Author: अनंत पांगारकर
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आपण आपल्या आमदारकीचा राजीनामा देत असल्याची घोषणा काही वेळापूर्वीच ट्विटरद्वारे केली आहे. जितेंद्र आव्हाड या घोषणेने राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. आव्हाड यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, ‘पोलिसांनी माझ्याविरुद्ध ७२ तासात दुसरा खोटा गुन्हा दाखल केला आणि तोही ३५४… मी ह्या पोलिसी अत्याचाराविरुद्ध लढणार… मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतो आहे… लोकशाहीची हत्या… उघड्या डोळ्याने नाही बघू शकत, असं म्हणत आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्याचं ट्विटरवरुन जाहीर केलं आहे. आव्हाड यांनी नुकतच ‘हर हर महादेव’ या मराठी चित्रपटात इतिहासाची तोडमोड केल्याचा दावा करत काही…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क नासिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे आणि टोल प्रशासना विरोधात संगमनेर मध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसने केलेल्या उपोषणाला आठवडा उलटत नाही तोच महामार्गावरील खड्ड्यांसंदर्भात आता खासदार अमोल कोल्हे संतप्त झाले असून त्यांनी थेट या खड्ड्यांमध्ये संबंधित अधिकारी आणि ठेकेदाराच्या नावासह मोबाईल क्रमांकाचे फलक लावण्याचा इशारा दिला आहे. नासिक-पुणे मार्गाचे चौपदरीकरणाचे काम बहुतांशी पूर्ण झाले आहे तसेच या मार्गावरील टोल नाके देखील सुरू झाले असून वाहन चालकांकडून टोल असलेली सुरू झाली आहे. मात्र या मार्गावर ठिकठिकाणी खड्डे झाल्याने वाहन चालकांचे हाल होत आहे. यातून अपघाताच्या देखील अनेक घटना घडल्या. अनेक जण जायबंदी झाले तर अनेकांना आपले जीव गमवावे लागले. महामार्गावर…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा सर्व वेळ शरद पवार आणि काँग्रेसला सांभाळण्यात गेला. महा विकास आघाडी सरकारच्या काळातील चुकांमुळे राज्यात येऊ घातलेले औद्योगिक प्रकल्प महाराष्ट्राच्या बाहेर गेले. आणि त्याचे खापर मात्र शिंदे फडणवीस सरकारवर फोडले जात असल्याची टीका भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. बावनकुळे सांगलीमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. ते म्हणाले, उद्धव ठाकरे यांना उद्योजकांशी काहीही देणे-घेणे नव्हते. शरद पवार आणि काँग्रेसला सांभाळणारे ठाकरे बोलत नव्हते म्हणून त्यांचे आमदार देखील त्यांना सोडून गेले तर त्यांच्या कार्यकाळामध्ये राज्यातील उद्योग बाहेर का जाणार नाही असा प्रश्न उपस्थित केला. राज्यात गुंतवणूक व्हायचे असेल तर उद्योजकांचे चर्चा…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क उद्धव ठाकरे यांनी दगाबाजी करून मुख्यमंत्री पद मिळविले. मुंबईतील अनेक प्रकल्प रोखण्याचे काम त्यांनी आणि त्यांच्या मुलाने केले. कोणताही व्यवसाय न करता ठाकरेंची करोडची संपत्ती कशी असा सवाल करत महापालिकेतून येणारे खोके बंद झाल्याने ते अस्वस्थ झाल्याची टीका भाजपचे मुंबई प्रभारी आमदार अतुल भातखळकर यांनी केली. भारतीय जनता पार्टीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘जागर मुंबईचा’ या अभियानांतर्गत शनिवारी झालेल्या कांदिवलीच्या सभेत ते बोलत होते. यावेळी खासदार गोपाळ शेट्टी, आमदार योगेश सावंत उपस्थित होते. भातखळकर म्हणाले, स्वतःला हिंदुत्वाचे ठेकेदार मानणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी हिंदू समाज आणि मुंबईतील जनतेत फूट पाडण्याचे घाणेरडे काम सुरु केले आहे. त्यांनी मुंबईच्या…
आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपरिषद निवडणुकीसाठी युवा सैनिकांनी सज्ज राहावे महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क युवा सेनेच्या कामाला गती येण्यासाठी जेथे पदाधिकाऱ्यांमध्ये बदल आवश्यक आहे तेथे, निश्चित बदल केला जाईल. मात्र ज्याचे काम चांगले आहे त्याचा देखील सन्मान केला जाणार असल्याचे प्रतिपादन युवा सेनेचे शिर्डी लोकसभा विस्तारक मितेश साटम यांनी केले. साटम यांच्या उपस्थितीत शनिवारी संगमनेरच्या शासकीय विश्रामगृहामध्ये युवा सेनेची बैठक पार पडली. यावेळी युवा सेनेचे जिल्हा प्रमुख अमित चव्हाण, शिवसेना उपजिल्हाप्रमुख मुजीब शेख, शिवसेना तालुकाप्रमुख भाऊसाहेब हासे, शिवसेना शहर प्रमुख अमर कतारी, कोपरगाव येथील युवा नेते भैय्या तिवारी, पठार भागातील ज्येष्ठ शिवसैनिक रंगनाथ फटांगरे, माजी शहर प्रमुख संजय…
