासना विरोधात रोष निर्माण झाला आहे. वितरित करण्यात आलेले अनुदान हे केवळ नियमित…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते प्रवक्ते व खासदार संजय राऊत पत्राचाळ घोटाळा प्रकरणी तुरुगांतून तब्बल तीन महिन्यानंतर जामीनावर सुटले आहे. शिवसेनेची बुलंद तोफ असलेले राऊत तीन महिन्यानंतर पुन्हा परतले असून ‘टायगर इज बॅक’ अशा घोषणा देत संगमनेरमध्ये त्यांच्या सुटकेचा आनंद फटाके फोडून साजरा करण्यात आला.बसस्थानक चौकात शहरप्रमुख प्रसाद पवार, माजी जिल्हा प्रमुख जयवंत पवार, माजी तालुकाप्रमुख कैलास वाकचौरे, समीर ओझा, भैय्या तांबोळी, युवासेनेचे जिल्हाप्रमुख अमित चव्हाण, जालिंदर लहामगे, माजी पंचायत समिती सदस्य अशोक सातपुते, जालींदर लहामगे आदींसह शिवसैनिकांनी जल्लोष करत राऊत यांच्या सुटकेचा आनंद व्यक्त करीत त्यांच्या सुटकेचे स्वागत केले. फटाक्याच्या आतीषबाजीने बसस्थानकाचा परिसर दुमदुमला…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क तब्बल १०१ दिवस तुरुंगात असलेल्या शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांना पत्राचाळ घोटाळा प्रकरणात पीएमएलए कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. संध्याकाळी त्यांची आर्थररोड कारागृहातून सुटका करण्यात आली. यावेळी कारागृहाबाहेर शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. राऊतांची सुटका झाल्याने ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत आनंदाचे वातावरण आहे. गळ्यात भगवा गमछा परिधान करुन संजय राऊत आर्थर रोड मध्यवर्ती कारागृहातून बाहेर आले. यावेळी शिवसैनिकांनी एकच जल्लोष केला. त्यामुळे कारागृहाबाहेरील परिसर कोण आला रे कोण आला… शिवसेनेचा वाघ आला… अशा घोषणांनी दुमदुमून गेला होता. बाहेर येताच राऊत यांनी स्वागतासाठी जमलेल्या कार्यकर्त्यांना नमस्कार केला आणि गाडीत बसून गेले. यावेळी माध्यमांशी…
सुयोग्य व्यवस्थापन व तालुकास्तरीय शिबिरांच्या माध्यमातून समितीचे जलद कामकाज महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क राज्यात १७ सप्टेंबर पासून जात वैधता प्रमाणपत्राच्या जलद वितरणासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहीमेंतर्गंत राज्यात ८५,८८४ प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत. यात सर्वाधिक ६३४४ प्रकरणे एकट्या अहमदनगर जिल्हा जात प्रमाणपत्र समितीने निकाली काढत राज्यात अव्वल स्थानावर झेप घेतली आहे. समितीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये समन्वय, सुयोग्य व्यवस्थापन, जलद निर्णय प्रक्रिया व तालुकास्तरावर घेतलेले शिबिरे या माध्यमातून अहमदनगर जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने केलेल्या कामकाजामुळे अहमदनगर जिल्हा समिती राज्यात अव्वल ठरली आहे. बार्टीने सेवा पंधरवडा कालावधी सुरू झाल्यापासून ते ८ नोव्हेंबर पर्यंत राज्यात निर्गमित करण्यात आलेल्या प्रकरणांची…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क राज्यभरातील 7751 ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयुक्त यु. पी. मदान यांनी जाहीर केला आहे. ग्रामपंचायत सदस्यांसह थेट सरपंच पदाच्या निवडणुकाही याच दिवशी होणार आहेत. ऑक्टोंबर ते डिसेंबर 2022 या कालावधीत मुदती संपणाऱ्या तसेच नव्याने स्थापित झालेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठीची नोटीस स्थानिक ठिकाणचे तहसीलदार 18 नोव्हेंबरला प्रसिद्ध करणार आहेत. या निवडणुकीसाठीची आचारसंहिता आजपासूनच लागू झाली आहे. इच्छुकांनी आपले उमेदवारी अर्ज 28 नोव्हेंबर ते दोन डिसेंबर 2022 या दरम्यान दाखल करावयाच्या आहेत. दाखल झालेल्या उमेदवारी अर्जाची छाननी 5 डिसेंबरला होणार असून 7 डिसेंबर पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत देण्यात आली आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी निवडणूक…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे खासदार संजय राऊत यांना अखेरीस आज विशेष पीएमएल न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे शिवसेनेच्या गोटात आनंदाचे वातावरण पसरले असून टायगर परत आलाय अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. खासदार संजय राऊत यांच्यासह प्रवीण राऊत यांनाही मंजूर करण्यात आला आहे. पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणात शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर विशेष पीएमएल न्यायालयात सुनावणीचे काम पूर्ण झाले होते. न्यायालयाच्या दिवाळी सुट्टी अगोदर झालेल्या सुनावणी दरम्यान अंमलबजावणी संचालनालयाच्या वतीने अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंह यांनी युक्तिवाद करत लेखी म्हणणे देण्यासाठी वेळ मागितला होता. मात्र जामीना संबंधीच्या याचिकेवरील आदेश 9 नोव्हेंबर पर्यंत न्यायालयाने राखून ठेवला…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क रोखठोक वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असलेले केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे कौतुक केले आहे. ‘उदारमतवादी अर्थव्यवस्थेमुळे देशाला नवी दिशा मिळाली. त्यासाठी देश मनमोहन सिंग यांचा ऋणी आहे’, अशा शब्दांत त्यांनी मनमोहन सिंग यांच्याबद्दल गौरवोद्गार काढले. दिल्लीत टॅक्स इंडिया ऑनलाईन पोर्टल आयोजित अवॉर्ड कार्यक्रमांमध्ये गडकरी बोलत होते. गडकरी म्हणाले, तत्कालीन अर्थमंत्री मनमोहन सिंग यांनी 1991 साली सुरू केलेल्या आर्थिक सुधारणांमुळे भारताला एक नवी दिशा मिळाली. उदारमतवादी आर्थिक धोरण शेतकरी आणि गरिबांसाठी असते. उदारमतवादी आर्थिक धोरणामुळे एखाद्या देशाचा कसा विकास होतो, याचे उत्तम उदाहरण चीन आहे. मनमोहन सिंग यांनी सुरू केलेल्या आर्थिक सुधारणांमुळे महाराष्ट्राचा मंत्री…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उत्तर नगर जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे यांचे मंगळवारी संगमनेरमध्ये भव्य स्वागत करत समर्थकांनी शक्ती प्रदर्शन केले. संगमनेरसह अकोले, कोपरगाव, राहता, श्रीरामपूर, नेवासे येथील शिवसेनेचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. शिवसेना पदाधिकारी निवडीवरून उत्तर नगर जिल्ह्यात शिवसेनेच्या दोन गटात मोठे रणकंदन सुरू आहे. या पार्श्वभूमीवर संपर्कप्रमुख बबन घोलप आणि जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे यांच्या समर्थकांमध्ये दोन गट पडले असून या दोन्ही गटांनी एकमेकांच्या नेत्याविरोधात आंदोलने केली होती. पक्षांतर्गत गटबाजी या निमित्ताने थेट पुणे प्रथमत:च समोर आली. नव्या पदाधिकाऱ्यांच्या निवडींना स्थगिती देण्यात आल्याने संगमनेरमध्ये जिल्हाप्रमुख खेवरे यांच्या प्रतिमेचे दहन करण्यात आले होते. त्यामुळे खेवरे समर्थकांनी पोलीस…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क फॉक्सकॉन, वेदांता सेमीकंडक्टर असे एका पाठोपाठ एक प्रकल्प महाराष्ट्राबाहेर जात आहे. ही बाब महाराष्ट्रासाठी दुर्दैवी ठरणारी असून टेक्निकल शिक्षण घेतलेल्या तरुणांसाठी राज्यात रोजगार निर्मिती न होणे आणि येणारे उद्योग परराज्यात जाणे, यामुळे येथील बेरोजगारीत मोठी वाढ होणार असल्याचे प्रतिपादन नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांनी केले. सह्याद्री महाविद्यालयामध्ये झालेल्या युवक करिअर मार्गदर्शन मेळाव्यात आमदार डॉ. तांबे बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. दीनानाथ पाटील होते. डॉ. बाळासाहेब वाघ, प्रा. शिवाजी नवले, प्रा. लक्ष्मण घायवट व्यासपीठावर उपस्थित होते. तांबे म्हणाले, महाराष्ट्र हे देशातील एक प्रगतशील राज्य आहे. मात्र सध्या नव्याने सत्तारूढ झालेल्या सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे गेल्या…
