Author: अनंत पांगारकर

सोमवार, १७ जून २०२४ विविध कारणावरून विवाहितेला शिवीगाळ करत शारीरिक मानसिक त्रास देऊन घराबाहेर काढण्याचा प्रकार कनकुरी (ता. राहाता) येथे घडला. या संदर्भात घुलेवाडी संगमनेर येथील विवाहितेने दिलेल्या फिर्यादीवरून सासरच्या लोकांविरुद्ध संगमनेरमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पती यशोदीप बाबासाहेब शेटे, सासरा बाबासाहेब बबनराव शेटे, सासू वृषाली बाबासाहेब शेटे व दीर श्रेयस बाबासाहेब शेटे (सर्व रा. कनकुरी ता. राहाता) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. विवाहिता कनकुरी येथे सासरी नांदत असताना आरोपींनी तिला तिच्या वडिलांनी लग्नात दोन लाख रुपये हुंडा दिला नाही, आमचा मानपान नीट केला नाही, तुला घरातील कामे नेट येत नाही या कारणावरून शिवीगाळ करत शारीरिक व…

Read More

सोमवार, १७ जून २०२४ संगमनेर शहर पोलिसांनी दागिने चोरीच्या गुन्ह्यातील हस्तगत केलेले दागिने फिर्यादी महिलेस परत करण्यात आले आहे. चोरी गेलेले दागिने परत मिळाल्याने महिलेच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण झाला होता. संगमनेर शहरात दागिने चोरीच्या घटना वारंवार घडत आहे. दागिने चोरांना पकडण्याचे मोठे आव्हान शहर पोलिसांसमोर आहे. आशा स्थितीतही दिलासादायक घटना समोर आली आहे. संगमनेर पोलिसांनी पकडलेल्या आरोपीकडून या गुन्ह्यातील सोने हस्तगत केले होते. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे हस्तगत केलेला मुद्देमालातील चार तोळ्याचे सोन्याचे दागिने तक्रारदार महिलेचे असल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने ते संबंधित महिलेला पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या हस्ते शहर पोलिसांनी परत केले आहे. संगमनेरचे पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली…

Read More

सोमवार दिनांक १७ जून २०२४ शेतकऱ्यांची पिळवणूक करणाऱ्या कृषी केंद्र चालकांवर गुन्हे दाखल करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी दिल्यानंतर कृषी विभाग ॲक्शन मोडवर आला आहे. जिल्ह्यात अचानक करण्यात आलेल्या तपासणींमध्ये बारा कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित करण्यात आले. ३० पेक्षा अधिक कृषी सेवा केंद्रांना नोटीस बजावण्यात आल्या तर तीन ठिकाणी थेट गुन्हे दाखल केल्याची माहिती समोर आली. यंदा सर्वत्र चांगला पाऊस पडणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. या पार्श्वभूमीवर कृषी विभाग बियाणे खते आणि कीटकनाशकांचा काळाबाजार रोखण्यासाठी ॲक्शन मोडवर आले आहे. बाजारपेठेत कपाशी सोयाबीन कडधान्य पिकाच्या बियाण्यांना मोठी मागणी असून बियाण्यांचा काळाबाजार, चढ्या दराने विक्रीच्या तक्रारी वाढल्या आहेत.…

Read More

रविवार, दि.१६ जून २०२४ प्रवरेच्या विद्यार्थिनींचा शेततळ्यात बुडून झालेला मृत्यू दुर्दैवी असून पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून कुटुंबीयांना शासकीय मदत मिळवून देण्याचे आश्वासन जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष शालिनी विखे पाटील यांनी दिले. तीन शालेय विद्यार्थिनींचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर आल्यानंतर रविवारी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष शालिनी विखे पाटील यांनी मृत विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांची भेट घेत त्यांना दिलासा दिला. मृत मुलींपैकी अनुष्का बढे आणि सृष्टी ढापसे या प्रवरा कन्या विद्या मंदीर विद्यालयाच्या विद्यार्थीनी असल्याने या दुर्दैवी घटनेचे प्रवरा परीवारालाही दुःख झाले. पालक मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी देखील घटनेच्या दिवशी दुख व्यक्त करून कुटूबियांना सर्वतोपरी मदत करण्याच्या सूचना केल्या…

Read More

रविवार, दिनांक १६ जून २०२४ शनिवारी संगमनेर तालुक्यातील मेंढवन येथे तीन विद्यार्थिनींचा शेततळ्याच्या पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना अत्यंत दुर्दैवी असल्याचे स्पष्ट करत तालुक्याचे लोकप्रतिनिधी माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात व युवक काँग्रेसचे अध्यक्ष, कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्री थोरात यांनी रविवारी मृत विद्यार्थिनींच्या कुटुंबीयांची भेट घेत त्यांचे सांत्वन केले. शनिवारी शालेय नवीन वर्षाला प्रारंभ झाला. सृष्टी उत्तम डापसे (इयत्ता सहावी, वय- १३ वर्ष), वैष्णवी अरुण जाधव (इयत्ता सहावी, वय १२ वर्ष) आणि अनुष्का सोमनाथ बडे (इयत्ता चौथी, वय १० वर्ष) या शालेय विद्यार्थिनींचा शाळेतून परतून येत असताना गावालगत असलेल्या शेततळ्यात बुडून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. महाविकास आघाडीच्या बैठकीसाठी मुंबईत…

