Author: अनंत पांगारकर
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क काँग्रेस अध्यक्षपदी वर्णी लागतात मल्लिकार्जुन खर्गे यांनी काँग्रेसमध्ये धक्कादायक निर्णयांना सुरुवात केली आहे. पदभार हाती घेताच त्यांनी काँग्रेसचा आत्मा समजली जाणारी काँग्रेस वर्किंग कमिटी (CWC) बरखास्त करीत नवी सुकाणू समिती जाहीर केली. काँग्रेसच्या नव्या सुकाणू समितीत अनेक बड्या नेत्यांना दूर ठेवण्यात आले असल्याचे दिसते. नव्या वर्किंग कमिटीमध्ये महाराष्ट्रातून कोणाची वर्णी लागणार याची उत्सुकता काँग्रेसमध्ये आहे. या समितीत काँग्रेसच्या माजी अध्यक्षा खासदार सोनिया गांधी, खासदार राहुल गांधी आणि माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना स्थान देण्यात आले आहे. जोपर्यंत काँग्रेसची नवी कार्यकारिणी स्थापन होत नाही तोपर्यंत पक्षाचे कामकाज या सुकाणू समितीच्या माध्यमातून चालणार आहे. नवीन समिती सहजपणे…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे पहिले राज्यस्तरीय अधिवेशन पुस्तकांचं गाव भिलार (महाबळेश्वर) येथे शनिवारी (२९ ऑक्टोबर) होणार आहे. अधिवेशनाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हस्ते होणार असून अधिवेशनाच्या अध्यक्षपदी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील तर स्वागताध्यक्षपदी सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई, स्वागत कार्याध्यक्षपदी सिक्कीमचे माजी राज्यपाल खासदार श्रीनिवास पाटील व प्रमुख पाहुणे म्हणून श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले हे उपस्थित राहणार असल्याची माहिती डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे संस्थापक ,अध्यक्ष राजा माने यांनी पत्रकार परिषदेत दिली.यावेळी संघटनेच्यावतीने राज्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांना दिल्या जाणाऱ्या “महाराष्ट्र महागौरव” पुरस्कारांची घोषणा करण्यात…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क सर्वत्र दीपावली पाडव्याच्या सण उत्साहात साजरा होत असताना संगमनेर तालुक्यातील साकुरमधून दुःखद घटना समोर आली आहे. सातपूर नजीक पिंपळगाव देपा गावात झालेल्या दुचाकी आणि छोटा हत्ती टेम्पोच्या अपघातात मोटरसायकलवरील दोघा तरुणांचा मृत्यू झाला.ओम राहूल पेंडभाजे (वय १९ वर्ष) व शुभम सदाशिव टेकुडे (वय १८ वर्ष, दोघे रा. देवगिरी वस्ती, साकूर, ता. संगमनेर) अशी अपघातात ठार झालेल्या दोघा तरूणांची नावे आहेत. घारगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास साकुरहून मोटार सायकलवर हे दोघे तरुण संगमनेरच्या दिशेने येत असताना संगमनेरकडून साकुरच्या दिशेने जाणाऱ्या छोटा हत्ती टेम्पोने या तरुणांच्या दुचाकीला पिंपळगाव देपा गावाच्या शिवारात जोराची धडक दिली.अपघातानंतर…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क सरकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी फोनवर ‘वंदे मातरम’ म्हणावे, वैद्यकीय व्यावसायिकांनी आपल्या पिस्क्रीप्शनवर ‘श्रीहरी’ लिहावे, अशा सरकारच्या फतव्यानंतर आता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी वेगळीच मागणी केली आहे. या मागणी संदर्भात ते पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र देणार आहेत. देशात सुख-समृद्धी हवी असेल तर भारतीय रुपयांवर महात्मा गांधींसोबत लक्ष्मी-गणेश यांचे छायाचित्र असायला हवे असे मुख्यमंत्री केजरीवाल यांनी म्हटले आहे. बुधवारी पत्रकार परिषद घेत त्यांनी ही मागणी केंद्र सरकारकडे केली आहे. केजरीवाल म्हणाले, देशाची अर्थव्यवस्था बिकट परिस्थितीतून जात आहे. डॉलरच्या तुलनेत रुपयाचे दिवसेंदिवस अवमूल्यन होत आहे. याचे परिणाम सर्वसामान्यांवर दिसू लागले आहेत. देशातील सामान्यांचे हाल होत असून हा देश समृद्ध…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क शिवसेनेत उद्भवलेला पेच अद्यापही कायम आहे. आपल्या गटाला समर्थन असल्याचे सिद्ध करण्यासाठी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रापैकी तब्बल अडीच लाख प्रतिज्ञापत्र केंद्रीय निवडणूक आयोगाने अवैध ठरविले आहे. तर उर्वरित प्रतिज्ञापत्र वैध असल्याचा निर्वळा आयोगाने दिला आहे.चार महिन्यांपूर्वी झालेल्या शिवसेना फुटीनंतर तात्पुरत्या स्वरूपात शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह गोठविल्यामुळे पक्षाच्या अडचणी वाढल्या असतानाच आता केंद्रीय निवडणूक आयोगाचा नवीन निर्णय समोर आला आहे. दरम्यान शिवसेना नावावर आणि धनुष्यबाण चिन्हावर ठाकरे आणि शिंदे दावा केल्यानंतर हा वाद केंद्रीय निवडणूक आयोगापर्यंत पोहोचला होता.