रविवार विशेष | प्रवीण पुरो (लेखक दैनिक आपलं महानगरचे माजी निवासी संपादक आहेत) ईडीच्या नाचऱ्या मोराला न्यायालयाने अद्दल घडवली हे बरंच झालं. आपल्या मर्जीला येईल तसा सरकारी यंत्रणांचा वापर करू शकतो, असा अहंगड भाजप नेत्यांच्या डोक्यात गेला होता. 2014 पासून हे नेते सुटल्यासारखे वागत होते. ईडी आणि सीबीआयचा कसाही वापर करायचा आणि विरोधकांचा आवाज दाबायचा ही विकृती भाजप नेत्यांनी जोपासली होती. यातून सत्ता आणि मत्ताही हाती लागते. हे त्यांना ठावूक होतं. 2014 ची सत्ता काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते फोडून भाजपने अशीच ताब्यात घेतली होती. पुढे हा मार्ग एकहाती अनुसरला गेला आणि फोडाफोडीचं घृण कृत्य भाजपने अवसरलं. लाचार झालेले…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क बक्षीसपत्राने दिलेल्या जमिनीची सातबारा उताऱ्याव नोंद करण्याचे आदेश देण्यासाठी मॅडमनी एका मध्यस्थाच्या मार्फत तब्बल ५ लाखाची लाच मागितली. दुसऱ्या दिवशी ही रक्कम ३ लाखावर आली आणि २ लाख रुपयांची रोकड स्विकारतांना मध्यस्थ लाचलुचपतच्या जाळ्यात अडकला. मध्यस्थ जाळ्यात अडकताच तहसिलदार मॅडमच्या घरी लाच लुचपतने छापा टाकला आणि मॅडमलाही ताब्यात घेतले. नंतर मॅडमच्या घराची झडती घेतली असता तेथे ७५ हजाराची तर मुंबईतील विक्रोळी येथील घरात एक कोटीहून अधिक रोख रक्कम सापडली. संपत्तीची मोजदाद सुरु केल्यानंतर मॅडमकडे तब्बल ६० तोळे सोने असल्याचे आढळून आले. एखाद्या सामान्य अधिकाऱ्याची ही कथा नाही तर ती आहे अलिबागच्या महिला तहसिलदारांची. मिनल कृष्णा दळवी…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क ८७ वर्षीय कर्करोगग्रस्त वृद्ध रुग्णावर गुंतागुंतीची शस्रक्रिया करण्यात एसएमबीटीच्या कर्करोग तज्ञांना यश आले आहे. विशेष म्हणजे शस्त्रक्रियेच्या दुसऱ्याच दिवशी या रुग्णाने फेरफटका मारत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. सकारात्मकता, दुर्दम्य इच्छाशक्ती आणि कुटुंबियांची साथ असेल तर कुठल्याही आजारावर मात करणे शक्य होते, असे म्हटले जाते. याच उक्तीचा प्रत्यय नाशिकमधील एसएमबीटी कॅन्सर इन्सिट्यूटमध्ये आला. धूम्रपान करणाऱ्या कोपरगाव येथील ८७ वर्षीय अजीज मन्सुरी यांना गेल्या काही दिवसांपसून खोकल्याचा त्रास होता. अनेक ठिकाणी त्यांनी वैद्यकीय उपचार केले मात्र निदान झाले नाही. काही दिवसांनी त्यांच्या खोकल्यातून रक्तदेखील पडू लागल्याने मन्सुरी यांच्या कुटुंबीयांनी त्यांना नाशिकमधील एका रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र रुग्णाची…
महाराष्ट्र संवाद न्यूज कुठलाही प्रकल्प तीन-चार महिन्यात येतो आणि जातो असे घडत नसते. ती काही जादूची कांडी नाही. फिरवली की आला आणि गेला. कोणताही प्रकल्प लगेचच राज्याबाहेर जात नाही. आरोप कोणीही करू शकतो. मात्र आमचे सरकार उद्योगाला चालना देणारे उद्योगांचे स्वागत करणारे सरकार आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. आणखीन एक प्रकल्प मध्य प्रदेशमध्ये गेला आहे, या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिंदे यांना विचारले असता ते म्हणाले, तीन-चार महिन्यांपासून गेल्या अडीच वर्षात प्रलंबित असलेल्या कामांना चालना देण्याचे काम आमच्याकडून सुरू आहे. विकास प्रकल्पांना वॉर रूममध्ये घेतले असून, त्याचा दररोज आढावा घेतला जातोय. राज्याचा सर्वांगीण विकास करणे आणि थांबलेल्या प्रकल्पांना पुढे…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क राज्यात सत्तारूढ झालेल्या शिंदे फडणवीस सरकारने महाविकास आघाडीच्या निर्णयांना स्थगिती देण्याचा धडका लावला असताना गरिबासाठी अन्नदात्री ठरलेली शिवभोजन थाळी सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र राज्यभरात या थाळ्यांचे यशदा आणि टीस या दोन संस्थांमार्फत ऑडिट केले जाणार आहे. नवे सरकार अस्तित्वात आल्यानंतर आधीच्या सरकारांच्या निर्णयांना जशी स्थगिती मिळाली तशाच पद्धतीने शिवभोजन थाळी देखील बंद केली जाण्याची चिन्हे होती. मात्र सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिवभोजन थाळी सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतल्याने या निर्णयाबद्दल समाधान व्यक्त होत आहे. शिवभोजन थाळी सुरू ठेवण्यासंदर्भात मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात आला असून प्रत्येक जिल्ह्यात पालकमंत्री शिवभोजन थाळीचा आढावा घेणार आहेत. तसेच राज्यभरात यशोदा आणि…