Read More

रविवार दिनांक १६ जून २०२४ शेअर ट्रेडिंगमध्ये नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत एका सेवानिवृत्त कर्मचाऱ्याची रिचा सेठी नावाच्या महिलेने ६६ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार अहमदनगरमध्ये समोर आला आहे. या संदर्भात शुक्रवारी अहमदनगरच्या सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक माहिती अशी, फिर्यादीच्या व्हॉट्सअपवर रिचा सेठी नावाच्या महिलेचा शेअर ट्रेडिंगबाबत मेसेज आला होता. या मेसेजच्या अनुषंगाने फिर्यादीने संबंधित महिलेकडून शेअर ट्रेडिंग बाबत अधिक माहिती घेतली. त्याच दरम्यान महिलेने फिर्यादीचा विश्वास संपादन करत शेअर ट्रेडिंग मध्ये पैसे गुंतवल्यास अधिक नफा मिळवून देण्याचे आमिष दाखविले. जास्तीचे पैसे मिळण्याच्या आमिषाने या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी सेठी नावाच्या महिलेने सांगितलेल्या बँक खात्यात…

Read More

रविवार दिनांक 16 जून 2024  केंद्रात सरकार स्थापन करतेवेळी मोदींना पाठिंबा देताना तेलगू देसम पक्षाचे नेते चंद्रबाबू नायडू यांनी लोकसभेचे अध्यक्षपद मागितले होते. चंद्राबाबू नायडू यांनी लोकसभा अध्यक्षपदासाठी उमेदवार दिला तर त्याला आम्ही पाठिंबा देऊ तसेच संपूर्ण इंडिया आघाडीचा पाठिंबा देण्यासंदर्भात इंडिया आघाडीत चर्चा केली जाईल, अशी भूमिका शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केली. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीनंतर प्रथमत:च संसदेचे पहिले अधिवेशन सोमवारपासून (24 जून) सुरू होत आहे. या अधिवेशनात लोकसभेचा अध्यक्ष निवडला जाणार आहे. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली देशात एनडीएचे सरकार स्थापन झाले आहे. त्यामुळे मोदींना पाठिंबा देताना तेलगू देसमचे नेते चंद्रबाबू नायडू यांनी लोकसभा अध्यक्षपदाची…

Read More

रविवार, दिनांक १६ जून २०२४ लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेले महायुतीचे उमेदवार ॲड. उज्वल निकम पुन्हा न्याय विभागाच्या कक्षेत दाखल झाले आहेत. विशेष सरकारी वकील म्हणून पुन्हा ते सांगलीतील खटल्यासह राज्यातील महत्त्वाच्या खटल्यामध्ये कामकाज पाहणार आहे. ॲड. उज्वल निकम हे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मुंबई उत्तर मध्य मतदारसंघात भारतीय जनता पार्टीचे (महायुती) उमेदवार म्हणून रिंगणात उतरले होते. निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी त्यांनी विशेष सरकारी वकीलपदाचा राजीनामा राज्य विधी व न्याय विभागाकडे दिला होता. हा राजीनामा स्विकारण्यात आला होता. त्यांचा निवडणुकीत पराभव झाला होता. त्यामुळे निकम पुन्हा त्यांच्याकडून खटल्यात सरकारी वकील म्हणून काम पाहणार का याची उत्सुकता होती.राज्य शासनाने फौजदारी प्रक्रिया संहिता…

Read More

विशेष प्रतिनिधी / मुंबई लोकसभा निवडणुकीत राज्यातील जनतेने दाखविलेला विश्वास सार्थकी नेण्यासाठी पुढे येणाऱ्या निवडणुकीसाठी एकत्रितपणे सामोरं जाण्याचा निर्णय महाविकास आघाडीतील तिन्ही घटक पक्षानी घेतला आहे. या निर्णयाची घोषणा आघाडीच्या नेत्यांनी शनिवारी मुंबईत सयुक्त पत्रकार परिषदेत केली. लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभेतही निश्चितच परिवर्तन होईल असा दावा घटक पक्षाच्या नेत्यांनी केला आहे. मुंबईत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये संयुक्त पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस शदरचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार तसंच काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण उपस्थित होते. पत्रकार परिषदेत काय म्हणाले नेते … उद्धव ठाकरे म्हणाले – राज्यातील जनतेचे आभार मानले. देशातील जनता आता जागी झाली आहे. त्यांना खरेपणा, खोटेपणा यातला फरक कळतो.…

Read More

शनिवार, दिनांक १५ जून २०२४ पीडब्ल्यूडीचे अधिकारी, चार जेसीबी, चार ट्रॅक्टर, नगरपालिकेचे चीफ ऑफिसर त्यांचा सर्व स्टाफ संगमनेर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आणि त्यांचा पुरुष व महिला पोलीस स्टाफ, पोलीस व्हॅन हा सर्व लवाजमा अकोले नाका येथे सुमारे चार महिन्यांपूर्वी कोणाच्या तरी सांगण्यावरून पूर्व नियोजन करून आला. म्हाळुंगी नदीच्या गाळपेर क्षेत्रात १९७५ पासून अनेक घरे, वस्ती करून राहतात. कोणी वेल्डिंग काम करतात, महिला धुण्या-भांड्याचे, कोणी गवंडीकाम तर कोणी भंगार गोळा करण्याचे काम करतात. सर्व सामान्य हातावरची माणसं. सरकारी यंत्रणा आल्यावर त्यांनी घरे पाडण्यास सुरुवात केली. आडवे आलेल्या लोकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. सरकारी यंत्रणेपुढे भयभीत होऊन शांत बसलेले लोक, चेहऱ्यावर…

Read More