त्यामुळे आपल्याच गटाला पदाधिकारी कार्यकर्त्यांचे समर्थन असल्याचे दावा करणारे प्रतिज्ञापत्रे ठाकरे-शिंदे गटातर्फे निवडणूक आयोगाकडे दाखल करण्यात आली होती. ठाकरे…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क बालकांच्या हृदयरोगाबाबत झालेली जनजागृती आणि सर्वसामान्य रुग्णांच्या मागणीमुळे या महिन्यात पुन्हा एकदा एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये बालकांच्या हृदय उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या महिन्यात तब्बल आठवडाभर बालकांवर मोफत हृदयउपचार करण्यात येणार आहेत.गेल्या दोन महिन्यांत आयोजित करण्यात आलेल्या बालकांवरील मोफत हृदयउपचार आरोग्य शिबिरास भरघोस प्रतिसाद मिळाला. तब्बल ८२ बालकांवर यशस्वी हृदय उपचार करण्यात आले. ठाणे, पालघर जिल्ह्यासह संपूर्ण उत्तर महाराष्ट्रातील रुग्णांचा या आरोग्य शिबिराला मोठा प्रतिसाद लाभला. आज २६ ऑक्टोंबरपासून या शिबिरास सुरुवात होणार असून जास्तीत जास्त रुग्णांनी संपर्क साधावा असे आवाहन एसएमबीटी हॉस्पिटलच्या प्रशासनाकडून करण्यात आले आहे. एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये गंभीर आजारांवरील उपचार होत आहेत. गंभीर आजारांवरील…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क विकृतपणाचा कळस गाठणारी आणि प्रत्येकाच्या मनात संताप निर्माण होईल अशी संतापजनक घटना पुण्यातून समोर आली आहे. पुण्याच्या वारजे माळवाडी भागात तेरा महिन्याच्या चिमुकलीवर अत्याचार करण्यात आला असून आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. ओळखीतल्या व्यक्तीनेच हे संताप आणणारे कृत्य केले आहे. पोलिसांकडील माहितीनुसार वारजे माळवाडी परिसरात मजुरी करणारे दांपत्य राहते. या दांपत्याला एक तेरा महिन्यांची चिमुकली आहे. चिमुकलीचे आई-वडील काही कामानिमित्त बाहेर जाण्यासाठी निघाले होते. त्यावेळी आरोपीने, तुम्ही येईपर्यंत मी चिमुकलीचा सांभाळ करतो. तुम्ही बिनधास्त जा, असे सांगत चिमुकलेला आपल्या कडेवर उचलून घेतले. संबंधित व्यक्ती ही विश्वासातील आणि ओळखीचे असल्याने तो आपल्या चिमुकलीचा सांभाळ करेल, असा विश्वास…
अनंत पांगारकर | महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क राज्याचे महसूल मंत्री आणि अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री असलेल्या राधाकृष्ण विखे पाटील यांनी महसूल खात्याचा पदभार हाती घेतल्यानंतर वाळू संदर्भात निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. मात्र त्यांचे हे निर्णय राज्यासाठी नसून केवळ संगमनेर आणि पारनेर या दोन तालुक्यासाठीच असल्याची टीका मंत्री विखे यांच्यावर होत आहे. या पार्श्वभूमीवर संगमनेर शिवसेनेची समाज माध्यमांवर व्हायरल होत असलेली पोस्ट चर्चेचा विषय ठरली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नुकताच औरंगाबाद दौरा करत अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांशी संवाद साधला होता. ठाकरे यांच्या या भेटीवर महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी टीका केली होती. या टीकेमुळे नाराज झालेल्या…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क गेल्या वर्षी राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचे नेतृत्व करून चर्चेत आलेले आणि सत्तांतर झाल्यानंतर फारसे चर्चेत नसलेल्या ॲड. गुणरत्न सदावर्ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. सदावर्ते यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे संपादक असलेल्या दैनिक ‘सामना’वर बंदीची मागणी केली आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष असलेल्या शरद पवार यांच्या घरावरील हल्ला प्रकरणी सदावर्ते यांना अटक करण्यात आली होती. अनेक दिवस अटकेत असलेल्या सदावर्ते यांनी नंतरच्या काळात मवाळ भूमिका घेतली.महाविकास आघाडी सरकार पडल्यानंतर राज्यात शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आले त्यानंतर देखील जवळपास तीन महिने सदावर्ते शांत होते.अलीकडेच शिंदे-फडणवीस सरकारने क्लीनचीट दिलेल्या व आयपीएस अधिकारी असलेल्या रश्मी शुक्ला यांच्याबद्दल दैनिक सामनातून येत असलेल्या बातम्यांचे कारण…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क शहराची सांस्कृतिक ओळख अधोरेखित करणारा आणि पहाट गाणी ही संकल्पना संगमनेरमध्ये रुजविणारा दिवाळी पहाट गाणी हा कार्यक्रम येत्या बुधवारी (दि.२६) पहाटे साडेपाच वाजता भंडारी मंगल कार्यालयात होणार आहे. संगमनेर इतिहास संशोधन मंडळ आणि स्वसंगम संगीत प्रसारक संस्था यांच्या वतीने सादर होणाऱ्या कार्यक्रमाला संगमनेरकर रसिकांनी नेहमीप्रमाणे मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन कार्यक्रमाचे संयोजक डॉ. संतोष खेडलेकर यांनी केले आहे. दरवर्षी वेगवेगळ्या संकल्पना घेऊन दिवाळी पहाट गाणी हा कार्यक्रम सादर केला जातो. या वर्षी स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर, ज्येष्ठ गायक भूपेन हजारिका, संगमनेरच्या भूषण गुलाबबाई संगमनेरकर हे महान कलाकार आपल्यातून गेल्याने, शाहीर साबळे यांचे हे जन्मशताब्दी वर्ष असल्याने…
